Search This Blog

Sunday, 19 April 2026

चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा


 चंद्रपूर  जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Ø नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूरदि. 19 : भारतीय हवामान विभागाकडून आगामी काळात विदर्भातविशेष करून चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कालावधीत काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने उष्णतेच्या काळात नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नयेयासाठी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.

1) तीव्र उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान बाहेर पडणे टाळावे. 2) पुरेसे पाणी पित राहावे. तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी पिण्याची सवय ठेवावी. 3) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्रीटोपी तसेच पांढरा शेला / दुपट्टा वापरावा. 4) सूर्यप्रकाशापासून बचावासाठीघरातील पडदे व झडपा वापराव्यात. 5) हलकेपातळसच्छिद्र व पांढऱ्या रंगाचे सूती / खादीचे कपडे वापरावेत. 6) प्रवास करताना किंवा कामाच्या ठिकाणी मुबलक पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

7) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएसलिंबूपाणीताकलस्सी इ. द्रवपदार्थ घ्यावेत. 8) घर थंड ठेवण्यासाठी पडदेशटर व सनशेडचा वापर करावा तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. 9) घरामध्ये कुलरपंखे किंवा वातानुकूलन (AC) यांचा योग्य वापर करावा. 10) कामगारांना सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी सूचना द्याव्यात. 11) गरोदर महिलावयोवृद्धआजारी व्यक्ती व लहान मुले यांची विशेष काळजी घ्यावी. 12) शिळे अन्न खाणे टाळावे. 13) उन्हात काम करताना चेहरा व डोके ओल्या कापडाने झाकावे. 14) शक्यतो दुपारी 12 ते 4 या कालावधीत श्रमाची कामे टाळावीत. 15) चक्कर येणे किंवा अस्वस्थ वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 16) पाळीव प्राणी व गुरेढोरे यांना सावलीत ठेवून त्यांना पुरेसे पाणी द्यावे. 17) उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाणे टाळावे. 18) दुपारच्या वेळेस मद्यचहाकॉफी व कार्बोनेटेड शीतपेये पिणे टाळावे.   

उष्माघात झालेल्या व्यक्तीस तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू  करावा. नागरिकांनी वरील सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनचंद्रपूर   यांच्या वतीने करण्यात येत आहे.

०००००००

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा


वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा

Ø जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

चंद्रपूरदि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक)जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीयअनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून जास्तीत जास्त सकाळी 11 वाजेपर्यंत सोडण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी या निर्देशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता बाळगावीअसेही त्यांनी नमूद केले आहे.

०००००००

Thursday, 16 April 2026

चंद्रपूरचा प्रदुषण मुक्तीचा प्लान तयार करणार - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

 







          चंद्रपूरचा प्रदुषण मुक्तीचा प्लान तयार करणार  - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

Ø  दुर्गापूर येथील कन्व्हेअर बेल्ट तसेच बेलसणी आणि घुग्घुस येथील कोल वॉशरीजची पाहणी

चंद्रपूर, दि. 16 : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. उद्योगांच्या विरोधात आम्ही नाही. मात्र उद्योगांनी सुद्धा नियमाप्रमाणे चालावे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही. येथील उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे, याची जाणीव आपल्याला आहे. त्यामुळेच आज चंद्रपूर येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदुषणमुक्ती संदर्भात सुरवातीला चंद्रपूरचा एक वर्षाचा, नंतर तीन वर्षाचा आणि दीर्घकालीन प्लान तयार करण्यात येईल, अशी ग्वाही पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

दुर्गापूर येथील चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या कन्व्हेअर बेल्ट, बेलसणी येथील महामाया कोल वॉशरीज आणि घुग्घुस येथील विदर्भ मिनरल एनर्जी या कंपनीला भेट देऊन श्रीमती मुंडे यांनी प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जनतेसोबत संवाद साधताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे अधिकारी श्री. यादव आदी उपस्थित होते.

