Search This Blog

Wednesday 30 September 2020

"माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेअंतर्गत मुलांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा

 


"माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेअंतर्गत मुलांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा

3 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांना होता येणार सहभागी

कोरोना जनजागृती संदर्भात स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूरदि.30 सप्टेंबर : कोरोना संसर्गाच्या काळात शाळांना सुट्टी असल्याने मुलांनाही घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. मित्र-मैत्रिणींमध्ये धमाल करणाऱ्या मुलांना आता चार भिंतीच्या आतच खेळ खेळावे लागत आहे. सारखा तोच तो अभ्यास अथवा तेच ते खेळ असताना मुलांच्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग त्यांच्या आवडत्या पद्धतीने करण्यासाठी तसेच मुलांमधील अंगभूत कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेअंतर्गत मुलांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा येत्या 1 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे. स्पर्धेचा कालावधी 10 ऑक्टोंबर पर्यंत असून निबंध व चित्र या कालावधीत पाठवावेत.

अशी असणार स्पर्धा :

कोरोना संसर्गाच्या काळात स्वतःची व इतरांची काळजी घेण्याविषयी चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृतीपर व कोरोनाला हरविण्याचा संदेश देणारे चित्र रेखाटावे. तसेच निबंध लेखन स्पर्धेच्या माध्यमातून स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणेनागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणेमास्क चा नियमित व योग्य वापर करणेवारंवार हात स्वच्छ धुणे तसेच निर्जंतुकीकरणाचा योग्य वापर करणे याबाबत महत्त्व पटवून देणे या विषयावर 100 ते 200 शब्दात निबंध असावा.

या स्पर्धेमध्ये 3 ते 6 वर्ष, 7 ते 12 वर्ष, 13 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांकरिता ही निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. मुलांनी घरातच राहून चित्र काढावयाचे असून निबंध लिहायचा आहे. चित्र व निबंध जिल्हा प्रशासनाच्या  9356774681 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावेत.चित्र व निबंधासोबत स्पर्धकाचे संपूर्ण नाववयपत्ता व संपर्क क्रमाक असणे गरजेचे आहे.

उत्कृष्ट चित्र व निबंधाला परितोषिक तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 10242

 


चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 10242

6047 बाधित कोरोनातून  झाले बरे;

उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 4043

24 तासात आणखी 233 बाधिततीन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 30 सप्टेंबर : जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 233 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 10 हजार 242 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 4 हजार 43 असून आतापर्यंत 6 हजार 47 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसारजिल्ह्यात 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्येसरकार नगरचंद्रपुर येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 27 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू मंजुषा लेआउट परिसरभद्रावती येथील 61 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 25 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरतिसरा मृत्यू राजुरा येथील 72 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 28 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  अनुक्रमे पहिल्या बाधिताला कोरोनासह मधुमेहदुसऱ्या बाधिताला कोरोनासह मधुमेह व उच्च रक्तदाब तर तिसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने या तीनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 152 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 143, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन तर भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 117, पोंभूर्णा तालुक्यातील तीनबल्लारपूर तालुक्यातील 13, चिमूर तालुक्यातील14, मुल तालुक्यातील नऊगोंडपिपरी तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील चारब्रह्मपुरी तालुक्यातील 20,  नागभीड तालुक्‍यातील चारवरोरा तालुक्यातील पाच,भद्रावती तालुक्यातील 18, सावली तालुक्यातील चार,  सिंदेवाही तालुक्यातील नऊराजुरा तालुक्यातील आठगडचिरोली येथील दोन तर भंडारा व वडसा येथील प्रत्येकी एक असे एकूण 233  बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील बापट नगरनगीना बागदुर्गापुरऊर्जानगरवडगावइंदिरानगरशास्त्रीनगरमहाकाली वार्डनिर्माण नगर तुकुमबालाजी वार्ड,शिवाजीनगरलुंबिनी नगरबाबुपेठभिवापुर वॉर्डहरिओम नगरबंगाली कॅम्प परिसररयतवारीजल नगरजटपुरा गेट परिसरएकोरी वार्ड भागातून बाधित ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील बिटीएस प्लॉट परिसरझाकीर हुसेन वार्डबामणीविद्या नगर वार्डबालाजी वार्डमहाराणा प्रताप वार्डविसापूरमानोरामहात्मा गांधी वार्ड,राणी लक्ष्मी वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील रामनगर कॉलनी परिसरपंचशील वार्डविवेकानंदनगरजवाहर नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.वरोरा तालुक्यातील इंद्रप्रस्थ नगर,कर्मवीर वार्डसिद्धार्थ वार्डयेन्सादत्त मंदिर वार्डमालवीय वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगरपेठ वार्डफुलेनगरकिन्हीटिळक नगररानबोथलीशिवाजीनगरसौंदरीगणेश वार्डगजानन नगर परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील सूर्य मंदिर वार्डगुरु नगरलुंबिनी नगरभंगाराम वार्डएकता नगरनवीन सुमठाणासावरकर नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील पेठगावव्याहाड भागातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील सावरगावमुसाभाई नगरमेंढा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

