Search This Blog

Monday 1 November 2021

रेती घाटांबाबत अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

 


रेती घाटांबाबत अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.1 नोव्हेंबर: जिल्ह्यातील सन 2021-22 या वर्षाकरिता वाळू गटांच्या राज्यस्तरीय पर्यावरण समितीची अनुमती मिळविण्याकरिता अर्ज सादर करावयाचे आहे. त्याकरिता जिल्ह्यातील वाळू गट निश्चित करण्यात आले असून उपलब्ध संसाधनाच्या आधारे जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय यांनी जानेवारी 2020 मध्ये प्रसिद्ध केलेल्या वाळू, रेती उत्खनन मार्गदर्शक सूचनेनुसार हा अहवाल जनतेच्या माहितीकरिता व अभिप्राय नोंदविण्याकरिता https:// Chanda.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी या अहवालातील रेतीघाटांच्या अनुषंगाने आपले अभिप्राय संकेत स्थळावर नोंदवावे. असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment