Search This Blog

Friday, 20 March 2026

कृषी क्षेत्राच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके








 

कृषी क्षेत्राच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

Ø पाच दिवसीय जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन

चंद्रपूरदि. 20 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा केली आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता शेतक-यांसोबतच शेतमजुरांनासुध्दा मिळणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून शेतक-यांच्या मागे शासन भक्कमपणे उभे आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

चांदा क्लब येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभागपशुसंवर्धन विभागजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाउमेद आणि माविम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कृषीपशु-पक्षी प्रदर्शन व मिनी सरस हिराई महोत्सव आयोजित करण्यात आला आहेया महोत्सवाचे उद्घाटन करतांना पालकमंत्री डॉवुईके बोलत होते.

यावेळी मंचावर चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता खांडेकरखासदार प्रतिभा धानोरकरआमदार किशोर जोरगेवारदेवराव भोंगळेमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहअतिरिक्त जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारेमनपा आयुक्त अकुनुरी नरेशअतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागरप्रकल्प संचालक मंजिरी टकलेजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावारआत्माचे प्रकल्प संचालक अरुण कुसळकरपशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉसुरेश कुंभरेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंतगिरीश धायगुडेशिक्षणाधिकारी अश्विनी केळकर चंद्रशेखर शेट्टी आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनीमध्ये 325 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहेअसे सांगून पालकमंत्री डॉवुईके म्हणालेप्रदर्शनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचे सादरीकरण सर्वत्र पोहोचावेचंद्रपूर जिल्ह्यात महिला बचत गटाचे काम मोठे आहेकृषी विषयक योजनांचा प्रचार व प्रसार शेवटच्या घटकांपर्यंत पोहचला पाहिजे1मार्च 2026 रोजी किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता वाटप करण्यात आलायात जिल्ह्यातील लक्ष 46 हजार 307 शेतकऱ्यांच्या खात्यात 49 कोटी 26 लाख रुपये जमा झाले आहेकर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहेग्रामीण महिला बचत गटासाठी तालुका स्तरावर प्रशिक्षण केंद्र आणि इमारत बांधण्याकरिता निधी देण्यात येईलअसे पालकमंत्री यांनी सांगितलेतत्पूर्वी पालकमंत्री यांच्या हस्ते फीत कापून कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी विविध स्टॉलची पाहणी केली.

खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्याशेतीमध्ये आगळावेगळा प्रयोग करणे अत्यंत गरजेचे झाले असून केंद्र व राज्याच्या अनेक कृषी विषयक योजना शेवटच्या घटकांपर्यंत अधिकाऱ्यांनी पोहचवाव्यातबचत गटाच्या उत्पादनासाठी तालुका स्तरावर विक्री केंद्र उपलब्ध करून द्यावेअशी मागणी त्यांनी केलीयावेळी महापौर संगिता खांडेकर यांनी सुध्दा मार्गदर्शन केलेकार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केलेसंचालन एकता बंडावार यांनी तर आभार शिवकुमार पुजारी यांनी मानले.

कृषी उद्योजक निर्माण करण्याची गरज : आमदार किशोर जोरगेवार

कृषी आणि संलग्न व्यवसायातून चंद्रपूरची नवी ओळख निर्माण होत आहेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंद्रपूरकडे विशेष लक्ष असून बचत गटाचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले आहेउमेदच्या माध्यमातून लखपती दीदी तयार होत आहेमहिलांना डिजिटल साक्षर होण्याची गरज आहेबांबूक्षेत्रातही शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावेचंद्रपूरला पर्यटनाच्या क्षेत्रातून विकसित करावेऍग्रो टुरिझमलाही जिल्ह्यामध्ये चांगली संधी आहेआज शेतीचा पॅटर्न बदलला असून कृषी उद्योजक निर्माण करण्याची गरज आहेअसे मत किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.

