Search This Blog

Tuesday 30 June 2020

ब्रह्मपुरी शहर पुढील 3 दिवसांसाठी कडकडीत बंद

ब्रह्मपुरी शहर पुढील 3 दिवसांसाठी कडकडीत बंद
प्रशासनाला सहकार्य करा : पालकमंत्री ना.वडेट्टीवार
कोरोना प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी
फक्त हॉस्पिटलमेडिकल व सरकारी कार्यालय सुरू राहतील
चंद्रपूर दि. 30 जून : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहर व तालुक्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील तीन दिवस 1 जुलै ते 3 जुलै ब्रह्मपुरी शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांच्याच आरोग्यासाठी करण्यात आलेली ही उपाययोजना असून कोरोना कडी तोडणाऱ्या या उपाय योजनेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. तर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
ब्रम्हपुरी उपविभागीय दंडाधिकारी क्रांती डोंबे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत परवानगी मागीतली होती. ब्रह्मपुरीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच ब्रह्मपुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी कोरोना उद्रेकाला चालना मिळू नये ,यासाठी किमान तीन दिवस शहर बंद ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. जिल्हा प्रशासनाने पुढील तीन दिवसांसाठी याला परवानगी दिली आहे.
या काळामध्ये शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. उपरोक्त कालावधीत फक्त सरकारी कार्यालय,  सर्व प्रकारची रुग्णालयऔषधालयऔषधांची दुकाने सुरू राहतील. वैद्यकीय सेवेकरिता आवश्यक वाहतूक सेवे व्यतिरिक्त इतर सर्व वाहतूक सेवा बंद राहील. त्याचप्रमाणे इतर सर्व प्रकारची दुकानेआस्थापनापूर्णता बंद राहील. या कालावधीत शासकीय कर्मचारी वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आणि स्वच्छता विषयक काम करणारे कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर सामान्य जनतेला कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडण्यास मनाई असेल. त्यामुळे शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडूच नये,असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. केवळ रुग्णालय,शासकीय कार्यालय व औषधी दुकाने या काळात सुरू राहतील. अन्य कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाहीअसे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.
एकट्या ब्रह्मपुरी शहरामध्ये 11 कोरोना पॉझिटिव्ह आत्तापर्यंत आढळले आहे. तर ग्रामीण भागामध्ये 16 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यातच शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण यांच्या घरी काही दिवसापूर्वी वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. त्यामुळे शहराच्या अन्य भागातही संसर्ग झाला अथवा नाही हे तपासण्यासाठी शहर बंद ठेवणे आवश्यक असल्याचे पुढे आले आहे. त्यातूनच ब्रह्मपुरी शहर पुढील तीन दिवसांकरिता बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.


ग्रामीण भागातून नागरिकांनी येऊ नये : क्रांती डोंबे
      आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 34 ( क ) व 34 ( म) आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ( 1 ) व 144 ( 3 ) अंतर्गत ब्रह्मपुरी शहर येथील व इतर भागात कोरोना विषाणूचा संसर्ग इतर नागरिकांना होऊ नये या दृष्टीने सदर भागाच्या  संपूर्ण ब्रह्मपुरी शहर सीमा बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे उदया ब्रह्मपुरी शहरात येणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे  ब्रह्मपुरी तालुक्यातील अन्य गावातील नागरिकांनी देखील या काळामध्ये शहरात येऊ नये,  शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने,  दुकाने  व  वाहतुकीची सर्व साधने या काळात बंद असतीलअसेही स्पष्ट करण्यात आले आहे. या काळामध्ये शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नयेग्रामीण भागातून ब्रम्हपुरी शहरात कोणी येऊ नयेअसे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी क्रांती डोंबे यांनी केले आहे.
प्रशासनाला सहकार्य करा :पालकमंत्री
दरम्यान, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी 1 ते 3 जुलै या काळात ब्रह्मपुरी शहरातील संचार बंदीला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शहरांमध्ये कोरोना आजाराची लागन कुठपर्यंत झाली आहे. हे या काळामध्ये कळणार आहे. त्यामुळे स्वतःच्याकुटुंबाच्या व समाजाच्या भल्यासाठी पुढील तीन दिवस कडकडीत बंद पाळावा, असे आवाहनही ना.वडेट्टीवार यांनी केले आहे.
