Search This Blog

Thursday, 12 February 2026

व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा




व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

Ø राज्यस्तरीय बैठकीत वाढीव निधीची मागणी

चंद्रपूरदि. 12 : राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त व नियेाजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे बुधवारी (दि.11) सन 2026-27 चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचाजिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेतलायावेळी चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदारांनी वाढीव निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीला वित्त व नियेाजन राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वालआमदार सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूरतर जिल्हाधिकारी कार्यालयातून आमदार देवराव भोंगळे (राजुरा), आमदार किशोर जोरगेवार (चंद्रपूर), जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्यासह विविध यंत्रणेचे विभागप्रमुख उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्याकरीता शासनाकडून सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 358 कोटी 89 लक्ष रुपयेअनुसूचित जाती उपयोजनेकरीता 75 कोटी तर आदिवासी उपयोजनेकरीता 111 कोटी 48 लक्ष रुपयेकमाल वित्तीय मर्यादेत मंजूर केले आहेमात्र जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अंमलबजावणी यंत्रणामार्फत एकूण 1134 कोटी 15 लक्ष 24 हजार एवढी अतिरिक्त मागणी केली आहेराज्यस्तरीय बैठकीत उपस्थित आमदारांनीसुध्दा जिल्ह्याकरीता अतिरिक्त निधी वाढवून द्यावाअशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

यात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीजिल्हा वार्षिक योजनेची वित्तीय मर्यादा 358 कोटींवरून 600 कोटींपर्यंत वाढवून द्यावी, 3 वर्षात मामा तलावांचे नुतणीकरण करावे, 150 कोटींचे वूड म्युझियम तयार करून  रिसर्च म्युझियम म्हणून त्याला मान्यता द्यावीधानाचा बोनस त्वरीत द्यावाजलजीवन मिशन मध्ये चंद्रपूरला 508 कोटी रुपये द्यावेपोंभुर्णा आणि करंजी येथे आदिवासी एमआयडीसीची घोषणा करावीवीर बाबुराव शेडमाके स्टेडियमच्या 137 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता द्यावीएसएनडीटी महिला विद्यापीठासाठी त्वरीत निधी द्यावामुल पॉलिटेक्निक कॉलेज व गोंडवाना विद्यापीठाला निधी द्यावाअशा मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या.

आमदार देवराव भोंगळे यांनी राजुरा मतदारसंघातील ग्रामीण रस्ते (व्हीआरइतर जिल्हा मार्ग (ओडीआरकरीता तसेच जिवती येथील ग्रामीण रुग्णालयाकरीता निधी व जिवतीमध्ये सिंचनाचा प्रकल्प देण्याची विनंती केलीआमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिरासाठी तसेच धानोरा बॅरेजसाठी बजेटमध्ये निधी द्यावाअशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

जिल्हाधिका-यांकडून सादरीकरण : यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारणसन 2026-27 बाबत माहिती दिलीयात मागील सात वर्षातील मंजुर नियतव्ययजिल्ह्यात विविध स्त्रोतातून प्राप्त होणारा निधीगाभा व बिगर गाभा क्षेत्रहनिहाय जिल्हा वार्षिक योजना प्रारुप आराखडा 2026-27, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयजिल्हा शक्य चिकित्सक कार्यालयमा.सांकन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयजि.शिक्षण विभागमहिला व बालकल्याणमुख्य वनसंरक्षकजिल्हा पोलिस अधिक्षकसार्वजनिक बांधकाम विभागजि.बांधकाम विभागपशुसंवर्धन व दुग्धविकासलघुपाटबंधारे विभागमृद व जलसंधारण विभागजि.ग्रामपंचायत विभागनगरपालिका प्रशासनग्रामीण पाणी पुरवठाजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयनाविन्यपूर्ण योजना आदींबाबत मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले.

००००००

गटई कामगारांना 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल


गटई कामगारांना 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल

            चंद्रपूरदि. 12 : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकारढोरहोलारमोची इत्यादीलोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गटई स्टॉल ही योजना शासनाने सुरू केली आहेया योजनेत महानगरपालिकानगरपालिकाछावणी क्षेत्र आणि ग्रामपंचायत क्षेत्रात 100 टक्के  शासकीय अनुदान तत्वावर पत्राचे स्टॉल देण्यात येतात.