चिमूर तालुक्यातील भिसीविहीरगावजांभुळ घाटवडाळाआझाद वार्डगुरुदेव वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूरकुकुडबोडी,शांती कॉलनी नांदा फाटा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांना दिलेला शब्द पाळला



 मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांना दिलेला शब्द पाळला

नागपूर विभागातील पूरग्रस्तांसाठी 162 कोटी 81 लाख 7 हजारचा निधी मंजूर : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची वचनपूर्ती

Ø चंद्रपूर जिल्ह्यासाठी 38 कोटी

Ø गडचिरोली जिल्ह्यासाठी 24 कोटी

Ø गोंदिया जिल्ह्यासाठी 12 कोटी

Ø भंडारा जिल्ह्यासाठी 43 कोटी

Ø नागपूर जिल्ह्यासाठी 45 कोटी रुपये

चंद्रपुरदि.30 सप्टेंबर : नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये 30-31 ऑगस्ट तसेच 1 सप्टेंबर 2020 रोजी पुरस्थिती निर्माण झाली होती. या पुरिस्थितीमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरी, नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना विविध बाबींसाठी वाढीव दराने मदत देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून नागपूर विभागातील पूरग्रस्त जिल्ह्यासाठी 162 कोटी 81 लाख 7 हजारचा निधी मंजूर करण्यात आला आहे.अशाप्रकारे पुरग्रस्थांना भरीव मदत करून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वचनपूर्ती केली आहे.

मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोदीखुर्द प्रकल्पातील सर्व दरवाज्यांमधून 5 मीटर पर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला.यामुळे भंडारागडचिरोलीचंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यात 1995 साली ओढावलेल्या पूरापेक्षाही मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांत,शेतामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचेशेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या दाहक व भीषण परिस्थितीची माहिती मिळताच राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून  नागरिकांसोबत थेट संवाद साधण्यासाठी नियोजित सर्व दौरे रद्द करून तातडीने चंद्रपूर,गडचिरोलीभंडारा व नागपूर जिल्ह्याचा दौरा केला. या चारही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना श्री.वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार पुरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले होते. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेउपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी दुरध्वनीव्दारे चर्चा करून पुरग्रस्तांना तातडीच्या मदतीची विनंती केली होती. या अनुषंगाने आजच महसूल व वन विभागाने निधी मंजूरीचा शासन निर्णय निर्गमीत केला.

नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी तसेच मत्स्यबीज शेतीसाठी सहाय्य व मदतमृत व जखमी व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्णता: घराची क्षती झाली असल्यास कपडेभांडी व घरगुती वस्तूंकरीताशेतपिकांच्या नुकसानमृत जनावरव घराची अंशता: पडझड झालेली कच्ची किंवा पक्की घरंनष्ट झालेल्या झोपड्या आणि गोठ्याचे नुकसानकारागीरबारबलुतेदारदुकानदार व टपरी धारकांना मदतजमिनीतील वाळूचिकन माती क्षार काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य तसेच नदीच्या रूपांतरामुळे झालेले जमिनीच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सहाय्यमोफत केरोसीन वाटपासाठी सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 162 कोटी 81 लाख 7 हजारचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्यासाठी  45 कोटी 17 लाख  79 हजारवर्धा 69 लाखभंडारा 42 कोटी 43 लाख 53 हजारगोंदिया 12 कोटी 32 लाख 40 हजारचंद्रपूर 37 कोटी 81 लाख 6 हजार व गडचिरोली जिल्ह्यासाठी 24 कोटी 37 लाख 29 हजार  रूपये निधी मंजूर झाला आहे. नागपूर दौऱ्यावर असतांना दिलेला शब्द श्री. वडेट्टीवार यांनी शासन निर्णय निर्गमित करून पूर्ण केला आहे.