00000

कोविड केअर सेंटर सुविधा युक्त : जिल्हाधिकारी

कोविड केअर सेंटर सुविधा युक्त : जिल्हाधिकारी
चंद्रपूर जिल्ह्यात उपचार घेत
असलेल्या बाधितांची संख्या 41; आतापर्यतची बाधित संख्या 95
Ø  54 बाधित कोरोना मुक्त
Ø  जिल्ह्यात 83 हजारावर नागरिक दाखल
Ø  गृह अलगीकरणात 2 हजारावर नागरिक
Ø  843 नागरीक संस्थात्मक अलगीकरणात
चंद्रपूरदि.30 जून: जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर सर्व सुविधांनी युक्त आहे. तसेच या सेंटर मध्ये लागणाऱ्या आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे यासाठी कोणत्याही निधीची कमतरता राहणार नाही, अतिशय उत्तम  व्यवस्था व वैद्यकीय अधिकाऱ्यांची तैणाती या ठिकाणी आहे.कोरोना बाधित बरे होत असून नागरिकांनी घाबरून न जाता वैद्यकीय निर्देशाचे पालन करावे, कोरोना आजारातून बरे होता येते, असे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंतची बाधितांची संख्या 95 झाली आहे. 54 बाधित कोरोना मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 41 आहे. यापैकी 38 बाधित कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपुर तर तीन बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-7, बल्लारपूर दोनपोंभूर्णा दोनसिंदेवाही दोनमुल तीनब्रह्मपुरी 16, नागभीड चारवरोरा पाच बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर चारवरोरा 9, राजुरा दोनमुल एकभद्रावती चारब्रह्मपुरी-11, कोरपणानागभिडगडचांदूर प्रत्येकी एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोनबिनबा गेट एकबाबुपेठ तीनबालाजी वार्ड दोनभिवापूर वार्ड एक शास्त्रीनगर  एकसुमित्रानगर चारस्नेह नगर एकलुंबीनी नगर 4, जोडदेउळ एक बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 95 वर गेली आहे.
जिल्ह्यातील कोविड-19ची सर्वसाधारण माहिती:
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 4 हजार 574 स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 95 नमुने पॉझिटिव्ह, 4 हजार 104 नमुने निगेटिव्ह, 342 नमुने प्रतीक्षेत तर 33 नमुने अनिर्नयीत  आहेत.
जिल्ह्यातील अलगीकरणा विषयक माहिती:
जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 843 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 239 नागरिक,तालुकास्तरावर 239 नागरिक तरजिल्हास्तरावर 358 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 83 हजार 646 नागरिक दाखल झाले आहेत. 80 हजार 790 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 2 हजार 856 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित) आणि 29 जून (एकूण 8 बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 95 झाले आहेत. आतापर्यत 54 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे  95 पैकी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या  बाधितांची संख्या आता 41 आहे.
00000

चंद्रपूर जिल्ह्यात 31 जुलै पर्यंत जमावबंदी कायम


चंद्रपूर जिल्ह्यात 31 जुलै पर्यंत जमावबंदी कायम
कोरोनावर मात करण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन
चंद्रपूरदि. 30 जून: जिल्ह्यामध्ये  लॉकडाऊनच्या काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज आदेश काढले आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी संपूर्ण जिल्ह्यात  कलम 144 लागू असणार आहे. त्यामूळे 5 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यास मज्जाव आहे.कोरोना आजारात सातत्याने वाढ होत असून 95 पर्यंत कोरोना रूग्ण झाले आहेत.त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.
सार्वजनिक स्थळी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होऊ नये. परंतु तिथे पाचपेक्षा कमी व्यक्ती एकत्र येत असेल त्यावेळी त्यांचे कमीत कमी 6 फूट सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील.सार्वजनिक ठिकाणीस्थळी पान,तंबाखू,धूम्रपान करणे इत्यादी प्रतिबंध राहील.