महाराष्ट्र राज्यामध्ये चामड्याच्या वस्तु व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती कार्यरत आहेत्यांची उपजिविका ही या व्यवसायावर अवलंबून आहेअनुसूचित जाती प्रवर्गातील पादत्राणे दुरुस्ती करणारे व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हातान्हात बसून आपली सेवा जनतेला देत असतातया व्यावसायिकांना ऊनवारा व पाऊस यांपासून संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती व्हावीयासाठी ग्रामपंचायतनगरपालिका क्षेत्रात 100 टक्के अनुदानावर गटई कामगारांना गटई स्टॉल देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे.

गटई स्टॉल योजनेचे अर्ज सहायक आयुक्त कार्यालयसमाजकल्याण चंद्रपुर या कार्यालयाकडे उपलब्ध आहेतरी या योजनेचा अनुसूचित जातीच्या गटई कामगारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

पात्रतेचे निकष : 1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी व अनुजातीतील संवर्गातील असावा. 2.अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागासाठी 80 हजार व शहरी भागासाठी लाखांपेक्षा अधिक नसावे. (तहसिलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक राहीलअथवा अर्जदार दारिद्रय रेषेखालील असावा. 3. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. 4. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायतनगरपालिकाछावणी बोर्ड (कटक मंडळकिंवा महानगरपालिका यांनी अर्जदारास भाडयानेकरारानेखरेदीनेअगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वमालकीची असावी.

अर्ज कसा असावा : अर्जदारांनी योजनेच्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज शासन निर्णयात नमूद अटीनुसार सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण कार्यालय चंद्रपुर येथे सादर करावा.

अटी व शर्ती : 1. एकदा लाभार्थ्यांना स्टॉलचा लाभ दिल्यानंतर या स्टॉलची देखभालत्याची दुरुस्ती इत्यादी बाबी संबंधित लाभार्थ्यांनी करणे आवश्यक राहील. 2. गटई पत्र्याचे स्टॉल हे एका घरात एकाच व्यक्तीला दिले जातील. 3. ग्रामीण भागक वर्ग नगरपालिका तसेच महानगरपालिका क्षेत्रात व छावणी क्षेत्रात (कटकमंडळसदर गटई स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी गटई कामगारांची राहील. 4. एकदा गटई स्टॉलचे वाटप झाल्यानंतर सदर स्टॉलची विक्री करता येणार नाहीतसेच ते भाडे तत्वावर किंवा स्टॉलचे हस्तांतरण करता येणार नाही. 5. स्टॉलधारकाने सदर स्टॉल कोणत्या जागेत निश्चित केला आहे यासाठीस्टॉलधारकाचे त्याच्या स्टॉल व जागेसह जिओ टॅगींग छायाचित्राचे रेकॉर्ड सहायक आयुक्तसमाज कल्याण यांनी अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे. 6. ज्या कारणासाठी गटई स्टॉल देण्यात आलेला आहेत्याशिवाय इतर कोणत्याही कारणांसाठी वापरण्यात आला तर संबंधित लाभार्थ्यांकडून दिलेले अनुदान वसूल करण्यात येईल व दिलेला स्टॉल रद्द करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे : 1. अर्जदाराचा स्वतःचा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला 2. उत्पन्नाचा दाखला 3. शाळा सोडल्याचा दाखला 4. रेशन कार्डाची झेरॉक्स (साक्षांकित प्रत) 5. आधार कार्डची झेरॉक्स प्रत 6. आधार संलग्न असलेले बँक खाते प्रत. 7. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत आहेती जागा ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका यांनी भाड्याने/कराराने/खरेदीने/स्वमालकीची असल्याबाबतची भाडे चिठ्ठी कराराची प्रत किंवा खरेदी खात्याची साक्षांकित प्रत 8. ग्रामसेवक / सचिव यांचे गटई काम करीत असल्याचे प्रमाणपत्र 9. असा व्यवसाय करीत असल्याबाबतचे ग्रामपंचायत/नगरपालिकेचे व्यवसाय प्रमाणपत्र व या जागेवर बसून काम करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्रव्यवसाय करतानाचा पोस्टकार्ड साईज फोटो जोडणे आवश्यक आहे. 10. अधिवास प्रमाणपत्र