00000

Tuesday 29 September 2020

कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांना वेळेत उपचार द्यावेत : विभागीय आयुक्त संजीव कुमार


 कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांना वेळेत उपचार द्यावेत : विभागीय आयुक्त संजीव कुमार

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला कोरोना विषयक आढावा

चंद्रपूर दि.29 सप्टेंबर: रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा शोधघरोघरी सर्वेक्षण आणि लवकर निदान यावर लक्ष केंद्रित करा. लक्षणे आढळलेल्या व्यक्तीला तात्काळ उपचार मिळतील याची संपूर्ण काळजी घ्यावी असे निर्देश विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा जाणून घेताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हानेअतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरनिवासी  उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाडमनपा आयुक्त राजेश मोहितेउपविभागीय अधिकारी  रोहन घुगे, तहसीलदार निलेश गौंडअतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेन्द्र लोखंडेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत उपस्थित होते.

दैनंदिन 50 कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करून कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांना  उपचार द्यावेत. कोरोनाची लक्षणे ही एका दिवसात दिसत नसून काही व्यक्तींमध्ये दोन ते चार दिवसात दिसू लागतात. त्यामुळे  दैनंदिन दूरध्वनीद्वारे त्या व्यक्तीच्या लक्षणांची माहिती जाणून घ्यावी. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने राज्यभर 'माझे कुटुंबमाझी जबाबदारी'  ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शहरगावेवस्त्या यातील प्रत्येक नागरीकाची आरोग्य तपासणी आणि प्रत्येक नागरिकास आरोग्य शिक्षण द्यावयाचे आहेअसे श्री. कुमार म्हणाले.

संबंधित उपविभागीय अधिकारीतहसीलदारगट विकास अधिकारी यांनी एकमेकात समन्वय ठेवून व या कार्यात पुढाकार घेऊन आरोग्य तपासणी व सर्वेक्षण करणाऱ्या चमूला विशिष्ट घरे ठरवून द्यावी. एखादी व्यक्ती संशयित आढळल्यास त्याला तात्काळ उपचार द्यावेत. तालुकास्तरावर काही अडचण भासल्यास जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांना कळवावे. तसेच या मोहिमेत ग्रामस्तरावर तलाठीग्रामसेवककोतवालयांना मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. ग्रामीण भागात  होर्डींगफ्लेक्सपत्रके या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी.अशा सूचना श्री. कुमार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्यात.

त्यासोबतच सर्व तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्यादैनंदिन सुरू असलेले सर्वेक्षण याबाबत विस्तृत माहिती जाणून घेतली.

00000


चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 5876 बाधितांना डिस्चार्ज

 


चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 5876 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 10009;

उपचार सुरु असणारे बाधित 3984

जिल्ह्यात 24 तासात 197 बाधितएका बाधिताचा मृत्यू

चंद्रपूरदि. 29 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 197 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 हजार 9 झाली आहे. यापैकी 5 हजार 876 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 984 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासामध्ये एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये तुकुमचंद्रपूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा  समावेश आहे. या बाधिताला 28 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 149 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 140, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन तर भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 99 , पोंभूर्णा तालुक्यातील दोनबल्लारपूर तालुक्यातील 12, चिमूर तालुक्यातील पाचमुल तालुक्यातील पाचगोंडपिपरी तालुक्यातील तीनब्रह्मपुरी तालुक्यातील आठ,  नागभीड तालुक्‍यातील सहावरोरा तालुक्यातील 22, भद्रावती तालुक्यातील पाचसावली तालुक्यातील दोन,  सिंदेवाही तालुक्यातील चारराजुरा तालुक्यातील 21, गडचिरोली येथील तीन असे एकूण 197  बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील बाबूपेठबालाजी वार्डमहेश नगरचोर खिडकी परिसरसमता चौक परिसरदुर्गापुरजगन्नाथ बाबा नगरशास्त्रीनगरनगीना बागआंबेडकर नगरसिस्टर कॉलनी परिसरदाताळाजटपुरा वॉर्डभानापेठ वॉर्डविश्वकर्मा नगरमहाकाली वार्डकोतवाली वार्डबापट नगरआकाशवाणी रोड परिसरओम नगर भिवापुर वॉर्ड या भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील भगतसिंग वार्डरेल्वे वार्डफुलसिंग नाईक वार्डशिवाजी वार्डगणपती वार्डराणी लक्ष्मी वार्डकन्नमवार वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील नेहरू चौक परिसरश्रीनिवास कॉलनी परिसरआंबेडकर वार्डदेशपांडे वाडीजवाहर नगररामपूरस्वप्नपूर्ती नगररामनगर कॉलनी परिसरसोनिया नगरगौरी कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील ज्योतिबा फुले वार्डदत्त मंदिर वार्डचरुर खटीकमला नेहरू वार्डविनायक लेआउट परिसरटिळक वार्डहनुमान वार्डआझाद वार्डकॉलरी वार्डबावणे लेआउट परिसरजिजामाता वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील भवानी वार्डकुर्झा वार्डसंत रवीदास चौक परिसरशिवाजीनगरनागेश्वर नगरशेष नगरतोरगाव बुजपरिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील गणपती वार्डगुरु नगर,परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील चक पिरंजी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील भेंडाळा,भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील नवखेडाआदर्श कॉलनी परिसरसावरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील नेरीमाणिक नगरनेताजी वार्डवडाळा पैकुभागातून बाधित पुढे आले आहे.

