Search This Blog

Tuesday, 17 March 2026

चांदा ज्योती सुपर 100 उपक्रमांतर्गत अंतिम चाळणी परीक्षा 23 मार्च रोजी

चांदा ज्योती सुपर 100 उपक्रमांतर्गत अंतिम चाळणी परीक्षा 23 मार्च रोजी

चंद्रपूरदि. 17 : जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे राबविण्यात येणाऱ्या चांदा ज्योती सुपर 100 या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत सन 2025-26 मध्ये इयत्ता 10 वीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांना IIT/JEE/NEET या स्पर्धा परीक्षांसाठी दोन वर्षे मोफत मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

 या माध्यमातून सामाजिकदृष्ट्या मागास ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत प्रथम चाळणी परीक्षा दि. 31 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल जिल्हा परिषद चंद्रपूरच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्रथम चाळणी परीक्षेत 40 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम निवड परीक्षा दि. 23 मार्च 2026 रोजी दुपारी 12.00 ते 2.30 या वेळेत भवानजीभाई चव्हाण हायस्कूलमुल रोडचंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांत उपलब्ध राहणार असून प्रश्न इयत्ता 10 वीच्या बीजगणित (Algebra), भूमिती (Geometry) आणि विज्ञान (Science) या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील.

तरी पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम निवड परीक्षेला उपस्थित राहावेअसे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक)जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

Monday, 16 March 2026

जिल्हास्तरीय कृषी, पशु-पक्षी प्रदर्शन व मिनी सरस हिराई महोत्सव

 जिल्हास्तरीय कृषीपशु-पक्षी प्रदर्शन व मिनी सरस हिराई महोत्सव

Ø चांदा क्लब ग्राऊंड येथे 20 ते 24 मार्च दरम्यान आयोजन

चंद्रपूरदि. 16 : शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी व कृषी संलग्न विभागांच्या योजनातंत्रज्ञान व उपक्रमांची माहिती मिळावी तसेच उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीला चालना मिळावी या उद्देशाने जिल्हास्तरीय कृषीपशु-पक्षी प्रदर्शन व मिनी सरस हिराई महोत्सव-2026 चे आयोजन करण्यात आले आहेहा पाच दिवसीय महोत्सव 20 ते 24 मार्च 2026 दरम्यान चांदा क्लब ग्राऊंडचंद्रपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेहा महोत्सव कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभागजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), पशुसंवर्धन विभाग (जिल्हा परिषदतसेच महिला आर्थिक विकास महामंडळचंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवात सेंद्रीय व बिगर सेंद्रीय शेतमालाची विक्रीशेतकरी उत्पादक कंपन्यामहिला स्वयं सहाय्यता गट व बचत गटांमार्फत तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री तसेच कृषी व पशुपालन विषयक माहितीपर स्टॉल उभारण्यात येणार आहेतएकूण 325 स्टॉल उभारण्यात येणार असून त्यामध्ये शासकीय योजनाकृषी निविष्ठाकृषी प्रात्यक्षिकेकृषी यांत्रिकीकरणपशु-पक्षी प्रदर्शनखाद्य स्टॉल तसेच चर्चासत्रे व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

महोत्सवात सूक्ष्म सिंचन अभियानएकात्मिक फलोत्पादन विकास अभियानजलयुक्त शिवार अभियानसेंद्रीय शेतीश्री पद्धतीची भात लागवड यांसारख्या उपक्रमांची माहिती व प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेततसेच मधुमक्षिका पालनमत्स्य व्यवसायपशुसंवर्धनरेशीम उद्योग आदी कृषी संलग्न क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेयाशिवाय पशु-पक्षी प्रदर्शनामध्ये देवणीडांगीखिल्लारलालकंधारीगवळाऊकठाणी यांसारख्या गाईंच्या जातीगीर व थारपारकर देशी गायी तसेच जर्सी संकरीत गायीनागपुरीजाफ्राबादीपंढरपुरी व मुर्रा म्हशीतोतापरीउस्मानाबादीबेरारीबिटलकच्छीबारबेरी व आफ्रिकन बोअर या शेळ्यांच्या जाती तसेच कुक्कुट व बदकांचे विविध प्रकार प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

महोत्सवात अनुभवी व पुरस्कारप्राप्त शेतकरीशास्त्रज्ञ व उद्योजक यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानकृषीविषयक परिसंवाद तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन कार्यक्रमही होणार आहेतसांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ‘पैसारे पैस’ हे दोन अंकी नाटक तसेच महारोगी सेवा समितीआनंदवन यांच्या स्वरानंदवन ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेया महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांचे तंत्रज्ञानअद्ययावत कृषी उपकरणे तसेच विविध योजनांची माहिती मिळणार असून शेतकरी उत्पादकांकडून शेतमालाची थेट वाजवी दरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीनागरिक व ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावाअसे आवाहन प्रकल्प संचालककृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीप्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाउपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय तसेच महिला आर्थिक विकास महामंडळचंद्रपूर यांनी केले आहे.