संपर्क : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपुर (07172 -253198) अधिक माहितीकरीता सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणशासकीय दुध डेअरी जवळजलनगर वार्डचंद्रपूर येथे संपर्क करावा

००००००

महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्यात


महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्यात

Ø रुपाली चाकणकर यांचे आवाहन

Ø 18 फेब्रुरोजी महिला आयोग आपल्या दारी' उपक्रम

चंद्रपूरदि. 12 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारीया उपक्रमांतर्गत चंद्रपुर जिल्हयात बुधवार दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी जनसुनावणी होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेतनियोजन भवनजिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपुर येथे सकाळी 11 वाजता होणा-या जनसुनावणीस महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यातअसे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारीहा उपक्रम राबविण्यात येत आहेयासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा , रुपाली चाकणकर  18 फेब्रुवारी, 2026 रोजी चंद्रपुर जिल्हयात असणार आहेतयावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहेजनसुनावणी नंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासनपोलिसकामगारपरिवहनआरोग्यशिक्षण आदी विभागांची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

 'महिला आयोग आपल्या दारीया उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, 'महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहेराज्याच्या कानाकोप-यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणेआर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाहीत्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहेमहिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिसप्रशासनविधी सल्लागारसमुपदेशकजिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येतेयातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहेआढावा बैठकीतून वरिष्ठ अधिका-यांना त्या जिल्ह्यातील महिलांचे प्रश्नयोजनांची अंमलबजावणी निर्देश देण्यात येतात.

००००००

13 फेब्रुवारी ते 29 मार्च दरम्यान पशुधनाची लसीकरण मोहीम


13 फेब्रुवारी ते 29 मार्च दरम्यान पशुधनाची लसीकरण मोहीम

चंद्रपूरदि. 12 : लाळ खुरकत हा रोग अत्यंत संसर्गजन्यविषाणुजन्य असून त्याचा पशुधन उत्पादनावर विपरीत परिणाम होतोया रोगाच्या नियंत्रण व निर्मूलनासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 2030 पर्यंत लसीकरणाद्वारे सदर रोग निर्मुलनाचे उद्दष्टि निश्चित करण्यात आले आहेसलग तीन वर्षे रोग आढळल्यास राज्य लाळ खुरकत मुक्त घोषित होवून मांस निर्यातीचा मार्ग मोकळा होईल.

चंद्रपूर जिल्ह्यात गायम्हैसशेळ्यामेंढ्यामधील लाळ खुरकत या संसर्गजन्य रोगाला प्रतिबंध करण्याकरिता लसीकरणाची आठवी फेरी 13 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहेया टप्प्यात लक्ष 25 हजार 928 जनावरांना लस दिली जाईलकेंद्र सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्यासाठी लक्ष 25 हजार 950 लस मात्रा उपलब्ध झाली आहेसदर लसीकरण पुढील 45 दिवसात युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे.

पशुचे आरोग्य जपण्यासाठी व रोगप्रसार रोखण्यासाठी तसेच पशुपालकांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी पशुधनाचे लसीकरण करून घ्यावेअसे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त डॉसुरेशकुमार कुंभरे  यांनी केले आहे.

००००००

16 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन


16 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

चंद्रपूरदि.12 :  समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच महिलांच्या तक्रारी/अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावीयासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.

प्रत्येक महिन्याचे तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर व चवथ्या सोमवारी तालुकास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतोफेब्रुवारी 2026 महिन्याचा तिसरा सोमवार दि. 16 रोजी  असल्याने या दिवशी दुपारी 1 वाजता निवासी उपजिल्हाधिकारीतथा अपर जिल्हादंडाधिकारीचंद्रपूर यांच्या दालनात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या महिलांचे तक्रार/निवेदन/अडचणीसमस्या वैयक्तीक स्वरुपाचे असतीलअशा तक्रारी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसापुर्वी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीचंद्रपूर यांचे कार्यालयात दोन प्रतीत अर्ज सादर करावेप्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी संबंधित विभागाला पाठवून प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यात येईल.  तरी समस्याग्रस्त पिडीत महिलांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी सदर महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावाअसे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी  भस्मे यांनी कळविले आहे.

००००००