00000

जाणुन घेऊया ! हवामानावर आधारीत कृषी सल्ला

 

जाणुन घेऊया ! हवामानावर आधारीत कृषी सल्ला

चंद्रपूर दि. 29 सप्टेंबर: अतिवृष्टीगारपीटढगाळ हवामान आदी संकटांमुळे पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असतो. हवामान बदलामुळे शेती व्यवसायापुढे विविध आव्हाने निर्माण होत असतात. गावपातळीवरील शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर हवामान सल्ला पोचविणे गरजेचे असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानावर आधारीत कृषि सल्ल्याच्या आधारावर पिकाचे योग्य ते व्यवस्थापन करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

असा आहे हवामानावर आधारित कृषी सल्ला:

धान लोंबी येण्याची अवस्था:

लवकर येणाऱ्या धान पिक वाणांची भेसळ लोंबी (लांबोर) काढून टाकावे.लवकर येणाऱ्या कालावधीच्या धानामध्ये लोंबी येण्याच्या सुरूवातीस 25 टक्के (54 किलो) युरिया प्रति हेक्टरी द्यावे व पोटरी अवस्थेत 10 सेंमी पाण्याची पातळी ठेवावी.मध्यम ते उशिरा कालावधीच्या धानाचे निंदणी करून उरलेल्या 50 टक्के नत्राच्या मात्रेपैकी अर्धी मात्रा 25 टक्के (54 किलो) युरिया प्रति हेक्टरी दयावे. तसे  2.5 ते 5 सेंमी पाण्याची पातळी ठेवावी.

ढगाळ वातावरण व वाढत्या आद्रतेमुळे तपकीरी तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तरी धान पिकात प्रति चुड 5 ते 10 तपकीरी तुडतुडे यांचा नियंत्रणासाठी मेटाराहयझियम अनीसोपली ही जैविक 2.50 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात दयावीत.

खोडकिडीचे 5 टक्के किडग्रस्त फुटवे दिसताच क्वीनॉलफॉस 32 मिली किंवा ट्रायझोफॉस 25 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.लष्करी अळीचा प्रादुर्भावावर पाळत ठेवण्यासाठी सायंकाळी अर्धा तास प्रकाश सापळे लावावेत व या सापळयात पतंग आढळल्यास कृषि तज्ञास सूचित करावे.

पाने गुंडाळणारी अळीबेरडसुरळीतील अळी व शिंगे अळी यांच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 25 मि.ली. किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.करपा रोगाचा नियंत्रणासाठी  कार्बेन्डाझीम 50 टक्के डब्ल्युपी 10 ग्रॅम किंवा मेन्कोझेब 75 टक्के प्रवाही 30 ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल 5 टक्के ई.सी.20 मि.ली. यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.

कडाकरपा रोगाचा नियंत्रणासाठी कॉपर हायड्रोक्साईड 53.8 टक्के डीएफ 30 ग्रम किंवा स्टेपटोमायसीन सल्फेट 90 टक्के + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड 10 टक्के एसपी हे संयुक्त जीवाणू नाशक 1.5 ग्रम प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.

