Search This Blog

Friday 29 October 2021

शेतकरी आत्महत्या पाच प्रकरणांमध्ये मदत


 

शेतकरी आत्महत्या पाच प्रकरणांमध्ये मदत

Ø अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरांनी घेतला आढावा

चंद्रपूर,दि. 29 ऑक्टोंबर : शेतकरी आत्महत्येची पाच प्रकरणे मदत पात्र असल्याचे जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या 11 प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी 5 प्रकरणे पात्र करून मदतीकरीता निकाली काढण्यात आली, 4 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली तर उर्वरीत 2 प्रकरणे प्रलबिंत ठेवण्यात आली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे कर्जाचे पुरावे जोडलेले नाहीत, ते पुरावे मागवून घ्यावेत. अशा सुचना अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी बैठकीत दिल्या.

बैठकीला अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, नायब तहसीलदार (सामान्य) गीता उत्तरवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत धोंगळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी एम.एन.हेकाड, डॉ. गजेंद्र मेश्राम, महसूल सहाय्यक प्रमोद गेडाम, प्रशांत कंचनवार प्रामुख्याने उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment