Search This Blog

Tuesday, 10 February 2026

हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन


 हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन

Ø ग्रामपंचायत चिरोली (तामुलयेथे शुभारंभ

चंद्रपूरदि. 10 : जिल्ह्यात हत्तीरोग दूरीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन मुल तालुक्यातील चिरोली येथे झाले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेगटविकास अधिकारी किशोर शिंदेजिल्हा हिवताप अधिकारी डॉप्रकाश साठेराज्य कार्यक्रम अधिकारी डॉ.  मिथीलेश सिंगडॉशिरिषा पटेलजिल्हा पर्यवेक्षक सुनिल जोशीमनिभूषण धनवानमहात्मा ज्योतिबा फुले विद्यालयचिरोली येथील मुख्याध्यापक परमानंद सेलोकरजिल्हा समन्वयक महेश झरकरतालुका आरोग्य अधिकारी डॉरामेश्वर बावणेतालुका पर्यवेक्षक महादेव जांभुळेवैद्यकीय अधिकारी डॉसौरभ कन्नाके उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी हत्तीरोग निर्मूलनासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचे महत्त्व नागरिकांना पटवून दिलेतसेच सर्व मान्यवरांनी शालेय विद्यार्थ्यांसमोर स्वतः एमडीए-आयडीए औषध सेवन करून मोहिमेबाबत विश्वास निर्माण केलायानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीत औषध देण्यात आलेकार्यक्रमाच्या आयोजनासाठी आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारीतसेच महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयचिरोली येथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य केले.

००००००

18 फेब्रुवारी रोजी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम


18 फेब्रुवारी रोजी महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम

चंद्रपूरदि. 10 : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (राज्यमंत्री दर्जारुपाली चाकणकर ह्या 18  फेब्रुवारी 2026 रोजी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत असून 18 फेब्रुवारी  रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन कार्यालयचंद्रपूर येथे महिलांच्या समस्येकरिता महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गंत जनसुनावणी घेणार आहे.

तरी चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या महिलांना त्यांच्या समस्येबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे निवेदन करावयाचे आहेत्यांनी 18 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन सभागृहचंद्रपूर या ठिकाणी जनसुनावणीस उपस्थित रहावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे  करण्यात आले आहे.

००००००

Saturday, 7 February 2026

पालकमंत्र्यांच्या हस्ते राणी हिराई उमेद मार्टचे उद्घाटन


 






पालकमंत्र्यांच्या हस्ते राणी हिराई उमेद मार्टचे उद्घाटन

चंद्रपूरदि. 07 : ग्राामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावीत्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यातया उद्देशाने ग्रामीण जिवनोन्नती अभियान (उमेद) जि.प. च्या वतीने तयार करण्यात आलेल्या राणी हिराई उमेद मार्टचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते करण्यात आले. 

ज्युबली हायस्कूल परिसरचंद्रपूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवरआमदार करण देवतळेजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहजिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शनमनपा आयुक्त अकुनुरी नरेशप्रकल्प संचालक मंजिरी टकलेउपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत,  जिल्हा अभियान व्यवस्थापक प्रवीण भांडारकर आदी उपस्थित होते. 

राणी हिराई उमेद मार्ट हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून येथे ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेले ब्रँड्सची विविध दुकाने उपलब्ध आहेत. तसेच अद्ययावत फूड कोर्टकॅफेआवश्यक सुविधा आणि कुटुंबांसाठी आकर्षक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना खरेदी व मनोरंजनाचा दर्जेदार अनुभव मिळणार आहे. राणी हिराई उमेद मार्टमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पन्नात वाढ होईल. चंद्रपूरवासीय जनतेने राणी हिराई उमेद मार्टमधे येऊन महिलांनी उत्पादित केलेल्या वास्तूची खरेदी करून त्यांच्या आनंदात सहभागी व्हावेअसे आवाहन मंजिरी टकले यांनी केले.

यावेळी मान्यवरांनी महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची पाहणी केली व संवाद साधला. कार्यक्रमाला उमेदचे तालुका व्यवस्थापक गजानन भिमटेरोशन साखरेसंदीप घोंगेशितल गर्गेलवारमोहित नैतामनरेंद नगराळेअर्चना बोनसुलेउद्धव मडावीविवेक हरणेराजेश दुधेअमोल मोडकहेमचंद बोरकरवसीम काझी आदी उपस्थित होते.

