Search This Blog

Monday, 27 April 2026

प्रत्येक आदिवासी प्रकल्पात आता उन्हाळी प्रशिक्षण शिबीर - पालकमंत्री डॉ. वुईके



प्रत्येक आदिवासी प्रकल्पात आता उन्हाळी प्रशिक्षण शिबीर पालकमंत्री डॉवुईके

Ø चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या उपक्रमाची दखल व कौतुक

चंद्रपूरदि. 27 : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन होत असते. मात्र अशा शिबिरांची प्रवेश फी, अतिशय जास्त असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे पालक आपल्या पाल्यांना पाठवू शकत नाही आणि मोठ्या प्रमाणात खर्चही करू शकत नाहीही बाब लक्षात घेऊन चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या संकल्पनेतून गत तीन वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहेहा अतिशय स्त्युत्य उपक्रम असूनपुढील शैक्षणिक वर्षापासून चंद्रपूरचा हा उपक्रम राज्यातील प्रत्येक आदिवासी प्रकल्पात राबविण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर अंतर्गत बोर्डा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होतेयावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमहानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेशप्रकल्प अधिकारी विकास राचेलवारशाळेचे मुख्याध्यापक रामदास खवशी आदी उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावाअसे सांगून डॉवुईके म्हणालेविद्यार्थ्यांना आदिवासी संस्कृतीबद्दल माहिती व्हावीतसेच ही संस्कृती टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेया संकल्पनेतून सलग तिसऱ्या वर्षी शासकीय आश्रमशाळा बोर्डा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेया शिबिरात धनुर्विद्यागोंडी व वारली पेंटिंगसंगीतविविध वाद्य वाजवणे कलाकराटेलाठी काठी चालवणेयोगाक्ले आर्ट व मुलींसाठी मेहंदी कलाबांबू आर्ट आदींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहेत्यामुळे या शिबिराचा आदिवासी विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावाअसे आवाहन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.अशोक वुईके त्यांनी केले.

शिबिरात चंद्रपूर प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा व 24 अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य आश्रमशाळेतील सुमारे 150 मुली व 80 मुले अशा एकूण 230 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाकार्यक्रमाच्या सुरुवातीला ढोल पथकाच्या गजरात मंत्री डॉअशोक वुईके यांच्यासह सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आलेयावेळी क्रांतिवीर बिरसा मुंडाक्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलेसदर उन्हाळी प्रशिक्षणामध्ये आलेल्या 230 विद्यार्थ्यांनाएक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात येत येणार आहेजेव्हा नवीन सत्रात शाळा सुरू होईलतेव्हा हे प्रशिक्षित झालेले विद्यार्थी आपापल्या शाळेमध्ये उर्वरित विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केलेसंचालन उच्च माध्यमिक शिक्षिका अनुराधा लाड यांनी तर आभार मुख्याध्यापक रामदास खवशी यांनी मानले.  कार्यक्रमाला सहाय्यक प्रकल्प अधिकारीसर्व मुख्याध्यापकशिक्षक व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

 ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई / चंद्रपूरदि. 27 : भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहेपारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारीत होत आले आहेपरंतू हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेतसदरील हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देता यावेया दृष्टीने भारत सरकारने ज्ञानभारतम् या प्रकल्पाची आखणी केली आहेया प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षणदस्तऐवजीकरणसंवर्धनडिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे.

भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला 16 मार्च 2026 पासून प्रारंभ करण्यात आला.

या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्थासंग्रहालयेग्रंथालयेधार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेतसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहेयामध्ये हस्तलिखितांची मालकी ही संबंधीत संस्थाग्रंथालय अथवा खाजगी संग्राहक यांचीच राहणार आहेपरंतू कोणाला स्वखुशीने सदरील हस्तलिखिते शासनाकडे सुपूर्द करावायाची झाल्यास शासन ती स्विकारेल.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असून राज्यातील विविध सांस्कृतिक संस्थाविद्यापीठेसंशोधन संस्थाहस्तलिखित संग्रहालये तसेच विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहेमहाराष्ट्रात या प्रकल्पासाठी खालील संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत. 1) कवी कालिदास संस्कृत विद्यापीठनागपूर क्लस्टर केंद्र, 2) भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थापुणे क्लस्टर केंद्र, 3) आनंद आश्रम संस्थानपुणे स्वतंत्र केंद्र, 4) भारत इतिहास संशोधक मंडळपुणे स्वतंत्र केंद्र.

