Search This Blog

Wednesday, 11 March 2026

उष्माघाताबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी – जिल्हाधिकारी गौडा



उष्माघाताबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी – जिल्हाधिकारी गौडा

Ø जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची बैठक

चंद्रपूरदि. 11 : गत आठवड्यापासून उन्हाची तिव्रता अचानक वाढली असून उष्णतेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा नेहमीच अग्रस्थानावर असतोयावर्षीसुध्दा तापमान वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहेत्यामुळे नागरिकांनी उष्माघाताबाबत काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी (दि. 11) आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत ते बोलत होतेयावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमनपा आयुक्त अकुनूरी नरेशनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीगौडा म्हणालेदिवसा व रात्रीच्या उकाड्यात वाढ झाली असून सामान्यपेक्षा तापमान जास्त राहण्याची शक्यता आहेकामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावीदुपारी 12 ते या वेळात कोणतेही शासकीय कार्यक्रम घेऊ नयेलहान मुलेवयोवृध्द नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांची विशेष काळजी घ्यावीप्रत्येक स्तरावर उष्माघाताबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावीशाळाअंगणवाडी आदींच्या वेळेत बदल करण्याचे शिक्षण विभागाने निर्देश द्यावेअशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

उष्माघातासंदर्भात आजाराची लक्षणे : 1. चक्कर येऊन पडणे, 2. फेफरे येणे झटके येणे, 3. झोपेतून उठण्यास त्रास येणे उठता न येणे, 4. गोंधळल्यासारखे बोलणे वागणे, 5. श्वासाची व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, 6. शरिराचे तापमान 105 अंशापेक्षा अधिक होणे, 7. स्नायूत पेटके येणे, 8. चिडचीड होणे, 9. डोकेदुखी, 10. अशक्तपणा येणे, 11. मळमळ व उलटी होणे, 12. अधिक घाम येणे

 उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता

काय करावे : 1. पुरेसे पाणी प्यावेतहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. 2. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. 3. दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा. 4. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. 5. हलकीपातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरा. 7. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा. 8. उन्हात काम करीत असल्यास टोपीछत्री किंवा ओल्या कपड्याने डोकेमानचेहरा झाकण्यात यावा. 9. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएसघरी बनवण्यात आलेली लस्सीकैरीचे पन्हेलिंबू-पाणीताक इत्यादीचा वापर नियमित करावा. 10. अशक्तपणाडोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. 11. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्यावे. 13. सूर्यप्रकाशाचा थेट संबध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. 14. सकाळच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करावा तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.

काय करू नये : 1. उन्हात अतिकष्टाची कामे करू नका. 2. दारूचहाकॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. 3. दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा. 4. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. 5. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. 6. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.7. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. 8. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावेतसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावी.

०००००००

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कामाचे अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या हस्ते लोकार्पण


 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कामाचे अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या हस्ते लोकार्पण

Ø गावात एकोपा वाढवून लोकसहभागातून काम करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 11 : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ कामाचे लोकार्पण भारत गणेशपुरे यांच्या हस्ते भद्रावती तालुक्यातील सागरा येथे करण्यात आले. हे अभियान केवळ बक्षीसापुरते मर्यादित न राहता, गावा-गावात एकोपा वाढून लोकसहभागातून काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना केले.

            कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) गिरीश घायगुडे होतेयावेळी  गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळसहा.गट विकास अधिकारी डॉबंडु आकनुरवारसंजय नैतामग्रामपंचायत प्रशासक शंकर रासेकरमंगेश भोयरसुधाकर रोहणकरप्रदीप महाकाळकरएकनाथ घागीमनिषा रोडेछाया जंगम उपस्थित होते.

प्रथम लेझीम आणि भजन दिंडीच्या गजरात स्वागत झाल्यानंतर दीप प्रजल्वन मालार्पण करण्यात आलेअभिनेता भारत गणेशपुरे यांच्यासह या अभियानात नाविन्यपूर्ण उपक्रमात लोकसहभाग व वर्गणीतून उभारण्यात आलेले गोरक्षणसार्वजनिक सभागृह, स्मशानभुमीनिराधार गृहव्यायाम शाळाजि.. शाळा बांधकामाच्या वर्गखोल्यांना भेटी देऊन लोकार्पण करण्यात आलेयावेळी मराठी अभिनेते भारत गणेशपुरेगिरीश घायगुडे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत नावीन्यपूर्ण उपक्रमासह आठ मुद्यावर सविस्तर मार्गदर्शन केलेघेण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी केलेसंचालन भारती उरकांदे तर आभार विस्तार अधिकारी प्रणाली भागवत यांनी मानलेयावेळी ग्रामपंचायत अधिकारी सुशील शिंदेग्रामस्थ,पंचायत समितीग्रामपंचायत अधिकारी तसेच तालुक्यातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

००००००

कारागृहात दिव्यांग कलावंतांनी सादर केला संगीतमय कार्यक्रम




कारागृहात दिव्यांग कलावंतांनी सादर केला संगीतमय कार्यक्रम

चंद्रपूरदि. 11 :   कारागृहातील गुन्हेगारांच्या विचारसरणीत व वर्तणुकीत सुधारणा करून समाजात त्यांचे योग्यप्रकारे पुनर्वसन करण्याकरीता विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतातयाच उपक्रमाचा एक भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा कारागृहात महारोगी सेवा समितीआनंदवन येथील दिव्यांग कुष्ठमुक्त कलावंतांचा 'स्वरानंदवन वाद्यवृंदकार्यक्रम सादर करण्यात आला.

