Search This Blog

Monday, 2 March 2026

जिवती तालुका स्तरावरील जनता दरबार उत्साहात पार



 

जिवती तालुका स्तरावरील जनता दरबार उत्साहात पार

७/१२ संगणकीकरणावर भर

चंद्रपूरदि. 02 : जिवती तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आज (2 मार्च) तालुका स्तरावरील जनता दरबार कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळेजिल्हाधिकारी विनय गौडा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी निवासी जिल्हाधिकारी दगडू कुंभारउपवनसंरक्षक योगेश वाघायेजिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रदीप जगतापराजुराचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने,  ओमप्रकाश गौडजिवतीच्या तहसीलदार रुपाली मोगरकरगटविकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडकेगटशिक्षणाधिकारी अमर साठेतालुका कृषी अधिकारी माधुरी गावडेउपअधीक्षक भूमी अभिलेख अवधेष फटींगसार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता धिरज तंदीवारतालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील टेंभेमहावितरण कंपनीचे अभियंता जयस्वालजिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता राठोड तसेच नगर पंचायत जिवतीचे मुख्याधिकारी साठोने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री गौडा म्हणाले, 'आपले सरकार सेवा केंद्रमधील तक्रारी निकाली काढाव्यात. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत पुढील तीन महिन्यात तालुकास्तरावर शिबिर घेण्यात येणार आहे. सर्व लाभार्थ्यांना या शिबिरात लाभ द्यावा.

सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्यासाठी त्वरित नोंदणी करावी. स्थानिक नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्याबाबत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला निर्देश दिले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी  रविंद्र माने यांनी प्रास्ताविकतेत तालुक्यातील ७/१२ संगणकीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली. तालुक्यात एकूण १३,४६० इतके ७/१२ अभिलेख असून त्यापैकी महसूल विभागाच्या ८,२२२ अभिलेखांपैकी ६,४१५ अभिलेख संगणकीकृत झाले आहेत. सुमारे १,८६० अभिलेख संगणकीकरणासाठी शिल्लक असून जवळपास ३,८०० अभिलेख संशयित स्वरूपातील आहेत. त्याबाबत रद्द करण्याची कार्यवाही उपविभागीय कार्यालयजिवती येथे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ३,१६७ अभिलेख वन विभागाच्या नावे असल्याची माहिती देण्यात आली.

निवासी जिल्हाधिकारी श्री .कुंभार यांनीही ७/१२ संगणकीकरण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी प्रशासनाच्या कार्याला दुजोरा देतज्यांचे ७/१२ अभिलेख संशयित यादीत आहेत त्यांच्या मूळ हक्कांवर अन्याय होणार नाहीयाची खबरदारी घेतली जाईलअशी ग्वाही दिली. तसेच जमीन मोजणी प्रक्रियेसाठी नागरिकांनी सहकार्य करावेअसे आवाहन केले.

यानंतर उपस्थित नागरिकांना आपल्या समस्या मांडण्याची संधी देण्यात आली. विविध महसुलीजमीन नोंदीमोजणीप्रमाणपत्रे तसेच मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न नागरिकांनी मांडले. संबंधित विभाग प्रमुखांनी तात्काळ मार्गदर्शन करून काही प्रकरणे जागेवर निकाली काढलीतर उर्वरित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन श्री. भगत यांनी तर आभार तलाठी सागर कोडापे यांनी मानले. यावेळी महसूलवनभूमी अभिलेखकृषीआरोग्यशिक्षणसार्वजनिक बांधकाममहावितरणनगर पंचायत आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जनतेच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा जनता दरबार नागरिकांसाठी उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

नागरिकांनी मांडल्या आपल्या समस्या : यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडून प्रशासनाला निवेदन सादर केले. यात सातबारा संगणकीकरण करून जमिनीची त्वरित मोजणी करून देणेनगरपंचायत अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलासाठी जमीन उपलब्ध करून देणेअतिक्रमण नोंदवही उपलब्ध करून देणेघरकुल बांधकामाकरिता पाच ब्रास मोफत रेती त्वरित उपलब्ध करून देणेभूमी अभिलेखमहसूल विभाग व वन विभाग यांनी संयुक्तरित्या मोजणी करून देणेअत्याधुनिक वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देणेआदी विषयांची निवेदने देण्यात आली.

