Search This Blog

Thursday 16 May 2024

बालशक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत

 

बालशक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम  मुदत 31 जुलैपर्यंत

चंद्रपूरदि. 15 : केंद्र  शासनाच्या महिला व बाल विकास  विभागामार्फत  बालशक्ती  पुरस्कार दिला जातो.  प्रधानमंत्री  राष्ट्रीय बाल पुरस्कार हा 5 ते 18 वर्षापर्यंत शिक्षणकला, सांस्कृतिक कार्यखेळ, नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे, अशा बालकांना हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री  राष्ट्रीय बाल पुरस्कार  2025 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज http://awards.gov.in या संकेतस्थळा मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत.

ज्या मुलांचे वय 5पेक्षा अधिक व 31 जुलै2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षणकलासांस्कृतिक कार्यखेळनाविन्यपूर्ण शोधसामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केली आहेत्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकारकेंद्रशासित प्रदेशजिल्हाधिकारी /जिल्हादंडाधिकारीपंचायत राज्य संस्थानागरी स्वराज संस्था,  शैक्षणिक संस्था इ.अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत आहे, असे महिला व बालविकास आयुक्त यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment