Search This Blog

Monday, 13 April 2026

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा

 




माझं गावआरोग्य संपन्न गाव’ अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा

चंद्रपूरदि. 13 : आरोग्य हा विषय नागरिकांच्या केंद्रस्थानी यावा, याबाबत चर्चा व्हावी तसेच नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा  घेण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, माता बाल संगोपन अधिकारी मोहनीश गिरी आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिंह म्हणाले, 1 एप्रिल 2026 पासून हे अभियान राबविण्यात येत असून वर्षभर ते सुरू राहणार आहे. आरोग्याच्या बाबतीत नागरिकांमध्ये सजगता निर्माण होण्यासाठी हा अतिशय महत्वाचा उपक्रम आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान’ राबविण्यात आले. त्याच धर्तीवर आता आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन ‘माझं गाव, आरोग्य संपन्न्‍ गाव’ अभियान हाती घेतले आहे. गावस्तरावरील सर्व यंत्रणांचा तसेच लोकांचा सहभाग यात अतिशय महत्वाचा आहे. अभियानाची उद्दिष्टपुर्ती आणि प्रभावी अंमलबजावणी लोकसहभागातूनच पूर्ण होणार असून त्यांच्याच सहकार्याने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा आपण आरोग्य संपन्न करू, अशी अपेक्षा श्री. सिंह यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कटारे म्हणाले, आरोग्याबाबत जनतेमध्ये चर्चा होणे गरजेचे झाले आहे. हा एक नियमित उपक्रम असला तरी लोकसहभाग आणि आंतरविभागीय समन्वय आवश्यक आहे. या मोहिमेमध्ये संसर्गजन्य आजार, असंसर्गजन्य आजार, जलजन्य आजार, किटकजन्य आजार याबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावयाची आहे. यात लोकांचा सहभाग, इतर विभागाशी प्रशासकीय समन्वय, शेवटच्या घटकांपर्यंत नवीन उपक्रम आणि परिणामकारक मुल्यमापन हे घटक महत्वाचे आहेत.

जिल्हास्तरावर दोन महिन्यातून एकदा तर ग्राम आणि तालुकास्तरावर महिन्यातून एकदा याचा आढावा घेण्यात येईल. या अभियानांतर्गत राज्यस्तरावर पाच कोटी, विभागीय स्तरावर तीन कोटी तर जिल्हास्तरावर दोन कोटींचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुराव्यासह यात मुल्यमापन होणार असल्याचे डॉ. कटारे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन माता बाल संगोपन अधिकारी मोहनीश गिरी यांनी केले. कार्यक्रमाला सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, समुदाय आरोग्य अधिकारी, तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

०००००००

डॉ. आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा शांतता समितीची बैठक


डॉआंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा शांतता समितीची बैठक

चंद्रपूरदि. 13 :  भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रॅली व उत्सवाचे आयोजन करण्यात येतेया पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावीयासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज (दि. 13) नियोजन भवन येथे पार पडली.

यावेळी मंचावर मनपा आयुक्त अकुनुरी नरेशअपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडेसहायक पोलिस अधिक्षक गौरव कायंदे पाटीलनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना मनपा आयुक्त श्रीनरेश म्हणालेडॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनितित्त शहरात निघणा-या रॅलीकरीता मार्गावरील खड्डे बुजविण्याचे नियोजन करण्यात आले असून मनपाद्वारे सर्व वॉर्डात साफसफाई करण्यात येणार आहेडॉआंबेडकर पुतळ्याजवळ अग्निशमन व्यवस्थावैद्यकीय पथक तसेच रुग्णवाहिका ठेवण्यात येईलया परिसरात फिरत्या शौच्छालयाची व्यवस्थापिण्याच्या पाण्याची व्यवस्था राहणार आहे.

अतिरिक्त पोलिस अधिक्षक श्रीकातकडे म्हणालेअफवा निदर्शनास आली तर थेट पोलिसांशी संपर्क करावासर्व पोलिस निरीक्षकांनी आपापल्या क्षेत्रातील वाहतुकीचे उत्तम नियेाजन करावेजयंती उत्सव शांततेत आणि आनंदाने पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावेनिवासी उपजिल्हाधिकारी श्रीकुंभार म्हणालेचंद्रपूर हा शांतताप्रिय जिल्हा आाहेजिल्ह्याची ही पंरपरा कायम राखण्यासाठी प्रशासनासोबतच शांतता समितीच्या सदस्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.