००००००

7 मार्च पासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा पहिला टप्पा

7 मार्च पासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा पहिला टप्पा

चंद्रपूरदि. 02 : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्या पुढाकारातून तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ या उपक्रमाचा पहिला टप्पा 7 मार्च पासून सुरू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासन व महसूल विभागाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकशेतकरीविद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न तात्काळ सोडविणे हा आहे. जनतेच्या तक्रारी त्वरीत निकाली काढून महसूल सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणेमहसूल प्रशासन अधिक लोकाभिमुखकार्यक्षम व गतिमान करणे हे या उपक्रमाचे मुख्य ध्येय आहे.

 मार्च ते मे २०२६ या कालावधीत चंद्रपूर तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ तसेच नगर परिषद/नगरपंचायत स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

 ७ मार्च रोजी सकाळी १० वा. – ग्रामपंचायत कार्यालयअजयपूर

१४ मार्च रोजी सकाळी १० वा. – स्नेहप्रभा मंगल कार्यालयघुग्घुस

१० एप्रिल रोजी सकाळी १० वा. – लोकसेवा मंगल कार्यालयपडोली

१७ एप्रिल रोजी सकाळी १० वा. – जिल्हा परिषद शाळाचिंचाळा

८ मे रोजी सकाळी १० वा. – खत्री महाविद्यालयचंद्रपूर आणि

 १५ मे २०२६ रोजी सकाळी १० वा. – तहसील कार्यालयचंद्रपूर येथे समारोप होईल.

या अभियानांतर्गत महसूल विभागाच्या १५ पेक्षा अधिक प्रमुख सेवा थेट शिबिरस्थळी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे७/१२ मधील त्रुटी दुरुस्तीडिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व ८-अ उतारे वाटपउत्पन्नरहिवासीजात व नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रेअकृषक तरतुदीबाबत मार्गदर्शनसनद प्रक्रियेची माहितीसामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभविद्यार्थ्यांसाठी विविध दाखलेतुकडेबंदी कायद्यावरील प्रकरणांचा निपटारापाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यताघरकुल पट्टे वाटपई-मोजणी अर्ज निकाली काढणेअॅग्रीस्टॅक व पी.एम. किसान नोंदणीभूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणे आदी सेवांचा समावेश आहे.

तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नवीन तरतुदींची जनजागृती व प्रभावी अंमलबजावणीडिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

नागरिकांनी संबंधित शिबिरस्थळी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावाअसे आवाहन तहसील कार्यालय व भूमी अभिलेख कार्यालयचंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

जिवती तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन


 जिवती तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

चंद्रपूरदि. 03 : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनताशेतकरीविद्यार्थी  महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणेजनतेच्या तक्रारी निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुखकार्यक्षम  गतिमान करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्याबाबत राज्य शासनाने सुचना दिल्या आहेत.

त्या अनुषंगाने जिवती तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून 7 मार्च 2026 रोजी शासकीय आश्रम शाळा पाटण येथे, 14 मार्च रोजी जिल्हा परिषद प्राशाळा टेकामांडवा येथे, 10 एप्रिल रोजी शासकीय आश्रम शाळा पाटण येथे, 17 एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राशाळा टेकामांडवा, 8 मे रोजी विदर्भ कॉलेज जिवतीआणि 15 मे 2026 रोजी तहसील कार्यालय जिवती येथे सदर शिबिर घेण्यात येणार आहे.

तरी सर्व जनतेनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिवतीच्या तहसीलदार रुपाली मोगरकर यांनी केले आहे

००००००

Sunday, 1 March 2026

गुरु तेग बहादुरांच्या शौर्याची परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 


  • हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमात ध्वनिचित्रफितद्वारे प्रधानमंत्र्यांनी दिला संदेश

गुरु तेग बहादुरांच्या शौर्याची परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा

 – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

खारघरदि. १ : महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० वा शहिदी समागमाच्या माध्यमातून आपण महान परंपरेचे साक्षीदार होत आहोत. गुरूंनी दिलेला त्याग आणि सामाजिक एकतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहेअसा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ध्वनिचित्रफितद्वारे दिला.

अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश ध्वनिचित्रफितीद्वारे दाखविण्यात आला.

प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले कीगुरूंनी त्यागाची पराकाष्ठा केली. त्या काळात समाजातील सर्व घटक एकत्र उभे राहिले. सत्य आणि संस्कृतीसाठी ठाम राहण्याची प्रेरणा समाजाला मिळाली. या सामाजिक एकतेच्या महायज्ञात गुरु गोविंद सिंह आणि गुरु नानक नाम लेवा संगत यांची महत्त्वाची भूमिका होती. आज देशाला पुन्हा सामाजिक एकतेची गरज असताना हा समागम आश्वासक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या यात्रेची सुरुवात गेल्या वर्षी नागपूर येथून झाली. त्यानंतर तख्त श्री हजूर साहिबनांदेड येथे कार्यक्रम पार पडला आणि आता नवी मुंबईत हा समागम महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या उपक्रमाद्वारे श्री गुरु तेग बहादुर यांचा शौर्यपूर्ण इतिहास महाराष्ट्रातील हजारो गावांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. या आयोजनाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.

