Search This Blog

Thursday, 30 April 2026

आजपासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरवात




 

आजपासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरवात

Ø ते 15 मे या कालावधीत स्वयंगणना करण्याची सोय

Ø जिल्हाधिका-यांनी घेतला यंत्रणेचा आढावा

चंद्रपूरदि. 30 : सन 2011 च्या जनगणनेनंतर तब्बल 15 वर्षांनी 1 मे 2026 पासून जनगणनेला सुरवात होत आहे. देशातील ही पहिलीच डिजीटल जनगणना असून 1 ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वयंगणना करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहेचंद्रपूर जिल्ह्यात जनगणना शुभारंभाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी गुरुवारी (दि. 30) सर्व यंत्रणेचा आढावा घेऊन सुचना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला मनपा आयुक्त अकुनुरी नरेशनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारउपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामपालिका प्रशासन अधिकारी डॉविद्या गायकवाडतहसीलदार विजय पवारप्रभारी नियोजन अधिकारी सुभाष कुमरे यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारीसर्व तहसीलदारसर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्याजनगणना हे राष्ट्रीय कार्य आहेविविध यंत्रणांनी आपापल्या क्षेत्रातील खासदारआमदारलोकप्रतिनिधीसभापती आदींची स्वयं गणना करावीतसेच नागरिकांनासुध्दा स्वयं गणनेसाठी प्रवृत्त करावेअधिकारी – कर्मचा-यांचे प्रशिक्षण व्यवस्थित घ्यावेजनगणनेबाबत शासन स्तरावरून रोजच आढावा घेण्यात येणार आहेत्यामुळे सर्वांनी आपली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावीअशा सूचना त्यांनी दिल्या.

अशी राहील स्वयंगणनेची प्रक्रिया :

1) संकेतस्थळाचा वापर आणि लॉगिन : https://se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्याराज्य / केंद्रशासित प्रदेश निवडाकॅप्चा प्रविष्ट करा.

2) कुटुंब नोंदणी : कुटुंब प्रमुखाचे नाव. 10 अंकी मोबाईल क्रमांकमेल आयडी असल्यास प्रविष्ट कराकुटुंब प्रमुखाचे नाव नंतर बदलता येणार नाहीप्रत्येक कुटुंबासाठी फक्त एकच मोबाईल क्रमांक वापरावाएकदा नोंदणी झाल्यावर तोच क्रमांक इतर कोणत्याही कुटुंबासाठी  वापरता येणार नाही.

3) भाषा आणि ओटीपी पडताळणी : पसंतीची भाषा निवडा आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवलेला ओटीपी प्रविष्ट करानिवडलेली भाषा नंतर बदलता येणार नाही.

4) स्थानाचा तपशील द्या : जिल्हा निवडा आणि परिसर / गाव / नगर व पीन कोड प्रविष्ट करा.

5) नकाशावर आपले निवासस्थान शोधा : आपली अचूक निवासी इमारत ओळखण्यासाठी आणि स्थानाची पुष्टी करण्यासाठी नकाशावरील लाल मार्कर ड्रॅग करा.

6) प्रश्नावली पूर्ण करा : टूलटिप्सवारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूजआणि आवश्यक माहिती टिपांच्या मार्गदर्शनानुसार घरसुची आणि गृह गणना प्रश्नावली भरा.

7) पूर्वावलोकन आणि पुनरावलोकन : प्रविष्ट केलेला सर्व डेटा तपासण्यासाठी पुर्वावलोकन स्क्रीनचा वापर करातुम्ही नोंदी संपादीत करू शकतानंतर सादर करण्यासाठी मसुदा जतन करू शकता किंवा अंतिमरित्या सादर करू शकता.

8) अंतिम सादर करणे : तुमचा डेटा लॉक करण्यासाठी ‘अंतिम सादर करा’ वर क्लिक कराअंतिम सादर केल्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीतसादर केल्यानंतर 11 अंकी एस.ई आयडी (एसएमएसआणि ईमेल दिले असल्यास त्यावर येईल.

