Search This Blog

Tuesday, 12 May 2026

चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयाम यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव



चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयाम यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

Ø राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित

चंद्रपूरदि. 12 : महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्यसेवेची मशाल तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयाम यांचा नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आलाआंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस 2026 निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यातराष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांच्या हस्ते उज्ज्वला सोयाम यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल प्रतिष्ठित राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आलेया विशेष सोहळ्यात देशभरातून निवडक एकूण 15 नर्सिंग अधिकारी कर्मचारी यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याला केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पीनड्डाआरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव उपस्थित होत्या.

चंद्रपूर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या उज्ज्वला सोयाम यांनी गेल्या 24 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात अत्यंत समर्पित सेवा दिली आहेविशेषतः नक्षल प्रभावित आणि आदिवासी भागामध्ये कन्याभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि आरोग्य जनजागृतीमध्ये घेतलेला पुढाकार गौरवास्पद आहेनैसर्गिक आपत्ती प्रवणक्षेत्र असो किंवा कठीण भौगोलिक परिस्थितीउच्च जोखीम असलेल्या गर्भवती मातांची आणि बालकांची काळजी घेण्यात त्यांनी नेहमीच तत्परता दाखवली आहे.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवसाची संकल्पना ‘आमच्या परिचारिकाआमचे भविष्यसक्षम परिचारिका जीव वाचवतात’ अशी ठेवण्यात आली होतीया पुरस्काराचे स्वरूप पदकप्रमाणपत्रप्रशस्तीपत्र आणि 1 लाख रुपये रोख असे आहे.

०००००००

Monday, 11 May 2026

जलयुक्त शिवारची प्रस्तावित कामे तात्काळ पूर्ण करा



 जलयुक्त शिवारची प्रस्तावित कामे तात्काळ पूर्ण करा 

Ø जिल्हाधिका-यांच्या यंत्रणेला सुचना

चंद्रपूरदि. 11 : ‘अल निनो’ च्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पावसाचे जास्तीत जास्त पाणी साठविणे, त्याचा उपयोग शिवारातील शेतीकरीता करणे, तसेच जमिनीची पाणी पातळी वाढविण्यास प्राधान्य देणे, आदी उपाययोजनांसाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यात येत आहे. शासन स्तरावरून याबाबत नियमित आढावा होत असल्याने या अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध यंत्रणांनी घेतलेली कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियानातील प्रस्तावित कामांच्या प्रगतीचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी (मनरेगा) शुभम दांडेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे, कार्यकारी अभियंता श्री. बेलपत्रे (ग्रामीण पाणी पुरवठा), आदी उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उपविभागीय स्तरावर असलेल्या समितीची सर्व उपविभागीय अधिका-यांनी तात्काळ बैठक घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, आपापल्या क्षेत्रात संबंधित यंत्रणांनी किती कामे घेतली आहे, त्यापैकी किती सुरू असून किती कामे पूर्ण झाली आहे. तसेच 100 टक्के कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा. जी कामे पूर्ण झाली आहेत, त्याचे पोर्टलवर नियमित मॅपिंग करावे. काम पूर्ण झाले, मात्र पोर्टलवर अपलोड न केल्यामुळे जिल्ह्याची आकडेवारी कमी दिसते. याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी.

जे कंत्राटदार काम करण्यास इच्छुक नाहीत किंवा टाळाटाळ करीत आहे, त्यांना  सक्त ताकीद देऊन काम पूर्ण करून घ्या किंवा त्यांचे कंत्राट रद्द करा. ज्या कामांना प्रशासकीय मान्यता पाहिजे असल्यास तसा प्रस्ताव सादर करावा. आवश्यक कामे घ्यायची असेल तर ती त्वरीत घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी पंत यांनी दिल्या. यावेळी त्यांनी महसूल, कृषी, वन, मृद व जलसंधारण, सिंचन, सामाजिक वनीकरण, मग्रारोहयो, ग्रामीण पाणी पुरवठा, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आदी विभागाच्या कामांची प्रगती जाणून घेतली.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची प्रगती : चंद्रपूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 232 गावांची निवड करण्यात आली असून कामांची एकूण संख्या 3357 आहे. 232 गावांमध्ये 3099 कामे सुरू असून यापैकी 2918 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू झालेल्या कामांची टक्केवारी 92.31 तर पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी 86.92 आहे.