०००००००

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांकडून योजनांचा आढावा





राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांकडून योजनांचा आढावा

चंद्रपूरदि. 16 : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य वड्डेपल्ली रामचंदर यांनी सोमवारी (दि. 16) अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी असलेल्या योजनांचा आढावा घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे संचालक सुनीलकुमार बाबू उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एम. रामानुजन, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह,  मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, खाजगी सचिव क्रांती कुमार, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, अधिक्षक अभियंता (महावितरण) संध्या चिवंडे, पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी वड्डेपल्ली रामचंदर म्हणाले, अनुसूचित जातीच्या नागरिकांना घरपट्टे किंवा घरकुल प्राधान्याने द्यावे. रोजगार, स्वयंरोजगारासाठी बँकांनी त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, याबाबत जिल्हा अग्रणी बँकेने पाठपुरावा करावा. प्रधानमंत्री रोजगार गॅरंटी आणि मुख्यमंत्री रोजगार गॅरंटी योजनेची मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. अनुसूचित जातीच्या लोकांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी उद्योग विभागाने त्यांचे प्रस्ताव त्वरीत बँकांकडे पाठवावे. अत्याचाराच्या घटना घडल्या तर त्यावर पोलिस विभागाने त्वरीत पीडितांना न्याय द्यावा. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती द्यावी, अशा सुचना त्यांनी केल्या.

यावेळी रामचंदर यांनी अनुसूचित जातीच्या मुलामुलींची वसतीगृह प्रवेशस्थिती, शाळांची संख्या, केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान, आरोग्य आणि पोषण, ॲक्ट्रोसिटीची प्रकरणे, ग्रामीण पाणी पुरवठा, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, बँकांची कर्ज प्रकरणे आदींचा आढावा घेतला.

००००००

बांबू सखींच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना मिळणार हक्काचा रोजगार

 


बांबू सखींच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना मिळणार हक्काचा रोजगार

Ø चिचपल्ली येथे 7 दिवसीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

चंद्रपूरदि. 16 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्लीच्या वतीने 'कॅम्पाप्रकल्पांतर्गत पारंपारिक बांबू कारागीर समुदायाचे सक्षमीकरण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहेया उपक्रमांतर्गत 'बांबू सखीतयार करण्यासाठी सात दिवसीय 'प्रशिक्षकांचे प्रशिक्षणनुकतेच यशस्वीरित्या पार पडले.

विशेष प्रशिक्षण सत्रामध्ये मोहरलीचोरगावनिंबाळाबल्लारशावरवट आणि घुग्गुस या गावातील प्रशिक्षित बांबू सखी आता गावागावात जाऊन इतर महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देतीलयामुळे ग्रामीण भागातील महिलांना घराबाहेर न पडताघरबसल्या सन्मानाने काम करण्याची आणि आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध होणार आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलावन परिक्षेत्र अधिकारी आकाश मल्लेलवार यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली हे सत्र पार पडलेप्रशिक्षणाचे संपूर्ण नियोजन आणि सत्र संचालक म्हणून बी.आर.टी.सी.च्या पर्यवेक्षक योगिता साठवणे यांनी जबाबदारी पार पाडलीया सात दिवसांच्या कालावधीत संतोष बजाईत आणि गोविंदा आत्राम यांनी प्रशिक्षक म्हणून महिलांना बांबूकामातील विविध तांत्रिक कौशल्ये आणि आधुनिक डिझाइन्सचे प्रशिक्षण देऊन कुशल केले.

प्रशिक्षणाचे उद्दिष्ट : पारंपारिक बांबू कलेला आधुनिकतेची जोड देणे ग्रामीण महिलांना 'बांबू सखीम्हणून विकसित करून त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणेस्थानिक स्तरावर बांबू उद्योगाला चालना देऊन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणेहा आहेया उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांबू हस्तकलेचे नवे जाळे निर्माण होणार असून महिलांच्या आर्थिक स्तरात मोठी सुधारणा होईलअसा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

०००००००

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन


आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Ø 23 मार्च पुर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 16 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुसूचित जमाती (एसटी.) प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहेतहे वर्ग आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकासरोजगार  उद्योजकता माहिती  मार्गदर्शन केंद्र पहिला माळाचंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहेत.

सदर मार्गदर्शन एप्रिल ते 15जुलै 2026 या कालावधीत म्हणजेच सुमारे साडेतीन महिन्यांचे असेलवर्ग-3  वर्ग-4 पदांसाठी होणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेची सविस्तर तयारी या वर्गाद्वारे करून घेण्यात येईलइच्छुक उमेदवारांनी 23 मार्च 2026 पूर्वी आवश्यक कागदपत्रांच्या (आधारकार्डशैक्षणिक प्रमाणपत्रेजातीचे प्रमाणपत्र  बँक पासबुकछायाप्रतींसह नोंदणी फॉर्म सादर करावानोंद केलेल्या उमेदवारांची मुलाखत 24 मार्च  रोजी घेण्यात येईलतर निवड यादी 25 मार्च  रोजी प्रसिद्ध केली जाईल.

मार्गदर्शन वर्गामध्ये गणितइंग्रजीसामान्यज्ञानबुद्धीमता चाचणी आणि मराठी हे विषय अनुभवी मार्गदर्शकांमार्फत शिकवले जातीलनिवड झालेल्या उमेदवारांना चार पुस्तकांचा संच तसेच प्रतिमाह हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल.

जिल्ह्यातील सर्व आदिवासी उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन कौशल्य विकासरोजगार  उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रोशन गभाले यांनी केले आहेअधिक माहितीसाठी मनोज सिडाम (मोक्र. 9764580986  यांच्याशी अथवा कार्यालयासी संपर्क साधावा.

००००००