Search This Blog

Sunday, 1 March 2026

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमात सामाजिक ऐक्याचे प्रभावी दर्शन


 

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमात सामाजिक ऐक्याचे प्रभावी दर्शन

            नवी मुंबईदि. 28 :  हिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात नऊ समाजांचा उत्स्फूर्त सहभागाने विविध समाजपंथ आणि घटक एकत्र येत सामाजिक ऐक्याचे प्रभावी दर्शन घडले.

या कार्यक्रमात सिखसिकलीगरबंजारालबानासिंधीमोहयालवाल्मीयमउदासीन तसेच संत नामदेव महाराजांच्या वारकरी (भगत नामदेव) संप्रदायातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग सर्व समाजातील प्रतिनिधींनी उपस्थित राहून एकताबंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. श्रद्धासेवा आणि समतेच्या विचारांवर आधारित कार्यक्रमात सर्वांनी शांततेत आणि शिस्तीत सहभाग घेतला.

कार्यक्रमस्थळी सर्व समाजांनी परंपरासंस्कृती आणि धार्मिक मूल्यांचा सन्मान राखत शांततेत सहभाग घेतला. विविध समाजांच्या उपस्थितीमुळे हा केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु ग्रंथ साहिब यांच्या शिकवणीनुसार समता व मानवतेचा विचार अधिक दृढ करण्यात आला.

0000

शैलजा पाटील/संध्या गरवारे/कोकण भवन पथक

No comments:

Post a Comment