Search This Blog

Tuesday, 28 April 2026

नागरिकांना अधिसुचित सेवा विहित वेळेत द्या - जिल्हाधिकारी वसुमना पंत



नागरिकांना अधिसुचित सेवा विहित वेळेत द्या जिल्हाधिकारी वसुमना पंत

Ø जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘सेवा हक्क दिन

चंद्रपूरदि. 28 : महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य म्हणून ओळखले जाते. कल्याणकारी राज्यामध्‍ये शासनाच्या विविध सेवा वेळेत देण्याला प्राधान्य आहे आणि तो नागरिकांचा हक्क्‍ सुध्दा आहे. त्यामुळे सर्व विभागांनी आपापल्या विभागाच्या अधिसुचित सेवा नागरिकांना विहित वेळेत द्याव्यात, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

नियोजन सभागृह येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित सेवा हक्क दिन (28 एप्रिल) कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.

शासन आणि प्रशासन लोकांसाठी काम करते, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नये, म्हणून जास्तीत जास्त सेवा ह्या ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र या सेवा ऑनलाईन असल्या तरी संबंधित अधिका-यांनी नागरिकांच्या तक्रारी वेळेत निकाली काढणे बंधनकारक आहे. शासन स्तरावरून दर महिन्याला याचा आढावा घेतला जातो. यात प्रत्येक जिल्ह्याची रँकिंग कळते. अर्ज निकाली काढण्याची शासकीय विभागांची गती कशी आहे, याचीसुध्दा पडताळणी केली जाते. त्यामुळे नागरिकांना वेळेत सेवा देणे आपले कर्तव्य आहे. लोकांना त्रास न होता सेवा मिळाल्या तर शासन-प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यास मदत होते, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर म्हणाल्या, पूर्वी सर्व सेवा ऑफलाईन होत्या. आता मात्र विविध विभागाच्या सेवा ऑनलाईन आहेत. प्रत्येक विभागाने 100 टक्के काम करून आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार म्हणाले, 34 विभागाच्या एकूण 1212 सेवा ह्या ऑनलाईन असून 13 विभागाच्या 113 सेवा ह्या ऑफलाईन आहेत. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात आपल्या विभागाच्या अधिसुचित सेवांचा फलक लावणे आवश्यक आहे. तसेच प्रथम अपिलीय, द्वितीय अपिलीय अधिकारी कोण, याची माहिती सुद्धा लावावी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा प्रकल्प प्रमुख विकास लालसरे यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी मानले.

नागरिकांना प्रमाणपत्राचे वाटप : यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना विविध सेवेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात लक्ष्मी झोडे, वैष्णवी गभणे, चंदा वैद्य यांना नवीन शिधापत्रिका प्रमाणपत्र, गोविंद सरकार यांना संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र तर वर्षा कोडापे, प्रतिक्षा चावरे, शुभांगी चवरे यांना पोलिस विभागाचे व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र देण्यात आले.

००००००

अंमली पदार्थ प्रतिबंधाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा

 

अंमली पदार्थ प्रतिबंधाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूरदि. 28 : जिल्ह्यात अंमली पदार्थ सेवन, वापर व विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले असून याबाबत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (दि. 28) समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, आजची तरुण पिढी व्यसनाकडे जाण्याची शक्यता असल्यामुळे महाविद्यालयांमध्ये विशेष लक्ष ठेवावे. तसेच जिल्ह्यात कुठेही अंमली पदार्थाची विक्री, साठवणूक व वापर होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. बाहेरुन येणारे टपाल स्कॅनरने तपासणे आवश्यक आहे. 16 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत अवगत करावे. तसेच शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यशाळा घ्याव्यात. जिल्ह्यात अंमली पदार्थाची आवक, विक्री आदी माहिती मिळण्यासाठी पोलिस विभागाने खब-यांचे नेटवर्क वाढवावे, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