सुधीरभाऊंनी विधानसभेत प्रदूषणाबाबत प्रश्न उपस्थित केला, त्याच वेळेस मी त्यांना आश्वासित केले होते की, या प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी मी प्रत्यक्ष चंद्रपूर येथे येऊन प्रदूषणाची समस्या जाणून घेईल. चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणात उद्योग असल्यामुळे येथील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील नागरिकांचे दुःख पाहण्यासाठी आज मी प्रत्यक्ष येथे आली आहे.

प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. जीव अतिशय महत्वाचा असून लोकांच्या जीवाशी कोणालाही खेळू देणार नाही. उद्योगांनी प्रदुषण कमी करणारे फॉगर, फॉगिंग मशीन व इतर साधनसामुग्री त्वरीत बसवावी व नियमाप्रमाणे चालावे. अन्यथा पर्यावरण मंत्री म्हणून त्यांच्यावर अंकुश कसा ठेवायचा हे आपल्याला माहित आहे. जे अधिकारी ऐकणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कंपन्यांच्या प्रदुषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस काळा पडत असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची त्यांना भरपाई देण्यात येईल.

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे येथे आल्या आहेत. प्रदूषणाच्या संदर्भात कायद्याच्या व नियमाच्या चौकटीत निर्णय घेण्यात येईल. तसेच पर्यावरण संदर्भात एक जिल्हास्तरीय समिती तयार करण्यात येईल. प्रदूषणामुळे येथील नागरिकांना विविध प्रकारचे आजार झाले असून शेतकऱ्यांचा कापूस पूर्णपणे काळा पडत आहे. त्यांना कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

००००००

Wednesday, 15 April 2026

एसआयआर अंतर्गत 100 टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी



 

एसआयआर अंतर्गत 100 टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी

Ø  जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची बैठक

चंद्रपूरदि. 15 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एप्रिल 2026 पासून विशेष सखोल पुनरिक्षण (स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हीजन - एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आज (दि.15) राजकीय पक्षांची बैठक घेण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, आगामी सखोल पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये राजकीय पक्षाने सक्रिय सहभाग घ्यावातसेच मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ करण्याकरीता मतदारांना प्रवृत्त करावेप्रत्येक मतदार यादी भागाकरिता प्रत्येकी एक (1) याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व मतदार यादी भागांकरिता, सर्व राजकीय पक्षाने मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमावातसेच त्याची सूचना विहित नमून्यात संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात.   

'शून्य त्रुटीमतदार यादी तयार करणे, हे या सखोल मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जेव्हा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या निवासस्थानी प्रत्यक्ष पडताळणीसाठी येतीलतेव्हा त्यांना आपल्या कुटुंबाची अचूक माहिती आणि आवश्यक असल्यास ओळख पुराव्याची कागदपत्रे देऊन सहकार्य करावे. लोकशाहीच्या या बळकटीकरण प्रक्रियेत मतदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले.

बैठकीला उपजिल्हाधिकारी (निवडणूकसंजीव देशमुखचंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामप्रभारी तहसीलदार ओकांर ठाकरे यांच्यासह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

        प्रशासकीय यंत्रणा पोहचणार घरोघरी : सामान्यतः राबविल्या जाणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणात प्रामुख्याने अर्जांच्या आधारे मतदार यादी अद्ययावत केली जाते. मात्रआगामी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत जिल्ह्यातील संपूर्ण मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी 100 टक्के घरोघरी भेट दिली जाणार आहे. यामध्ये केवळ अर्जांची वाट न पाहताप्रशासकीय यंत्रणा स्वतः प्रत्येक उंबरठ्यावर जाऊन मतदारांच्या वास्तव्याची आणि पात्रतेची प्रत्यक्ष खात्री करणार आहे.

केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओयांचे कार्य व जबाबदारी : सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्यामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गाव आणि वस्तीवर प्रत्यक्ष भेट देऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याची माहिती तपासणे. मयतकायमस्वरूपी स्थलांतरित आणि दुबार नावे शोधून ती वगळण्याची विहित कायदेशीर कार्यवाही करणे. ज्या पात्र नागरिकांनी (वय 18 वर्ष पूर्ण) अद्याप नोंदणी केलेली नाहीत्यांचे अर्ज नमुना मध्ये जागेवरच भरून घेणे. एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे एकाच ठिकाणी एकत्रित असल्याची खात्री करणे, अशी जबाबदारी बीएलओ पार पाडणार आहेत.

      एसआयआर मोहिमेकरीता अशी आहे जिल्ह्यातील आकडेवारी : एकूण मतदार 18 लक्ष 76 हजार 18 असून यात पुरुष मतदारांची संख्या 9 लक्ष 48 हजार 902, स्त्री मतदार 9 लक्ष 27 हजार 66 तर तृतीयपंथी मतदार 50 आहे. 18 ते 19 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 47728 असून 85 वर्षांवरील वयोवृध्द मतदारांची संख्या 12693 तर दिव्यांग मतदार 8957 आहेत.

००००००

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

 







केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Ø जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक

चंद्रपूरदि. 15 : केंद्र शासनाच्या वतीने जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांच्या प्रगतीचा लेखाजोखा घेण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचा (दिशा) आढावा आज (दि. 15) घेण्यात आला.

नियोजन भवन येथे पार पडलेल्या या बैठकीला चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता खांडेकर, आमदार देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्ह्यातील नगराध्यक्ष, दिशा समितीचे अशासकीय सदस्य व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात बांधकामाधीन असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रोडचे बांधकाम करणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतक-यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी सोयीचे होईल, मात्र काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सर्व्हिस रोडचे बांधकाम केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणने संबंधित कंत्राटदारास सक्त निर्देश देऊन सर्व्हिस रोडचे बांधकाम करून घ्यावे. ज्या भागात बीएसएनएलचे टॉवर बंद / रेंज नसेल तेथे अधिका-यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते आवश्यक गावात प्राधान्याने पूर्ण करावे. अंगणवाडीतून दर्जेदार पोषण आहार दिला गेला पाहिजे. अन्यथा नागरिकांना कुठे तक्रारी करावयाच्या याबाबत प्रत्येक अंगणवाडीमध्ये फलक लावावा.

वर्धा – बल्लारशहा रेल्वेच्या तिसरी लाईन संदर्भात स्थानिक यंत्रणेला विश्वासात घ्यावे. गावागावांमधील शेत पाणंद रस्ते अतिशय महत्वाचा विषय आहे, ते त्वरीत पूर्ण करावे. चंद्रपूर शहराची लोकसंख्या लक्षात घेता महानगर पालिकेने पाणी पुरवठा योजनेचे योग्य नियोजन करावे. अमृत योजनेचे अतिशय संथगतीने आणि निकृष्ट काम करणा-या संबंधित कंत्राटदारावर मनपाने कारवाई करावी. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्कूल बसेसची फिटनेस तपासणी करावी. तसेच रस्त्याच्या बाजुला उभ्या असणा-या वाहनांवर सक्त कारवाई करावी. खाजगी शाळांमध्ये कोणत्याही शालेय साहित्याची विक्री नको. जी शाळा जबरदस्ती करीत असेल अशा संस्थांवर शिक्षण विभागाने कारवाई करावी, अशा सुचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या.

यावेळी आमदार देवराव भोंगळे, विविध नगर पालिकेचे नगराध्यक्ष आणि समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना सुचना केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांनी तर संचालन जि.प. समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे यांनी केले.

या विषयांचा झाला आढावा :  यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, बीएसएनएल – भारत नेट, प्रधानमंत्री खनीज क्षेत्र कल्याण योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण आणि शहरी प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन (शहरी आणि ग्रामीण), अमृत योजना, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री कृषी विमा योजना, मृदा आरोग्य कार्ड, राष्ट्रीय आरोग्य मिशन, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बालविकास योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचा आढावा घेतला.

०००००००