प्रमुख अतिथी म्हणून मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णीजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवेचंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक अनुपकुमार कुमरेऑर्केस्ट्राचे प्रमुख व्यवस्थापक सदाशिव ताजनेअंतर्गत व्यवस्थापन समिती सदस्य सुधाकर कडुराजेश ताजनेआनंदवनचे प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात जय मा सरस्वती या गीताने झालीसति व निशा यांनी सूया घे गं दाभन घे’ हे गीत सादर करून बंद्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केलेयावेळी विविध हिंदी चित्रपटांची गाणीसुध्दा सादर करण्यात आलीनिशाउज्वलासुषमाबैनाबाई आदी दिव्यांग कलावंतांनी हिंदीमराठीतेलगु भाषेतील उत्कृष्ट गीत व नृत्य सादर करून उपस्थित बंदी बांधवांचे मन जिकंलेतसेच मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी यांनी कानडा राजा पंढरीचा हे गीत सादर करून कारागृहातील बंद्याना भक्ती गीतामध्ये तल्लीन केलेयावेळी  तुरुंगाधिकारी श्रेणी-1 यांनी कमलाकर मिराशे यांनी मागतो मी पांडुरंगा हेची एक दान हे गीत गायन केले.

कार्यक्रमाचे संचालन संजीव हटवादे व श्रीमती शमा पठाण यांनी केले. यावेळी कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी सतिश सोनवणेकमलाकर मिराशेमिलींद बनसोडप्रकाश लोमटेसंजीव हटवादेशिक्षक रविंद्र वांढरेविजय माल्टेसुभेदार महेंद्र हिरोळेसत्यानंद दुबेशिवशंकर खंडारेनरेंद्र दशमवारगुणवंत लखदिवेस्वप्निल भोयरपरेश जगनाडेमोहनिश महादुलेस्वाती शहारेकोमल बिरादारप्रिया तलांडेअश्विनी तुराणकरमिना मडावी व इतर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

००००००

आनंदवन वरोरा येथे तीन दिवसीय शासकीय योजनांची छायाचित्र प्रदर्शनी

 

आनंदवन वरोरा येथे तीन दिवसीय शासकीय योजनांची छायाचित्र प्रदर्शनी

Ø 12, 13 व 14 मार्च रोजी आयोजन

चंद्रपूरदि. 11 :   राज्य शासनाच्या कल्याणकारी शासकीय योजनांची प्रचार व प्रसिध्दी व्हावीनागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी व त्याचा लाभ घेता यावाया उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आनंदवन वरोरा येथे छायाचित्र प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे.

सदर प्रदर्शनी ही आनंदवन येथील मुख्यमंत्री सभागृह येथे दि. 12, 13 व 14 मार्च या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी वाजेपर्यंत नागरिकांसाठी उपलब्ध राहील. 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता वरोराचे उपविभागीय अधिकारी डॉसंदीप भस्के यांच्या हस्ते व तहसीलदार योगेश कौटकरआनंदवन च्या अंतर्गत व्यवस्थापन प्रमुख डॉपल्लवी आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे. 14 मार्च रोजी आनंदवन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजनसुध्दा करण्यात येणार आहेया तीन दिवसीय प्रदर्शनीचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी केले आहे.

००००००

वरवट येथे 15 दिवसीय बांबू हस्तकला प्रशिक्षण शिबिराचा समारोप


वरवट येथे 15 दिवसीय बांबू हस्तकला प्रशिक्षण शिबिराचा समारोप

चंद्रपूरदि. 11 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली च्यावतीने 'कॅम्पाअंतर्गत वरवट येथे आयोजित करण्यात आलेल्या 15 दिवसीय 'पारंपारिक बांबू हस्तकला समुदाय सक्षमीकरणप्रशिक्षण शिबिराचा नुकताच समारोप झालाया प्रशिक्षणाद्वारे स्थानिक महिलांना आधुनिक बांबू कलाकृतींचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.

15 दिवसांच्या कालावधीत प्रशिक्षणार्थी महिलांनी अत्यंत उत्साहाने बांबूपासून विविध आकर्षक वस्तू तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केलेयामध्ये प्रामुख्याने बांबू बुके (गुच्छ)बांबूची फुलेबांबू बॅच आणि बांबू चटई यांसारख्या वस्तूंचा समावेश होताघरची सर्व कामे सांभाळून महिलांना हा व्यवसाय करता यावा आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यातहा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी आकाश मल्लेलवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतेमहिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे कौतुक करत, त्यांना भविष्यात मार्केटिंग आणि रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन केलेयाप्रसंगी पर्यवेक्षक योगिता साठवणे, वन कर्मचारी कृष्णा साहू यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी मनिषा नन्नावरे आणि संतोष बजाईत यांनी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावलीत्यांनी महिलांना बांबू कापण्यापासून ते फिनिशिंगपर्यंतचे सर्व बारकावे शिकवले.

कार्यक्रमाचे संचालन समन्वयक सुनीता मोकाशे यांनी केलेया प्रशिक्षणामुळे वरवट परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असूनआता त्या घरबसल्या बांबू व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

००००००