दोन सफारी वाहनांचे लोकार्पण : करवा सफारी गेट येथे स्थानिक महिलांसाठी रोजगारनिर्मिती करणे व ईको – टुरिझमला चालना देणे या उद्देशाने प्रधानमंत्री खनीज क्षेत्र कल्याण योजनेअंर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या दोन सफारी वाहनांचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवारकिशोर जोरगेवारकरण देवतळेजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह उपस्थित होते.

००००००

Friday, 6 February 2026

सन 2026-27 च्या जिल्हा नियोजनासाठी 658 कोटींची अतिरिक्त मागणी




 

सन 2026-27 च्या जिल्हा नियोजनासाठी 658 कोटींची अतिरिक्त मागणी

Ø पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक

चंद्रपूरदि. 06 : जिल्ह्यास विविध स्त्रोतातून प्राप्त होणा-या निधीतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला जातो. यात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व इतर योजनांचा समावेश आहे. सन 2026-27 च्या जिल्हा नियोजनासाठी मंजूर नियतव्ययाव्यतिरिक्त 658 कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज (दि.6) नियोजन सभागृह येथे पार पडली. यावेळी आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटींवार (बल्लारपूर), किशोर जोरगेवार (चंद्रपूर), देवराव भोंगळे (राजुरा), करण देवतळे (वरोरा), जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्यवनसंरक्षक एम.एन.रामानुजनमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त नरेश अकुनूरीप्र.जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरेप्रकल्प अधिकारी विकास राचेलवारसहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतूरे यांच्यासह संबंधित कार्यान्वयन यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शासनाकडून सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरीता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेकरीता 358 कोटी 89 लक्ष रुपयेअनुसूचित जाती उपयोजनेकरीता 75 कोटी तर आदिवासी उपयोजनेकरीता 111 कोटी 48 लक्ष रुपये,  कमाल वित्तीय मर्यादेत मंजूर करण्यात आले आहेमात्र पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जिल्हा नियेाजन समितीच्या बैठकीतजिल्हा वार्षिक योजनेच्या 358 कोटी व्यतिरिक्त अधिकचा 450 कोटींचा निधीअनुसूचित जाती उपयोजनेच्या 75 कोटी व्यतिरिक्त अधिकचा 58 कोटी आणि आदिवासी उपयोजनेच्या 111 कोटी व्यतिरिक्त अधिकचा 150 कोटी अशी एकूण 658 कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे.

यावेळी बैठकीत 26 सप्टेंबर  2025 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास व अनुपालन अहवालास मंजुरी देण्यात आलीतसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2025-26 अंतर्गत मंजूर कामे व माहे जानेवारी 2026 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आलाजिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2026-27 च्या शासनाची वित्तीय मर्यादा लक्षात घेऊन एकूण 545 कोटी 36 लक्ष 82 हजार रुपये खर्चाचा आराखडा सादर करण्यात आला.

या बैठकीत अंमलबजावणी यंत्रणामार्फत एकूण 1134 कोटी 15 लक्ष 24 हजार एवढी अतिरिक्त मागणी केलेली आहेयात सर्वसाधारण योजनेसाठी 821 कोटी 93 लक्ष 73 हजारअनुसूचित जाती उपयोजनामध्ये 58 कोटी 69 लक्ष 69 हजारआदिवासी घटक कार्यक्रमासाठी 253 कोटी 51 लक्ष 82 हजार रुपये एवढी अतिरिक्त मागणी आहे.  प्रस्तावित राज्यस्तरीय बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांना जास्तीत जास्त निधी वाढवून घेऊअसे राज्याचे आदिवासी विकास मंत्री  तथा पालकमंत्री.डॉ.अशोक वुईके यांनी सांगितले.

