Search This Blog

Tuesday, 12 May 2026

चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयाम यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव



चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयाम यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

Ø राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित

चंद्रपूरदि. 12 : महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्यसेवेची मशाल तेवत ठेवणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयाम यांचा नवी दिल्ली येथे गौरव करण्यात आलाआंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस 2026 निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यातराष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांच्या हस्ते उज्ज्वला सोयाम यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल प्रतिष्ठित राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आलेया विशेष सोहळ्यात देशभरातून निवडक एकूण 15 नर्सिंग अधिकारी कर्मचारी यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याला केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पीनड्डाआरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव उपस्थित होत्या.

चंद्रपूर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या उज्ज्वला सोयाम यांनी गेल्या 24 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात अत्यंत समर्पित सेवा दिली आहेविशेषतः नक्षल प्रभावित आणि आदिवासी भागामध्ये कन्याभ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि आरोग्य जनजागृतीमध्ये घेतलेला पुढाकार गौरवास्पद आहेनैसर्गिक आपत्ती प्रवणक्षेत्र असो किंवा कठीण भौगोलिक परिस्थितीउच्च जोखीम असलेल्या गर्भवती मातांची आणि बालकांची काळजी घेण्यात त्यांनी नेहमीच तत्परता दाखवली आहे.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवसाची संकल्पना ‘आमच्या परिचारिकाआमचे भविष्यसक्षम परिचारिका जीव वाचवतात’ अशी ठेवण्यात आली होतीया पुरस्काराचे स्वरूप पदकप्रमाणपत्रप्रशस्तीपत्र आणि 1 लाख रुपये रोख असे आहे.

०००००००

Monday, 11 May 2026

जलयुक्त शिवारची प्रस्तावित कामे तात्काळ पूर्ण करा



 जलयुक्त शिवारची प्रस्तावित कामे तात्काळ पूर्ण करा 

Ø जिल्हाधिका-यांच्या यंत्रणेला सुचना

चंद्रपूरदि. 11 : ‘अल निनो’ च्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पावसाचे जास्तीत जास्त पाणी साठविणे, त्याचा उपयोग शिवारातील शेतीकरीता करणे, तसेच जमिनीची पाणी पातळी वाढविण्यास प्राधान्य देणे, आदी उपाययोजनांसाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यात येत आहे. शासन स्तरावरून याबाबत नियमित आढावा होत असल्याने या अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध यंत्रणांनी घेतलेली कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियानातील प्रस्तावित कामांच्या प्रगतीचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी (मनरेगा) शुभम दांडेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे, कार्यकारी अभियंता श्री. बेलपत्रे (ग्रामीण पाणी पुरवठा), आदी उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उपविभागीय स्तरावर असलेल्या समितीची सर्व उपविभागीय अधिका-यांनी तात्काळ बैठक घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, आपापल्या क्षेत्रात संबंधित यंत्रणांनी किती कामे घेतली आहे, त्यापैकी किती सुरू असून किती कामे पूर्ण झाली आहे. तसेच 100 टक्के कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा. जी कामे पूर्ण झाली आहेत, त्याचे पोर्टलवर नियमित मॅपिंग करावे. काम पूर्ण झाले, मात्र पोर्टलवर अपलोड न केल्यामुळे जिल्ह्याची आकडेवारी कमी दिसते. याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी.

जे कंत्राटदार काम करण्यास इच्छुक नाहीत किंवा टाळाटाळ करीत आहे, त्यांना  सक्त ताकीद देऊन काम पूर्ण करून घ्या किंवा त्यांचे कंत्राट रद्द करा. ज्या कामांना प्रशासकीय मान्यता पाहिजे असल्यास तसा प्रस्ताव सादर करावा. आवश्यक कामे घ्यायची असेल तर ती त्वरीत घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी पंत यांनी दिल्या. यावेळी त्यांनी महसूल, कृषी, वन, मृद व जलसंधारण, सिंचन, सामाजिक वनीकरण, मग्रारोहयो, ग्रामीण पाणी पुरवठा, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आदी विभागाच्या कामांची प्रगती जाणून घेतली.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची प्रगती : चंद्रपूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 232 गावांची निवड करण्यात आली असून कामांची एकूण संख्या 3357 आहे. 232 गावांमध्ये 3099 कामे सुरू असून यापैकी 2918 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू झालेल्या कामांची टक्केवारी 92.31 तर पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी 86.92 आहे.