धार्मिक स्वरूपाचे समुपदेशन धर्मपरिषद धार्मिक गर्दीचे आयोजन करू नये.कोरोना विषाणूच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजात जनमानसात अफवा अपप्रचार व भीती व्हाट्सअप फेसबूक,ट्विटरवृत्तपत्रसोशल मीडिया व होर्डिंग इत्यादी वर प्रसारित करू नये तसेच अधिकृत माध्यमाद्वारे माहिती न घेता दिशाभूल करणारी माहिती प्रसारमाध्यमांवर प्रसारित करू नये.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने घोषित करण्यात आलेल्या क्वारटाईन स्थळांच्या 100 मीटर परिसरातर्गत एकत्रित येण्यास व हालचाल करण्यास निर्बंध घालण्यात येत आहे.
खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे मिरवणूक,रॅलीसामूहिक कार्यक्रम ,समारंभसांस्कृतिक कार्यक्रमसण-उत्सव ,उरूस ,जत्रामनोरंजनाचे कार्यक्रमक्रीडा व इतर सर्व स्पर्धाआंदोलने इ.यांना मनाई राहील.
खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्येकार्यशाळा ,प्रशिक्षण वर्ग,देशांतर्गत व परदेशी सहल यांचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील.शॉपिंग कॉम्प्लेक्समॉलसुपरमार्केटमनोरंजनाची ठिकाणेक्लब,पबक्रीडांगणेमैदाने,जलतरणतलावउद्यानेसिनेमागृहेनाट्यगृहेशाळामहाविद्यालयेखाजगी शिकवणी वर्गव्यायामशाळा ,संग्रहालये ,गुटखा तंबाखूपान विक्री इत्यादी बंद राहील.
निवासाची सोय असलेले सर्व हॉटेल,लॉज,खाजगी विश्रामगृह बंद राहतील.सामाजिक अंतर ठेवून दैनंदिन बाजार भरवता येईल परंतु आठवडी बाजार भरविता येणार नाही.
प्रवास :
आंतरराज्यीय व आंतरजिल्हा विनापरवाना प्रवासी वाहतुकीकरिता बंद असेल.परराज्यात,राज्यातर्गत( चंद्रपूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात) प्रवासाकरिता http://covid19.mhpolice.in यावर ऑनलाईन अर्ज करावा.
चंद्रपूर जिल्हा बाहेरून सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना आरोग्य विभाग यांचेकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार 14 दिवस होम क्वारन्टाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल होम क्वारन्टाईन किंवा संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेली व्यक्ती इतरत्र फिरताना आढळल्यास रुपये 2 हजार दंड व मास्कचा वापर न केल्यास रुपये 200 इतका दंड आकारण्यात येईल व संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता चे कलम 188, 269,270 ,271 नुसार कार्यवाही करण्यात येईल.
65 वर्षावरील व्यक्तीदुर्धर आजाराने ग्रस्त असलेले (कोमोरबेडिटीस) व्यक्ती व 10 वर्षाचे आतील बालके गर्भवती महिला यांनी अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी व वैद्यकीय उद्देशा शिवाय घराबाहेर निघू नयेत.अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी/ अधिकारी व संबंधित व्यक्ती यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तींच्या हालचालीस रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत प्रतिबंध राहील.
जीवनावश्यक असलेल्या पुढील बाबी कार्यरत राहतील:
अत्यावश्यक किराणा सामानदुग्ध,दुग्धोत्पादनेफळे व भाजीपालापार्सल स्वरूपात काउंटर तसेच इतर मार्गांनी विक्री,वितरण व वाहतूक करण्यास परवानगी राहील.
जीवनावश्यक खाद्यपदार्थ किराणादूधदुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतूकब्रेडफळेभाजीपालाअंडीमांस मासे बेकरीपशुखाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 9 ते सायंकाळी पाच  वाजेपर्यंत सुरू राहील. परंतु,  दुकान आस्थापना यामध्ये एकाच वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक उपस्थित राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे दुकानआस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.