समितीच्या सदस्यांनी केलेल्या सुचना : 1) डॉआंबेडकर पुतळ्याजवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, 2) रात्रीच्या वेळी पुतळ्यावर चांगला प्रकाश पडण्यासाठी हॅलोजन लावावे, 3) उन्हाचा तडाखा पाहता रुग्णवाहिका तैनात असावी, 4) मोबाईल टॉयलेटची व्यवस्था असावी, 5) मनपाने अनधिकृत बॅनरवर कारवाई करावी, 6) अफवा पसरू नये यासाठी दक्षता घ्यावी, 7) लटकलेल्या विद्युत तारांचा योग्य बंदोबस्त करावा, 8) पुतळ्याजवळील निर्माल्याचे वेळोवेळी साफसफाई करावी, 9) रॅलीच्या मार्गाचे योग्य नियोजन व्हावे.

००००००

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू

 मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू

Ø मदत आणि उपचाराला मिळणार गती

Ø आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

मुंबई / चंद्रपूरदि. 13 : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहेमुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहेया प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासांत पूर्ण होणार आहेविशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेतत्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाहीत्यामुळे  उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहेया प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये नाविन्यपूर्ण रुग्णस्नेही बदल करण्याचे काम सुरु आहेत्याचाच एक भाग मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली असणार आहे.  रुग्णाने रुग्णालयात सर्व रीतसर कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन त्याचा अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविणार आहेत्या ठिकाणी नियमानुसार सर्व कागदपत्रे असल्यास अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासांत पूर्ण होणार आहेयामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाला मोठा दिलासा मिळणार आहे.  तसेचगेल्या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यातील तब्बल 40 हजार 776 रुग्णांना 333 कोटी लक्ष 81 हजार 500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले कीरुग्णांना वेळेत उपचार मिळावेतयासाठी ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहेयामुळे आता अर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन प्रणालीचे अधिकृत उद्घाटन लवकरच होणार असूनत्यानंतर राज्यभरात ती प्रभावीपणे राबवण्यात येणार आहेअधिक माहितीसाठी गरजू रूग्णांनी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

                                     ०००००००

16 एप्रिल रोजी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 16 एप्रिल रोजी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूरदि.13 :  पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या 16 एप्रिल 2026 रेाजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

16 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमनसकाळी 11 वाचंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनदुर्गापूर येथे प्रदूषणसंबंधी पाहणी व जनतेच्या भेटी,  दुपारी 12 वा. बेलसणी येथे आगमन व कोल वॉशरी यांची पाहणीदुपारी 12.30 ते 2.30 आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी राखीवदुपारी 2.30 वा.  भिवापूर येथे आगमन व झरपट नदी प्रदूषण सद्यस्थिती बाबत पाहणीदुपारी वानियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषण प्रश्नांबाबत शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक, 3.30   वा चंद्रपूर जिल्ह्यातील पशुपालकांच्या प्रश्नांबाबत शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठकदुपारी वागडचांदूर कडे प्रयाणसायंकाळी वाजता गडचांदूर येथे आगमन व अल्ट्राटेक सिमेंटमाणिकगडयेथे प्रदूषण संबंधी पाहणी व जनतेच्या भेटी,  सायंकाळी वाबॉटनिकल गार्डनविसापूर कडे प्रयाणसायं. 7 वाबॉटनिकल गार्डन येथे चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाच्या  व्यक्तींसोबत प्रदूषणावरील उपाययोजनाबाबत चर्चा व राखीवरात्री 7.30 वा. ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर कडे प्रयाणरात्री 9 वाताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पचंद्रपूर येथे राखीव.

००००००

अक्षयतृतीयेला गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या


अक्षयतृतीयेला गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या

Ø जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे आवाहन

चंद्रपूरदि. 13 :  अक्षयतृतीयेचा मुहुर्त हा अत्यंत शुभ मानला जातोया मुहुर्तावर छुप्या मार्गाने बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाहीग्रामीण व शहरी भागात 19 एप्रिल रोजी होणाऱ्या अक्षयतृतीयेला बालविवाह होणार नाहीयाची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे.

भारतीय कायद्यानुसार विवाहासाठी मुलांचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहेयापेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बेकायदेशीर ठरतो. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवकतर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यरत आहेतगावागावांत सरपंचपोलिस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांनी सतर्क राहून विवाहापुर्वी वयाची खात्री करणे आवश्यक आहेबालविवाह लावणे हा दखलपात्र गुन्हा असुन यात केवळ पालकांवरच नाही तर विवाह सोहळयात सहभागी होणारे वऱ्ह्याडीभटजीवाजंत्रीमंगल कार्यालय चालक आणि बिछायत केंद्र चालक यांच्यावरही दाखल होऊ शकतोतसेच दोर्षीना 2 वर्ष सश्रम कारावास आणि लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. चंद्रपूर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून संशयास्पद विवाहाची माहिती तात्काळ टोल फ्री क्रमांकावर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

येथे करा तक्रार : तुमच्या गावात किंवा परिसरात बाल विवाह ठरला असल्यास किंवा होत असल्यासत्याबाबतची माहिती चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलिस विभागाच्या 112 या टोल फ्री  क्रमांकावर द्यावीमाहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईलअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००००००