Search This Blog

Sunday, 22 February 2026

विधीसेवेच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहचवा – न्यायमुर्ती महेंद्र नेरलीकर









विधीसेवेच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहचवा – न्यायमुर्ती महेंद्र नेरलीकर

Ø वरोरा येथे विधीसेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा

Ø 40 स्टॉलची उभारणी नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

चंद्रपूरदि. 22 : भारतीय राज्यघटनेमुळे नागरिकांना आपल्या अधिकारांची माहिती होत आहे. मात्र अधिकाराचा वापर कसा करावाहे अजूनही नागरिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचले नाही. त्यासाठीच विधीसेवेचा उपयोग अत्यंत महत्वाचा आहे. मोफत विधीसेवेच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहचविणे आपले कर्तव्य आहेअसे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयनागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती महेंद्र नेरलीकर यांनी केले.

जिल्हा तसेच वरोरा तालुका विधी सेवा प्राधिकरण,  जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा येथे विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्याचे उद्घाटन करताना न्यायमूर्ती श्री. नेरलीकर बोलत होते. यावेळी प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदमजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.वरोरा तालुका विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायमुर्ती क्र.1 प्रवीण अभंगअपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडेतालुका वकील संघाचे अध्यक्ष गजानन बोढालेमुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. कुलकर्णीविधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर इंगळे आदी उपस्थित होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या घटकांना न्याय देणे आवश्यक आहेअसे सांगून न्यायमुर्ती महेंद्र नेरलीकर म्हणालेदेशाचा प्रत्येक नागरिक हा घटनेचा संरक्षक आहे. मूलभूत अधिकारांची माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. न्याय प्रत्येकाला भेटला पाहिजेहे घटनेचे मूलभूत तत्व आहे. केवळ लाभार्थी म्हणून थांबू नका तर योजनांची माहिती इतरांनाही द्या. कौटुंबिक हिंसाचाराची अनेक प्रकरणे निदर्शनास येतात. स्त्रियांसाठी अनेक कायदे आहे. राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये विधी सेवा मोफत देण्याच्या सूचना आहेत. अन्याय सहन करत आपण शांत बसलो तर खऱ्या अर्थाने राज्यघटनेची परिपूर्ती होणार नाही.

जिल्हा वकील संघ व तालुका वकील संघानेसुद्धा समाजाच्या शेवटच्या घटकासाठी न्यायदानाचे काम करावे. तळागाळातील प्रत्येक नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्यावी. शासनाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा केवळ आपल्या कामापुरते मर्यादित न राहता विधी सेवेचे काम नागरिकांपर्यंत पोहोचवावे. विधी सेवेमुळे अनेक अडचणी सुटू शकतात. घटनेची स्वप्नपूर्ती करायची असेल तर नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावाअसेही न्यायमूर्ती महेंद्र नेरलीकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विविध स्टॉलला भेटी देऊन माहिती जााणून घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी केले. संचालन नेहा गोरले व रमा कपील यांनी तर आभार सचिव सुधीर इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारेजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मंजिरी टकलेउपविभागीय अधिकारी संदीप भस्के,  यांच्यासह मोठ्या प्रमाणावर न्यायाधीशन्यायिक अधिकारीलाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

लोकांपर्यंत एकत्रित योजना पोहचविण्याचा मानस : जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज वरोरा येथे विधी सेवा महरशिबिर व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. सर्व योजना एकाच छताखाली देण्याचे नियोजन असल्यामुळे येथे विविध स्टॉल उभारले आहेत. याशिवाय येथे योजनांचा लाभ त्वरित देण्याचे नियोजन सुद्धा करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा. शिबिराच्या माध्यमातून लोकांपर्यंत योजना पोहोचविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहेअसे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले

नागरिकांना विविध योजनांचा लाभ : यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्योती डाहुले यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यांना लाभकृषी यांत्रिकीकरण अंतर्गत पांडुरंग डोंगरकर यांना ट्रॅक्टर चाबीसचिन ढोकरे व अविनाश महाजन (वनहक्क पट्टा)बंडु पेटकर (आयुष्यमान भारत कार्ड)नीलिमा गजभिये (आटा चक्की) राहुल दारुडे (सिंचन विहीर)रामकृष्ण ताजणे (ट्रॅक्टर वाटप)भानुदास पेंदाम (वैयक्तिक वनहक्क पट्टा)केशव नगराळे (इनरवेल बोर)मोहन उमरे (ट्रॅक्टर वाटप)वैधवी पवारमीरा झाडे आणि घनश्याम तळवेकर या बालकांना (श्रवण यंत्र) उपदेश चहांदे यांना शिलाई मशीन वाटप करण्यात आली.

००००००

कॅम्पा’ प्रकल्पांतर्गत पारंपारिक बांबू कारागिरांचे सक्षमीकरण


 

कॅम्पा’ प्रकल्पांतर्गत पारंपारिक बांबू कारागिरांचे सक्षमीकरण

चंद्रपूरदि. 22 :  कॅम्पा प्रकल्पांतर्गत मोहर्ली बांबू क्षेत्रातील पारंपारिक कारागीर समुदायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित 15 दिवसीय ‘बांबू बास्केट्री’ प्रशिक्षण कार्यक्रमाचा नुकताच यशस्वी समारोप झाला.

या प्रशिक्षणात स्थानिक महिलांनी बांबूपासून विविध आकर्षक व बाजारपेठेत मागणी असलेल्या वस्तू तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले. पारंपारिक टोपल्यांबरोबरच बांबू चटईबांबू बुकेबांबूची फुलेबांबू बॅच आदी आधुनिक व कलात्मक वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड मिळाल्याने तयार झालेल्या वस्तू अधिक व्यावसायिक आणि दर्जेदार ठरल्या आहेत.

समारोपप्रसंगी आयोजकांनी सांगितले कीबांबू कारागिरांच्या हाताला काम मिळवून देणे आणि त्यांच्या कलेला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तू त्यांच्या आर्थिक प्रगतीस निश्चितच चालना देतील. कार्यक्रमादरम्यान महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात आले. गावाच्या सरपंच श्रीमती काटकर तसेच वन परिक्षेत्र अधिकारी श्री. थीपे यांनी महिलांच्या कौशल्याचे विशेष कौतुक केले.

सदर प्रशिक्षणाचे आयोजन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांनी केले. प्रशिक्षणाचे नियोजन पर्यवेक्षक योगिता साठवणे यांनी केले असून सहाय्यक म्हणून सुनिता मोकाशेप्रशिक्षक बांबू सखी मनिषा नन्नावरे व अनिता भोयर तसेच विशेष प्रशिक्षक संतोष बजाईत यांनी मोलाची भूमिका बजावली. हा प्रशिक्षण कार्यक्रम बीआरटीसीचे संचालक मनोज खैरनारवन परिक्षेत्र अधिकारी आकाश माल्लेलवारयांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन : कौशल्य विकासासोबतच कारागिरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षण कालावधीत विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सहभागी महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली तसेच त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.

००००००

Friday, 20 February 2026

22 फेब्रुवारी रोजी वरोरा येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा

 22 फेब्रुवारी रोजी वरोरा येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा

चंद्रपूरदि.20 :  वरोरा येथे स्व. दादासाहेब देवतळे शेतकरी भवनसद्भावना चौक अभ्यंकर वार्ड येथे 22 फेब्रुवारी2026 रोजी विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजीत करण्यात येत आहे .त्यामध्ये विविध शासकीय योजनांचे स्टॅाल लागणार असून त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त नागरीकांनी सदर महाशिबीरात उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव यांनी केले आहे.

