Search This Blog

Saturday, 25 April 2026

जिल्ह्याच्या नियोजनाचा पालकमंत्र्यांकडून आढावा



जिल्ह्याच्या नियोजनाचा पालकमंत्र्यांकडून आढावा

Ø जिल्हा वार्षिक योजना 2026-27

चंद्रपूरदि. 25 : सन 2026 - 27 या आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी मंजूर नियतव्ययविविध यंत्रणाच्या माध्यमातून करण्यात येणारी विकासकामेत्याची अंमलबजावणी आदीबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेतला.

नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीला आमदार देवराव भोंगळेकरण देवतळेजिल्हाधिकारी वसूमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमनपा आयुक्त अकुनुरी नरेशउपवनसंरक्षक कुमारस्वामीकुशाग्र पाठकयोगेश वाघायेआनंद रेड्डीप्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुंभरे यांच्यासह विविध यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. वुईके म्हणालेएप्रिल ते जून 2026 या कालावधीत यंत्रणांनी नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर करावे. या प्रस्तावात आपल्या विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात कोणकोणती विकास कामे करण्यात येणार आहे,  त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करणारया बाबींचा समावेश असावा. तसेच विविध यंत्रणांनी जिल्ह्यात नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावे.

महावितरणने तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील गावे 100 टक्के सौर उर्जेवर करावी. कर्ज वितरणाबाबत बँकांची तक्रार येणार नाही. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर बँकांनी कर्ज उपलब्ध करून द्यावेयासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी योग्य नियोजन करावे. आकांक्षित तालुका जीवतीमध्ये शिक्षणआरोग्य या बाबींवर विशेष फोकस करावा. क्रीडा विभाग खेळाडू तसेच तरुणांना खेळण्यासाठी दीर्घकाळ टिकेलअशी कामे घ्यावीत. वैद्यकीय रुग्णालयातील सर्व उपकरणे अद्यावत ठेवावी. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात पावसाळ्याच्या दिवसात आवश्यक औषधी उपलब्ध ठेवाव्या. तसेच शुद्ध पिण्याचे पाणीबसण्याची व्यवस्थाशौचालय स्वच्छ ठेवावे. अंगणवाड्यांमध्ये सुद्धा पिण्याचे पाणी व शौचालयाची व्यवस्था असावी. ज्या गावांना रस्त्यांची अत्यंत गरज आहेअशा गावांसाठी ग्रामीण रस्ते त्वरित करावे. त्यासाठी निधी देण्यात येईल. चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात चांगल्या अभ्यासिका तयार कराव्याअशा सूचना पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या.

यावेळी आमदार भोंगळे म्हणालेनियमित कर्ज भरणाऱ्यांना बँकांनी लगेच कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. मात्र बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा अग्रणी बँकेने त्वरित बँकांना सूचना कराव्या. सर्व तालुका क्रीडा संकुलामध्ये कुस्ती आणि कबड्डीसाठी मॅट उपलब्ध करून द्यावीअशी मागणी त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सादरीकरण केले.

०००००००

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक विद्यार्थी घडवा – पालकमंत्री डॉ. वुईके





दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक विद्यार्थी घडवा – पालकमंत्री डॉ. वुईके

Ø जिल्हा परिषद येथे जिल्हास्तरीय स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ

चंद्रपूरदि. 25 : विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू आहे. शिक्षण केवळ नोकरीसाठी नाहीतर विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवण्यासाठी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये भावनिकअध्यात्मिक बुद्धिमत्ता निर्माण झाली पाहिजे. तसेच त्यांना सामाजिक भानसुध्दा असावे. कठीण आणि संकटाच्या वेळी कसा निर्णय घ्यायचाही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक विद्यार्थी घडविला तर समाज आणि देशाचे भवितव्य उज्वल होईलत्यांना घडवण्याची नैतिक जबाबदारी आपली आहेअसे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहजिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मंजिरी टकलेउपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंतशिक्षणाधिकारी राजेश पाताळेअश्विनी केळकर यांच्यासह मंचावर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत उन्नती वडसकरफाल्गुनी पोतराजे आणि गायत्री बांदुरकर या विद्यार्थिनींना सुद्धा मानाचे स्थान देण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या पाचव्या वर्गात माझे शिक्षण झालेतो दिवस मला आज आठवलाअसे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणालेशिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून या देशाचा राज्यकारभार सुरू आहे. जर संविधान नसते तर मी सुद्धा तुमच्यासमोर उभा नसतो. बक्षीस हा सन्मान असला तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या शिक्षकांचे व पालकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या जिल्ह्याला प्रथमच महिला जिल्हाधिकारी म्हणून वसुमना पंत लाभल्या आहेत. स्त्री केवळ शक्ती नाहीतर परिवर्तन करण्याची ऊर्जा आहे. स्त्रीचा सन्मान म्हणजे राष्ट्राचा सन्मान आहे. या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चांगला बदल घडून येईल. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या नवीन कल्पनेनुसार जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्यासात-आठ महिन्यांपासून अतिशय चांगला उपक्रम जिल्हा परिषद मध्ये सुरू आहे. निपुण या उपक्रमामध्ये जिल्ह्याला तिसरा क्रमांक प्राप्त झाला. यासाठी सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी चांगली मेहनत घेतली. तर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणालेजिल्हा परिषदेच्या पाच शाळांमध्ये रोबोटिक्स उपक्रम राबविण्यात येत आहे. सोबतच ई -चावडी वाचन सुद्धा करण्यात येते. जिल्हास्तरावर विविध स्पर्धा घेण्यात आल्या. निपुण मध्ये जिल्ह्याची प्रगती चांगली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर यांनी केले. संचालन एकता बंडावर यांनी तर आभार विनीत मत्ते यांनी मानले. 