विविध विभागांनी करावयाची कार्यवाही : शिक्षण विभागाने शाळा महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये अंमली पदार्थदारूतंबाखुचे सेवन होणार नाहीयाकडे लक्ष द्यावेतसेच अंमली पदार्थ प्रतिबंधाबाबत निबंध स्पर्धावादविवाद स्पर्धापथनाट्यरॅलीच्या माध्यमातून जनजागृती करावीसहायक आयुक्तअन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील सुरू व बंद असलेल्या कारखान्यांची तसेच मेडीकल स्टोअर्सला अचानकपणे भेट देऊन अवैधरित्या होणा-या ड्रग्ज विक्रीची तपासणी करावीजिल्ह्यात शेतांमध्ये खसखस किंवा गांजाची लागवड होणार नाहीयाबाबत कृषी विभागाने दक्षता घ्यावीअंमली पदार्थ सेवन करून रुग्णालयात आलेल्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाने त्वरीत पोलिस प्रशासनाला द्यावीटपालाद्वारे येणा-या पार्सलमध्ये काही अंमली पदार्थाबाबत संशय आल्यास टपाल विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्याची सूचना पोलिसांना द्यावीसर्व ठाणेदारांनी खाजगी कुरीअर एजन्सीसोबत संपर्क ठेवून अंमली पदार्थाच्या वाहतुकीबाबत माहिती प्राप्त करून घ्यावी.

पोलिस विभागाने अंमली पदार्थ बाळगणा-यांवर वेळोवेळी धाडी टाकाव्याततसेच अंमली पदार्थ सेवन करणा-यांविरुध्द कडक कारवाई करावीएमआयडीसी परिसरातील बंद कारखान्यांची पाहणी करून तेथे अंमली पदार्थ उत्पादित होत नाहीयाची खात्री करावीरेल्वे विभागाने तेलंगणा व इतर राज्यातून संशयित रेल्वे प्रवाशांच्या सामानाची तसेच बेवारस सामानांची पडताळणी करून योग्य कारवाई करावी.

०००००

खत विक्रीतील अनियमितता ; 16 कृषी केंद्राचे परवाने निलंबित


खत विक्रीतील अनियमितता ; 16 कृषी केंद्राचे परवाने निलंबित

Ø कृषी विभागाची मोठी कारवाई

चंद्रपूरदि. 28 : जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालकांकडून खत विक्री मध्ये करण्यात येणाऱ्या अनियमितेची गंभीर दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी धडक कारवाई केली आहे. 24 एप्रिल रोजी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात पार पडलेल्या विशेष सुनावणीअंती जिल्ह्यातील 16 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर 3 कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येऊन 12 कृषी केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली.

जिल्ह्यात काही कृषी केंद्र चालकांकडून खतांच्या साठ्याबाबत आणि विक्री दराबाबत नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्यात्या अनुषंगाने जिल्हा गुण नियंत्रण पथकाने विविध केंद्रांची अचानक तपासणी केली असताअनेक ठिकाणी खतांच्या साठ्यात तफावत आणि विक्रीच्या नोंदीमध्ये अनियमितता असल्याचे निदर्शनास आलेया तक्रारींच्या आधारे संबंधित केंद्र चालकांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात आले होते.

परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीचंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुनावणी प्रक्रिया पार पडलीयावेळी प्रत्येक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आलीसुनावणी दरम्यान केंद्र चालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्याने 16 कृषी केंद्रांवर निलंबनाची कारवाई निश्चित करण्यात आलीखत विक्रीत किंवा इतर कोणत्याही कृषी निविष्ठांच्या बाबतीत गैरप्रकार करणाऱ्या केंद्र चालकांवर यापुढेही अशाच प्रकारची कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनधिकृत साठेबाजी आणि खतांच्या चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहेआगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