सोयाबीन-फांद्या येणाची अवस्था:

तंबाखूची पाने खाणारी व हिरवी उंट अळ्यांचास्पोडोप्टेराचा प्रादुर्भाव आढळल्यास त्यांच्या प्रादुर्भावानुसार नियंत्रणासाठी इंडोक्व्सीकार्ब 15.8 टक्के एस.सी. 7 मि.ली. किंवा ट्रायझोफोस 40 टक्के 12.5 मि.ली किंवा ईथीआन 50 टक्के 15 ते 30 मि.ली लिटर पाण्यातून फवारावे.

पक्षांना बसण्यासाठी शेतात हेक्टरी 15 ते 20 पक्षी थांबे लावावेत म्हणजे त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळया टिपून खातील.ढगाळ वातावरणामुळे पानावरील जीवाणु व बुरशीजन्य ठिपके आढळल्यास टेबूकोनाझोल 10 टक्के डब्लू.पी.+ सल्फर 65 टक्के डब्लू.जी. 25 ग्रम 10 लिटर पाण्यातून फवारावे.लवकर येणारी वाण (जेएस 95-60, जेएस 20-34, जेएस 93-5) परीपक्क्व झाले असल्यासशेंगा फुटण्याअगोदर कोरडे वातावरण पाहून पिक कापून घ्यावे.

कापूस-फुले व बोंडे अवस्था:

पीक फुलावर असतांना 2 टक्के युरिया़ची (200 ग्रॅम युरिया + 10 लिटर पाणी) आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेत 2 टक्के डिएपी (200 ग्रॅम डिएपी +10 लिटर पाणी) ची फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मि.ली. किंवा बुफ्रोफेजीन 25 टक्के 20 मि.ली. किंवा प्रोफेनाफॉस 50 टक्के प्रवाही 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.

शेंदरी बोडअळीच्या निरीक्षणासाठी प्रति हेक्टरी 8 कामगंध सापळे लावावेत.या सापळ्यामधील अडकलेल्या नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच दर 21 दिवसानंतर वडया  (ल्युर) बदलत राहावे.कपाशीला प्रादुर्भाव ग्रस्त डोमकल्या आढळल्यास दर आठवडयांनी अळीसहित वेचून नष्ट कराव्या.5 टक्के प्रादुर्भाव दिसल्यास प्रोफेनाफॉस 50 टक्के प्रवाही 20 मिली किंवा क्वीनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मि.ली. क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रावाही 25 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.

तूर फांद्या येण्याची अवस्था:

तुर पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास त्याच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.  तसेच रोगग्रस्त फांदया काढून टाकावे.

तीळ- फांद्या अवस्था:

धान बांधीच्या धुऱ्यावर तीळ पिकातील तणांच्या नियंत्रण करण्यासाठी एक किंवा दोनदा निंदणी करून घ्यावी.

हळद- कंद वाढीची अवस्था:

पानावरील ठिपके आढळताच कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. खोडमाशीचा नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने काढून जाळून टाकावे व निंबोळी अर्क टक्के प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. रासायनिक तणनाशक व किटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहूनच करावी. फवारणी करताना संरक्षक किटचा वापर करावा.

00000

धान पिकावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

धान पिकावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर दि. 29 सप्टेंबर : सदयस्थितीत पूर्व विदर्भात धानावर तुडतुडयांच्या प्रादुर्भावास सुरूवात झाली आहे. पिकावर तपकिरीपांढऱ्या पाठीचे व हिरवे तुडतुडे प्रादुर्भाव करतांना आढळून येतात. त्यापैकी तपकिरी तुडतुडे अधिक नुकसानकारक असतात व त्यांचा प्रादुर्भाव वाढत्या प्रमाणात दिसून येतो. हिरवे लुसलुशीत दाटलेल्या पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. तसेच या महिण्याचा शेवटचा आठवडा व ऑक्टोबरचा पहिला पंधरवाड्यात प्रादुर्भाव पोषक वातावरणामुळे हमखास वाढून नुकसान संभवते. तसेच शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणाचे त्वरीत उपाय करावेअसे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

प्रौढ व पिल्ले खोडावर समुहाने राहुन खोडातील रस शोषण करतात त्यामुळे झाड पिवळे कमकुवत होते. झाडाची वाढ खुंटते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या लोंब्यावर विपरीत परिणाम होवून दाणे भरण्याच्या प्रक्रियेत बाधा उत्पन्न होते. या तुडतुडयामुळे झाडामध्ये विषाणुंची लागण होते त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त पिक गवतासारखे खुरटल्यासारखे दिसते व लोंब्या करपल्यासारख्या दिसतात.