पुढे ते म्हणालेलोकप्रतिनिधी हे विकास कामांसाठी आग्रही असणे स्वाभाविक आहेविविध विभाग प्रमुखांनी समितीच्या बैठकीत उपस्थित झालेल्या प्रश्नांप्रती अधिक सकारात्मक राहून लोकप्रतिनिधींना अनुपालन अहवालातील माहिती तात्काळ दिली पाहिजेजिल्ह्याच्या सीमेवर तसेच इतर ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे यंत्रणेने नियोजन करावेप्रत्येक तालुका स्तरावरील विश्रामगृह हे सुसज्ज व सोयीसुविधायुक्त करावेजिल्ह्यातील सीकलसेल ॲनेमिया  व हत्तीरोग निर्मुलनासाठी अधिक प्रभावी मोहीम राबवावीजिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमी नसणे हे दुर्दैवी आहेविकास कामांमध्ये ग्रामपंचायत भवन आणि गावात स्मशानभुमीचे बांधकाम प्राधान्याने घ्यावेवीज कनेक्शनअभावी प्रादेशिक पाणी  पुरवठा योजना बंद ठेवू नकाअशा सुचना पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी दिल्या.

बैठकीच्या सुरवातीला माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

 विशेष अभिनंदनाचा ठराव : जिल्हाधिकारी विनय गौडा आणि जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय चांगले काम करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहेया बाबीची दखल घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष अभिनंदनाचा ठराव मांडलाजिल्हा नियोजन समितीने एकमुखाने या ठरावास मान्यता देऊन जिल्हाधिकारी श्रीगौडा व पोलिस अधिक्षक श्रीसुदर्शन यांचे विशेष कौतुक केले.

०००००००

 

Thursday, 5 February 2026

‘सीआयएसएफ' कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–2026’चे आयोजन


सीआयएसएफकडून रत्नागिरीत वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन2026चे आयोजन

Ø उपक्रमाचा आरंभ उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते

मुंबईदि. 4 : देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) आपल्या 57 वर्षांच्या गौरवशाली सेवेचे औचित्य साधत 14 फेब्रुवारी 2026 रोजी रत्नागिरी येथील पोलीस मैदानावर वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन2026’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा आरंभ उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती

या सायक्लोथॉनचा उद्देश किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृतीराष्ट्रीय एकात्मतातंदुरुस्तीपर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा आहे. विशेष बाब म्हणजे या मोहिमेत 50 टक्के महिला सहभागी आहेत.

या सायक्लोथॉनद्वारे किनारी भागातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे भान निर्माण करणेनागरिक व सीआयएसएफ’ यांच्यात समन्वय वाढवणेतरुण पिढीला अमली पदार्थांच्या धोक्यांबाबत जागरूक करणे आणि बंदर सुरक्षेतील सीआयएसएफच्या 51 वर्षांच्या अनुभवाची माहिती देणे हा उद्देश आहे.

1969 मध्ये स्थापन झालेल्या सीआयएसएफने गेल्या 57 वर्षांत रिफायनरीजविमानतळबंदरेमेट्रो रेल्वेअणुऊर्जा प्रकल्पअंतराळ केंद्रे यांसह देशाच्या अनेक सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा सक्षमपणे सांभाळली आहे. सुरक्षेपुरतेच नव्हे तर जनजागृतीसामाजिक उपक्रम आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या कार्यक्रमांद्वारे सीआयएसएफ राष्ट्रीय सेवेची बांधिलकी जोपासत आहे.

6,600 किलोमीटरचा प्रवास

वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीताच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या कोस्टल सायक्लोथॉनमध्ये देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून तब्बल 6,600 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असूनया उपक्रमाचा समारोप कोची येथे होणार आहे. मागील वर्षीच्या सायक्लोथॉन2025 ला 30 लाखांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होतातर 2.9 कोटी डिजिटल संवाद नोंदविण्यात आले होते.

52 किनारी गावे

तट प्रहरी’ म्हणून दत्तक

सामाजिक सहभागाच्या माध्यमातून 52 किनारी गावांना तट प्रहरी’ म्हणून दत्तक घेण्यात आले असूनत्या गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमनाट्यप्रयोगवैद्यकीय सेवाखुली व्यायामशाळाक्रीडा सुविधा तसेच तस्करी व बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

रत्नागिरी येथील पोलीस मैदानावर 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात 2019 मध्ये पुलवामामध्ये शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील चार शहीद जवानांच्या कुटुंबियांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्हा सांस्कृतिक पथकएनसीसीचे विद्यार्थी तसेच सीआयएसएफ पथकाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

--------000---------

संजय ओरके/विसंअ.