Search This Blog

Monday 11 February 2019

चंद्रपूर जिल्ह्यातील घोडपेठ गावाची डिजिटल गाव म्हणून घोडदौड सुरू





महाराष्ट्रातील पहिल्या डिजिटल गावात सुविधा देण्यास प्रारंभ
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले डिजिटल गावाचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 11 फेब्रुवारी - चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात येणाऱ्या घोडपेठ येथे आज केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या शुभहस्ते डिजिटल गावाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव म्हणून आता घोडपेठ उदयास आले असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे एकडिजिटल ग्राम तयार करण्यात येत असल्याची माहिती  केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज येथे दिली.
         चंद्रपूर जिल्ह्यातील घोडपेठ  गावातील नागरिकांना आजपासून  टेलिमेडिसीन सेवाविद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाची सुरुवात,  महिलांना  सॅनिटरी नॅपकीन तयार करणे व विकण्याची सुविधा आणि  उर्जा वाचविणाऱ्या एलईडी बल्बच्या निर्माण केंद्राची सुरुवात करण्यात आली. याशिवाय वेगवेगळ्या पद्धतीच्या डिजिटल दाखल्यांची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली. यासोबतच या गावांमध्ये आता आर्थिक व्यवहारासंदर्भातील प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. गावामध्ये सोलार स्ट्रीट लाईट लवकरच लावले जाणार आहेत.
      कार्यक्रमाच्या व्यासपीठावर  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रेसीएससीचे  (कॉमन सव्हीस सेंटर) महाराष्ट्राचे प्रमुख वैभव देशपांडेजि.प.सभापती अर्चना जिवतोडे, ब्रिजभूषण पाझारेभद्रावती पंचायत समितीचे सभापती विद्या कांबळे, तहसिलदार महेश शितोटे, गावाच्या सरपंच वैशाली उरकुडे, राहुल सराफ, नरेंद्र जिवतोडे, रवी नागापुरेविजय वानखेडेगिरीश बन्नोरे आदींची उपस्थिती होती.
       यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ग्रामीण भागाबद्दल विशेष कळवळा असून त्यातूनच डिजीटल गाव करण्याची संकल्पना पुढे आली आहे. शेतकरीशेतमजूर, ग्रामीण भागातील जनता यांना मध्यवर्ती ठेवून प्रधानमंत्री प्रत्येक योजना तयार करतात व राबवतात.  देशातील मोठी लोकसंख्या ही गावांमध्ये राहते. त्यामुळे देशात डिजीटल व्यवहार सुरू झाला पाहिजे. कुठलेही मध्यस्थ न ठेवता थेट संगणकाच्या माध्यमातून बँकेपासून तर आरोग्य पर्यंतच्या सर्व सुविधा मिळाल्या पाहीजे. या माध्यमातून विकासाचा लाभ गतिशीलपारदर्शी होऊन थेट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे,अशी त्यांची इच्छा आहे.
            यावेळी त्यांनी आयुष्यमान भारत योजना मध्ये चंद्रपूर जिल्ह्याने घेतलेल्या आघाडीचे कौतुक केले. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरू करून ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या आरोग्यासाठी फार मोठी उपलब्धी व संधी तयार करून दिली आहे. याशिवाय यावेळी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भागात प्रधानमंत्री किसान योजनेसंदर्भातील सुरू असलेल्या सर्वेक्षणIची प्रगती जाणून घेतली. प्रधानमंत्री किसान योजनेतील तरतुदीप्रमाणे आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असे त्यांनी सांगितले.
     यावेळी घोडपेठ गावांमधील सगळ्या नागरिकांच बँक अकाऊंट काढल्याबद्दल अभिनंदन ही त्यांनी केले. टेलिमेडिसीन या सेवेचा अधिक लाभ घेण्याबाबत गावकर्‍यांना सांगितले. आज घोडपेठ येथून  मुंबईच्या अपोलो हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांची  एका रुग्णाची थेट बोलणी झाली. त्यांच्यासाठी ऑनलाईन सूचवण्यात आलेल्या औषधोपचाराची डिजिटल  प्रिस्क्रिप्शन’ त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दाखविल.  यापुढे सर्वांनी आपल्या आरोग्याची तज्ञ डॉक्टरांकडून टेलिमेडिसीनद्वारे तपासणी करावी, असे आवाहनही केले.
      या ठिकाणी उपस्थित बहुसंख्य महिलांशी संवाद साधताना त्यांनी आता घोडपेठ या गावांमध्ये आजपासून सॅनिटरी नॅपकीन तयार होतील. आजूबाजूच्या परिसरातील महिला, तरुणीना देखील ही सुविधा मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमानंतर गावच्या सरपंच वैशाली उरकुडे यांनी गावातील मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटपही केले.
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीएससीचे राज्याचे प्रमुख वैभव देशपांडे यांनी केले. घोडपेठ व पांढरकवडा या दोन गावांमध्ये डिजिटल गाव बसविण्यात येत असल्याचे सांगीतले. या डिजीटल गाव अंतर्गत केंद्र शासनाने सुरू केलेल्या ई-गव्हर्नन्स सुविधा उपलब्ध केल्या जातात. राज्य सरकारच्या आपले सेवा केंद्र सारखीच सुविधा या ठिकाणी दिली जाते. सर्व शासकीय दाखले या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात. घोडपेठ येथे आज उद्घाटित करण्यात आलेल्या डिजिटल व्हिलेजमध्ये चार वेगवेगळ्या युनिटचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये मुलांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निलीट (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲन्डइन्फॉमेशन टेक्नॉलॉजी) सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. याच ठिकाणी डिजिटल डॉक्टर सेंटर देखील उघडण्यात आले आहे.या योजनेअंतर्गत टेलिमेडिसीन सुविधा उपलब्ध केल्या जातात. संगणकावर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन स्थानिक रुग्णांना उपलब्ध केले जाते. डिजिटल व्हिलेजमधील तिसरे केंद्र हे स्त्री स्वाभिमान केंद्र असून याठिकाणी सॅनिटरी नॅपकिन निर्माण केल्या जाते व तसेच त्याची विक्री देखील केली जाते. एकाच ठिकाणी उघडण्यात आलेले चौथे केंद्र म्हणजे एलईडी निर्माण केंद्र. अवघ्या काही मिनिटात एलीडी बल्फ निर्माण केले जातात. बाजाराच्या किमतीपेक्षा अतिशय कमी किमतीत सीएससी या नावाने हे एलईडी बल्फ तयार होतात. गावातच हे बल्ब तयार करण्याची ही व्यवस्था असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरपंच वैशाली उरकुडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन उद्धव पुरी यांनी केले. या कार्यक्रमाला घोडपेठसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीएससीचे विभागीय समन्वयक निलेश कुंभारेजिल्हा समन्वयक रमजान शेख तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरच्या केंद्रचालक ममता सारडा यांनी प्रयत्न केले.
                                                              0000

No comments:

Post a Comment