Search This Blog

Tuesday, 10 March 2026

चंद्रपुरात 12 मार्चला क्रांतिवीर बाबूराव शेडमाके जयंती व आदिवासी लोककला महोत्सव


 चंद्रपुरात 12 मार्चला क्रांतिवीर बाबूराव शेडमाके जयंती व आदिवासी लोककला महोत्सव

चंद्रपूरदि. 10 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयचंद्रपूर यांच्या वतीने क्रांतिवीर बाबूराव पुलेश्वर शेडमाके यांची जयंतीआदिवासी मेळावा तसेच भव्य आदिवासी लोककला महोत्सव’ गुरुवार12 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता वीर बाबूराव शेडमाके शहीद स्मारक (मध्यवर्ती कारागृह परिसर)गिरणार चौकचंद्रपूर येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने या महोत्सवात पारंपरिक आदिवासी लोककला आणि वाद्यांचे सादरीकरण होणार आहे. यानिमित्ताने लोककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून विविध आदिवासी पथके आपल्या पारंपरिक कला सादर करणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्या पथकांना आकर्षक रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. यात प्रथम पारितोषिक 50 हजार रुपयेद्वितीय पारितोषिक 40 हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक 30 हजार रुपये असेल. तसेच 10 हजार रुपयांची दोन प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येणार असून प्रत्येक सहभागी पथकास 5 हजार रुपये प्रवास भत्ता दिला जाणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक  उईके उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवात प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी व नागरिकांनी या सांस्कृतिक सोहळ्याला उपस्थित राहावेअसे आवाहन प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर विकास राचेलवार यांनी केले आहे.

0000000

उष्माघात टाळण्यासाठी बांधकाम कामगार व ठेकेदारांना उपाययोजना करण्याचे आवाहन

 

उष्माघात टाळण्यासाठी बांधकाम कामगार व ठेकेदारांना उपाययोजना करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 10 : उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता  चंद्रपूर जिल्ह्यात उष्माघात कृती आराखडा राबविण्यात येत आहे. याअनुषंगाने बांधकाम क्षेत्रातील कामगार तसेच मालकनियोक्ता व ठेकेदारांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन सहायक कामगार आयुक्तचंद्रपूर यांनी केले आहे.

उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असून काही वेळा उष्माघातामुळे जीवितहानीही होऊ शकते. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवते. याच काळात इमारत बांधकाम व त्यासंबंधित कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असतात. त्यामुळे कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. बांधकाम स्थळी पिण्याच्या थंड पाण्याची अखंड व्यवस्था ठेवावी.

 कामगारांना दुपारी 12 ते 4.30 या कालावधीत भर उन्हात काम करू देऊ नये. कामाच्या वेळेचे नियोजन करून पहाटेच्या वेळेत अधिक काम पूर्ण करणे योग्य ठरेल. तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी पिणेतसेच गोड ताकपन्हेकोकम सरबत यांसारखी पेये घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आहारात ताजे अन्नतांदळाची भाकरीभाताची पेजपालेभाज्या व फळे यांचा समावेश करावा.

 काम करताना डोक्यावर टोपीगॉगल तसेच ओल्या कपड्याने डोकेमान व चेहरा झाकून ठेवावा.बांधकामस्थळी प्रथमोपचार पेटीत ORS पावडर व उष्माघातावरील औषधे उपलब्ध ठेवावीत. गर्भवती व आजारी कामगारांकडून काम करून घेऊ नये. दुपारी 12 ते 4.30 या वेळेत बांधकामाच्या आतील भागातील कामे करण्याचे नियोजन करावे.

तसेच या काळात कामगारांना दुपारी 12 ते 4.30 दरम्यान शारीरिक श्रमाची कामे देऊ नयेत. चहाकॉफीमद्य व कार्बोनेटेड थंड पेये टाळावीत. शिळे अन्नजंक फूड तसेच अतितिखट व तेलकट पदार्थांचे सेवन टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

0000000

Monday, 9 March 2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रचारासाठी अभिनेता भारत गणेशपुरे चंद्रपुरात येणार


 मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रचारासाठी अभिनेता भारत गणेशपुरे चंद्रपुरात येणार

चंद्रपूरदि. 9 : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 अंतर्गत जनजागृती व प्रचार-प्रसारासाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भारत गणेशपुरे हे 10 मार्च 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान ते ग्रामपंचायत सागरा (पं.स. भद्रावती)ग्रामपंचायत नांदगाव पोडे (पं.स. बल्लारपूर) आणि ग्रामपंचायत जिबगाव (पं.स. सावली) येथे भेट देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यांच्या खास शैलीतून ते पंचायत राज व्यवस्थेचे महत्त्व पटवून देत ग्रामीण विकासातील लोकसहभागाबाबत जनजागृती करणार आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामीण नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध करून देणेआरोग्यशिक्षणउपजीविका व सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सक्रीय सहभाग वाढविणे यावर भर देण्यात येत आहे. जिल्हा परिषदपंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षमतेत वाढ करणेस्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर 5 कोटी रुपयांपर्यंतची पारितोषिके जिंकण्याची संधी मिळणार आहे. सुशासनजलसमृद्धतास्वच्छताडिजिटल शिक्षण आदी सात प्रमुख घटकांवर गावांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भारत गणेशपुरे यांच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साह निर्माण होऊन अभियानाची व्यापक प्रसिद्धी होण्यास मदत होईलअशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती या अभियानात सहभागी झाल्या आहेत. ग्रामस्थांनी लोकसहभागातून व श्रमदानातून ग्रामविकासाची लोकचळवळ उभी करावी तसेच मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावेअसे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