महाराष्ट्र राज्यासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालयमहाराष्ट्र राज्यमुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य नोडल अधिकारी म्हणून सुजितकुमार उगलेसंचालकपुराभिलेख संचालनालय कार्य पाहणार आहेततर अंजली ढमाळउपसंचालकमराठी भाषा विकास संस्थातथा अभिजात मराठी भाषा कक्षमराठी भाषा विभाग या सहनोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

सदर सर्वेक्षणासाठी ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत "Gyan Bharatam" हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे क्षेत्रीय मूल्यांकनपडताळणी व दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहेया मोहिमेच्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यात ज्ञानभारतम् प्रकल्पासाठी जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करणेजिल्हास्तरीय समिती स्थापन करणेतसेच मंदिरेमठधार्मिक संस्थाविद्यापीठेग्रंथालयेशैक्षणिक संस्था व खाजगी संग्राहक यांना सर्वेक्षणात सहभागी करून घेणे याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

या सर्वेक्षण मोहिमेत शैक्षणिक संस्थाग्रंथालयेसंग्रहालयेसंस्कृत पाठशाळाधार्मिक संस्थासंशोधकपारंपरिक पंडिततसेच एनसीसीएनएसएस स्वयंसेवकविद्यार्थी व वारसा संवर्धन संस्था यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहेया निमित्ताने आवाहन करण्यात येते कीआपल्याकडे जर काही हस्तलिखिते उपलब्ध असतील तर त्याची माहिती ज्ञानभारतम् या मोबाईल अॅप वर अपलोड करावी व या कार्यात सहभाग नोंदवावा.

०००००

मधुमित्र मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने आमंत्रित

 मधुमित्र मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने आमंत्रित

Ø अंतिम मुदत मे 2026 पर्यंत

चंद्रपूरदि. 27 :  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने 2026 साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेतमंडळाच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून ही पुरस्कार योजना सुरू झाली आहेमधमाशीपालन व्यवसायास गती मिळावी व मधपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने हा उपक्रम सुरू केला आहे.

मधमाशीपालनात अनेक वर्ष काम करणाऱ्या यशस्वी मधपाळांना प्रथम पुरस्कार 11 हजार रुपयेद्वितीय हजार व तृतीय हजार रुपये पुरस्काराने सन्मानित करण्यात येतेयातील एक पुरस्कारमहिला मधपाळासाठी राखीव आहे. 20 मे  रोजी जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून पुणे येथे जाहीर समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातीलया पुरस्काराची लिंक मंडळाच्या www.mskvib.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहेतसेच प्रत्येक जिल्ह्यात खादी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात नामांकन अर्ज मिळू शकतील.

इच्छुकांनी आपले नामांकन मे 2026 पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात पाठवावेअधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारीजिल्हा कार्यालय चंद्रपूर येथे, 07172 - 252142 या दूरध्वनी क्रमांकावर  तसेच 9607219247, 9322789232 या क्रमांकावर संपर्क साधावाअसे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी गजानन इंगळे यांनी कळविले आहे.

००००००

'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता


 

'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता

Ø पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी नियोजन व अंमबजावणीचे निर्देश

चंद्रपूरदि. 27 : राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता व उष्णलहरींचा धोका लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने राज्यातील पशुपालककुक्कुटपालक व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेतवाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विभागाने सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून पशुपालकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे

उष्णलहरींच्या काळात पशुधनाची कशी काळजी घ्यावी व याबाबत्त क्षेत्रिय स्तरावर काय जनजागृती करावीयाबाबत पशुसंवर्धन विभागाने पशुधनाची  काळजी घेण्याबाबत आवाहन केले आहेयामध्ये 1) पशुधनाला पुरेसे स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. 2) आहारात क्षार मिश्रणे व जीवनसत्वांचा समावेश करावा. 3) दुभत्या जनावरांना संतुलित आहार द्यावा. 4) शेतीच्या किंवा वहनाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पशुधनाला सकाळी 11 ते सायंकाळी या तीव्र उन्हाच्या काळात विश्रांती द्यावीत्यांना सावलीत किंवा खेळती हवा असलेल्या थंड जागी बांधावे. 5) गोठ्याचे छत उष्णता रोधक असावे किंवा छतावर गवत/पालापाचोळा टाकून त्यावर पाणी मारावे. 6) उष्णलहरी सुरू होण्यापूर्वी घटसर्पफऱ्या व आंत्रविषार यांसारख्या रोगांचे प्रतिबंधक लसीकरण व जंतनाशक औषधे पाजणे आवश्यक आहे.