खाद्य पदार्थकिराणादूधब्रेडफळेभाजीपालाअंडीमांस ,मासे यांची वाहतुक व साठवण.अत्यावश्यक वस्तूंची पुरवठासाखळी आणि वाहतूक. पार्सल स्वरूपात सुविधा उपलब्ध करून देण्याचे अटीवर उपहारगृहेखाद्यगृहे घरगुती खानावळ स्वीट मार्केटफरसाण सेंटर व चहा नाष्टा सेंटर सुरू राहतील तथापि प्रत्यक्ष दुकानात ग्राहकांसाठी बैठक व्यवस्थेस मनाई असेल.
पावसाळी ऋतू संबंधित साहित्य जसे छत्रीरेनकोटप्लॅस्टिक शीटकव्हर यांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात येत आहे.त्यामुळे सदर साहित्याची विक्री व वितरणाबाबत वेळ सकाळी 9 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहील.
प्रसारमाध्यमांचे सर्व प्रकारचे दैनिकनियतकालिकेटीव्ही न्यूज चैनल इ.कार्यालय.किमान मनुष्यबळाचा सह बँक एटीएमकॅश लॉजिस्टिक आणि  कॅश ट्रांजेक्शन व अन्य संबंधित सेवा,मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमेरुग्णालयेऔषधालयचष्म्याची दुकानेऔषधांची दुकानेऔषधांचे कारखानेविक्रेते आणि वाहतूकपेट्रोल पंपएलपीजी गॅसऑइल एजन्सी यांचे वितरणविक्रीसाठवणूक आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक सुरू राहतील.
शेतीविषयक उत्पादन/ सुविधा /आस्थापना संबंधाने पुढील बाकी कार्यरत राहतील:
सर्व प्रकारचे शीतगृहे,वखार ,गोदामा संबंधित सेवा,घाऊक वितरणासाठी आणि सदर बाबींशी संबंधित पुरवठा साखळी,कृषी उत्पादन व किमान आधारभूत किंमत यांच्याशी संबंधित कार्य करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य शासनातर्फे अधिकृत असलेले मंडीबाजार विशेषतः कापूसतुर व धान खरेदी,विक्री आस्थापना,दुकाने सुरू राहतील.
शेतकरी व शेतमजूर यांचेकडून करण्यात येणारी शेतीविषयक कामे मासेमारी व मत्स्य व्यवसाय संबंधित सर्व कामे व शेती विषयक अवजारे,यंत्र विक्री व दुरुस्ती संबंधित मान्यताप्राप्त दुकाने,आस्थापना (किमान मनुष्यबळासह),शेती संबंधित यंत्रे,अवजारे चालविण्यासाठी आवश्यक असणारा मजूरवर्ग,केंद्र,शेतमाल आणि अन्य वस्तूंची आयात निर्यात आणि वाहतूकराज्यांतर्गत व आंतरराज्य कृषी फलोत्पादन संबंधित अवजारेयंत्रे जसे पेरणी,कापणी यांची वाहतूक.खते कीटकनाशके व बियाणे यांच्याशी निगडित उत्पादन व पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग/ आस्थापना /दुकाने संपूर्ण जिल्ह्याकरिता सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहतील.


लग्न समारंभाकरिता पुढीलप्रमाणे परवानगी राहतील:
लग्न समारंभ (50 लोकांच्या उपस्थितीत) सामाजिक अंतर राखून करण्यास परवानगी असेल. परंतुसदर परवानगीही उपविभागीय अधिकारी/ तहसिलदार यांचेकडून प्राप्त करणे बंधनकारक राहील. विवाह करिता 50 लोकांच्या कमाल मर्यादित उपस्थितीत ज्यामध्ये प्रत्येकी पाच व्यक्तींचे बँड पथक सुगम संगीत कलावंत यांची उपस्थिती ठेवून खुले लॉनविना वातानुकूलित मंगल कार्यालयहॉलसभागृहघर व घराच्या परिसरात पार पाडण्यास परवानगी असणार आहे.
तसेच,अंत्यविधीकरिता सामाजिक अंतर राखून 50 लोकांचे उपस्थितीस परवानगी राहील.