देशभरात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत असल्याचे सांगत हरियाणातील कुरुक्षेत्र येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचा अनुभव त्यांनी सांगितला. केंद्र शासन गुरूसंबंधित प्रत्येक ऐतिहासिक प्रसंग राष्ट्रीय स्तरावर साजरा करत आहे. ४००वा प्रकाश पर्वस्मृतिचिन्ह, टपाल तिकीट आणि विशेष नाण्याचे प्रकाशनतसेच गुरु नानक देव यांचा ५५०वा प्रकाश पर्व श्रद्धेने साजरा करण्यात आल्याचा उल्लेख प्रधानमंत्री मोदी यांनी केला. साहिबजाद्यांच्या सन्मानार्थ वीर बाल दिवस’ साजरा करण्याची परंपराही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

शीख समाजासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले कीकरतारपूर साहिब कॉरिडॉर विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला. श्री हेमकुंड साहिब यात्रेसाठी सुविधा उभारण्यात आल्या. शीख संघटना आणि गुरुद्वारांशी संबंधित संस्थांना एफसीआरए अंतर्गत सवलती देण्यात आल्या. शीख इतिहासाला अभ्यासक्रम आणि सांस्कृतिक चर्चेत स्थान देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानातील शीख बांधवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि गुरु ग्रंथ साहिब यांच्या सन्मानासाठी सरकारने मिशन मोडमध्ये काम केले. जम्मू-काश्मीरमधील शीख कुटुंबांसाठी पुनर्वसन पॅकेज लागू करण्यात आलेअसेही त्यांनी सांगितले.

शीख समाजाच्या श्रद्धेचा सन्मान आणि त्यांच्या प्रगतीसाठी नवे मार्ग निर्माण करणे ही आमची जबाबदारी असून ही सेवा करण्याचे आम्हाला सौभाग्य लाभले आहेअसे नमूद करत त्यांनी नवी पिढी गुरूंच्या साहस आणि सत्याच्या मूल्यांशी जोडली गेली पाहिजेअसे आवाहन केले. इतिहास केवळ स्मरणात न ठेवता तो आचरणात आणणे हेच या समागमाचे उद्दिष्ट असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले.

०००००

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह






 श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात

– केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 

नवी मुंबईदि. ०१ :  हिंद दी चादर म्हणून संपूर्ण देशात आदराने ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे शहिदत्व हे केवळ शीख समाजासाठी नव्हेतर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आपले शीश अर्पण केले. देश त्यांच्या या त्यागाचा सदैव ऋणी राहीलअसे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने नवी मुंबईतील खारघर येथे हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात गृहमंत्री शाह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारअखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोलेशहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंह जीमुखीदमदमी टकसालप्रधान संत समाजबंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराजराज्यस्तरीय समनव्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईकराज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह आदी उपस्थित होते.

या उपक्रमाचे महत्त्व विषद करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणालेप्रत्येक गुरुद्वारा आणि प्रत्येक वस्तीपर्यंत हिंद दी चादरचा संदेश पोहोचविण्यासाठी बाबा हरनाम सिंगजी यांनी मोठे कार्य केले आहे. राज्य शासनाने यापूर्वी नांदेड व नागपूर येथे आयोजित केलेल्या हिंद दी चादर’ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून नवी मुंबईतील कार्यक्रमात शीख बांधवांसह विविध समाजघटकांचा मोठा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शीख समाजासाठी सेवाकार्याची संधी साधत विविध प्रसंगी त्यांच्या परंपराश्रद्धा आणि योगदानाचा गौरव केला आहे. त्याच धर्तीवर देशभर हिंद दी चादर’ पर्वाचे आयोजन करण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

यावेळी संत परंपरेचे स्मरण करताना त्यांनी पोहरादेवी येथील सेवालाल महाराज तसेच संत नामदेव महाराज यांना वंदन केले. संत नामदेव यांच्या रचनांचा समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये झालेला आहेही भारतीय संतपरंपरेच्या व्यापकतेची साक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संत रविदास यांसारख्या संतांच्या विचारांनाही गुरु ग्रंथ साहेबमध्ये स्थान मिळाले आहेयावरून भारतीय अध्यात्माची सर्वसमावेशकता स्पष्ट होतेअसे त्यांनी नमूद केले.