तातडीच्या उपाययोजना व उपचार : पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे (उदाधापा टाकणेतोंडावाटे लाळ गळणेअस्वस्थता दिसून आल्यास त्वरित तात्काळ सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावेपशुधनावर थंड पाण्याचा मारा करावा. (अश्ववर्गीय प्राण्यांच्या बाबतीत पायाकडून शरीराच्या वरील भागाकडे पाणी मारावे). जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावापशुसंवर्धन विभागाने सर्व क्षेत्रीय संस्थांना हवामान विभागाच्या संपर्कात राहून दैनंदिन तापमानाचा अंदाज घेण्याच्या सूचना दिल्या आहेतसर्व दवाखान्यांमध्ये आवश्यक जीवरक्षक औषधे व औषधीसाठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आला आहेफिरती पशुवैद्यकीय पथके तातडीच्या सेवेसाठी तैनात ठेवण्यात आली आहेत.

उष्णलहरीच्या काळात काय करावे : पशुधनासाठी नेहमी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सोय करावी.

पिण्याची भांडी नियमित स्वच्छ ठेवावीतपिण्याचे पाण्याचे हौद शक्यतो गोठयाजवळ व सावलीत असावेतनसल्यास त्यावर शेड उभारून थेट उन्हापासून संरक्षण करावेचारावैरण व पशुखाद्याचा पुरेसा साठा करून ठेवावाखाद्यात मिनरल मिक्श्चरचा समावेश करावाउत्पादक व दुभत्या पशुधनास संतुलित आहार द्यावागाभन पशुधनाच्या चाऱ्याची  काळजी घ्यावीआधुनिक गोठ्यामध्ये स्प्रिंकलर वापरावेतइतर पशुपालकांनी पशुधनाच्या अंगावर पाणी फवारावेम्हशींना शक्य असल्यात स्वच्छ पाण्याच्या हौदात बसण्याची सोय करावीसायंकाळच्या दूध दोहनाची वेळ टप्याटप्याने किमान तास उशिरा ठेवावी.

काय करू नये : पशुधन उन्हाळ्यात उघड्यावर बांधू नयेपाळीव पशुधनास पार्क केलेल्या गाडीत सोडून जावू नयेशेती विषयक व इतर कामासाठी वापरण्यात येणाऱ्या पशुधनास उन्हाच्या वेळी कामास लावू नयेपशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फार दूर व फार वेळ चालावे लागू नयेयाची दक्षता घ्यावी.  पशुधनाची गर्दी करू नयेदाटीवाटीने बांधु नयेभर उन्हात पशुधनाची हलचाल / वाहतुक करू नयेउन्ह असल्यास दुभत्या पशुधनाचे दोहन करून नयेमृत पशुधन उघड्यावर टाकू नये.

रस्त्यावरील पशू-पक्ष्यांसाठी घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची भांडी/हौद ठेवावेतमृत पशुधनाची विल्हेवाट शास्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य जागा आरक्षित ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

०००००

Sunday, 26 April 2026

जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात संपन्न

 जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात संपन्न

चंद्रपूरदि. 26 : जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्ह्यात हिवताप प्रतिबंधनिर्मूलन व जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी  वसुमना पंत व जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी  पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमास सहा संचालक आरोग्य सेवा (हिवताप) डॉ. नयना दुफारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्यातर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले यांनी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. राहुल भोंगळे (बालरोग तज्ञसामान्य रुग्णालयचंद्रपूर) व डॉ. सचिन कुमरे (सहाय्यक प्राध्यापकशासकीय वैद्यकीय महाविद्यालयचंद्रपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात हिवतापाचे संशोधक डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

प्रास्ताविकात जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे यांनी मागील पाच वर्षांतील हिवताप परिस्थितीचा आढावा घेतला. विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृतीमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट झाल्याचे त्यांनी नमूद केले व नागरिकांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

विशेष अतिथी डॉ. नयना दुफारे यांनी जिवती तालुक्यासारख्या अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. हिवताप निर्मूलनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करत नागरिकांच्या सहभागातून सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. ललित पटले यांनी आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून गावागावात प्रभावी जनजागृती करून हिवताप निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध आरोग्य विभागातील कर्मचारीआरोग्य निरीक्षककिटकशास्त्रज्ञप्रयोगशाळा अधिकारी आदींचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमस्थळी प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती साहित्याचे प्रदर्शनही करण्यात आले.

जिल्हा हिवतापमुक्त करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन  सोनाली गायकी यांनी तर आभार  प्रशांत चात्रेश्वर यांनी manale. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा हिवताप कार्यालयाच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले.

०००००००