Search This Blog

Wednesday, 18 February 2026

जनसुनावणीमध्ये महिलांच्या 95 तक्रारींवर कार्यवाही





जनसुनावणीमध्ये महिलांच्या 95 तक्रारींवर कार्यवाही

Ø चंद्रपूरात महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम

Ø महिलांच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्या – रुपाली चाकणकर

चंद्रपूरदि. 18 :  ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जनसुनावणीमध्ये महिलांच्या 95 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आलीकार्यवाही करीता 5 पॅनलचे गठन करण्यात आले होतेआजच्या जनसुनावणीमध्ये वैवाहिक / कौटुंबिक समस्यांच्या 79 तक्रारीसामाजिक समस्यांच्या 5, मालमत्ता / आर्थिक फसवणुकीच्या 6, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळबाबत 1 तक्रार व इतर 4, अशा एकूण 95 तक्रारींवर कार्यवाही झाली.

नियोजन भवन येथे पार पडलेल्या या जनसुनावणीला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह सदस्य सचिव नंदिनी आवडेअतिरिक्त जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारेअपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडेनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारप्रकल्प संचालक मंजिरी टकलेजिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मेभागवत तांबेमनपा उपायुक्त संदीप चिद्रावार आदी उपस्थित होते.

उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करतांना श्रीमती चाकणकर म्हणाल्यामहिलांच्या तक्रारी जागच्या जागेवर सुटाव्यात्यांना न्याय मिळावाया उद्देशाने ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहेअनेक महिलात्यांच्या समस्यांबाबत तक्रारी करतातमात्र यंत्रणेकडून त्याची दखल घेतली जात नाहीहे अतिशय दुर्दैवी आहेमहिलांच्या तक्रारींबाबत कोणतीही टाळाटाळ न करता संबंधित यंत्रणेने तात्काळ दखल घ्यावी व त्याची गांभिर्याने सोडवणूक करावी.

महिलांना आपल्या समस्यांबाबत मुंबईत चकरा माराव्या लागू नयेस्थानिक स्तरावरच त्यांच्या तक्रारींची सोडवणूक व्हावीया उद्देशाने महिला आयोगच तुमच्या दारी आला आहेभरोसा सेलदामिनी पथकाच्या माध्यमातून पोलिस विभाग चांगले काम करीत आहेकौटुंबिक हिंसाचाराच्या सर्वाधिक तक्रारी आयोगाकडे येतातमात्र हा वाद होऊच नयेयासाठी विवाहापुर्वीच तरुण मुला-मुलींचे समुपदेशन करणे गरजेचे आहेहुंडाबळी कायदा अस्तित्वात असूनही हुंड्यासाठी मुलींचा छळ केला जातोहुंडा देणारा आणि घेणारा दोघेही गुन्हेगार आहेतआपल्या कर्तुत्वावर मुलींचे लग्न करात्यासाठी मुलींना चांगले शिकवाबालविवाहाबाबतही पालकांनी सजग राहावेअसे आवाहन श्रीमती चाकणकर यांनी केले.

आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे म्हणाल्याआजच्या जनसुनावणीला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहतामहिला आपल्या अधिकारांबाबत जागृत आहेअसे निदर्शनास येतेमहिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठीच प्रत्येक जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम घेण्यात येत आहे.

अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉव्यवहारे म्हणालेशासनाच्या विविध विभागांमार्फत महिलांसाठी योजना राबविल्या जातातत्याची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाकडून होत आहेप्रशासनामध्ये महिलांची भागिदारी जास्तीत जास्त असावीयासाठीएक टीमवर्क म्हणून जिल्ह्यात काम करीत असल्याचे त्यांनी सांगितलेअपर पोलिस अधिक्षक श्रीकातकडे म्हणालेभरोसा सेल द्वारे महिलांच्या समस्या सोडविल्या जाताततसेच महिलांवर अन्याय – अत्याचार होऊ नये म्हणून दामिनी पथकाद्वारे नियमित पेट्रोलिंग सुरू असतेपोलिस काकापोलिस दिदी उपक्रमांतर्गत शाळा – महाविद्यालयांना भेटी देऊन जनजागृती केली जातेअसे ते म्हणाले.

उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केलेसंचालन राणी खडसे यांनी तर आभार मोरेश्वर झोडे यांनी मानले.

०००००००

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 3 कोटी 75 लाखांचे बक्षीस


 

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 3 कोटी 75 लाखांचे बक्षीस

Ø माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये उत्कृष्ट कामगिरी

चंद्रपूरदि. 18 :  पृथ्वीजलवायुअग्नी आणि आकाश या निर्सगाच्या संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान 5.0’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये एप्रिल 2024 ते 31 मे 2025 या कालावधीमध्ये राबविण्यात आलेया अभियानात राज्यातील 27895 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतलायात चंद्रपूर  जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतींचा समावेश होता. ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीयविभागस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कारउंच उडी पुरस्कार आणि भुमी थिमॅटीक पुरस्कार श्रेणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत एकूण 3 कोटी 75 लाखांचे बक्षीस मिळविले.