००००००

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1067 प्रकरणे यशस्वीपणे निकाली


राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1067 प्रकरणे यशस्वीपणे निकाली

चंद्रपूरदि. 11 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणमहाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्षा समृध्दी भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1067 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली.

मे रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होतेया अदालतीमध्ये प्रलंबित न्यायालयीन 12694 प्रकरणे, 11743 दाखलपूर्व प्रकरणे  ठेवण्यात आली होतीत्यापैकी प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी 907 प्रकरणे तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी 160 अशी एकूण 1067 प्रकरणे निकाली काढण्यात आलीयात मोटार अपघात वाहन प्रकरणे 22 निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाईची 1कोटी 86 लक्ष 35 हजार रुपये रक्कम मंजूर करण्यात आलीदाखलपूर्व प्रकरणामध्ये 51 लक्ष 30 हजार 945 रुपये वसूल करण्यात आलेतसेच धनादेश अनादरीत झालेला प्रकरणापैकी 74 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीशसर्व वकीलसर्व न्यायालयीन कर्मचारीपोलिस कर्मचारी यांनी सहकार्य केलेअशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एसएस इंगळे यांनी दिली.

००००००

चंद्रपूरातील युवकांसाठी जर्मनीमध्ये करियरची संधी


 चंद्रपूरातील युवकांसाठी जर्मनीमध्ये करियरची संधी

Ø 14 मे रोजी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

चंद्रपूरदि. 11 : महाराष्ट्र शासनाचा कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग आणि 'मॅजिक बिलियनकंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एका विशेष ऑनलॉइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. 'जर्मनीमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधीया विषयावर 14 मे 2026 रोजी दुपारी ते या वेळेत हे मार्गदर्शन सत्र पार पडणार आहे.

या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्टचंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना जर्मनीमधील रोजगाराच्या संधीची माहिती देणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणेहे आहेतांत्रिक कौशल्य असलेल्या ग्रामीण भागातील तरुणांना जागतिक स्तरावर करिअरची संधी खुली व्हावीयासाठी शासन स्तरावरून हा प्रयत्न केला जात आहे.       

या वेबिनारमध्ये आयटीआय किंवा कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थीरोजगाराच्या शोधात असलेले इच्छुक उमेदवारतांत्रिक कौशल्य असलेले युवक सहभागी होऊ शकतातउमेदवारांना सहभागी होण्यासाठी 'Google Meet' ची लिंक https://meet.google.com/mqp-wyad-nbo उपलब्ध करून देण्यात आली आहेतसेचअर्जासाठी दिलेल्या Google form https://forms.gle/tgiFD-TogDR४५CqN९ लिंकद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधी लाभ घ्यावाअसे आवाहन सहायक आयुक्तजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर यांनी केले आहेअधिक माहितीसाठी 07172- 252292  या दूरध्वनी क्रमांकावर तसेच या कार्यालयाशी संपर्क करावा.

००००००

भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø नवी दिल्लीतील सीआयआयच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राच्या प्रगतीचे सादरीकरण

Ø औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणारी परिपूर्ण इको सिस्टीम उभारण्यासाठी सर्व प्रयत्न

Ø महाराष्ट्राचा 2047 पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

नवी दिल्ली / चंद्रपूरदि. 11 : पायाभूत सुविधानाविण्यपूर्णताप्रतिभास्वच्छ ऊर्जासुव्यवस्थित शहरीकरणतंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहेही क्षमता असणारा महाराष्ट्र त्यादृष्टीने  आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहेजागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून  त्यासाठी सर्व आघाड्यांवर  जाणीवेने प्रयत्न  सुरू असल्याची ग्वाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

नवी दिल्ली येथील हॉटेल ताज पॅलेसमध्ये कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे (सीआयआयआजपासून आयोजित ॲन्युअल बिझनेस समिट - 2026   या दोन दिवसीय परिषदेअंतर्गत आज सकाळच्या सत्रात झालेल्या Vision For India @100 परिसंवादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.  कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे डायरेक्टर जनरल चंद्रदीप बॅनर्जी आणि अध्यक्ष राजीव मेमाणी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते

सध्याचा क्षण हा भारतासाठी बदलाची व्याख्या ठरवण्याचा आहेअसे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री म्हणालेआजचे जग एकाच वेळी अनेक स्थित्यंतरातून जात आहेयात भू-राजकीय विखंडनतांत्रिक उलथापालथऊर्जा संक्रमणपुरवठा साखळीतील बदल आणि आर्थिक विकासाच्या भविष्याबद्दलची मोठी अनिश्चितता यांचा समावेश आहेमात्रया अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारत हा एकमेव देश मोठ्या प्रमाणावर जगाचा आत्मविश्वास वाढवत आहेआमच्याकडे  स्थैर्यमहत्त्वाकांक्षालवचिकता आणि अंमलबजावणी करण्याची जबरदस्त क्षमता आहेपंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालीभारताने गेल्या दशकात स्वतःबद्दल जागतिक स्तरावर नवी प्रतिमा स्थापित केली आहे.

