Saturday, 28 October 2023

जिल्ह्यात उभे राहणार 52 नवीन तलाठी कार्यालय


 जिल्ह्यात उभे राहणार 52 नवीन तलाठी कार्यालय

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे 18 कोटी 19 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता

चंद्रपूरदि. 27 : ग्रामीण भागात नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच गावपातळीवरील प्रशासकीय कारभार उत्तम रितीने चालावायासाठी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकारामुळे 52 नवीन तलाठी कार्यालयाची निर्मिती होणार आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबत महसूल व वनविभागाने 17 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

चंद्रपूर हा नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असल्याने तेथील गावांमध्ये प्रशासकीय कामकाम उत्तमरित्या चालावेगावातील नागरिकांना आवश्यक असलेले महत्वाचे दाखलेकृषीविषयक नोंदी / कागदपत्रे वेळेत मिळावेतयासाठी नवीन तलाठी कार्यालयांची आवश्यकता होती. याबाबत प्रशासनाकडून सुरवातीला 7 कोटी 80 लक्ष रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र कर्मचा-यांच्या निवासस्थानासह तलाठी कार्यालयाची निर्मिती करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला सुचना केल्या. त्यानुसार विशेष बाब म्हणून 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला. राज्य शासनाने या प्रस्तावाला नुकतीच मंजूरी दिली असून नवीन तलाठी कार्यालय व कर्मचा-यांच्या निवासस्थानाचा मार्ग मोकळा झाला आहे. यात पोंभुर्णा तालुक्यात 11चंद्रपूर तालुक्यात 6बल्लारपूर तालुक्यात 7 आणि मुल तालुक्यात 28 असे एकूण 52 नवीन तलाठी कार्यालये उभारण्यात येणार आहे.

गावपातळीवरील राज्य शासनाचा महत्वाचा घटक म्हणून तलाठ्यांकडे अनेक प्रशासकीय कामे सोपविण्यात आली आहेत. यात गावपातळीवरील 21 गाव नमुने तयार करणेते अद्ययावत करणेवारसान नोंदी घेणेखरेदी-विक्री व्यवहारानुसार सातबारावर फेरफार नोंदी घेणेनैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानीचे पंचनामे करणेनागरिकांना नुकसान भरपाईबाबत प्रक्रिया राबविणेत्याचा अहवाल शासनाकडे सादर करणेरहिवासी व उत्पनाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र नागरिकांना उपलब्ध करून देणेगावाची पैसेवारी निश्चित करणेपीक कापणी प्रयोगई-पीक पाहणी आदी महत्वाच्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेकृषी गणना करणेसातबारा वाटप करणेऑनलाईन सातबारा नागरिकांना उपलब्ध करून देणे आदी महत्वाच्या कामामुळेच तलाठी हा गावपातळीवरील प्रशासनाचा मुख्य कणा मानला जातो.

या ठिकाणी होणार नवीन तलाठी कार्यालये

पोंभुर्णा तालुक्यातील वेळवामालचेकबल्लारपूरडोंगरहळदीउमरी पोतदारघोसरीदेवाडा (बुर्ज)देवाडा (खुर्द)नवेगाव मोरेजाम तुकुमफुटाना मोकासा आणि चेक ठाणेवासना. चंद्रपूर तालुक्यातील अजयपूरपिंपळखुटजुनोनापद्मापूरबोर्डादुर्गापूर चांदा रयतवारी. बल्लारपूर तालुक्यातील पळसगावमानोराकवडजाईकळमनाविसापूरकोठारीबामणीमूल तालुक्यातील मरेगावभादुर्णीउश्राळाचककेळझरराजगडपिपिरी दीक्षितभेजगावचिंचाळासुशी दाबगावताडाळानांदगावमूलराजोलीनवेगावकोसंबीकांतापेठ (रै)चिरोलीगडीसुर्लाबोंडाळा (भुज)मारोडाचिखली मालचिमढाहळदी गावगन्नाबोरचांदलीसिंताळाजुनासुर्लाबेलघाटा माल आणि डोंगरगाव येथे नवीन तलाठी कार्यालय निर्माण होणार आहे.

००००००

No comments:

Post a Comment