Search This Blog

Saturday, 7 March 2026

गोवरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप





गोवरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप

Ø जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट

चंद्रपूर, (राजुरा) दि. 7 : महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या टप्पा क्रमांक १ ची सुरुवात आज ७ मार्च २०२६ रोजी राजुरा तालुक्यातील मौजा गोवरी येथे करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी  विनय गौडा यांनी अचानक भेट दिली. या शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजुराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार  ओमप्रकाश गोंड यांनी केले. यावेळी विविध विभागांच्या विभागप्रमुखांनी आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

सदर शिबिरादरम्यान सामाजिक अर्थसहाय्य योजनांअंतर्गत नवीन लाभार्थी निवड आदेशनवीन रेशनकार्डजात प्रमाणपत्र तसेच विविध दाखले यांचे वितरण करण्यात आले. तसेच वर्ग-१ करण्यात आलेल्या जमिनीचे ७/१२ उतारे व दुरुस्ती केलेले ७/१२ उतारे लाभार्थींना प्रत्यक्ष देण्यात आले. विविध योजनांसाठी नव्याने अर्जही स्वीकारण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी  विनय गौडा यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले व हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी सहकार्य करावेअसे सांगितले.

कार्यक्रमास गट विकास अधिकारी भागवत रेजीवाडउपअधीक्षक भूमिअभिलेख दत्तू सोनवणेपशुधन विकास अधिकारी श्री. तेलंगेनायब तहसीलदार श्रीमती पवारतसेच गोवरीच्या सरपंच आशाताई उरकुडे यांच्यासह शेजारील ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकिशोर वाढईबंधू कोडापे,  वनमाला कातकर,  पांडुरंग पोटे आदी उपस्थित होते. तसेच गोवरी मंडळातील सर्व तलाठीमंडळ अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिरात सहभाग घेतला.

0000000

जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत महाराजस्व अभियानाचा शुभारंभ





जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत महाराजस्व अभियानाचा शुभारंभ 

Ø अजयपूर (ता. चंद्रपूर) येथे आयोजन

चंद्रपूरदि. 07 : शेतकरीशेतमजूरमहिलाविद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न त्वरीत निकाली काढण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसारमहसूल विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ शनिवारी (दि.7) अजयपूर (ता. चंद्रपूर) येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी चंद्रपूरचे उपविभाागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामजिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख श्री. जगतापतहसीलदार विजय पवारतालुका कृषी अधिकारी श्री. मानेउपअधिक्षक भुमी अभिलेख श्री. गिज्जेवारनायब तहसीलदार ओंकार ठाकरेराजू धांडेअजयपूरचे व चिचपल्लीचे सरपंच आदी उपस्थित होते.

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुखकार्यक्षम व गतिमान करून नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावायासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहेअसे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेसर्व नागरिकांनी लोकोपयोगी योजनांचा लाभ घ्यावा. शासकीय लाभापासून कोणीही वंचित राहू नये. तसेच आपल्या महसूल विषयक अडचणींचे त्वरीत निराकरण करून घ्यावे. कार्यक्रमादरम्यान विविध विभागाच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिका-यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या शंकांचे निराकरण केले. तसेच आगामी काळात होणाऱ्या मंडळस्तरीय महसूल अभियान शिबिरांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावेअसे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी केले.

कार्यक्रमाला सर्व मंडळ अधिकारीग्राम महसूल अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जवळपास 600 नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.

अभियानाचे उद्दिष्ट : 1. महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या दैनंदिन समस्या व तक्रारींचे त्वरित निराकरण करणे. 2. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नव्या तरतुदींबाबत जनजागृती करणे. 3. महसूल सेवांमध्ये डिजिटल प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहित करणे. 4. शासनाच्या विविध सुधारित धोरणांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे.

या सेवांच्या लाभासाठी महाराजस्व अभियान : 1. भोगवटदार वर्ग 2 जमिनींची तपासणी  करून पात्र प्रकरणांमध्ये वर्ग 1 मध्ये रुपांतर व अद्यावत 7/12 वितरण2. सर्व गावांमध्ये 7/12 वाचन करून प्रलंबित नोंदीची दुरुस्ती व अभिलेख अद्ययावत करणे3. पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेऊन मंजुरी आदेश वितरण4. तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी करून अद्यावत करण्यात आलेल्या 7/12 वितरण5. तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनामुळे 7/12 मधील इतर अधिकारातील नोंदी व शेरे तसेच नव्याने प्राप्त होणाऱ्या अर्जाविषयी फेरफार घेऊन अद्यावत 7/12 चे वाटप6. शाळांमधून विद्यार्थ्यांचे अर्ज संकलित करून प्रमाणपत्रांचे वितरण7. पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश संबंधित ग्रामपंचायतीना उपलब्ध करून देणे8. उर्वरित पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून लाभार्थ्यांना घरपट्टे वाटप. प्रलंबित फेरफार प्रकरणे सुनावणी करून निकाली काढणे9. 7/12 उताऱ्यातील  चुका दुरुस्त करण्यासाठी अर्ज स्वीकारणेडिजिटल 7/12 व 8 अ उतारे तात्काळ उपलब्ध करून देणे10 लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न प्रमाणपत्ररहिवासी / अधिवास प्रमाणपत्रजात प्रमाणपत्रनॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र इत्यादी वाटप11. महसुल सुधारणा बाबत मार्गदर्शन12. इतर सेवा अंतर्गत ई-मोजणीअग्रीस्टॅकपीएम किसान योजनातक्रार निवारण सेवा.