प्रवास व प्रवासी वाहतूकी संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:
जिल्हांतर्गत प्रवासाकरिता बस सेवा व 50 टक्के प्रवासी क्षमतेचा सामाजिक अंतर राखून निर्जंतुकीकरण उपाय राबवून सुरू राहतील.
जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यास (दुचाकी,चारचाकी वाहनाने) नागरिकांस कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही. परंतुचारचाकी वाहनाच्या बाबतीत वाहन चालकासह केवळ दोन प्रवासी वैद्य राहील आणि वाहनांमध्ये सॅनीटायजर ठेवून प्रवास करणाऱ्या व्यक्तीस मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच दुचाकी करिता केवळ दुचाकीचालक यांनाच वाहन चालविण्यास परवानगी असणार आहे. महानगरपालिकानगरपालिकानगरपंचायत क्षेत्राकरिता प्रवासी वाहतूक करिता रिक्षा,ऑटोरिक्षा चालक व दोन प्रवाशांसह रिक्षा ऑटोरिक्षाची वाहतूक सुरू राहील.
परंतु रिक्षाऑटोरिक्षा मध्ये सॅनीटायजर ठेवणे व मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल सदर वाहतूक ही ग्रामीण क्षेत्राकरिता लागू राहणार नाही.दुचाकीचारचाकीरिक्षाऑटोरिक्षा याद्वारे सायंकाळी 9 ते सकाळी 5 या कालावधीत प्रवास करता येणार नाही.
शासकीय व खाजगी कार्यालय संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:
जिल्ह्यातील सर्व शासकीयनिमशासकीय महामंडळ कार्यालय शंभर टक्के कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती सुरू राहतील.
शैक्षणिक संस्था,शाळा,कॉलेजमधील कार्यालयकर्मचारी यांची अध्यापना व्यतिरिक्त कामाकरिता जसे  ई-लर्निंग कन्टेन्टउत्तरपत्रिकांची तपासणी,निकालपत्र संबंधित कार्यवाही करण्याकरिता उपस्थितीस परवानगी  असणार आहे.
उद्योग संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील:
सर्व प्रकारचे शहरी व ग्रामीण भागातील औद्योगिक आस्थापना,वसाहतीयुनिट सुरू राहतील.परंतु कोविड-19 संबंधाने राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
बांधकाम संबंधी पुढील बाबी कार्यरत राहतील:
शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारची बांधकामे सुरू राहतील.परंतु बांधकाम स्थळी कामगार उपस्थित राहील व कोणत्याही कामगारांस बाहेरून आणण्यास परवानगी नसेल परंतु कोविड-19 संबंधाने राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
सलून,स्पा,बार्बर शॉपब्युटी पार्लरकेस कर्तनालय सुरु राहतील:
सलून,स्पाकेस कर्तनालय या आस्थापना सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील. यामध्ये केवळ हेअरकटडाईंग हेअरथ्रेडींग करण्यास परवानगी असेल विशेषता त्वचेसंबंधी कोणत्याही बाबीस परवानगी असणार नाही. यासंबंधी पत्रक दुकानाचे दर्शनी भागावर प्रसिद्ध करावेत.
सदरील आदेशांचे पालन न करणारेउल्लंघन करणारी कोणतीही व्यक्तीसंस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, 269, 270,271 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल सदरचा आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक जूलै ते 31 जूलै या कालावधीत करीता लागू राहील तसेच प्रतिबंधित क्षेत्राकरिता (कंटेनमेंट झोन) लागू राहणार नाही.                    
00000

वरोरा व मुल येथील उपजिल्हा रूग्णालयाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

वरोरा व मुल येथील उपजिल्हा रूग्णालयाला
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
चंद्रपूर,दि. 30 जून: लक्ष (लेबर रुम कॉलिटी इम्प्रोवमेंट इनिशिएटीव्ह) कार्यक्रम हा केंद्र शासनाचा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्रालय यांचे मार्फत संस्थेमधील प्रसुतीगृह तसेच शस्त्रक्रियागृह यांचा दर्जा उंचविण्याचा दृष्टीने आयपीएचएस (इंडियन पब्लिक हेल्थ स्टॅंडर्ड) व एनक्यूएएस (नॅशनल कॉलिटी एशुरन्स स्टॅंडर्ड) मानांकनानुसार मे-2018 मध्ये सुरु करण्यात आले. लक्ष (लेबर रुम कॉलिटी इम्प्रोवमेंट इनिशिएटीव्ह) कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय वरोरा व मुल या संस्थेस राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
लक्ष (लेबर रुम कॉलिटी इम्प्रोवमेंट इनिशिएटीव्ह) या कार्यक्रमाचा मुळ उद्देश गर्भवती महिलांना सन्मानपुर्वक वागणुक देणे तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन प्रसुती सुरक्षितपणे करणे तसेच मातामृत्यु व बालमृत्युचे प्रमाण कमी करणे होय.
