Search This Blog

Tuesday, 31 March 2026

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. ३१ :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिनडीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कीविशेषतः दुर्लक्षित असलेल्या हत्तीरोगासारख्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवात केली. देशात २०१७ मध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यात विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या  औषधोपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र सरकारकडे विनंती केली होती. यामुळे महाराष्ट्रातीलविशेषतः विदर्भातील आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचे दुःख मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. तसेचदेशातून हत्तीरोग निर्मूलन करण्याच्या प्रधानमंत्री यांच्या स्वप्नपूर्तीतही  मोठा वाटा उचलून या उपक्रमात महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य देत आहे.

राज्यात  ५५ लाख नागरिकांना औषधोपचाराचा लाभ देण्याचे उदिष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेकेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील १२ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘मास ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमडीए) मोहीम राबवली जात असूनत्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. या मोहिमेत पात्र नागरिकांना दरवर्षी प्रतिबंधात्मक औषधे दिली जातातज्यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते. राज्यामध्ये विशेष म्हणजेकाही निवडक जिल्ह्यांमध्ये पारंपरिक दोन औषधांऐवजी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) वापरली जात आहे. ही उपचारपद्धती अधिक प्रभावी मानली जाते आणि कमी कालावधीत रोग नियंत्रणात आणण्यास मदत करते.

महाराष्ट्रातील विदर्भ विभागात हत्तीरोगाचा मोठा प्रादुर्भाव असूनगडचिरोलीभंडाराचंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत. राज्यात सुमारे ५५ लाख नागरिकांना या औषधोपचाराचा लाभ देण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

नागपूर ग्रामीण भागात मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश

महाराष्ट्रातील नागपूरचंद्रपूरभंडारावर्धागडचिरोलीअमरावतीअकोलालातूरधाराशिवसोलापूरजळगावसिंधुदुर्गनांदेडठाणेपालघरनंदुरबारसोलापूर आणि यवतमाळ या १८ जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव आहे. फेब्रुवारी २०२६ च्या ताज्या अहवालानुसारमहाराष्ट्रातील हत्तीरोगाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे ७५ टवके रुग्ण एकट्या नागपूर विभागात आहेत. सर्वाधिक प्रभावित पाच जिल्हे: भंडाराचंद्रपूरनागपूरगडचिरोली आणि गोंदिया.

ट्रीपल ड्रग पॉलिसी (आयडीए) यशाचा दर: नागपूर ग्रामीण भागात या मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर ( एमएफ रेट) २०१४ मधील ४.९१ टक्क्यावरून २०२४ पर्यंत एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, ‘आयडीए’ उपचारामुळे मायक्रोफिलेरिया (परजीवी) कमी करण्यास अधिक परिणामकारक मदत होतेत्यामुळे रोगाचा प्रसार लवकर थांबवता येतो. राज्य शासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कीअफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही औषधे घ्यावीत. समाजाच्या सक्रिय सहभागाशिवाय हत्तीरोग निर्मूलन शक्य नसल्याचेही तज्ञांनी स्पष्ट केले आहे..

00000000000

चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी

 

चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी

 नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

चंद्रपूरदि. 31  : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक 1 व 3 एप्रिल 2026 रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळसोसाट्याचा वारा (ताशी 40 ते 50 किमी वेगाने) तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

तसेचकाही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्याच्या वेळी घरात सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. खिडक्या व दरवाजांपासून दूर राहावे तसेच सखल भागअंडरपासड्रेनेज परिसर किंवा पाणी साचणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. खराब दृश्यमानतेमुळे पावसात वाहन चालवणे टाळावे आणि विजेच्या तारांपासून तसेच पॉवर लाईन्सपासून दूर राहावे.

वादळ व विजांच्या कडकडाटाच्या वेळी मोकळ्या जागेत असल्यास सुरक्षित इमारतीचा आसरा घ्यावा. उंच झाडाखालीलोखंडी वस्तूजवळ किंवा तात्पुरत्या शेडमध्ये थांबू नये. घरात असताना विद्युत उपकरणे बंद ठेवावीतलँडलाईन फोनचा वापर टाळावा तसेच पाण्याच्या संपर्कात येणे टाळावे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे व आवश्यक सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यानमहाकाली यात्रेदरम्यान जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांनीही हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी  विनय गौडा यांनी केले आहे. यात्रेसाठी आलेल्या भक्तांनी निवारा क्षेत्राच्या अधिक माहिती करिता मंदिर परिसरातील नियंत्रण कक्षा भेट देऊन अधिक माहिती घ्यावी.

०००००००

Monday, 30 March 2026

वन अकादमीकडून कौशल्य विकास प्रशिक्षणातून शाश्वत रोजगार

 

वन अकादमीकडून कौशल्य विकास प्रशिक्षणातून शाश्वत रोजगार

चंद्रपूरदि. 30 : वन्यजीव परिक्षेत्रातील वन संसाधनांवरील अवलंबित्व कमी करून बेरोजगार युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर वन अकादमीतर्फे व्यापक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

या उपक्रमाचा मुख्य हेतू वन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणेत्यांना आत्मनिर्भर व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा आहेगेल्या तीन वर्षांपासून संचालक एमएसश्रीनिवास यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना उद्योगसापेक्ष कौशल्येव्यावहारिक ज्ञान आणि आत्मविश्वास दिला जात आहेविशेषतः ग्रामीण व वन क्षेत्रातील युवकांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासही मदत होत आहेवन परिसरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन वन संसाधनांवरील अवलंबित्व कमी करण्यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला आहे.