0000000

Saturday, 7 March 2026

गोवरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप





गोवरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप

Ø जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट

चंद्रपूर, (राजुरा) दि. 7 : महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या टप्पा क्रमांक १ ची सुरुवात आज ७ मार्च २०२६ रोजी राजुरा तालुक्यातील मौजा गोवरी येथे करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी  विनय गौडा यांनी अचानक भेट दिली. या शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजुराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार  ओमप्रकाश गोंड यांनी केले. यावेळी विविध विभागांच्या विभागप्रमुखांनी आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

सदर शिबिरादरम्यान सामाजिक अर्थसहाय्य योजनांअंतर्गत नवीन लाभार्थी निवड आदेशनवीन रेशनकार्डजात प्रमाणपत्र तसेच विविध दाखले यांचे वितरण करण्यात आले. तसेच वर्ग-१ करण्यात आलेल्या जमिनीचे ७/१२ उतारे व दुरुस्ती केलेले ७/१२ उतारे लाभार्थींना प्रत्यक्ष देण्यात आले. विविध योजनांसाठी नव्याने अर्जही स्वीकारण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी  विनय गौडा यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले व हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी सहकार्य करावेअसे सांगितले.

कार्यक्रमास गट विकास अधिकारी भागवत रेजीवाडउपअधीक्षक भूमिअभिलेख दत्तू सोनवणेपशुधन विकास अधिकारी श्री. तेलंगेनायब तहसीलदार श्रीमती पवारतसेच गोवरीच्या सरपंच आशाताई उरकुडे यांच्यासह शेजारील ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकिशोर वाढईबंधू कोडापे,  वनमाला कातकर,  पांडुरंग पोटे आदी उपस्थित होते. तसेच गोवरी मंडळातील सर्व तलाठीमंडळ अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिरात सहभाग घेतला.

0000000

जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत महाराजस्व अभियानाचा शुभारंभ





जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत महाराजस्व अभियानाचा शुभारंभ 

Ø अजयपूर (ता. चंद्रपूर) येथे आयोजन

चंद्रपूरदि. 07 : शेतकरीशेतमजूरमहिलाविद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न त्वरीत निकाली काढण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसारमहसूल विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ शनिवारी (दि.7) अजयपूर (ता. चंद्रपूर) येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी चंद्रपूरचे उपविभाागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामजिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख श्री. जगतापतहसीलदार विजय पवारतालुका कृषी अधिकारी श्री. मानेउपअधिक्षक भुमी अभिलेख श्री. गिज्जेवारनायब तहसीलदार ओंकार ठाकरेराजू धांडेअजयपूरचे व चिचपल्लीचे सरपंच आदी उपस्थित होते.

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुखकार्यक्षम व गतिमान करून नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावायासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहेअसे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेसर्व नागरिकांनी लोकोपयोगी योजनांचा लाभ घ्यावा. शासकीय लाभापासून कोणीही वंचित राहू नये. तसेच आपल्या महसूल विषयक अडचणींचे त्वरीत निराकरण करून घ्यावे. कार्यक्रमादरम्यान विविध विभागाच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिका-यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या शंकांचे निराकरण केले. तसेच आगामी काळात होणाऱ्या मंडळस्तरीय महसूल अभियान शिबिरांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावेअसे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी केले.

कार्यक्रमाला सर्व मंडळ अधिकारीग्राम महसूल अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जवळपास 600 नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.

अभियानाचे उद्दिष्ट : 1. महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या दैनंदिन समस्या व तक्रारींचे त्वरित निराकरण करणे. 2. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नव्या तरतुदींबाबत जनजागृती करणे. 3. महसूल सेवांमध्ये डिजिटल प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहित करणे. 4. शासनाच्या विविध सुधारित धोरणांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे.

या सेवांच्या लाभासाठी महाराजस्व अभियान : 1. भोगवटदार वर्ग 2 जमिनींची तपासणी  करून पात्र प्रकरणांमध्ये वर्ग 1 मध्ये रुपांतर व अद्यावत 7/12 वितरण2. सर्व गावांमध्ये 7/12 वाचन करून प्रलंबित नोंदीची दुरुस्ती व अभिलेख अद्ययावत करणे3. पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेऊन मंजुरी आदेश वितरण4. तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी करून अद्यावत करण्यात आलेल्या 7/12 वितरण5. तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनामुळे 7/12 मधील इतर अधिकारातील नोंदी व शेरे तसेच नव्याने प्राप्त होणाऱ्या अर्जाविषयी फेरफार घेऊन अद्यावत 7/12 चे वाटप6. शाळांमधून विद्यार्थ्यांचे अर्ज संकलित करून प्रमाणपत्रांचे वितरण7. पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश संबंधित ग्रामपंचायतीना उपलब्ध करून देणे8. उर्वरित पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून लाभार्थ्यांना घरपट्टे वाटप. प्रलंबित फेरफार प्रकरणे सुनावणी करून निकाली काढणे9. 7/12 उताऱ्यातील  चुका दुरुस्त करण्यासाठी अर्ज स्वीकारणेडिजिटल 7/12 व 8 अ उतारे तात्काळ उपलब्ध करून देणे10 लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न प्रमाणपत्ररहिवासी / अधिवास प्रमाणपत्रजात प्रमाणपत्रनॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र इत्यादी वाटप11. महसुल सुधारणा बाबत मार्गदर्शन12. इतर सेवा अंतर्गत ई-मोजणीअग्रीस्टॅकपीएम किसान योजनातक्रार निवारण सेवा.

००००००