जास्त प्रादुर्भाव असल्यास प्रामुख्याने बांधीच्या मध्यभागी पिक करपल्यासारखे गोलागार खडगे पडतात. अशी झाडे पिवळी पडून करपतात व खाली पडतात. उत्पादनात लक्षनीय घट येते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या बुंध्याजवळ निरीक्षण केल्यास असंख्य प्रमाणात तुडतुडे दिसून येतात बरेचदा प्रादुर्भावग्रस्त झाडावर साखरेच्या पाकासारखा चिकट द्रव आढळून येतो व त्यावर काळी बुरशीची वाढ  होते. पोषक वातावरणात हा प्रादुर्भाव वाढून संपुर्ण बांधीमध्ये पसरतो.

असे करा तुडतुड्यांचे व्यवस्थापन:

वाजवीपेक्षा नत्र खताचा वापर करू नये. कारण हिरव्या लुसलुसशीत व दाटलेल्या पिकात प्रादुर्भाव जास्त असतो. टेहाळणीसाठी प्रकाश सापळयांचा वापर करावा. प्रादुर्भाव झाल्यास बांधीतील पाणी सोयीनुसार 3 ते 4 दिवसासाठी बाहेर सोडावे.

प्रादुर्भाव सुरू झाल्याबरोबर मेटॅरायझियम अनिसोप्ली 1.15 टक्के भुकटी या जैविक बुरशीचा 2.5 किलो हे याप्रमाणे बांधीमध्ये वापर करावा. ही भुकटी 10 ते 15 किलो कुजलेल्या शेणखताच्या पावडरमध्ये चांगले मिसळून तसेच  1 ते 2 दिवस झाकून ठेवावे म्हणजे त्यामध्ये हया जैविक बुरशीची वाढ होवून त्याची परिणामकारकता वाढते. आवश्यकता भासल्यास परत 15 दिवसांनी परत या जैविक बुरशीचा वापर करावा.

रासायनिक किटकनाशकांची अनावश्यक फवारणी टाळून भक्षक व इतर परोपजीवी किटकांचा संवर्धन व संरक्षण करावे. तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच नियंत्रणासाठी बुप्रोफेजीन 25 टक्के प्रवाही 16 मिली. किंवा इमिडॅक्लोप्रीड 17.8 टक्के 2.2 मि.ली. किंवा फिप्रोनिल टक्के 20 मि.ली. किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 12.50 मि.ली. किंवा इथोफेनप्रॉक्स 10 टक्के प्रावाही 10 मि.ली फ्लोनीकॅमीड 50 टक्के 3 ग्रॅम किंवा  थायोमेथाक्झाम 25 दाणेदार ग्रॅम यापैकी कोणत्याही एका रासायनिक किटकनाशकाची 10 लिटर पाण्यांत मिसळून फवारणी करावी.पायरेथ्राईड वर्गातील किटकनाशके वापरू नयेत्यामुळे तुडतुडयांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

00000

मिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक

 


मिठाईच्या डब्यावर उत्पादन व मुदतबाह्य तारीख बंधनकारक

चंद्रपूर,दि. 29 सप्टेंबर: एफएसएसएआय अर्थात भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरण यांनी जारी केलेल्या नवीन निर्णयानुसारस्थानिक मिठाईच्या दुकानात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा आणण्यासाठी केंद्र सरकाने नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 1 ऑक्टोंबर 2020 पासून स्थानिक मिठाईच्या दुकानांनाही विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईसाठी मुदतबाह्य तारीख प्रदर्शित करणे आवश्यक आहेअशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे अन्न व औषध प्रशासन चंद्रपूरचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांनी दिली आहे.

आतापर्यंत पॅकेटबंद खाद्यपदार्थ अथवा मिष्ठान्नांना मुदतबाह्य तारीख नमूद करणे बंधनकारक होते. मात्र अलीकडे खुल्या पध्दतीने विक्री होणाऱ्या मिष्ठान्नांतून बाधा होत असल्याचे प्रकार उजेडात आल्याने शासनाने आता बाजारात खुल्या पध्दतीने विक्री होणाऱ्या मिष्ठान्नांच्या स्ट्रेवर मुदतबाह्य तारीख प्रकर्षाने नमूद करणे बंधनकारक केले आहे.