            परवाने निलंबन झालेले कृषी केंद्र : 1) श्रीॲग्रो ट्रेडर्सदुर्गापूर 2) शिव कृषी केंद्र,  वरोरा 3) कल्पना कृषी केंद्रवरोरा 4) आदर्श कृषी केंद्रजिबगाव (सावली) 5) धाईत कृषी केंद्रनिफंद्रा (सावली) 6) साई कृषी केंद्रसावली 7) आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थागिरगाव (नागभीड) 8) देशमुख कृषी केंद्रमांगली (नागभीड) 9) सेवा सहकारी संस्थापळसगाव (नागभीड) 10) प्रभु कृपा कृषी केंद्रमेंढा (नागभीड) 11) ठेंगरे कृषी केंद्रपिंपळगाव (ब्रम्हपुरी) 12) विनोद कृषी केंद्रपिंपळगाव (ब्रम्हपुरी) 13) पवन कृषी केंद्रभद्रावती 14) समर्थ ॲग्रो एजन्सीगवराळा (भद्रावती) 15) पाथरी सेवा सहकारी संस्थापाथरी (सावली) 16) गणेश कृषी केंद्रबेंबाळ (मुल) या कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेततर 1) तिरुमला ॲग्रो एजन्सीकोरपना 2) सेवा सहकारी संस्थागेवरा बुज (सावली) 3) कास्तकार कृषी केंद्रव्याहाड खु. (सावलीया कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्यात आल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.

००००००

योग्यता प्रमाणपत्र व अनुज्ञप्ती चाचणी वेळेत बदल


योग्यता प्रमाणपत्र व अनुज्ञप्ती चाचणी वेळेत बदल

चंद्रपूरदि. 28 :  जिल्ह्यात उन्हाची तिव्रता व वाढते तापमान पाहता प्रादेशिक परिवहन कार्यालयचंद्रपूरतर्फे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व अनुज्ञप्ती चाचणीच्या वेळेत बदल करण्यात आला आहेयोग्यता प्रमाणपत्र नुतणीकरण व चाचणी आता सकाळी ते दुपारी 12 आणि दुपारी ते या वेळे दरम्यान घेण्यात येणार आहेदुपारी 12 ते या दरम्यान नुतणीकरण व चाचणी बंद राहील.

तसेच ज्या पुर्वनियोजीत मुलाखती आहेतत्या उपरोक्त वेळेत घेण्यात येईलयाची नोंद नागरिकांनी घ्यावीअसे चंद्रपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.

००००००

9 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन


मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

चंद्रपूरदि. 28 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एसएसभीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये मे 2026  रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहेविधीज्ञपक्षकार व नागरिकांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावाअसे आवाहन एसएसभिष्म यांनी केले आहे.

झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहेलोकन्यायालयाचा महत्वाचा फायदा म्हणजे यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने व सर्वसंमतीने त्वरीत समक्ष  निकाल केला जातो व त्या आदेशाला दिवाणी  न्यायालयाच्या हुकूमनामाएवढेच महत्व असतेत्यांची अंमलबजावणी सुध्दा  करता येतेत्याद्वारे वेळपैसाश्रम यांची बचत होतेवादांचा कायमचा समोपचाराने निपटारा होतोसर्वच पक्षांना जिंकल्याचे समाधान  मिळत असल्याने भविष्यकालीन वाद टाळले जातात.

चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह  चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित दिवाणीफौजदारीकलम 138 एनआयअॅक्ट (धनादेश न बटणे), बँकांची कर्ज वसूली वगैरे प्रकरणेमोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणेजमीन अधिग्रहण अर्जकामगार कायद्याखालील प्रकरणेघरमालक-भाडेकरू वादकौटुंबिक वाद (विविह-विच्छेदन वगळता), इलेक्ट्रीसिटी अॅक्टचे समझोतायोग्य वाद तसेच न्यायालयात येण्याअगोदरची (प्रि-लिटीगेशनप्रकरणेमहसुलपाणीपट्टीबीजबिल आपसी समझोत्याकरीता ठेवून ती सामंजस्याने सोडविण्याबाबतचे  आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भिष्म यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमधी ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचंद्रपूर येथे स्वतः येऊन किंवा हेल्पलाईन क्रमांक 07172-271679 कार्यालयीन मोबाईल क्र. 8591903934 वर संपर्क करावा.

००००००