००००००

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1067 प्रकरणे यशस्वीपणे निकाली


राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1067 प्रकरणे यशस्वीपणे निकाली

चंद्रपूरदि. 11 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणमहाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्षा समृध्दी भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1067 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली.

मे रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होतेया अदालतीमध्ये प्रलंबित न्यायालयीन 12694 प्रकरणे, 11743 दाखलपूर्व प्रकरणे  ठेवण्यात आली होतीत्यापैकी प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी 907 प्रकरणे तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी 160 अशी एकूण 1067 प्रकरणे निकाली काढण्यात आलीयात मोटार अपघात वाहन प्रकरणे 22 निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाईची 1कोटी 86 लक्ष 35 हजार रुपये रक्कम मंजूर करण्यात आलीदाखलपूर्व प्रकरणामध्ये 51 लक्ष 30 हजार 945 रुपये वसूल करण्यात आलेतसेच धनादेश अनादरीत झालेला प्रकरणापैकी 74 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीशसर्व वकीलसर्व न्यायालयीन कर्मचारीपोलिस कर्मचारी यांनी सहकार्य केलेअशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एसएस इंगळे यांनी दिली.

००००००

चंद्रपूरातील युवकांसाठी जर्मनीमध्ये करियरची संधी


 चंद्रपूरातील युवकांसाठी जर्मनीमध्ये करियरची संधी

Ø 14 मे रोजी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

चंद्रपूरदि. 11 : महाराष्ट्र शासनाचा कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग आणि 'मॅजिक बिलियनकंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एका विशेष ऑनलॉइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. 'जर्मनीमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधीया विषयावर 14 मे 2026 रोजी दुपारी ते या वेळेत हे मार्गदर्शन सत्र पार पडणार आहे.

या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्टचंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना जर्मनीमधील रोजगाराच्या संधीची माहिती देणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणेहे आहेतांत्रिक कौशल्य असलेल्या ग्रामीण भागातील तरुणांना जागतिक स्तरावर करिअरची संधी खुली व्हावीयासाठी शासन स्तरावरून हा प्रयत्न केला जात आहे.       

या वेबिनारमध्ये आयटीआय किंवा कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थीरोजगाराच्या शोधात असलेले इच्छुक उमेदवारतांत्रिक कौशल्य असलेले युवक सहभागी होऊ शकतातउमेदवारांना सहभागी होण्यासाठी 'Google Meet' ची लिंक https://meet.google.com/mqp-wyad-nbo उपलब्ध करून देण्यात आली आहेतसेचअर्जासाठी दिलेल्या Google form https://forms.gle/tgiFD-TogDR४५CqN९ लिंकद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधी लाभ घ्यावाअसे आवाहन सहायक आयुक्तजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर यांनी केले आहेअधिक माहितीसाठी 07172- 252292  या दूरध्वनी क्रमांकावर तसेच या कार्यालयाशी संपर्क करावा.

००००००

भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø नवी दिल्लीतील सीआयआयच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राच्या प्रगतीचे सादरीकरण

Ø औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणारी परिपूर्ण इको सिस्टीम उभारण्यासाठी सर्व प्रयत्न

Ø महाराष्ट्राचा 2047 पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

नवी दिल्ली / चंद्रपूरदि. 11 : पायाभूत सुविधानाविण्यपूर्णताप्रतिभास्वच्छ ऊर्जासुव्यवस्थित शहरीकरणतंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहेही क्षमता असणारा महाराष्ट्र त्यादृष्टीने  आवश्यक इकोसिस्टीम उभारत आहेजागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून  त्यासाठी सर्व आघाड्यांवर  जाणीवेने प्रयत्न  सुरू असल्याची ग्वाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

नवी दिल्ली येथील हॉटेल ताज पॅलेसमध्ये कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे (सीआयआयआजपासून आयोजित ॲन्युअल बिझनेस समिट - 2026   या दोन दिवसीय परिषदेअंतर्गत आज सकाळच्या सत्रात झालेल्या Vision For India @100 परिसंवादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.  कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे डायरेक्टर जनरल चंद्रदीप बॅनर्जी आणि अध्यक्ष राजीव मेमाणी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते

सध्याचा क्षण हा भारतासाठी बदलाची व्याख्या ठरवण्याचा आहेअसे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री म्हणालेआजचे जग एकाच वेळी अनेक स्थित्यंतरातून जात आहेयात भू-राजकीय विखंडनतांत्रिक उलथापालथऊर्जा संक्रमणपुरवठा साखळीतील बदल आणि आर्थिक विकासाच्या भविष्याबद्दलची मोठी अनिश्चितता यांचा समावेश आहेमात्रया अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारत हा एकमेव देश मोठ्या प्रमाणावर जगाचा आत्मविश्वास वाढवत आहेआमच्याकडे  स्थैर्यमहत्त्वाकांक्षालवचिकता आणि अंमलबजावणी करण्याची जबरदस्त क्षमता आहेपंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालीभारताने गेल्या दशकात स्वतःबद्दल जागतिक स्तरावर नवी प्रतिमा स्थापित केली आहे.

पंतप्रधानांच्या  द्रष्टया धोरणांची अंमलबजावणी राज्यांनाच करावी लागेलअसे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,  महाराष्ट्र या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेदशकानुदशके महाराष्ट्र हे भारताचे 'इकोनॉमिक इंजिनराहिले आहेजागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी आम्ही महाराष्ट्राला सज्ज करत आहोतआज महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहेजी भारताच्या जीडीपीमध्ये  सुमारे 15 टक्के योगदान देतेभारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहेभारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत राज्याचा वाटा 20 टक्क्यांहून अधिक असून देशाची 'डेटा सेंटरआणि 'स्टार्टअपराजधानी आहेअसे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

भविष्यातील महाराष्ट्राबाबत आमचा रोड मॅप  स्पष्ट आहे.  2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातील सर्वात महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांपैकी महाराष्ट्र राहीलअसे सांगून मुख्यमंत्री म्हणालेयावर्षी दावोसमध्ये महाराष्ट्राने जवळपास 30 लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव आणलेभविष्यातील अर्थव्यवस्था ही महामार्गबंदरेविमानतळडिजिटल नेटवर्क्ससंशोधन प्रयोगशाळास्टार्टअप इकोसिस्टम आणि विद्यापीठांवर उभी असेल आणि म्हणूनच महाराष्ट्रात अभूतपूर्व वेगाने गुंतवणूक होत आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसमृद्धी महामार्गनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळवाढवण बंदरमेट्रोचे जाळेऔद्योगिक कॉरिडॉरलॉजिस्टिक इकोसिस्टमडिजिटल पायाभूत सुविधा आदी प्रकल्प एकत्रितपणे महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल बदलवत आहेतभविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्यासाठीची क्षमता एआय,  सेमीकंडक्टर्स,  इलेक्ट्रिक वाहने , प्रगत उत्पादनेस्वच्छ ऊर्जाडेटा सेंटर्सजागतिक क्षमता केंद्रे (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स ) आणि 'डीप-टेककल्पकतेवर आधारित असेल.

आज महाराष्ट्रात भारतातील सर्वात मोठ्या जीसीसी केंद्रांपैकी 24 टक्के केंद्रे आहेतआशियातील सर्वात महत्त्वाचा 'डेटा इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉरम्हणून महाराष्ट्र उदयास येत आहे.  देशातील 60 टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेतदेशातील 20 टक्के ऑटोमोबाईल उत्पादने आणि ईव्ही उत्पादनात आम्ही आघाडीवर आहोतमहाराष्ट्रात डिझाइननवनिर्मिती आणि  जागतिक बौद्धिक संपदा निर्माण करण्याची आमची महत्वाकांक्षा आहे.

मुंबई जागतिक आर्थिक आणि नाविन्यपूर्ण राजधानी म्हणून विकसित होत राहीलपुणे उत्पादनतंत्रज्ञान आणि संशोधन केंद्र म्हणून आपली पकड मजबूत करेलनागपूर हे भारताचे लॉजिस्टिक आणि भौगोलिक-धोरणात्मक केंद्र म्हणून उदयास येत आहेछत्रपती संभाजीनगर आणि नाशिक हे आमचे नवीन युगाचे मॅन्युफॅक्चरिंग हब असतीलगडचिरोली हे 2032 पर्यंत भारताचे सर्वात मोठे 'ग्रीन स्टीलउत्पादक जिल्हा बनेलआणि आमची द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरे औद्योगिक विकासाची पुढची इंजिने ठरतीलसंतुलित प्रादेशिक विकास हा केवळ सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा नाहीतर तो आर्थिकदृष्ट्याही अत्यंत शहाणपणाचा आहेअसे मुख्यमंत्री म्हणाले.