या अभियानात उच्चत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाची नावेपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने 17 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णयाद्वारे घोषित केलीयामध्ये चंद्रपुर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरावर तसेच विभाग स्तरावर उतुंग कामगिरी करीत पुरस्कार प्राप्त केलेयात राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार सावली तालुक्यातील जिबगाव ग्रामपंचायत (75 लक्ष रुपये), चिखली ग्रामपंचायत (1 कोटी रुपये), विभागस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर ग्रामपंचायत (50 लक्ष रुपये), मुल तालुक्यातील भेजगाव ग्रामपंचायत (50 लक्ष रुपये), उंच उडी पुरस्कार चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर ग्रामपंचायत (50 लक्ष रुपये), भुमी थिमॅटिक पुरस्कार सावली तालुक्यातील चिखली ग्रामपंचायत (50 लक्ष रुपयेअसे एकूण 3 कोटी 75 लक्ष रुपयांचे पुरस्कार ग्रामपंचायतींनी पटकाविले आहे.

मुख्य कार्यकारी अधिका-यांकडून अभिनंदन : माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी कोटी 75 लक्ष किंमतीचे पुरस्कार प्राप्त केले असून जिल्ह्याकरीता ही निश्चितच अभिमानाची बाब आहेअसे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणालेयावेळी त्यांनी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंचसचिव व नागरीक तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं), गटविकास अधिकारीविस्तार अधिकारी यांचे देखील कौतुक केले.

पृथ्वीजलवायुअग्नीआणि आकाश या निर्सगाच्या संबंधित पंचतत्वांच्या रक्षणासाठी आम्ही सदैव कटीबध्द असून त्याकरीता माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत जिल्ह्यातील 100 टक्के  ग्रामपंचायतीची नोंदणी करण्यात आल्याचे पुलकित सिंह यांनी सांगितले.

००००००

शिवजयंती निमित्त पदयात्रेचे आयोजन

 शिवजयंती निमित्त पयात्रेचे आयोजन

चंद्रपूरदि. 18 :  जिल्हाधिकारी कार्यालयजिल्हा परिषदजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयचंद्रपूर शहर महानगरपालिकानेहरु युवा केंद्रयांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त 19 फेब्रुवारी 2026 ला सकाळी वाजता शिवजयंती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहेसदर पदयात्रेत लोकप्रतिनिधींसह अधिकारीशिक्षकक्रीडा शिक्षकनागरीक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातू चंद्रपूर शहरात रॅली काढण्यात येणार आहेपदयात्रेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक येथूनमहात्मा गांधी चौक-आझाद बगीचा -गिरणार चौक -महात्मा गांधी चौक आणि मनपा पार्कींग येथे पदयात्रा समाप्त होईलअसे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

००००००

सिपेटतर्फे 20 फेब्रुवारीला चंद्रपूरात ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा

 

सिपेटतर्फे 20 फेब्रुवारीला चंद्रपूरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा

चंद्रपूरदि. 18 — सिपेट सीएसटीएस चंद्रपूर यांच्या वतीने 20 फेब्रुवारी 2026 रोजी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि चक्रीय अर्थव्यवस्था’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र शहरातील एन.डी. हॉटेल येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत पार पडणार असून सहभाग पूर्णपणे विनामूल्य आहे.

चंद्रपूर येथे सिपेट स्थापना झाल्यापासून प्लास्टिक उद्योगपूरक विविध नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने रसायने आणि खते मंत्रालयरसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभागभारत सरकार यांच्या सौजन्याने सदर राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहे.

या चर्चासत्रात प्लास्टिक कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापनआधुनिक पुनर्वापर तंत्रज्ञानशाश्वत विकासाची दिशा तसेच चक्रीय अर्थव्यवस्थेची संकल्पना यावर तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे.CSIR-NEERI, VNIT नागपूर, CIPET तसेच प्लास्टिक उद्योग क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञ या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होऊन उद्योग आणि समाजामध्ये शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यास चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. उद्योग क्षेत्रातील इच्छुक उमेदवारविद्यार्थीसंशोधकपर्यावरण तज्ञ व संबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील मोठी कार्यशाळा प्रथमच चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येत असून संबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिपेट चंद्रपूरचे संचालक व प्रमुख श्री. प्रवीण बच्छाव यांनी केले आहे.

००००००

Tuesday, 17 February 2026

संबंधित कर्मचाऱ्यास नोटीस; आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई


 संबंधित कर्मचाऱ्यास नोटीसआवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई

Ø जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ प्रकरणी प्रशासनाचा खुलासा

चंद्रपूरदि. 17 :  जिल्हाधिकारी कार्यालयात ‘शासकीय कामासाठी गेलेल्या महिलेसोबत वाद तसेच कर्मचा-याची महिलेशी अरेरावी अशा मथळ्याखाली एक व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहेया घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरू केली आहे.

या प्रकरणात प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधित कर्मचा-याला कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहेप्राप्त खुलाशाच्या आधारे आवश्यकतेनुसार पुढील योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाने नमूद केले आहे कीजिल्हाधिकारी कार्यालय किंवा त्याअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांशी सन्मानपूर्वक व संवेदनशीलतेने वागणेही प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहेकोणत्याही प्रकारची अरेरावी किंवा अनुचित वर्तन सहन केले जाणार नाहीअसा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

याप्रकरणी भविष्यात अशा घटना घडू नयेतयासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आलीबैठकीदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना संयमशिष्टाचार व प्रशासनाची प्रतिमा लक्षात ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेचकोणत्याही नागरिकास जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा क्षेत्रीय कार्यालयात काही तक्रार असल्यास संबंधित कर्मचा-यांशी वाद घालण्याऐवजी थेट कार्यालय प्रमुखांशी संपर्क साधून रीतसर लेखी तक्रार नोंदवावीअसे आवाहन करण्यात आले आहेतक्रारींची पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईलप्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेअशी ग्वाही प्रशासनाने दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी स्पष्ट केले आहे.

०००००००