9) गणकाची भेट : जेव्हा जनगणना गणक तुमच्या घरी भेट देईलतेव्हा तुमचा एस.आयडी त्यांना सांगाजर एस.आयडी विद्यमान नोंदीशी जुळला तर तपशील निश्चित करून सादर केले जातातअन्यथा गणक नव्याने डेटा गोळा करेल. 

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन : नागरिकांनी दिलेली माहिती गुप्त ठेवली जाईल व केवळ जनगणना कार्यासाठीच वापरली जाईलत्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती भरावीतसेच 15 मे नंतर घरी आलेल्या प्रगणकाला सहकार्य करून या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००००००

जिल्हाधिका-यांकडून जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा



जिल्हाधिका-यांकडून जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा

चंद्रपूरदि. 30 : जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी गुरुवारी (दि. 30) घेतलाजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडेसहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरेअतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉभास्कर सोनारकरपोलिस निरीक्षक अमोल काचारे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्याअनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधकअधिनियम अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यातील पिडीतांना दिलासा देण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावेतसेच कागदपत्रांची पुर्तता जलदगतीने करण्यासाठी विभागाने पुढाकार घ्यावापिडीतांना देय असलेल्या लाभाचा पहिला हप्ता त्वरीत देण्याचे नियोजन करावे.

सादरीकरण करतांना सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनीअनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधकअधिनियम 1989 अंतर्गत्‍ एप्रिल 2025 ते मार्च 2026 अखेरपर्यंत घडलेल्या गुन्ह्याची माहिती दिलीतसेच पोलिस तपासातील गुन्हेपोलिस फायनल गुन्हेन्यायालयात दाखल गुन्हे आदींची माहिती बैठकीत दिली.  तसेच गत वर्षातील 20 पिडीतांना पहिला हप्ता तर 29 पिडीतांना दुसरा व तिसरा हप्ता असे एकूण 49 पिडीतांना 41 लक्ष 75 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आल्याचे सांगितले.

००००००

पालकमंत्री यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम


 पालकमंत्री यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम

चंद्रपूरदि. 23 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके हे मे 2026 रोजी चंद्रपुरच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्याचा 67 व्या स्थापना दिन समारंभानिमित्त 1 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांच्या हस्ते पोलिस मुख्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहेसकाळी 10 वाजता नियोजन भवन येथे खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठकसकाळी 11.20 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे पालकमंत्री प्रयाण करतील.

००००००

‘नीट’ परिक्षेसाठी उमेदवार आणि पालकांनी सुचनांचे पालन करावे

 नीट’ परिक्षेसाठी उमेदवार आणि पालकांनी सुचनांचे पालन करावे

Ø जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूरदि. 30 : जिल्ह्यात ‘नीट’ (युजीपरीक्षा मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत जिल्ह्यातील 10 नियुक्त केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहेया परिक्षेसंदर्भात उमेदवारांनी आणि त्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे.

1) रिपोटिंग आणि प्रवेश  : परीक्षा केंद्रांवर प्रवेश सकाळी 11 वाजेपासून सुरू होईलअंतिम प्रवेशाची वेळ दुपारी 1.30 आहेया वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाहीशेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळण्यासाठी उमेदवारांनी केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचणे आवश्यक आहे.

2) अनिवार्य कागदपत्रे : उमेदवारांनी फोटो चिकटवलेले प्रवेशपत्रएक मूळ वैध फोटो ओळखपत्र सोबत आणावे

3) सुरक्षा आणि शिस्त : प्रवेशद्वारावर कडक तपासणी आणि बायोमेट्रिक पडताळणी केली जाईलउमेदवारांनी अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे आणि शिस्त पाळणे अनिवार्य आहेपालकांना परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश दिला जाणार नाही.