पंतप्रधानांच्या  द्रष्टया धोरणांची अंमलबजावणी राज्यांनाच करावी लागेलअसे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,  महाराष्ट्र या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेदशकानुदशके महाराष्ट्र हे भारताचे 'इकोनॉमिक इंजिनराहिले आहेजागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी आम्ही महाराष्ट्राला सज्ज करत आहोतआज महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहेजी भारताच्या जीडीपीमध्ये  सुमारे 15 टक्के योगदान देतेभारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहेभारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत राज्याचा वाटा 20 टक्क्यांहून अधिक असून देशाची 'डेटा सेंटरआणि 'स्टार्टअपराजधानी आहेअसे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

भविष्यातील महाराष्ट्राबाबत आमचा रोड मॅप  स्पष्ट आहे.  2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातील सर्वात महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांपैकी महाराष्ट्र राहीलअसे सांगून मुख्यमंत्री म्हणालेयावर्षी दावोसमध्ये महाराष्ट्राने जवळपास 30 लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव आणलेभविष्यातील अर्थव्यवस्था ही महामार्गबंदरेविमानतळडिजिटल नेटवर्क्ससंशोधन प्रयोगशाळास्टार्टअप इकोसिस्टम आणि विद्यापीठांवर उभी असेल आणि म्हणूनच महाराष्ट्रात अभूतपूर्व वेगाने गुंतवणूक होत आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसमृद्धी महामार्गनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळवाढवण बंदरमेट्रोचे जाळेऔद्योगिक कॉरिडॉरलॉजिस्टिक इकोसिस्टमडिजिटल पायाभूत सुविधा आदी प्रकल्प एकत्रितपणे महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल बदलवत आहेतभविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्यासाठीची क्षमता एआय,  सेमीकंडक्टर्स,  इलेक्ट्रिक वाहने , प्रगत उत्पादनेस्वच्छ ऊर्जाडेटा सेंटर्सजागतिक क्षमता केंद्रे (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स ) आणि 'डीप-टेककल्पकतेवर आधारित असेल.

आज महाराष्ट्रात भारतातील सर्वात मोठ्या जीसीसी केंद्रांपैकी 24 टक्के केंद्रे आहेतआशियातील सर्वात महत्त्वाचा 'डेटा इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉरम्हणून महाराष्ट्र उदयास येत आहे.  देशातील 60 टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेतदेशातील 20 टक्के ऑटोमोबाईल उत्पादने आणि ईव्ही उत्पादनात आम्ही आघाडीवर आहोतमहाराष्ट्रात डिझाइननवनिर्मिती आणि  जागतिक बौद्धिक संपदा निर्माण करण्याची आमची महत्वाकांक्षा आहे.

मुंबई जागतिक आर्थिक आणि नाविन्यपूर्ण राजधानी म्हणून विकसित होत राहीलपुणे उत्पादनतंत्रज्ञान आणि संशोधन केंद्र म्हणून आपली पकड मजबूत करेलनागपूर हे भारताचे लॉजिस्टिक आणि भौगोलिक-धोरणात्मक केंद्र म्हणून उदयास येत आहेछत्रपती संभाजीनगर आणि नाशिक हे आमचे नवीन युगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब असतीलगडचिरोली हे 2032 पर्यंत भारताचे सर्वात मोठे 'ग्रीन स्टीलउत्पादक जिल्हा बनेलआणि आमची द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरे औद्योगिक विकासाची पुढची इंजिने ठरतीलसंतुलित प्रादेशिक विकास हा केवळ सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा नाहीतर तो आर्थिकदृष्ट्याही अत्यंत शहाणपणाचा आहेअसे मुख्यमंत्री म्हणाले.

सीआयआयचे डायरेक्टर जनरल चंद्रदीप बॅनर्जी आणि अध्यक्ष  राजीव मेमाणी  यांनी आपल्या प्रास्ताविकात मुखमंत्र्याच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरव केला.

०००००