Search This Blog

Monday, 16 March 2026

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार

मुंबईचंद्रपूरदि. 16 : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षमतंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहेकृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आधारित आधुनिक उपाययोजनांचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य शासन आणि वाधवानी एआय (LEHS AI Unit) या सामाजिक हेतूने कार्य करणाऱ्या ना-नफा-ना-तोटा संस्थेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससार्वजनिक आरोग्य  कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या या सामंजस्य कराराअंतर्गत क्षयरोग (TB), मातृनवजात  बाल आरोग्य (MNCH), प्राथमिक आरोग्य सेवा-हेल्थ आदी क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा समावेश करून आरोग्य सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यात येणार आहेराज्यातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदारवेळेवर आणि प्रभावी आरोग्य सेवा पोहोचवणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.

डिजिटल महाराष्ट्र आता पुढील टप्प्यात प्रवेश करत असून कृत्रिम बुद्धिमत्ता सार्वजनिक आरोग्यासाठी ‘फोर्स मल्टिप्लायर’ ठरणार आहेवाधवानी एआयच्या सहकार्याने एआय सक्षम आरोग्य व्यवस्था उभारणार असल्याचे श्री फडणवीस म्हणाले.

सार्वजनिक आरोग्य  कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले कीक्षयरोगप्राथमिक आरोग्य सेवा आणि मातृ-बाल आरोग्यासाठी एआय साधनांचा वापर केल्यास लवकर निदानसुलभ सेवा आणि अग्रिम कर्मचाऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळेलही भागीदारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम  सक्षम बनवेल. 

वाधवानी एआयचे प्रमुख शेखर शिव सुब्रमणियन यांनीही या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले कीमहाराष्ट्र शासनाबरोबरची ही भागीदारी नवोन्मेषसमता आणि दीर्घकालीन परिणाम साधणाऱ्या आरोग्य सुधारणांसाठी महत्त्वाची ठरेल.

या सामंजस्य करारामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.

क्षयरोग निर्मूलनासाठी एआयचा प्रभावी वापर : या उपक्रमांतर्गत क्षयरोग रुग्णांमध्ये उपचार सोडून देण्याचा धोकाउपचारातील अडथळे  मृत्यूची शक्यता उपचाराच्या सुरुवातीलाच ओळखण्यासाठी एआय आधारित प्रणाली वापरण्यात येणार आहेत्यामुळे उच्च जोखमीच्या रुग्णांवर वेळेत लक्ष देऊन योग्य उपचार करता येणार आहेत.

‘Cough Against TB’ या एआय आधारित ॅप्लिकेशनच्या माध्यमातून खोकल्याच्या आवाजाचे विश्लेषण करून क्षयरोगाची प्राथमिक ओळख आरोग्य संस्थांमध्ये जलदगतीने करता येणार आहे.

याशिवायउपगाव पातळीवर (500 मी. × 500 मी.) क्षयरोगाचा धोका दर्शविणारे व्हल्नरेबिलिटी मॅपिंग तयार करण्यात येणार असूनलोकसंख्या घनताआरोग्य सुविधाप्रदूषणकुपोषण यांसारख्या घटकांचा अभ्यास करून सक्रिय रुग्ण शोध (ACF) मोहिमा अधिक परिणामकारक रितीने राबविता येणार आहेत.

-हेल्थ  प्राथमिक आरोग्य सेवांना गती : राज्याच्या -संजीवनी टेलिमेडिसीन सेवेमध्ये एआय आधारित Clinical Decision Support System (CDSS) समाविष्ट करण्यात येणार आहेयामुळे डॉक्टरांना अचूक निदान  रुग्णांच्या तक्रारींचा संक्षिप्त आढावा घेणे सुलभ होणार आहेमधुमेही रुग्णांसाठी ‘मधुनेत्रा’ या एआय प्रणालीद्वारे डोळ्यांच्या तपासणीस मदत होणार असून आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे रुग्णांना संदर्भित करता येणार आहे.

हेल्थ वाणी’ या एआय आधारित संवाद सहाय्यकाच्या माध्यमातून आशाएएनएम यांसारख्या अग्रिम आरोग्य कर्मचाऱ्यांना मोबाईलवरच प्रशिक्षणमार्गदर्शन  प्रमाणित माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

मातृ  बाल आरोग्यासाठी अभिनव तंत्रज्ञान. ‘शिशु मापन’ या एआय आधारित ॅप्लिकेशनमुळे केवळ स्मार्टफोन  साध्या मोजमापाच्या साधनांच्या सहाय्याने नवजात शिशूचे वजनलांबीडोके  छातीचा घेर मोजणे शक्य होणार आहेघरभेटीद्वारे 42 दिवसांपर्यंत नवजात शिशूंची काळजी अधिक प्रभावीपणे घेता येणार आहे.

नेतृत्वाचे मत

समावेशक  तंत्रज्ञानाधारित आरोग्य महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल : सध्या देशभरात वाधवानी एआयच्या उपाययोजनांद्वारे 15 कोटीहून अधिक लोकांपर्यंत सेवा पोहोचत असूनआरोग्यशेती  शिक्षण क्षेत्रात सामाजिक परिवर्तन घडविण्यात संस्थेचा मोलाचा वाटा आहेया सामंजस्य करारामुळे  राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अधिक सक्षमसमावेशक आणि लोककल्याणकारी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

०००००००

No comments:

Post a Comment