कृषी आणि पशु प्रदर्शनाचे अतिशय चांगले नियेाजन : आमदार देवराव भोंगळे

जिल्हास्तरीय कृषी महोत्सव हा चंद्रपूरकरांसाठी एक पर्वणी असतेया माध्यमातून जनतेपर्यंत कृषी विषयक व संलग्न योजनांचा प्रचार प्रसार होतोआज येथे कृषी आणि पशु प्रदर्शनाचे अतिशय चांगले नियोजन करण्यात आले आहेपशुंच्या प्रजाती ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजेजिल्हास्तरीय पाच दिवसांच्या कृषी प्रदर्शनीचा जिल्ह्यातील सर्व शेतकरी नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

समुदाय निधी धनादेश वाटप : 1) मध संकलन केंद्राकरिता लक्ष्मी प्रभाग संघ यांना 50 लक्ष रुपयांचा धनादेश, 2) आजीविका ग्रामीण वाहतूक करिता सक्षम प्रभाग संघ यांना 51 लक्षाचा धनादेश, 3) समूह गुंतवणूक निधी करिता क्षितिज प्रभाग संघ यांना कोटीचा धनादेश, 4) समूह गुंतवणूक निधी म्हणून नारीशक्ती प्रभाग संघ यांना कोटीचा धनादेश, 5) एकात्मिक शेती करिता मातोश्री प्रभाग संघ यांना 30 लक्ष रुपयांचा रुपये धनादेश, 6) समूह गुंतवणूक निधी अंतर्गत अस्मिता प्रभाग संघ यांना 54 लक्षाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कृषी महोत्सवाचे प्रमुख्य वैशिष्टये : 1) शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी व कृषी संलग्न विभागाच्या योजना / उपक्रमांची माहिती 2) महिला स्वयंसहायता गटांमार्फत उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री 3) कृषी विद्यापिठाने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती 4) अनुभवी आणि प्रगतशील शेतक-यांचे मार्गदर्शन 5) कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत विविध खाजगी कंपन्यांची अद्यावत तंत्रज्ञानाची कृषी औजारे 6) सुक्ष्म सिंचन - ठिबक / तुषार संचांची प्रात्यक्षिके 7) उत्पादक ते ग्राहक थेट विक्री

०००००

आरटीई प्रवेशासाठी असलेली 1 कि.मी. ची अट रद्द


आरटीई प्रवेशासाठी असलेली 1 कि.मीची अट रद्द

Ø अर्ज भरण्यास 25 मार्च पर्यंत मुदतवाढ

चंद्रपूरदि. 20 :  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सीनुसार आर्थिकदृष्या दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांसाठी खाजगी  विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के मोफत शिक्षणांची तरतूद आहेआरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी कि.मीपर्यंतच्या अंतरावरील शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य पालकांना देण्यात आलेले होतेतथापि उच्च न्यायालयमुंबईखंडपीठ नागपूर येथे दाखल याचिकेवर  न्यायालयाने नोंदविलेल्या निरिक्षणानुसार आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश जर किमीअंतरावर शाळा उपलब्ध नसेलतर मुलांना त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखता येणार नाहीत्यानुसार 25 टक्के प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी असलेली कि.मीअट रद्द करण्यात आली आहे.

ज्या पालकांनी कि.मीच्या आत असलेल्या शाळांची निवड करून अर्ज भरलेला आहेतसेच ज्या पालकांनी आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी नोंदणी केली आहेत्यांना आता किमी., 1 ते कि.मीतसेच कि.मीपेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झालेल्या आहेततरी संबंधितांना आरटीई पोर्टलवर आपला आरटीई 25 टक्केचा अर्ज unconfirm करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत्यानुसार संबंधित पालकांना याबाबत आरटीई 25 टक्के पोर्टलवरून आवश्यक ती माहिती भरून सुधारित अर्ज करता येईलतसेच आरटीई 25 टक्के प्रवेशासाठीचे अर्ज भरण्यास 25 मार्च 2026 पर्यंत मुद्दतवाढ देण्यात आल्याचे पुणे येथील  शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी कळविले आहे.

००००००

21 मार्च रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले चंद्रपुरात

 21 मार्च रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले चंद्रपुरात

चंद्रपूरदि. 20 :  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे 21 मार्च 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

21 मार्च रोजी सायंकळी 5.15 वाजता चंद्रपूर विश्रामगृह येथे आगमनसायंकाळी 5.30 वाजता प्रियदर्शिनी सभागृह येथे दिव्यांग नागरिकांना साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थितीसायंकाळी 6.30 वाजता विश्रामगृह येथे राखीवरात्री 8 वाजता नागपूरकडे प्रयाण.