त्याअनुषंगाने सदर कार्यक्रमातर्गत संस्थास्तरावर प्रसुती कक्ष व शस्त्रक्रिया गृह करीता क्वॉलिटी सर्कल स्थापन करण्यात आले असून यामध्ये वैद्यकिय अधिक्षकस्त्रिरोगतज्ञबालरोगतज्ञभुलतज्ञअधिपरिसेविका व परिसेविका यांचा समावेश करण्यात आला होता. क्वॉलिटी सर्कल यांचेमार्फत संस्थास्तरीय मुल्यमापन करून आरोग्य संस्थेतील त्रुटी काढण्यात आले. सदर त्रुटींची पुर्तता केल्यानंतर जिल्हास्तरीय कोचिंग चमुमार्फत मुल्यमापन करण्यात आले. सदर मूल्यमापन अहवालानुसार, 70 टक्के पेक्षा  जास्त गुण प्राप्त आरोग्यसंस्थांना राज्यस्तरीय मानांकनाकरीता पाठविण्यात आले.
राज्यस्तरीय मानांकनाकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयमुल व उपजिल्हा रुग्णालयवरोरा या आरोग्यसंस्थाची निवड करण्यात आली. तद्नंतर सदर संस्थेची मानांकनानुसार पडताळणी करणेकरीता केंद्रशासनामार्फत दोन सदस्यीय चमू पाठविण्यात आले. सदर चमुमार्फत उपजिल्हा रुग्णालयवरोरा येथे योग्य ती उपाययोजना व सुधारणा केल्याने तसेच मातामृत्यु दर शून्यावर आणल्याने तेथील प्रसुतीगृहाला व शस्त्रक्रियागृहाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले बाबत केंद्रशासनाकडून 2 मार्च 2020 रोजी पत्राद्वारे जिल्हास्तरावर व संस्थास्तरावर कळविण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयमुल व उपजिल्हा रुग्णालयवरोरा या संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने रु.2 लक्ष प्रति वर्ष असे सलग 3 वर्ष प्रसुतीगृह व शस्त्रक्रियागृह असे प्रति विभाग केंद्रशासनामार्फत निधी प्राप्त होणार आहे. उपरोक्त संस्थांना राष्ट्रीय मानांकन मिळणेकरीता उपजिल्हा रुग्णालयमुल व उपजिल्हा रुग्णालयवरोरा येथील वैद्यकिय अधिक्षकपरीसेविका प्रसुतीगृह तसेच शस्त्रक्रियागृह येथे अधिकृत अधिपरीचारीका व वर्ग 4 चे कर्मचारी यांनी संस्थेकरिता केलेले प्रयत्न तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी सदर संस्थेला भेटी देऊन केलेले मार्गदर्शन व पाठपुरावा या सर्व बाबींमुळे सदर संस्थेला मानांकन मिळणे शक्य झाले.