स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्राचे वाटप : जिल्हा परिषदेमार्फत पाच प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आला. या स्पर्धेचे जिल्हास्तरीय बक्षीस वितरण पालकमंत्री अशोक वुईके यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यात प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक संस्कार कारेकरद्वितीय स्वराज नन्नावरेतृतीय क्रमांक नैतिक कुचनकर यांनी प्राप्त केला. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पूर्वी केळझरकरद्वितीय दिव्या आरकिनवारतृतीय श्रेयस मराठे यांनीनिबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मानसी ढूमनेद्वितीय अपेक्षा बेतालतृतीय गायत्री बांदुरकर यांनीवकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रांजली आवारीद्वितीय माही वासेकरतृतीय कनिष्क कांबळे यांनी तर चावडी वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक देवांश परतेकीद्वितीय ईश्वरी मोहुर्ले आणि तृतीय क्रमोक सोमानी गोरे यांनी प्राप्त केला. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

०००००००

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीकरिता चंद्रपूर जिल्ह्यात 1643 मतदार

 महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीकरिता चंद्रपूर जिल्ह्यात 1643 मतदार

Ø 26 एप्रिल रोजी मतदान

चंद्रपूरदि. 25 : निवडणूक निर्णय अधिकारीमहाराष्ट्र वैद्यकीय परिषदमुंबई यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक 26 एप्रिल 2026 रोजी पार पडणार आहे. वैद्यकीय परिषदेवर नऊ सदस्यांची निवड करण्याकरिता एकूण  60 उमेदवार रिंगणात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 1643 पात्र मतदारांकडून गुप्त मतदानाद्वारे मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येईल.

सदर मतदान रामनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये होणार असून एकूण तीन मतदान केंद्र आहेत. यात खोली क्रमांक 1 अधिष्ठाता यांच्या दालनासमोरील कक्षात 1 ते 544 मतदारांचे मतदानखोली क्रमांक 2 परिचारिका कक्षात 545 ते 1087 मतदारांचे मतदान तर खोली क्रमांक 3 प्रशासकीय अधिकारी यांच्या दालनात 1088 ते 1643 मतदारांचे मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 5 असून या कालावधीत सर्व पात्र मतदारांनी ठरवलेल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावावाअसे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.

मतदारांची ओळख पटविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका दस्तऐवजाची मूळ प्रत मतदान केंद्राध्यक्ष सादर करणे अनिवार्य आहे. यात 1) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र (छायाचित्र नसल्यास इतर फोटो आयडी प्रूफ सोबत) 2) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आलेले ओळखपत्र3) भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा लोकसभा निवडणुकीसाठी मान्यता दिलेले कोणतेही छायाचित्रासह ओळखपत्र.

मतदान केंद्रात मोबाईल फोन व व्हिडिओ कॅमेरे आणण्यास परवानगी राहणार नाही. प्रत्यक्ष मतदान केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्याद्वारे संपूर्ण मतदान प्रक्रिया नोंदविण्यात येणार आहे. उमेदवाराने नियुक्त केलेला एक प्रतिनिधी संबंधित मतदान केंद्रात उपस्थित राहू शकतो. सर्व नोंदणीकृत डॉक्टर मतदारांनी निवडणुकीच्या नियमांचे पालन करून शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2026 पारदर्शकपणेनिष्पक्ष व कुठलाही अनुचित प्रकार न घडता यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व डॉक्टर व संबंधितांनी सहकार्य करावेअसेही आवाहन करण्यात आले आहे.

