Search This Blog

Thursday, 23 April 2026

‘जनगणना 2027’ अंतर्गत 1 ते 15 मे दरम्यान नागरिकांना स्वयंगणना करण्याची सुविधा

 


जनगणना 2027’ अंतर्गत 1 ते 15 मे दरम्यान नागरिकांना स्वयंगणना करण्याची सुविधा

चंद्रपूर, दि. 23 : ‘जनगणना 2027’ चा कार्यक्रम जाहीर झाला असून देशातील ही पहिलीच डिजिटल जनगणना आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

2011 च्या जनगणनेनंतर तब्बल 15 वर्षांनी ही जनगणना होत असून जनगणनेतील माहितीचा उपयोग देशाच्या विकासाकरीता व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता उपयुक्त ठरत असते. चंद्रपूर जिल्ह्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी 1 मे ते 15 मे 2026 या पंधरा दिवसांच्या कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी https://se.census.gov.in  या अधिकृत वेब पोर्टलवर भेट देऊन आपली माहिती भरावयाची आहे. यात कुटुंब प्रमुखाचे नाव, 10 अंकी मोबाईल क्रमांक आदींचा समावेश आहे.

या पोर्टलवर  विविध भाषांमध्ये माहिती भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती यशस्वीरीत्या भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक (आयडी) प्राप्त होईल, जो नागरिकांनी अत्यंत सुरक्षितपणे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. दुस-या टप्प्यात जेव्हा प्रगणक घरभेटीसाठी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी दिल्यास प्रगणक तो पोर्टलवर अपलोड करतील आणि नागरिकांची माहिती अधिकृतरीत्या जनगणनेत नोंदवली जाईल.

यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असल्याने, माहिती संकलनासाठी विशेष ॲप्लिकेशन्सचा वापर केला जाणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष कुटुंबाची तसेच घराची सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी 'ॲप' वापरले जाणार आहे. या अद्ययावत प्रक्रियेद्वारे घराची स्थिती, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, आणि मालमत्ता याबद्दलची सखोल माहिती घेतली जाईल. या वेब पोर्टलमध्ये भरलेली नागरिकांची सर्व वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहणार आहे.

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन : जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. नागरिकांनी आपल्या वेळेनुसार 1 मे ते 15 मे दरम्यान घरबसल्या स्वयंगणना पोर्टलचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच दुस-या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करून आपल्या कुटुंबाची अचूक आणि परिपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००

24 एप्रिल रोजी पालकमंत्री डॉ. वुईके चंद्रपुरात



24 एप्रिल रोजी पालकमंत्री डॉ. वुईके चंद्रपुरात

चंद्रपूर, दि. 23 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके हे 24 एप्रिल रोजी चंद्रपुरच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

24 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता विविध विभागांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. रात्री सोयीनुसार वन अकादमी येथे आगमन व राखीव. 25 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता वन अकादमी येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

००००००

 

Wednesday, 22 April 2026

मनपा क्षेत्रातील पट्टे वाटपसंदर्भात जिल्हाधिका-यांकडून आढावा

 


मनपा क्षेत्रातील पट्टे वाटपसंदर्भात जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूर, दि. 22 : महानगरपालिका क्षेत्रात 1 जानेवारी 2011 पुर्वीची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत राज्य शासनाने 23 मार्च 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांना जागेचा मालकी पट्टा देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (दि.22) आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी (जमीन) सचिन कुमावत, जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख प्रदीप जगताप, उपअधिक्षक श्री. गिज्जेवार, मनपाचे उपायुक्त संदीप चिद्रावार, शुभांगी सुर्यवंशी व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, महानगरपालिका क्षेत्रात 1 जानेवारी 2011 पुर्वीचे अतिक्रमण असलेल्या पात्र लाभार्थ्यांना मालकी हक्क पट्टे देण्याचा कार्यक्रम मिशन मोडवर राबवावा. यासाठी 23 मार्च 2026 च्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना पट्टे द्यायचे आहे, ही सकारात्मकता ठेवून मनपाने नियोजन करावे. नागरिकांना याबाबत अवगत करण्यासाठी वॉर्डांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करावे. यासाठी नगरसेवकांची मदत घ्यावी. तसेच शहरी भागात होणा-या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानात हा विषय प्राधान्याने घ्यावा. जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना पट्ट्यांचे वाटप करण्यात येईल, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.

ज्या लाभार्थ्यांकडे घर टॅक्स पावती किंवा वीज बील किंवा राशनकार्ड यापैकी कोणताही एक पुरावा असल्यास त्यांनी अर्जासोबत महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात सादर करावा, असे उपायुक्त संदीप चिद्रावार यांनी सांगितले.