राष्ट्रीय पुरस्कार मिळणेकरीता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे विशेष सहकार्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड,  लक्ष कार्यक्रम अधिकारी डॉ. बंडू रामटेकेस्त्रीरोगतज्ञ डॉ. दिप्ती श्रीरामेजिल्हा गुणवत्ता नियमन समन्वयक डॉ. पराग जिवतोडेआयपीएचएस समन्वयक डॉ. यशश्री मुसळे, संस्थास्तरावरील वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय वरोरा डॉ. गोवर्धन दूधेउपजिल्हा रुग्णालय मुल डॉ. सुर्यकांत बाबर तसेच उपजिल्हा रुग्णालय वरोरा व मुल येथील अधिकारीकर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
लक्ष (लेबर रुम कॉलिटी इम्प्रोवमेंट इनिशिएटीव्ह) कार्यक्रमामुळे सामान्य जनतेला शासकिय रुग्णालयात होणारे फायदे:
शासकिय रुग्णालयाची प्रतिमा उच्च दर्जाची होईल. प्रसुती दरम्यान गर्भवती महिलेला तिच्या इच्छेनुसार प्रसुती करता येईल व याकरीता गर्भवती महिलेला सन्मानपुर्वक वागणुक दिली जाईल. यामुळे शासकिय रुग्णालयात प्रसुतीच्या संख्येमध्ये वाढ होईल.
गुणवत्तापुर्वक सुविधा दिल्याने मातामृत्यु व बालमृत्युचे प्रमाण कमी होईल. गुंतागुंतीच्या वेळेस वेळीच धोका ओळखुन रुग्णांना मोफत संदर्भ सेवा देण्यात येईल. प्रसुतीदरम्यान प्रसंगानुसार शस्त्रक्रिया करण्यात येईल. खाजगी संस्थेपेक्षा उच्च दर्जाच्या सेवा शासकिय संस्थेत मोफत घेता येईल.
00000    


प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा
शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि.30 जून: राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2020 व रबी 2020- 21 हंगामापासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
नैसर्गिक आपत्तीकीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणेपिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणेशेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणेकृषी क्षेत्रासाठीचा पतपुरवठा यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमी पासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मक वाढ ही हेतू साध्य होण्यास मदत होईल हे या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के रबी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला.
पीक पेरणीपासून काढणीपर्यंत या कालावधीत नैसर्गिक आगवीज कोसळणेगारपीटवादळ,चक्रीवादळपूरक्षेत्र जलमय होणेभूस्खलनदुष्काळ,पावसातील खंडकीड व रोग इत्यादी बाबी मुळे उत्पन्नात येणारी घट,स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान ,नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्‍चात नुकसान या प्रमुख बाबींचा मोबदला देण्याचा योजनेअंतर्गत करण्यात आला आहे.
योजनेत समाविष्ट पिके:
तृणधान्य व कडधान्य पिके यामध्ये खरीप हंगामात घेतले जाणारे भात (धान),खरीप ज्वारी,बाजरीनाचणी(रागी)मूगउडीदतूरमका या  8 पिकांचा समावेश होतो. तर रबी हंगामात घेतले जाणारे गहू (बागायत), रबी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात या पिकांचा समावेश होतो.
गळीत धान्य पिके यामध्ये खरीप हंगामात घेतले जाणारे भुईमूग,कारळे,तीळसूर्यफूलसोयाबीन या पाच पिकांचा समावेश होतो.तर रबी हंगामात घेण्यात येणारे उन्हाळी भुईमूग या पिकाचा समावेश होतो.
नगदी पिकांमध्ये खरीप हंगामात घेतले जाणारे कापूसखरीप कांदा तर रबी हंगामात घेतला जाणारा कांदा या पिकाचा समावेश होतो.
लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे:
अर्जदाराने अर्जासोबत आधार कार्ड किंवा आधार नोंदणीची प्रत,सातबारा उताराभाडेपट्टा करार असलेल्या शेतकर्‍यांचा करारनामासहमतीपत्रपेरणी घोषणापत्र आणि बँक पासबुकची प्रत सादर करून प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे. राष्ट्रीय पिक विमा योजना पोर्टलला महाभुलेख संकेतस्थळांचे एकत्रिकरण कार्यान्वित झाल्यावर  संबंधित शेतकऱ्यांच्या जमीन धारणेची पडताळणी होणार असल्याने पुन्हा अर्जासोबत सातबारा उतारा अपलोड करण्याची आवश्यकता राहणार नाही.आपले सरकार सेवा केंद्राद्वारे नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रस्तावासोबत  मोबाईल क्रमांक नमूद करून आधार क्रमांकाची स्वयंसाक्षांकन करणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी व माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारीजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीतालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
00000