सीआयआयचे डायरेक्टर जनरल चंद्रदीप बॅनर्जी आणि अध्यक्ष  राजीव मेमाणी  यांनी आपल्या प्रास्ताविकात मुखमंत्र्याच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरव केला.

०००००

Friday, 8 May 2026

कंपनीच्या फायद्यापेक्षा शेतक-यांचे हित महत्वाचे - पालकमंत्री डॉ. अशोक वुईके



कंपनीच्या फायद्यापेक्षा शेतक-यांचे हित महत्वाचे पालकमंत्री डॉअशोक वुईके

Ø बेलोराजेनापानवडाळा येथील पुनर्वसनभुसंपादन व इतर समस्यांबाबत आढावा

चंद्रपूरदि. 08 : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहेविविध कंपन्या येथे येऊन व्यवसाय करतातमात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी घेतातत्यांनाच वाऱ्यावर सोडत असल्याचे निदर्शनास आले आहेशेतकऱ्यांची जमीन प्रकल्पासाठी घेतली असल्यास त्यांचे योग्य पुनर्वसन आणि स्थानिकांना रोजगार देणे हे कंपनीचे कर्तव्यआहेमात्र याबाबतीत शेतकऱ्यांची लूट होत असेलतर खपवून घेतल्या जाणार नाहीअसा इशारा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी दिला.

अरबिंदो कोल माईन्समुळे प्रभावित बेलोराजेनापानवडाळा व इतर 11 गावांतील पुनर्वसनभुसंपादन तसेच नागरी समस्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आलीयावेळी ते बोलत होतेबैठकीला जिल्हाधिकारी वसूमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहवरोऱ्याचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्केउपजिल्हाधिकारी अतुल जटाळे (पुनर्वसनसंजय पवार (भुसंपादन), जिल्हा खनीकर्म अधिकारी वसीम सय्यदतहसीलदार राजेश भांडारकरवरोराचे पोलिस उपअधिक्षक संतोष बाकलअरबिंदो कंपनीचे उपाध्यक्ष संजीवा रावसहउपाध्यक्ष व्यंकट रेड्डीसहाय्यक महाव्यवस्थापक रमेश वाकडेअजय सिंग यांच्यासह गावकरी प्रवीण ठेंगणेजनाचे सरपंच प्रभा बोढालेउपसरपंच हरिश्चंद्र आसुटकरहेमेंद्र धानोरकर व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉवुईके म्हणालेगावक-यांच्या पुनर्वसनाबाबत कंपनीने कालमर्यादा ठरवून ठराविक वेळेत पुनर्वसन व इतर नागरी समस्यांची सोडवणूक करावीकंपनीने प्रकल्पासाठी काही जमीन विकत घेतली आहे व उर्वरित जमीन अद्यापही घ्यायची आहेफसवेगिरी करून व्यवसाय करत असालतर खपवून घेणार नाहीशेतकऱ्यांचे हित हे महत्त्वाचे आहेकंपनीत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजेज्यांना रोजगार दिला आहेत्यांची यादी आधारकार्ड सह जिल्हा प्रशासनाला सादर करावीशेतकऱ्यांच्या संयमालासुद्धा मर्यादा आहेत्यामुळे कंपनी शेतकऱ्यांचे नुकसान करू नयेअसे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी दिले

गावक-यांनी मांडल्या समस्या : यावेळी गावकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्यायात जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कंपनीने कोळसा उत्खनन करू नयेकंपनीने मुख्य मार्ग तोडला आहेप्रकल्पासाठी जमीन घेत असाल तर सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजेनोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे.

०००००

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करा


जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करा

Ø पालकमंत्र्यांच्या पोलीस अधिक्षकांना सूचना

चंद्रपूरदि. 08 : चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावीतसेच वाढत्या अपघाताला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस विभागाने ठोस उपाययोजना कराव्यातअशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक आयुश नोपानी यांना दिल्यायावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमनपा आयुक्त अकुनुरी नरेश आदी उपस्थित होते.