4) प्रतिबंधित वस्तू / ड्रेस कोड : उमेदवारांना खालील गोष्टी आणण्यास सक्त मनाई आहेमोबाईल फोनइलेक्ट्रॉनिक उपकरणेस्मार्ट वॉचअभ्यास साहित्यकागदपत्रेकॅल्क्युलेटरबॅग किंवा इतर कोणतीही अनधिकृत वस्तूतसेच उमेदवारांनी दागिनेअलंकारघड्याळे किंवा कोणतीही धातूची वस्तू घालू नयेबेल्टटोपी किंवा मार्गदर्शक तत्त्वांनुसार परवानगी नसलेले इतर साहित्य टाळावेतपासणी सुलभ होण्यासाठी साधे आणि हलके कपडे परिधान करावेतप्रतिबंधित वस्तू जवळ बाळगल्यास परीक्षेच्या नियमांनुसार कडक कारवाई केली जाईल

5) सुविधा आणि व्यवस्था : सुरक्षावैद्यकीय मदतपिण्याचे पाणी आणि अखंड वीजपुरवठ्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहेउमेदवारांच्या सोयीसाठी विशेष वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहेदिव्यांग उमेदवारांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

6) कडक उष्णतेबाबत महत्त्वाची सूचना : उमेदवारांनी केंद्रावर येण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे आणि हलका आहार घ्यावादीर्घकाळ थेट सूर्यप्रकाशात राहणे टाळावेउष्णतेमुळे होणारी घाई टाळण्यासाठी केंद्रावर लवकर पोहोचावेड्रेस कोडच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारहलके आणि आरामदायी कपडे घालावेकेंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध असेलतथापिउमेदवार मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वतःची पारदर्शक पाण्याची बाटली सोबत आणू शकतात.

 7) महत्त्वाच्या सूचना : उमेदवारांनी प्रवेशपत्रावर छापलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करावे.

8) पालकांसाठी सूचना : पालकांनी परीक्षा केंद्रांजवळ गर्दी करणे टाळावेउमेदवार वेळेवर केंद्रावर पोहोचतील याची खात्री करावीजिल्हा प्रशासन आणि पोलिसांना पूर्ण सहकार्य करावेसर्व उमेदवार आणि पालकांनी या परीक्षेच्या सुरळीत संचालनासाठी वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईचंद्रपूरदि. 30 : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.

या संदर्भात 13 जुलै 2017 रोजी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्र शासनाच्या आरोग्य संशोधन विभागामार्फत देशभर उभारण्यात येणाऱ्या 150 अत्याधुनिक विषाणू प्रयोगशाळांच्या उपक्रमाचे स्वागत करत महाराष्ट्राला योग्य वाटा देण्याची मागणी करण्यात आली होतीया पत्रात देशाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर आणि राज्याची राजधानी मुंबई येथे राज्यस्तरीय प्रयोगशाळा तसेच राज्यातील विविध विभागांतील दहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती.

केंद्र शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयनागपूर येथे राज्यस्तरीय विषाणू प्रयोगशाळा मंजूर केलीयाशिवाय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयनागपूर तसेच अकोलाछत्रपती संभाजीनगरसोलापूरधुळे आणि मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली.

या योजनेसाठी केंद्र शासनाकडून एकूण 29 कोटी 21 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाया निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करून प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्याकोविड-19 महामारीच्या काळात या प्रयोगशाळांनी आरटी-पीसीआर चाचण्यांद्वारे मोठी भूमिका बजावली.

याशिवायया प्रयोगशाळांमुळे विविध विषाणूजन्य आजारांचे निदान करणे शक्य झाले आहेआतापर्यंत कोविड-19 (37,21,154), डेंग्यू (88,327), चिकनगुनिया (39,817), झीका (3,923), स्क्रब टायफस (7,091), इन्फ्लुएंझा (27,536), एचबीव्ही (1,53,180), रोटाव्हायरस (651) अशा एकूण 40,41,689 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळाली असून भविष्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी राज्य अधिक सक्षम झाले आहे.

००००