००००००

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश


 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश

Ø चिमूर प्रकल्प कार्यालयामार्फत 22 एप्रिल पासून नि:शुल्क अर्ज वितरण

चंद्रपूरदि. 22 : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता ली मध्ये प्रवेश देण्याकरीता शासनाची योजना आहेत्याकरीता अनुसूचित जमातीच्या (आदिवासीप्रवेशपात्र विद्यार्थ्यांकडून प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचिमूर यांच्या कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 22 एप्रिल पासून प्रवेश अर्ज नि:शुल्क वितरीत करण्यात येत असून संपूर्ण भरलेले अर्ज विहीत कागदपत्रासह 23 मे 2026 पर्यंत स्विकारले जातील.

इयत्ता लीत प्रवेश घेण्याकरीता अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.

1) सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. 2) जर विद्यार्थ्यांचे पालक दारिद्रय रेषेखालील असेल तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमीत केलेले बीपीएल प्रमाणपत्र जोडावे. 3) या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष रुपयांपर्यंतचे असावे. 4) शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे दिनांक 18 सप्टेंबर, 2020 च्या शासन निर्णयाप्रमाणे असावे. 5) अर्जासोबत विद्यार्थ्यांचा जन्मतारखेचा दाखलावैद्यकीय प्रमाणपत्रविद्यार्थ्यांचे आधार कार्ड जोडावे. 6) विद्यार्थ्यांचे पालक शासकिय / निमशासकिय नोकरदार नसावेत. 7) या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकानी संमतीपत्र जोडावे व विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जोडावे. 8) विद्यार्थ्यांचे पालक विधवानिराधारपरितक्ता असल्यास अर्जासोबत तसा पुरावा जोडण्यात यावा. 9) निवड झालेल्या विद्यार्थ्यांला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत शाळा बदलता येणार नाही.         

शासन स्तरावर निवड झालेल्या शाळेत व मंजुर प्रवेश संख्येच्या अधिन राहून विद्यार्थी निवड प्रक्रिया करण्यात येईलमंजुर जागेपेक्षा जास्त प्रमाणात आवेदन प्राप्त झाल्यास ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड प्रक्रिया केल्या जाईलअसे चिमुरच्या प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी कळविले आहे.

प्रवेश अर्ज खालील ठिकाणी निःशुल्क उपलब्ध आहेत : 1) प्रकल्प कार्यालयएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचिमूर 2) आदिवासी मुला/मुलींचे शासकीय वसतीगृहचिमूरनागभिडब्रम्हपुरीवरोराभद्रावती, 3) शासकीय आश्रमशाळाचंदनखेड़ाजांभूळघाटचिंधिचककोसंबी (गवळी), 4) अनुदानित आश्रम शाळा कांपाब्रम्हपुरीएकारापळसगांवआंबोलीनवतळासुमठाणाधानोली,   5) नामांकित शाळा-नागभिडब्रम्हपुरीभद्रावती.

००००००

लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक

 लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक

Ø अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

चंद्रपूरदि. 22 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक करण्यात आली आहे.

सदर योजनेअंतर्गत बँक मंजुरी स्तरावर अपूर्ण कागदपत्रांमुळे स्थगिती देण्यात आलेली प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या लॉगिनद्वारे पाहता येणार असूनत्यामधील अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्यांना स्वतऑनलाइन अपलोड करून करता येणार आहेयामुळे लाभार्थ्यांना कार्यालयीन फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नाही.

 

लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर संबंधित प्रकरण तपासणी स्तरावर दिसेलत्या ठिकाणी कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी महामंडळामार्फत पूर्ण झाल्यानंतर पात्र प्रकरणासाठी  पर्याय उपलब्ध होईललाभार्थ्यांनी सबमीट केल्यानंतर संबंधित प्रकरण पुढील तपासणीकरिता मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल व त्यावर महामंडळामार्फत नियमांनुसार कार्यवाही करण्यात येईल.

त्यानंतरच्या टप्प्यातलाभार्थी व्याज परताव्यासाठी क्लेम सादर करत असताना कागदपत्रांमधील त्रुटींमुळे होल्ड स्थितीत असलेली प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर कारणांसहित दिसून येतीलअशा प्रकरणांचे त्वरित निराकरण करण्यासाठी लाभार्थ्यांनी संबंधित त्रुटींची पूर्तता जिल्हा समन्वयकांमार्फत करावीसंबंधित लाभार्थ्यांनी होल्डची कारणे लक्षात घेऊन 15 दिवसांच्या कालावधीत अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून आपले प्रकरण नियमित करून घ्यावेमहामंडळ नियमानुसार योजना राबवित असून लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महामंडळाच्या अधिकृत वेब प्रणालीद्वारेच अर्ज व प्रक्रिया पूर्ण करावीअसे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने कळविले आहे.

०००००