चंद्रपूरमध्ये अवैध धंदे व गुंडागर्दी खपवून घेतल्या जाणार नाहीकायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्या नागरिकांवर त्वरित पोलिस विभागाने कारवाई करावीयाबाबत कोणतीही हयगय करू नयेचंद्रपूर शहरात गत तीन-चार दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांचा बळी गेला आहेहे अतिशय दुर्दैवी आहेशहरातून जड वाहनांची अनिर्बंध पद्धतीने वाहतूक होत असल्यास तात्काळ त्यावर कारवाई करावीअशा सुचना पालकमंत्री डॉवुईके यांनी दिल्या.

००००००

महाराजस्व अभियानात जिल्हाधिका-यांकडून विविध स्टॉलची पाहणी




महाराजस्व अभियानात जिल्हाधिका-यांकडून विविध स्टॉलची पाहणी

चंद्रपूरदि. 08 : तहसील कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने शहरातील मातोश्री विद्यालय येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी विविध स्टॉलची पाहणी करून शुभारंभ केला. तसेच या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना आमदार जोरगेवार म्हणालेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीनागरिकांना शासकीय सेवा एक जागेवर मिळाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने महराजस्व अभियान सुरू केले आहेचंद्रपूर तालुक्यातील हे पाचवे शिबीर आहेयापूर्वीच्या घुग्गस व पडोली मंडळातील शिबिरात मोठ्या प्रमाणात लाभाचे वितरण करण्यात आलेतालुका महसूल प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने शिबिरे पार पाडलीयानंतर देखील चंद्रपूर नियमित शिबिरे आयोजित करावीतजेणेकरून नागरिकांना जलद सुविधा मिळतील.  

यावेळी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार राजू धांडे, ओंकार ठाकरे, मंडळ अधिकारी प्रवीण वरभे आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते लाभार्भ्यांना प्रमाणपत्र वाटप : यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध शासकीय येाजनांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत किसान लोणगाडगे, ऋषी निब्रड, वारलू सपाट, शंकर लोणगाडगे, प्रभाकर ताजणे यांना, जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत सुशीलाबाई देहाळकर, सुधाकर भोंगरे, विशाल काळे, भारत काळे, कवडू तडस यांना राशनकार्ड लाभार्थ्यांमध्ये किरण शर्मा, कविता पुंड, विद्या जगताप यांना तर सजंय गांधी योजना / इंदिरा गांधी योजना / श्रावणबाळ योजनेंतर्गत तुळशीराम रामटेके, वेदांत गवळी, रमेश गुरुनुले, स्निग्धा मंडल, जीत मल्लीक, गोविंदराव कोडापे आदींचा समावेश होता.

००००००

Thursday, 7 May 2026

समुह विकास कार्यक्रमांतर्गत भाजीपाला उत्पादनासाठी क्लस्टर निर्मिती

 

समुह विकास कार्यक्रमांतर्गत भाजीपाला उत्पादनासाठी क्लस्टर निर्मिती

चंद्रपूरदि. 07 : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फलोत्पादन मंडळामार्फत फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम 2021 पासून प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहेसन 2025 मध्ये नवीन मागदर्शक सूचनांन्वये मल्टी कमोडीटी हाय व्हॅल्यू क्लसस्टर्स आणि पेरी अर्बन भाजीपाला क्लस्टर या दोन संकल्पनांचा सभावेश नव्याने करण्यात आला आहे.

या येाजनेचा मुख्य उद्देश प्रमुख शहरांच्या जवळ मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादनासाठी क्लस्टर्स विकसित करणेभाजीपाला संकलनसाठवणूक आणि विपणन यांची व्याप्ती वाढविण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्थासहकारी संस्था आणि नव द्योजक संस्थांना प्रोत्साहन देणेदेशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी एकात्मिक पध्दतीने लॉजिस्टिक्समार्केटींग आणि ब्रॅडिंगमध्ये पूर्व-उत्पादनउत्पादन काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन याद्वारे कृषी मूल्य साखळीच्या अडचणी दूर करणे व उत्पादनाच्या कापणीनंतरचे हाताळणीमूल्यवर्धन आणि बाजार जोडणी याकरिता पायाभूत सुविधांचा विकास /विस्तारसुधारणा करणे हा आहे.

