Search This Blog

Monday 28 October 2024

जिल्ह्यात सोमवारी 57 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

 

जिल्ह्यात सोमवारी 57 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

चंद्रपूर, दि. 28 :  महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक  निवडणुकीसाठी सोमवारी (दि.28) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 57 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.

70- राजुरा विधानसभा मतदारसंघात प्रिया बंडू खाडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), निनाद चंद्रप्रकाश बोरकर (अपक्ष), सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस), संजय यादवराव धोटे (भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष), चित्रलेखा कालिदास धंदरे (अपक्ष), सुदर्शन भगवान निमकर (भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष), देवराव विठोबा भोंगळे  (भारतीय जनता पार्टी), सचिन बापूराव भोयर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), गजानन गोदरू पाटील जुमनाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी),  प्रवीण रामराव कुमरे (बहुजन मुक्ती पार्टी) आणि वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले.

71 - चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सुरेश मल्हारी पाईकराव (अपक्ष), राजेश भीमराव घुटके (अपक्ष), जोरगेवार किशोर गजानन (भारतीय जनता पार्टी), प्रियदर्शन अजय इंगळे (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व अपक्ष), प्रवीण नानाजी पडवेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मिलिंद प्रल्हाद दहिवले (केंद्रीय मानवाधिकार संगठन व  अपक्ष), ज्ञानेश्वर एकनाथ नगराळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-अ), भानेश राजम मातंगी (अपक्ष) आणि                     भुवनेश्वर पद्माकर निमगडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.

72- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात किशोर बंडू उईके (अपक्ष), संजय नीलकंठ गावंडे  (अपक्ष), रामराव ओंकार चव्हाण (अपक्ष), निशा शीतलकुमार धोंगडे (अपक्ष), राजू देवीदास जांभुळे (अपक्ष), सतीश मुरलीधर मालेकर (वंचित बहुजन आघाडी), कुणाल पुरुषोत्तम गायकवाड (अपक्ष), सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार (भरतीय जनता पार्टी), अरुण देवीदास कांबळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिर्फॉमिस्ट) आणि अभिलाषा राकेश गावतुरे (अपक्ष) यांचा समावेश आहे.

73 - ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात विनोद अंबादास नवघडे (अपक्ष), कृष्णा सहारे (भारतीय जनता पार्टी), वसंत वर्जूर्कर (अपक्ष), अनंता भोयर (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक).

74 - चिमूर विधानसभा मतदारसंघात अरविंद आत्माराम चांदेकर (वंचित बहुजन आघाडी), अनिल अंबादास घोंगळे (अपक्ष), सतीश वारजुकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), हेमंत गजानन दांडेकर (अपक्ष), धनंजय मुंगले (अपक्ष), कैलास श्रीहरी बोरकर (अपक्ष), प्रकाश नान्हे (अपक्ष), डॉ. हेमंत सुखदेव उरकुडे (अपक्ष).

75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), विनोद कवडूजी खोब्रागडे (अपक्ष), अमोल दिलीप बावणे (अपक्ष), राजू मारोती गायकवाड. (अपक्ष), जयवंत नथ्थुजी  काकडे (अपक्ष), जयंत मोरेश्वर टेमुर्डे (अपक्ष), अहेतेशाम सदाकत अली (प्रहार जनशक्ती), श्रीकृष्ण धुमदेव दडमल (अपक्ष), रंजना मनोहर पारशिवे (अपक्ष), करण संजय देवतळे (भारतीय जनता पार्टी), मुकेश मनोज जिवतोडे (शिवसेना उबाठा आणि अपक्ष), चेतन गजानन खुटेमाटे (अपक्ष), महेश पंढरीनाथ ठेंगणे (अपक्ष), मुनेश्वर बापूराव बदखल (अपक्ष), रमेश महादेवराव राजुरकर (भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष) यांनी नामांकन दाखल केले.

 महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे.  उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे.