नववे श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या शहादतीचा विशेष उल्लेख करताना केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले कीअन्याय आणि अत्याचारांविरोधात उभे राहून त्यांनी दिलेले शहिदत्व भारतीय इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी घटना आहे. शीश दियापर सिर न झुकाया हीच शीख गुरुपरंपरेची ओळख असून भारताच्या अखंडतेचा तो आधार आहे.

            शीख परंपरेतील नामजपआराधना आणि लंगर यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले कीया मूल्यांमधून समाजातील समरसता आणि बंधुभाव दृढ होतो. गुरु गोविंद सिंग यांच्या काळात खालसा पंथाची स्थापना झाली आणि धर्मरक्षणासाठी अद्वितीय त्यागाची परंपरा अधिक बळकट झाली. त्यांच्या चारही सुपुत्रांच्या शहादतीनेही या परंपरेला अमरत्व प्राप्त झालेअसे त्यांनी नमूद केले.

आनंदपूर साहिबसारख्या पवित्र स्थळांचा उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले कीअन्यायकारक फर्मानांसमोर न झुकता गुरूंनी दाखवलेले साहस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. नववे गुरु श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचा संदेश महाराष्ट्र शासन राज्यातील छोट्या-छोट्या गावांपर्यंत पोहोचवत आहेयाबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.

भारताची संस्कृती सर्व धर्म समभाव’ या तत्वावर आधारलेली आहे. ही परंपरा जपण्यासाठी शीख गुरूंनी केलेले योगदान अमूल्य आहे. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध उभे राहणे हीच खरी देशभक्ती असल्याचे केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्यानंतरही देशाच्या सुरक्षेसाठी शीख जवानांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. एक भारतश्रेष्ठ भारत या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी अशा ऐतिहासिक कार्यक्रमांची गरज आहेअसे त्यांनी सांगितले.

यावेळी शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा ‍हरनाम सिंग जीमुखीदमदमी टकसालप्रधान संत समाज यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री शाह यांना जफरनामा देऊन सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र आणि पंजाबमधील अध्यात्मिक व ऐतिहासिक संबंध

बाबा‍ हरनाम सिंग जीमुखीदमदमी टकसालप्रधान संत समाज

राज्य समन्वय  समितीचे मार्गदर्शक बाबा ‍ हरनाम सिंग म्हणाले कीनागपूर आणि तख्त सचखंड श्री हजूर साहिबनांदेडनंतरचा हा तिसरा आणि सर्वात मोठा कार्यक्रम ऐतिहासिक उत्साहात पार पडला. यावेळी  महाराष्ट्र आणि पंजाबमधील अध्यात्मिक व ऐतिहासिक संबंधांना उजाळा दिला.     

            भारतीय संस्कृतीवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानामुळेच आज भारतीय संस्कृती सुरक्षित आहे. संत नामदेव महाराज आणि गुरु नानक देव जी यांच्या काळापासून हे दोन्ही प्रांत जोडलेले आहेत.  दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंह जी यांनी पंजाबमधून येऊन नांदेडच्या पावन भूमीवर वास्तव्य केलेज्यामुळे हे नाते अधिक घट्ट झाले आहे.

महाराष्ट्र शासनाने अतिशय स्तुत्य निर्णय घेतले आहेत. ब्रिटीश काळापासून सिखलीगर समाजावर लादलेले निर्बंध हटवून त्यांना सन्मानाचे आणि समानतेचे अधिकार देण्याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या सहकार्याने जनजागरण- शरदराव ढोले

अखिल भारतीय धर्मजागरण मंचाचे प्रमुख शरदराव ढोले यांनी प्रास्ताविकात संत नामदेव महाराजांच्या पंजाब-महाराष्ट्रातील आध्यात्मिक नात्याचा उल्लेख केला आणि वारकरीसिंधीमोहियाल तसेच गुरु नानकांना गुरु मानणाऱ्या विविध समाजघटकांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले. उदासीन संप्रदायाच्या सहभागासह महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ९६ रथांच्या माध्यमातून सुमारे २० हजार गावांमध्ये जनजागरण करण्यात आले असून ५०० हून अधिक पूर्णकालीन कार्यकर्त्यांच्या तीन महिन्यांच्या परिश्रमातून हा भव्य कार्यक्रम यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.

०००००