पात्र लाभार्थी : शेतकरी उत्पादक संघटना आणि त्यांच्या संस्थाकंपन्या किंवा त्यांचे संयोजन यांचा समावेश असलेल्या कायदेशीर संस्था पात्र असतील.

समाविष्ट पिके : क्लस्टरमध्ये प्रमुख फलोत्पादन पीक असणे आवश्यकया प्रमुख पिकाव्यतिरिक्तकल्स्टरमध्ये कृषी विविधता आणि उत्पादक्ता वाढविण्यासाठी अतिरीक्त फलोत्पादन पिके देखील समाविष्ट केली जाऊ शकतात.

निवडीचे निकष : क्लस्टरचा समावेश असलेली जमीन ही शक्य तितक्या प्रमाणात सलग असावीजर जमीन क्षेत्र संलग्न नसेल तर कमाल दोन ठिकाणांमधील अंतर डोंगराळ भागात असल्यास 50 किमी आणि सर्वसाधारण भागात असल्यास 80 किमी पेक्षा जास्त नसावेकिमान वार्षिक किंमत 100 कोटी असावीएकूण प्रकल्प मूल्यामध्ये शेतकरी घटक कमीत कमी 40 टक्के असावा.

पेरी-अर्बन उत्पादन : 1) शेतक-यांनी राबविण्याचे घटक-पिकाचे लागवड साहित्यशेतीचे यांत्रिकीकरणसुक्ष्म सिंचनएकात्मिक गुल्यद्रव्यकिड व्यवस्थापनआधुनिक तंत्रज्ञान इ. 2) अंमलबजावणी यंत्रणा यांनी राबविण्याचे घटकशेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना व प्रोत्साहनशेतकऱ्यांची / उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणीसुधारीत कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब आणि प्रसारशेतीचे यांत्रिकीकरणसुक्ष्म सिंचन इ.

काढणीपश्चात व्यवस्थापन आणि वितरण : संकलन व वितरण केंद्रएकात्मिक पॅक हाऊसरायपनिंग चेंबरपूर्वशीतकरण गृहशीतखोलीशीतवाहनप्रक्रिया केंद्र यांची निर्मिती व विस्तारीकरणशीतगृह उभारणीमुल्यवर्धन आणि पॅकेजींग इसदर घटक हे अंमलबजावणी यंत्रणांनी राबवयाचे आहेत.

अनिवार्य पिके : टोमॅटोकांदा आणि बटाटा याव्यतिरिक्त कोबीफ्लॉवरभेंडीवांगीशिमला मिरचीकाकडीदुधी भोपळाकोथिंबीरलिंबूआलेहिरवी मिरचीलसूण इ.

अर्ज करण्याची कार्यपद्धती : 1) प्रस्ताव सादर करण्याकरीता अंमलबजावणी यंत्रणेचे पात्रता निकष व सविस्तर मार्गदर्शक सुचना राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ यांच्या https://nhb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत्यानुषंगाने अंमलबजावणी यंत्रणेकरीता इच्छुक अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेतसंबंधित क्लस्टर संदर्भात काही अडचणी असल्यास clusters.nhb@gov.in या ई-मेलवर कळविण्यात याव्यात. 2) सदर कार्यक्रमांतर्गत अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे https://www.nhb.gov.in या वेबसाईटर अर्ज सादर करावेत.  3) अधिक माहितीसाठी सदर योजनेच्या सविस्तर मार्गदर्शक सुचना वेबसाईटवर उपलब्ध आहेतhttps://nhb.gov.in राष्ट्रीय बागवानी मंडळ यांच्या यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

००००००

कामगार अधिसूचना सहायक कामगार आयुक्त कार्यालयात प्रसिध्द


कामगार अधिसूचना सहायक कामगार आयुक्त कार्यालयात प्रसिध्द

चंद्रपूरदि07 : वेतन संहिता 2019. औद्योगिक संबंध संहिता 2020 आणि व्यावसायिक सुरक्षाआरोग्य व कामाची स्थिती संहिता 2020  बाबात अधिसूचना 28  30 एप्रिल 2026 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहेवरील तिन्ही कामगार अधिसूचना सहायक कामगार आयुक्तकार्यालय चंद्रपूर येथे उपलब्ध आहेतसेच कामगार विभागाच्या https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सबब अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून नमूद केलेला 45 दिवसांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी उक्त मसुद्याच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून प्राप्त झालेले आक्षेप व सूचना राज्य शासनाकडून विचारात घेण्यात येईलयाबाबत कोणताही आक्षेप किंवा सूचनाकामगार आयुक्तमहाराष्ट्र राज्यकामगार भवनसी 20, ई ब्लॉकवांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सवांद्रे (पूर्व), मुंबई 400051 किंवा ईमेल-mh.labourcodes.rules@gmail.com वर स्वीकारण्यात येतीलअसे सहायक कामगार आयुक्त प्रभिकावळे यांनी कळविले आहे.