००००००

Sunday 27 October 2024

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या 29 तक्रारी प्राप्त

 

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या 29 तक्रारी प्राप्त

Ø 100 मिनीटांच्या आत तक्रारींची सोडवणूक

चंद्रपूरदि. 27 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी - व्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या 100 मिनिटांत कार्यवाही केली जाते. चंद्रपूर जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत एकूण 29 तक्रारी सी-व्हिजील ॲपवर प्राप्त झाल्या. त्यापैकी 16 तक्रारींमध्ये तथ्य नसल्याने निवडणूक निर्णय अधिका-यांनी त्या रद्द केल्या तर उर्वरीत दाखल 13 तक्रारींची सोडवणूक करण्यात आली आहे.

सी-व्हिजीलवर प्राप्त तक्रारी : चंद्रपूर जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 16 तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले नाही. यात ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघातील 1 तक्रार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील 2 आणि चिमूर मतदारसंघातील 13 तक्रारींचा समावेश आहे. तर तथ्य असलेल्या व सोडवणूक केलेल्या 13 तक्रारींमध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील 2 तक्रारी, चिमूर येथील 6 आणि वरोरा विधानसभा क्षेत्रातील 5 तक्रारींचा समावेश आहे.

       काय आहे सी- व्हिजील ॲप : सी - व्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आय.ओ.एस. डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करण्यासाठीवापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणेउल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशीलस्थानवेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

वैशिष्ट्य : सी- व्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

वापर कसा करायचा : एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे. त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांकपत्तामतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळवेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

अचूक कृती व देखरेख : या ॲप्लिकेशनचा वापर करूननिवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्षनिवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृतीदेखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

लाईव्ह फोटोव्हिडिओ : या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटोव्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथकस्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

तातडीने होते कारवाई : या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

डाटा सुरक्षा : या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड ठेवला जातो.

०००००००


Saturday 26 October 2024

सोयाबीन पिकाची कापणी व मळणी करतांना योग्य व्यवस्थापन करा


 सोयाबीन पिकाची  कापणी व मळणी करतांना योग्य व्यवस्थापन करा

Ø कृषी विभागाचे शेतक-यांना आवाहन

चंद्रपूरदि. 26 : सोयाबीन पिकाची काढणी व मळणीची कामे जवळपास 80 ते 85 टक्के पूर्ण झाली असून बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस सुरुवात केली आहे. सोयाबीनचे बहुतेक वाण आता शेंगा फुटण्यास प्रतिरोधक असले तरीकाही जातींमध्ये शेंगा फुटण्याचे नुकसान वाढले आहे. कापणी नंतरचे व्यवस्थापन म्हणजे शेल्फ लाइफताजेपणा आणि आकर्षक स्वरुप वाढविण्यासाठी कापणीनंतर कृषी उत्पादनांची हाताळणीकापणीमळणीपॅकेजिंगसाठवण आणि वाहतूक इ. दरम्यान कापणीनंतरच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे सुमारे 9 ते 10 टक्के धान्य वाया जाते. कापणीनंतरचे योग्य वैज्ञानिक व्यवस्थापन हे नुकसान कमी करु शकते. कापणीनंरतरच्या व्यवस्थापनाप्रमाणेच योग्य कापणीच्या साधनांचा वापर आणि योग्य कापणीपूर्व उपायोजनांमुळे धान्याची साठवणूक  आयुष्य सुधारते आणि कापणीनंतरचे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी करता येते.             

शेतकऱ्यांनी सद्याच्या परिस्थितीत सोयाबीन पिकाची  कापणी व मळणी करतांना खालीलप्रमाणे  निर्देशांचा अवलंब केल्यास धान्याची प्रत चांगली राहून योग्य बाजारभाव मिळू शकतो. 

1. कापणी झालेल्या परंतु पावसाच्या हवामानामूळे मळणी न झालेल्या सोयाबीनचे एकत्र ढीग किंवा गंजी करून ठेवण्यात आलेल्या सोयाबीनची मळणी करतांना सर्वप्रथम गंजी मोकळी करा. तसेच गंजी कोरडया जागेवर सुकवणीस पसरावे व काडाची उलथापलट करत राहावी. काड व दान्यातील आर्द्रता कमी झाल्याची खात्री करुनच मळणीबाबत निर्णय घ्यावा. 2. ज्या ठिकाणी सोयाबीनची कापणी झालेली नाही अशा ठिकाणी कापणी करतांना स्वच्छ हवामान पाहून 90 टक्के शेंगा वाळल्यानंतर बियाण्यातील ओलावा 17 ते 20 टक्के असताना पिकांच्या कापणीला सुरवात करावी. 3. पेरणी केलेल्या आणि उशिरा पक्व होणाऱ्या वाणांसाठी देखील शेंगांचा रंगात बदलानुसार पिकाची कापणी करावी. 4. शेंगा पिवळया असताना कापणी केलेले उत्पादन ताबडतोब उन्हात वाळवावे व त्याची मळणी करावी. 5. परिपक्वतेच्या वेळी पावसामुळे शेंगा दाणे फुटल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि दर्जेदार मळणीसाठी कापणी केलेले पीक योग्य प्रकारे वाळवावे.