विनापॅकिंग असणारा पदार्थ कधी बनविला आहे किंवा बनविल्यापासून तो किती दिवस खाण्यासाठी उपयुक्त आहे हे ग्राहकांना माहिती नसते. ट्रेमधील अन्न पदार्थ, विक्रीस ठेवलेल्या  उघड्यावर ठेवलेली मिठाईशिळे अन्नपदार्थ खाल्ल्याने विषबाधा होण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे मुदत संपत असल्याची तारीख लिहिल्यास खराब मिठाईची विक्री होणार नाही.

जिल्हयातील मिठाई उत्पादक व मिठाई विक्रेते यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे,असे आवाहन अन्न व औषध प्रशासन चंद्रपूरचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांनी केले आहे.

000000

ऑनलाइन रोजगार मेळाव्यात 131 उमेदवारांचा सहभाग

 


ऑनलाइन रोजगार मेळाव्यात 131 उमेदवारांचा सहभाग

चंद्रपूर,दि. 29 सप्टेंबर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार  व  उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर या  कार्यालयाचा माध्यमातून 25 सप्टेंबर रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. एकूण 131 उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यामध्ये नोंदणी केलीअशी माहिती जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी दिली आहे.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लिमिटेड नाशिक प्लांटपीएनबी मेटलाईफ इंडिया इंशुरन्स कंपनी लिमिटेड नागपूरपवनसुत मशिनरी अॅन्ड इलेक्ट्रिकल चंद्रपूर या कंपन्यामध्ये अनुक्रमे ट्रेनीफायनाशियल अॅडव्हायझरइलेक्ट्रिशियनया पदासाठी  या तीन कंपन्यांनी  सहभाग  घेतला.

या कंपन्यांमध्ये इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर स्वतःचे  नांव  नोंदणी करुन किंवा ज्यांनी यापूर्वी नावनोंदणी केलेली असेल अशा सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉगीन करुन दिनांक 25 सप्टेंबर2020 रोजी वेबपोर्टलवर रोजगार मेळाव्यासाठी नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरीता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी केली.         

000000

भरघोस उत्पादनासाठी रब्बी पिकातील आंतरपिकाची लागवड करावी: कृषी विभागाचे आवाहन


 

भरघोस उत्पादनासाठी रब्बी पिकातील आंतरपिकाची लागवड करावी: कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर दि.29 सप्टेंबर:  जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा,गहूलाखोळी,रब्बी ज्वारी ही मुख्य पिके असून काही प्रमाणात जवसमूगउडीद ही पिके घेतली जातात. या पिकाच्या उत्पादनाची ग्राहकांकडून मागणी असल्याने व या मधून उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या पिकांची रब्बी हंगामात लागवड करावीअसे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी रब्बी हंगामात 93 हजार 77 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली होती. यावर्षी रब्बी हंगामात 1 लक्ष 1 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात जवसकरडईमोहरीरब्बी तीळ या पिकाचे क्षेत्र जरी कमी असले तरी या पिकाचा लागवडी खर्च कमी व उत्पादनातून चांगला भाव मिळत असतो. जवसकरडईमोहरीरब्बी तीळ या पिकाच्या लागवडीसाठी तांत्रिक मार्गदर्शन कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत करण्यात येईल.

00000

Monday 28 September 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 5690 बाधित कोरोनातून झाले बरे

 