००००००

Thursday, 19 March 2026

जिल्हाधिकाऱ्यांनी केली महाकाली मंदिर परिसराची पाहणी





जिल्हाधिकाऱ्यांनी केली महाकाली मंदिर परिसराची पाहणी

चंद्रपूरदि. 19 : चंद्रपूरची आराध्य दैवत असलेल्या माता महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेची पूर्वतयारी व इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी माता महाकाली मंदिर परिसराची पाहणी करून संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शनमनपा आयुक्त अकुनुरी नरेशचंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामतहसीलदार विजय पवारमनपा उपायुक्त संदीप चिद्रावार माता महाकाली मंदिर विश्वस्त मंडळाचे सुनील महाकाळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागआरोग्य विभागचंद्रपूर शहर महानगरपालिका व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेमाता महाकाली यात्रेसाठी इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाविकांचा प्रवेश आणि बाहेर निघण्याचा मार्ग स्वतंत्र असावा. गर्दी व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन प्रशासनाने करावे. ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात यावे. यात्रा कालावधीत संपूर्ण मंदिर परिसराची साफसफाई नियमितपणे करावी. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था  असावी.

किचन स्थळ हे मंदिर परिसर आणि दुकानांच्या दूर ठेवावे. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात भाविकांना बसू देऊ नये. सर्वांनी रांगेत दर्शन घेऊन बाहेर निघावे. आरोग्य विभागाने प्रथोमपचार वैद्यकीय सेवा तसेच २४ तास रुग्णवाहिका व अग्निशमन सेवा उपलब्ध ठेवावी. बांधकाम विभागाने काही दुरुस्तीची कामे असल्यास आताच करून घ्यावीतअशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी घाट परिसराची सुद्धा पाहणी केली.

००००००

Wednesday, 18 March 2026

पोक्सो कायदा तथा बालविवाह प्रतिबंधाबाबत मागदर्शन



पोक्सो कायदा तथा बालविवाह प्रतिबंधाबाबत मागदर्शन

Ø जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजन

Ø शिक्षकग्रामसेवकआरोग्य कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती

चंद्रपूरदि. 18 : जिल्हा महिला व बालविकास कार्यालयजिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या मार्गदर्शनात बीजीएम कार्मेल अकादमी येथे मंगळवारी पोक्सो कायदा तथा बालविवाह प्रतिबंध आणि महिला बालविकास विभागाच्या योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णीजिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर इंगळेजिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणेउपशिक्षणाधिकारी गणेश येरणेबालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बारसकरसदस्या ज्योत्स्ना मोहितकरवनिता घुमेबीजीएम कार्मेल अकादमीचे प्राचार्य जेसन जेकबजिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पुलकित सिंह म्हणालेबालक देशाची संपत्ती असून बालकाचे संरक्षण आपली प्रथम जबाबदारी आहेबालकांच्या संरक्षणासाठी शासन प्रशासन तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपली भूमिका संवेदनशीलपणे पार पाडावीअसे आवाहन केलेमुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णीयांनी मार्गदर्शन करतांनाबालकांची सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची असून सर्वांनी कायद्याला अनुसरून कार्यवाही केलीच पाहिजेयासाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व पोलिस यांना सहकार्य करावेसुधीर इंगळे यांनी बालविवाह व पोक्सो कायदा समजावून सांगितला व बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांच्या जबाबदारीविषयी मार्गदर्शन केलेतसेच ग्राम/वार्ड बाल संरक्षण समितीची भूमिका विषद केली.

प्रास्ताविकातून मिनाक्षी भस्मे यांनीबालकांच्या कार्यक्षेत्रात कार्य करणारे अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी सदर कार्यशाळा महत्वाची असून सर्व संबंधित यंत्रणेने समन्वयाने कार्य करून चंद्रपूर जिल्हा बालविवाह मुक्त तसेच बालस्नेही बनविण्याचा संकल्प करू या असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजुरकर यांनी तर आभार अजय साखरकर यांनी मानलेयावेळी विधी अधिकारी अनिल तानलेपरिविक्षा अधिकारी अतिशकुमार चव्हाणअभिषेक मोहुर्लेशशिकांत मोकाशेजिल्हा व रेल्वे चाईल्ड हेल्पलाईनजिल्हा बाल संरक्षण कक्षसखी वन स्टॉप सेंटररूद्या संस्था आदींनी मोलाची भुमिका बजावली.

००००००