6. कापणी करतांना झाड उपटून येणार नाही याची काळजी घ्यावी. झाड उपटून आलेच तर मुळांना लागलेली माती झटकून घ्यावीमाती मुळांना लागून मळणी करताना मिसळली जाते आणि गुणवत्ता ढासळते. 7.              वेळेवर कापणी केल्यास मळणीमध्ये बियांचे नुकसान होत नाही. पिकाची काढणी करताना धारदार विळा किंवा  कोयत्याचा वापर करावा. 8. काढणीनंतर सोयाबीनचे एकत्र ढीग किंवा गंजी करुन ठेवू नये. यामुळे त्यास बुरशी लागून धान्याची प्रत खालावते. 9. काढणी केलेले पीक उन्हामध्ये चांगले वाळवावे. मळणीसाठी उशीर होणार असेल तरच वाळलेल्या सोयाबीनची गंजी करून ठेवता येईल. पावसाचे वातावरण असल्यास सर्व शेतमाल एकत्र करून मोठी गंजी लावून झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. 10. मळणी केलेले धान्य स्पायरल सेपरेटर किंवा धान्य स्वच्छता केंद्रावर प्रतवारी करुन घ्यावी. योग्य दर्जाच्या प्रतवारी केलेल्या धान्यास प्रति क्विंटल 200 ते 500 रु. अतिरिक्त दर मिळतो.

वरीलप्रमाणे सोयाबीन विक्री करीत असतांना खबरदारी घेतल्यास आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री करण्यास अडचण निर्माण होत नाही व शेतकऱ्यांचे श्रम व  पैसा वाया जाणार नाही, असे आवाहन कृषी विभाग तथा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

००००००

माजी सैनिकांच्या / विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती

 

माजी सैनिकांच्या / विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती

Ø 15 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत

चंद्रपूर, दि. 26 : शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत किमान 60 टक्के गुणांनी उर्त्तीण झालेल्या माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना पुढील शिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांनी 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

लाभार्थीचा अर्जशिष्यवृत्ती फॉर्मओळखपत्राची छायाकिंत प्रतबोनाफार्इड प्रमाणपत्रउर्त्तीण झालेल्या वर्गाची गुणपत्रिकेची झेरॉक्स व इतर कुठल्याही योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळत नसल्याचे प्रमाणपत्र इत्यादि कागदपत्र अर्जासोबत जोडावेत. ज्या माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती  अंतर्गत शिष्यवृत्ती मिळवायची आहेअशा पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाची शिष्यवृत्ती लागू होत नाही. ज्या पाल्यांनी सीईटीजेईई  किंवा इतर कारणासाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रथम वर्षासाठी  प्रवेश घेतलेला आहेअशा विद्यार्थ्यांनी प्रकरणासोबत गॅप सर्टिफिकेट जोडावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयप्रशासकीय इमारतपहिला मजलारूम नंबर 3चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेकरीता 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेकरीता 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 26 : जिल्ह्यातील माजी सैनिक /विधवांच्या पाल्यांनी वर्ग 12 वी मध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करून शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी कोणत्याही व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असल्यास सदर विद्यार्थी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास पात्र आहेत.

            त्याकरिता ऑनलाईन अर्ज www.ksb.gov.in या वेबसाईटवर असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. तरी मुळ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे स्कॅन करुन  प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जासह अपलोड करावे. अपूर्ण किंवा चूकीचा अर्ज भरलेला असल्यास नाकारल्या जाईल. तरी सर्व संबंधित माजी सैनिक/ विधवांनी  आपापल्या पात्र पाल्यांचे ऑनलाईन अर्ज 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत भरावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

००००००