00000000

Friday, 24 April 2026

2011 पुर्वीच्या अतिक्रमणधारकांना प्राधान्याने जागेचा मालकी हक्क द्या



 

2011 पुर्वीच्या अतिक्रमणधारकांना प्राधान्याने जागेचा मालकी हक्क द्या  

Ø पालकमंत्र्यांनी दिले यंत्रणांना निर्देश

चंद्रपूरदि. 24 : अनेक वर्षांपासून वास्तव्य असलेल्या अतिक्रमणधारकांना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहेत्यानुसार 1 जानेवारी 2011 पुर्वी असलेले अतिक्रमण नियमानुकूल करून संबंधितांना जागेचा मालकी हक्क द्यायचा आहेया धोरणात्मक निर्णर्याची चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून 2011 पुर्वीचा कोणताही पात्र लाभार्थी घराच्या / जागेच्या मालकी हक्कापासून वंचित राहणार नाहीयाची दक्षता घ्यावीअसे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीत ते बोलत होतेयावेळी आमदार देवराव भोंगळेआमदार करण देवतळेजिल्हाधिकारी वसुमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमनपा आयुक्त अकुनुरी नरेशनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारउपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामसंदीप भस्के उपजिल्हाधिकारी (जमीनसचिन कुमावतअतुल जटाळे (पुनर्वसनयांच्यासह दूरदृष्यप्रणालीने सर्व उपविभागीय अधिकारीसर्व तहसीलदारगटविकास अधिकारीनगर पालिका आणि नगर पंचायतीचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

अतिक्रमण नियमानुकुल करण्याची प्रक्रिया 2017 पासून सुरू झाली आहेअसे सांगून पालकमंत्री डॉवुईके म्हणालेयात सुधारणा करून अतिक्रमणधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 25 मार्च 2026 रोजी अद्ययावत शासन निर्णय काढला आहेत्यानुसार 2011 पूर्वीच्या पात्र अतिक्रमीत लाभार्थ्यांना नियमानुकूल करून घराचा / जागेचा मालकी हक्क प्रदान करण्यात येईल.

ग्रामस्तरावरील यंत्रणेने यासाठी नागरिकांपर्यंत पोहचावेलोक आपल्याकडे येतीलयाची वाट पाहू नयेगावातील कोणताही पात्र लाभार्थी मालकी हक्कापासून वंचित राहणार नाहीयाची यंत्रणेने काळजी घ्यावीसर्व गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना त्वरित सूचना द्याव्यातवनजमीन वगळता गायरान आणि महसुलीच्या जागेवर अतिक्रमण असेल तर नियमानुकूल करणे आवश्यक आहेअसेही पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी सांगितले.

            बळीराजा शेतपाणंद रस्त्यांचा आढावा : बळीराजा शेतकरी पाणंद रस्त्यासाठी स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहेआपापल्या क्षेत्रातील पाणंद रस्त्यांबाबत त्वरीत आढावा घेऊन किती किलोमीटरचे पाणंद रस्ते तयर करावयाचे आहेत्याचे नियोजन कसे केलेयाची माहिती द्यावीपावसाळ्यापूर्वी प्रत्येक मतदारसंघात पांदण रस्ते तयार व्हावेअशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

०००००

चंद्रपूर जिल्ह्यात 105 रुग्णांना सुमारे 89.33 लाखांची मदत


 चंद्रपूर जिल्ह्यात 105 रुग्णांना सुमारे 89.33 लाखांची मदत

Ø मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

चंद्रपूरदि. 24 :  शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत  मिळालेल्या पात्र  गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे.  चंद्रपूर जिल्ह्यात आर्थिक वर्षात 105 रुग्णांना सुमारे 89 लाख 33 हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापनापेपरलेस अर्ज प्रक्रियातातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आलेत्यासोबतच सामंजस्य करारक्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालयधर्मादाय रूग्णालयसंस्थादाते आदींच्या सहकार्य लाभत आहे.  

मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहेपरिणामीअधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.

20 गंभीर आजारासाठी मदत : कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष ते 6), हृदययकृतकिडनीफुफ्फुसबोन मॅरोहाताचेगुडघ्याचे प्रत्यारोपणहिप रिप्लेसमेंटकर्करोग शस्त्रक्रियारस्ते अपघातलहान बालकांची शस्त्रक्रियामेंदूचे आजारहृदयरोगडायालिसिसकर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधननवजात शिशुंचे आजारबर्न (भाजलेलेरुग्णविद्युत अपघात रुग्ण अशा एकूण 20 गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षबीपीसीएल फाऊंडेशन  टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहेया करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआरअंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहेआर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.

आर्थिक वर्षातील मदत : 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यातील तब्बल 40 हजार 776 रुग्णांना 333 कोटी लाख 81 हजार 500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहेतरयाच कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील 105 रुग्णांना सुमारे 89 लाख 33 हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील 105 गरजू रुग्णांना सुमारे 89.33 लाख रुपयांची मदत मिळाल्याने ही योजना अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहेजलदपारदर्शक आणि संवेदनशील कार्यपद्धतीमुळे पात्र रुग्णांना वेळेत उपचारासाठी आर्थिक सहाय्य मिळत आहेगरजूंनी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी  धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

००००००