Sunday, 6 July 2025

पालकमंत्र्यांकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

 










पालकमंत्र्यांकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

Ø प्रशासकीय सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणा-या अधिका-यांचा सन्मान

चंद्रपूरदि. 6 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारीजिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिका-यांचासुध्दा सन्मान केला.

नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.मनपा आयुक्त विपीन पालिवालअतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडेउपसंचालक आनंद रेड्डीउपवनसंरक्षक श्वेता बोड्डूप्रकल्प अधिकारी विकास राचेलवारश्री. लाटकर आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. श्री. उईके म्हणालेआदिम जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी.एम. जनमन आणि धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत विविध शासकीय विभागामार्फत आदिवासींना एकत्रितपणे योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यात घरकुलवनपट्टेमतदान ओळखपत्रआधार कार्डआयुष्मान कार्डरेशन कार्डविद्युत जोडणीजात प्रमाणपत्रजॉब कार्डराष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्रसातबारापीएम किसानउत्पन्न दाखलाजनधन खाते आदींचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात 18 टक्के लोकसंख्या आदिवासींची असून दोन प्रकल्प कार्यालय आहेत. जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूरची टीम मन लावून काम करीत आहे. धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून 17 विभागाच्या 25 सेवा देण्यात येत आहे. धरती आबा अभियान प्रत्येक घरापर्यंत पोहचले पाहिजे. यापुढेही आदिवासी समाजाला काय अपेक्षित आहेत्यानुसारच योजना राबविली जाईल. आदिवासींना लाभ खरच मिळाला की नाहीयाची प्रकल्प अधिका-यांनी शहानिशा करावी. योजनेमध्ये गैरप्रकार होऊ देऊ नकागरजवंतांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुक्ष्म नियेाजन करावे.

प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणालेप्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत 12360 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला आहे. या अभियानात जिल्ह्यातील 167 गावांचा समावेश असून चंद्रपूर प्रकल्प कार्यालय अंतर्गत 115 गावे तर चिमूर प्रकल्प कार्यालयअंतर्गत 52 गावांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 87 गावांमध्ये धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचे शिबीर घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.      

उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिका-यांचा सन्मान : राज्य शासनाच्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कार्य करून राज्यात अव्वल स्थान प्राप्त करणारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच नागपूर विभागात जिल्ह्यातील 19 शासकीय कार्यालयांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संबंधित अधिका-यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात प्रथम क्रमांक प्राप्त करणारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडेसा.बां. उपअभियंता (मूल) राजेश चव्हाणउपविभागीय कृषी अधिकारी (नागभीड) प्रफुल गव्हारेतहसीलदार (नागभीड) प्रताप वाघमारेतालुका वैद्यकीय अधिकारी (नागभीड) डॉ. विनोद मडावीपशुधन विकास अधिकारी (वरोरा) डॉ. सतिश अघडते. 

द्वितीय क्रमांक प्राप्त करणारे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडेजिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख भुषण मोहितेउपविभागीय अधिकारी (ब्रम्हपूरी) पर्वणी पाटीलमहावितरण उपअभियंता (मुल) चंदन चौरसियाउपजिल्हा रुग्णालय (ब्रम्हपूरी) डॉ. प्रितम खंडाळेतालुका कृषी अधिकारी (कोरपना) गोविंद ठाकूरबालसंरक्षण अधिकारी (मूल) आर्यन लोणारेनगर परिषद मुख्याधिकारी (नागभीड) राहुल कंकाळ यांचा समावेश होता.

००००००

No comments:

Post a Comment