००००००

Thursday, 19 February 2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य पदयात्रा







छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य पदयात्रा

Ø चंद्रपूरात उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, जि.प. शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच मेरा युवा भारत यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 19) सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पदयात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, महानगर पालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे (माध्य.) अश्विनी सोनवणे (प्राथ.), जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते

 यावेळी जिल्हाधिका-यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला प्रारंभ होताच विद्यार्थ्यांनी शिवगर्जना व जयघोषांनी परिसर दणाणून सोडला. विविध शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित वेशभूषा, पोवाडे, आकर्षक झाँकी व घोषणांच्या माध्यमातून राष्ट्राभिमान जागविला. पदयात्रेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज स्मारक – महात्मा गांधी चौक – आझाद बगीचा – गिरणार चौक मार्गे होत शेवटी मनपा पार्किंग येथे समारोप करण्यात आला.

रॅलीतील उत्कृष्ट सादरीकरणासाठी आयुक्त महानगरपालिका यांच्या हस्ते तीन सामूहिक व तीन वैयक्तिक पारितोषिके (ट्रॉफी व पेन सेट) प्रदान करण्यात आली. प्रथम क्रमांक लोकमान्य टिळक कन्या प्राथमिक शाळेला देण्यात आला. या शाळेतील विद्यार्थी निरव चहारे यांनी शिवचरित्रावर प्रभावी पोवाडा सादर केला. द्वितीय क्रमांक लोकमान्य टिळक विद्यालय, चंद्रपूर तर तृतीय क्रमांक पीएमश्री सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक शाळा, बाबुपेठ, चंद्रपूर यांनी मिळविला.

या पदयात्रेत जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना, सामाजिक व महिला संघटना, ज्येष्ठ नागरिक, खेलो इंडिया खेळाडू, एन.एस.एस., एन.सी.सी., क्रीडाप्रेमी, क्रीडा शिक्षक व विद्यार्थी व शिवप्रेमींनी सहभाग नोंदविला. एकूण 22 शाळा व महाविद्यालयांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी संदीप उईके, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, नंदू आवारे तसेच प्रशासन अधिकारी सुनील आत्राम, मेरा युवा भारतचे अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, क्रीडा व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

००००००

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला विविध विभागाचा आढावा


 

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला विविध विभागाचा आढावा

चंद्रपूर, दि. 19 :  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बुधवारी (दि.18) जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विभागाचा आढावा घेऊन सुचना केल्या.

बैठकीला महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, भागवत तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, मनपा उपायुक्त संजय चिद्रावार आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती चाकणकर म्हणाल्या, शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये महिलांसदर्भात असलेल्या अंतर्गत तक्रार समितीचे ऑडीट करावे. या समित्या केवळ कागदावर न राहता ॲक्टीव्ह असल्या पाहिजे. जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरला अचानकपणे भेट देऊन तपासणी करावी. अवैधरित्या चालणारे सोनोग्राफी सेंटर, गर्भपात सेंटरवर कडक कारवाई करा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिल्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्यांना रोजगाराची साधने उपलब्ध करून द्या.

प्रत्येक शासकीय कार्यालये, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे असली पाहिजे. त्याची नियमित साफसफाई करून पाण्याची व्यवस्था ठेवावी. आदिवासी विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थीनींना ने-आण करणा-या पालकांची खात्री झाल्याशिवाय इतर कोणाहीसोबत पाठवू नये. त्यांना अधिकृत ओळखपत्रे द्यावीत तसेच त्याची नियमित तपासणी करावी. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्तरावरील यंत्रणेला सोबत घेऊन बालविवाहाला प्रतिबंध करा. नागरिकांची लोकोपयोगी कामे वेळेत आणि जबाबदारीने करा, अशा सुचना अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या.

विविध विभागाचे सादरीकरण : यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सादरीकरण करतांना अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी अंतर्गत तक्रार निवारण समिती, बालविवाह प्रतिबंध, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी असलेल्या योजना आदींबाबत माहिती दिली. तसेच आरोग्य विभागांतर्गत अल्पवयीन मुलींची प्रसुती, महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र,  विशाखा समिती, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, गरोदर महिलांसाठी विशेष उपाययोजना यांच्यासह शिक्षण विभाग, कामगार कल्याण विभाग, राज्य परिवहन महामंडळ, आदिवासी विकास विभाग, चंद्रपूर महानगर पालिका आदी विषयांचे सादरीकरण करण्यात आले.

००००००