००००००

8 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

 

मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

चंद्रपूरदि. 07 : जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर आणि मॉडल करिअर सेंटर या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावीया हेतूने महिन्यातील दुसऱ्या व चवथ्या शुक्रवारी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येतेया अनुषंगाने 8 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रप्रशासकीय भवन चंद्रपूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 10 वी, 12 वीआय.टी.आय., पदविकापदवी इत्यादी युवक व युवतींकरीता विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच जिल्ह्यातील उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या हेतूने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेया प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 50 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून 1) गोपानी आर्यन अॅन्ड स्टिल प्रा.लिचंद्रपूर 2) भारत पे प्रालिचंद्रपूर 3) राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेजचंद्रपूर द्वारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण उमेदवार भरावयाची असल्याचे या कार्यालयास कळविण्यात आले आहे.

तरी मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी दोन प्रतीउपस्थित राहावेअधिक माहीतीकरीता जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रदुरध्वनी क्रमांक 07172- 252295 येथे संपर्क करावाजिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये भाग घेण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्तजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपुर यांनी केले आहे.

००००००

8 मे रोजी पालकमंत्री चंद्रपुरात

 मे रोजी पालकमंत्री चंद्रपुरात

चंद्रपूरदि. 07 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके हे 8 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेतत्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 8 मे रोजी दुपारी 2 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीवदुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीस उपस्थितीसायंकाळी सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण.

०००००

Wednesday, 6 May 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत प्रवेश


 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत प्रवेश

Ø 21 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 06 : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याकरिता अनुसूचित जमातीच्या (आदिवासीप्रवेशपात्र विद्यार्थ्यांकडून इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेतएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर यांच्या  कार्यालयाकडून प्रवेशाकरीता 20 एप्रिल पासून प्रवेश अर्ज निःशुल्क वितरीत करण्यात येत असून संपूर्ण भरलेले अर्ज 21 मे 2026 पर्यंत स्वीकारले जातील.

प्रवेशासंबंधी अटी व शर्ती : 1) सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावाविद्यार्थ्याने सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावीप्रमाणपत्राची मूळ प्रत तपासणीसाठी सोबत आणावी. 2) जर विद्यार्थ्यांचे पालक दारिद्रय रेषेखालील असेल तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमीत केलेले बीपीएलप्रमाणपत्र जोडावे. 3) या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पनाची कमाल मर्यादा लक्ष रुपये इतकी असावीसंबंधित पालकाने सक्षम अधिकारी यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करावे. 4) शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे दिनांक १८ सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयाप्रमाणे असावे. 5) विद्यार्थ्यांचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसावेततसे आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईलखोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. 6) इयत्ता ली मध्ये प्रवेशित झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांचे समायोजन इतर नामांकित निवासी शाळांमध्ये करण्यात येणार नाही. 7) प्रवेश दिल्यानंतर त्याच शाळेत शिक्षण घेणे बंधनकारक राहीलकुठल्या परिस्थितीत पालकांच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. 8) कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याची वेळ आल्यास त्यांचे समायोजन एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलइंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्येच करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे : 1) विद्यार्थ्यांचा जन्मतारखेचा दाखला, 2) विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, 3) या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्रक व विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, 4) विद्यार्थ्यांचे पालक आदिम जमातीअंपगविधवाघटस्फोटितनिराधारपरित्यक्ता असल्यास अर्जासोबत तसा पुरावा जोडावा.

प्रवेश अर्ज खालील ठिकाणी निःशुल्क उपलब्ध आहेत : 1) प्रकल्प कार्यालयएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पजिल्हा स्टेडीयम मागेसिव्हिल लाईनचंद्रपुर,  2) प्रकल्प कार्यालयएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय वसतिगृहएकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलदेवाडा.

००००००