जिल्ह्यात आतापर्यंत 5690 बाधित कोरोनातून झाले बरे

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3974

जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 9812 वर

24 तासात 230 नवीन बाधितपाच बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 28 सप्टेंबर : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 230 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 9 हजार 812 वर गेली आहे. आतापर्यंत 5 हजार 690 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 974 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्येलाखांदूरभंडारा येथील 46 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू श्याम नगरचंद्रपुर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 22 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू बनवाहीनागभिड येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू  ब्रह्मपुरी येथील 70 वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 22 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरपाचवा मृत्यू चुनाभट्टीराजुरा येथील 74 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 25 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या सर्व मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 148 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 139, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीन,यवतमाळ तीन आणि भंडारा एक बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 149 बाधितपोंभूर्णा तालुक्यातील दोनबल्लारपूर तालुक्यातील सातमुल तालुक्यातील 8, कोरपना तालुक्यातील एकब्रह्मपुरी तालुक्यातील 18,  वरोरा तालुक्यातील 13, भद्रावती तालुक्यातील पाचसावली तालुक्यातील 11,  सिंदेवाही तालुक्यातील 14, राजुरा तालुक्यातील दोन असे एकूण 230 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील बालाजी वार्ड, समाधी वार्ड, रेल्वे कॉलनी परिसरस्नेह नगरसुमित्रा नगरअंचलेश्वर वार्डमहेश नगरहॉस्पिटल वार्डजल नगरघुटकाळा वार्डरयतवारी कॉलनी परिसरगोपाल नगरबाबुपेठतुकूमऊर्जानगरदुर्गापुर ,पठाणपुरा वार्डसिव्हिल लाईन परिसरभिवापुर वॉर्डविठ्ठल मंदिर वार्डजटपुरा गेट परिसरसिद्धार्थ नगरसंजय नगरगंज वार्डओमकार नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील मानोराबामणीनेहरू वार्डटिळक वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील अमराई वार्ड भागातून बाधीत पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील सलिम नगरटिळक वार्डसरदार पटेल वार्डमालविय वॉर्डमोकाशी लेआऊट परिसरएकार्जूनाकृषी नगरअभ्यंकर वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधिनगरगुजरी वॉर्डपेठ वॉर्ड,  मेंढकीसंत रविदास चौक परिसरशेष नगर परिसरातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून बाधित ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील गुरु नगरगजानन नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील  व्याहाडचकपरंजी  भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव भागातून बाधित पुढे आले आहे.

00000

Sunday 27 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 5511 बाधितांना डिस्चार्ज



चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 5511 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 9582;

उपचार सुरु असणारे बाधित 3928

जिल्ह्यात 24 तासात 232 बाधितएका बाधिताचा मृत्यू

चंद्रपूरदि. 27 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 232 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 9 हजार 582 झाली आहे. यापैकी 5 हजार 511 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 928 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार24 तासामध्ये एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये रामपुरराजुरा येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 21 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 143 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 135तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीन आणि यवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 126 बाधितबल्लारपूर तालुक्यातील 12चिमूर तालुक्यातील तीनमुल तालुक्यातील 8गोंडपिपरी तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील 9ब्रह्मपुरी तालुक्यातील 12नागभीड तालुक्यातील 14वरोरा तालुक्यातील पाचभद्रावती तालुक्यातील एकसावली तालुक्यातील 12,  राजुरा तालुक्यातील 19यवतमाळ जिल्ह्यातील तीनगडचिरोली जिल्ह्यातील पाचवर्धा व तेलंगणा येथील प्रत्येकी एक असे एकूण 232 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपुर शहर व परिसरातील वृंदावन नगर, जिल्हा कारागृह, नगीनाबाग, वडगांवविठ्ठल मंदिर वार्ड, दत्त नगरसंजय नगरजलनगर, बाबुपेठ, रामनगरजटपुरा गेट, चोर खिडकीपठाणपुरा वार्डतुकुमअंचलेश्वर वार्डलालपेठ कॉलनीआकाशवाणी रोड परीसरभानापेठबंगाली कॅम्पबापट नगर, इंदिरा नगरनेहरु नगरपंचशिल चौकजीएमसी चौकक्रिष्णा नगरबालाजी वार्डनांदा फाटा, सरकार नगर, बालाजी वार्ड, घुग्घुस, उर्जानगर, दुर्गापुर या परीसरातुन बाधित पॉझिटीव्ह ठरले आहे.

तालुक्यात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील डॉ.राजेंद्र प्रसाद वार्डगोकुळ वार्डगांधी वार्डटिळक वार्डफुलसिंग नाईक वार्डविद्यानगर वार्ड या भागातून बाधित पुढे आले आहेत. चिमूर तालुक्यातील शंकरपुर या परिसरातून बाधित पॉझिटिव्ह ठरले आहे.

मुल तालुक्यातील चिरोली गावातून बाधित ठरले आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील इंदिरानगर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

कोरपना तालुक्यातील उपरवाही परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील देलणवाडीकोलारीनंन्होरीविद्यानगरनागेश्वर नगरगांधी नगरविद्या नगररानबोथली भागातून बाधित पुढे आले आहे.

नागभीड तालुक्यातील मिंढाळानवखाळा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील माजरी भागातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील लोणारा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

राजुरा तालुक्यातील रमाबाई नगरसोमनाथपूर वार्डदेशपांडे वाडी परिसरजुना बस स्टॉप परिसरसास्तीरामनगरजवाहर नगरस्वप्नपूर्ती नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

00000