मार्च महिन्यात तीन रोजगाराभिमुख अभ्यासक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आलेयात 1) इलेक्ट्रिकल व सोलर पीव्ही इंस्टॉलर कोर्समध्ये इलेक्ट्रिकल मूलतत्त्वे तसेच सोलर पॅनल बसविणे व देखभाल यांचे प्रशिक्षण देण्यात आलेया माध्यमातून 20 युवकांना नोकरी मिळाली असून त्यांना 18200 रुपये प्रतिमाह वेतनासह निवास व भोजन सुविधा देण्यात येत आहे.

2) ऑटोमोटिव्ह 4-व्हीलर असिस्टंट या प्रशिक्षणामध्ये वाहनांचे भागसर्व्हिसिंग व देखभाल याबाबत ज्ञान देण्यात आलेप्रशिक्षित युवकांपैकी काहींना पुणे (भारत बेंझ – चाकण), मालेगावनागपूर (गिरनार आयशरतसेच इरोस हुंडाई येथे 14 ते 15 हजार रुपये प्रतिमाह वेतनावर नोकऱ्या मिळाल्या आहेत. 3) मल्टीफंक्शनल ऑफिस असोसिएट या कोर्समध्ये संगणकसंवाद कौशल्ये व कार्यालयीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. 29 प्रशिक्षित युवकांना गोवामुंबईपुणे व चंद्रपूर येथील विविध नामांकित संस्थामॉल व रुग्णालयांमध्ये 10 हजार ते 19 हजार रुपये प्रतिमाह वेतनावर रोजगार मिळाला आहे.

अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष प्रशिक्षणवैयक्तिक मार्गदर्शन व कामाचा अनुभव दिल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहेया उपक्रमामुळे युवकांना रोजगाराच्या संधी मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळत आहे.

०००००००

शिष्यवृत्तीची 60 टक्के रक्कम महाविद्यालयात जमा करावी

 शिष्यवृत्तीची 60 टक्के रक्कम महाविद्यालयात जमा करावी

Ø समाजकल्याण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन

चंद्रपूरदि. 30 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसारअनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन 2021-22 पासून सुधारीत निधी वितरण कार्यपध्दती अवलंब करावयाची आहेअनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत अर्ज संबंधित जिल्ह्यातील सहायक आयुक्तसमाज कल्याण यांच्यामार्फत मंजूर झाल्यानंतर त्या शैक्षणिक वर्षाची अनुज्ञेय शिष्यवृत्ती रक्कम प्रणालीद्वारे निश्चित करण्यात येतेसदरहु मंजूर करण्यात आलेली संपुर्ण शिष्यवृत्तीची रक्कम म्हणजेच महाविद्यालयास देय असणारा भाग (शिक्षण शुल्कपरीक्षा शुल्क व इतर नापरतावा शुल्क इत्यादीतसेच विद्यार्थ्याला देय असणारा भाग (निर्वाह भत्ताया दोन्ही भागांच्या एकत्रित रक्कमेचा केंद्र हिस्सा 60 टक्के या प्रमाणात लाभाची रक्कम केंद्र शासनाच्या प्रणालीमध्ये निश्चित करण्यात आली आहे.

त्यानुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यास अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरीत महाविद्यालयास देय असलेली 60 टक्के रक्कम सात दिवसांच्या आत महाविद्यालयाकडे जमा करावीयासाठी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून अर्जामध्ये नोंद असलेल्या एकूण शुल्काची रक्कम पाहावीअसे आवाहन समाज कल्याण विभागाचे  सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

००००००

‘दिव्यांग सहायक पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन


 

दिव्यांग सहायक पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 30 :  महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने राज्यातील दिव्यांग व्यक्तींनासर्व सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकाभिमुख दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ विकसित केले आहेराज्यातील दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सदर पोर्टल समावेशकपारदर्शक व सुविधा आधारित यंत्रणा आहेया पोर्टलवर लाभार्थ्यांकडून नोंदणी करण्यात येत असून विविध सक्षमीकरणात्मक योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यानुसार चंद्रपुर जिल्हयातील विविध संस्थादिव्यांग पुनर्वसन केंद्रेदिव्यांगांच्या शाळादिव्यांगांची कौशल्य विकास केंद्रे तसेच दिव्यागांचे इतर उपक्रम यांच्यामधील दिव्यांग लाभार्थीविद्यार्थी तसेच दिव्यांग प्रशिक्षणार्थी यांनी ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर’ 31 मार्च 2026 पर्यंत divyangsahayak.maharashtra.gov.in या वेब संकेतस्थळावर नोंदणी करून घ्यावीअसे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहजिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे यांनी केले आहे.

००००००