००००००

Friday, 6 March 2026

जिल्हाधिका-यांकडून माता महाकाली यात्रा पुर्वतयारीचा आढावा


 

जिल्हाधिका-यांकडून माता महाकाली यात्रा पुर्वतयारीचा आढावा 

चंद्रपूर, दि. 06 : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव 19 मार्चपासून सुरू होत आहे. या दरम्यान विविध जिल्ह्यातून तसेच इतरही राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे त्यांना देण्यात येणा-या सोयीसुविधांबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, महाकाली मंदीर विश्वस्त मंडळाचे सुनील महाकाळे, मुख्य पुजारी गजाननराव चन्ने आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महाकाली यात्रेकरीता चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यामुळे त्यांना मंदीर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणा-या सोयीसुविधा चांगल्या असायला पाहिजे. गर्दीचे योग्य नियोजन करून बस गाड्यांची पार्किंग व्यवस्था उत्तम ठेवावी. बाहेर जिल्ह्यातून येणा-या बसेसची संख्या किती राहील, सदर बसेस कोणत्या जिल्ह्यातून येतील, त्यांची पार्किंग कुठे केली जाईल, आदी बाबींचे योग्य नियोजन करावे. नियंत्रण कक्ष, कॉल सेंटर, पोलिस चौकी, अग्निशमन व्यवस्था 24 बाय 7 उपलब्ध ठेवावी.

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भाविकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच मंदीर परिसरात असलेल्या नदीची स्वच्छता, तेथे पाण्याची उपलब्धता ठेवावी. मंदीर परिसरात विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे अखंडीत सुरू असले पाहिजे. जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही. तसेच येणा-या भाविकांची नोंदणी करणे शक्य असेल तर त्यांची नावे, मोबाईल क्रमांक नमुद करावा. महानगरपालिका प्रशासन, पोलिस विभाग, वाहतूक शाखा तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेच्या अधिका-यांनी तात्काळ मंदीर परिसराची पाहणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

०००००००

जिल्हाधिका-यांच्या हस्ते शासकीय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

 






जिल्हाधिका-यांच्या हस्ते शासकीय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

Ø तहसील कार्यालयचंद्रपूर येथे 6, 7 आणि 8 मार्च पर्यंत आयोजन

चंद्रपूरदि. 06 : जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालयचंद्रपूर येथे कल्याणकारी शासकीय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या हस्ते आज (दि.6) करण्यात आलेयावेळी चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामतहसीलदार विजय पवारसहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरेजिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकरनायब तहसीलदार ओंकार ठाकरेराजू धांडे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीगौडा म्हणालेजिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासकीय योजनांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्यात येत आहेयोजनांची माहितीत्याचे निकषअटी  शर्ती आदी बाबी प्रदर्शनामध्ये लावण्यात आल्या आहेत. 7 मार्च पासून जिल्ह्यातील महसूली मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहेमहाराजस्व अभियानादरम्यान सर्व अधिकारी  कर्मचा-यांनी आपल्या संपूर्ण क्षमतेने काम करून नागरिकांना योजनांचा लाभ द्यावातसेच चंद्रपूर तहसील कार्यालय येथे आयोजित तीन दिवसीय प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन त्यांनी केले.

सुरवातीला फित कापून जिल्हाधिकारी श्रीगौडा यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केलेयावेळी त्यांनी डीजीटल चित्ररथाचे सुध्दा उद्घाटन केलेतहसील कार्यालय चंद्रपूर येथे 6, 7 आणि 8 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत छायाचित्र प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

०००००००

अर्थसंकल्पात सर्व घटकांच्या विकासाचा संकल्प – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

 


अर्थसंकल्प प्रतिक्रिया :

अर्थसंकल्पात सर्व घटकांच्या विकासाचा संकल्प

– पालकमंत्री डॉअशोक वुईके

राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचे प्रतिबिंब उमटले आहेशेतकरीशेतमजूरदलितआदिवासीमहिलादुर्बल घटक आदिंच्या विकासाचा संकल्प अर्थसंकल्पात करण्यात आला आहेकेंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच सामान्य नागरिकांचा विचार करून आर्थिक धोरणे राबवित असल्यामुळे लोकांचे जीवनमान सुकर झाले आहे.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बजेटमध्ये 21723 कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहेयात राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनाशबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळडॉएपीजे अबुल कलाम अमृत आहार योजनानमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानआदर्श आश्रमशाळाभगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजनापंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना आदींचा समावेश आहेराज्यातील जनतेला या अर्थसंकल्पामुळे दिलासा मिळणार आहे. – आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके

०००००००