Search This Blog

Thursday, 15 August 2019

पाच वर्षात जिल्ह्याला पाणीदार बनवण्याकरिता जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार : ना. सुधीर मुनगंटीवार







आठ दिवसात चंद्रपूर जिल्हा राज्यातील पहिला गॅस युक्त जिल्हा
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळा
चंद्रपूरदि. 15 ऑगस्ट: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी  शेतकऱ्यांचे उत्पन्न  दुप्पट करण्याचे स्वप्न बघितले असून त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहे. जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून जिल्हा पाणीदार करण्यासाठी जलसत्याग्रह चळवळ उभी करण्यात येणार असून याकरिता सर्वांनी सहकार्य करावेअसे आवाहन राज्याचे वित्तनियोजन विशेष सहाय्यवनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याचा 72 व्या वर्धापन दिन सोहळ्याचे शानदार आयोजन जिल्ह्याधिकारी कार्यालयात करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला खासदार  सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकरचंद्रपूर विधानसभाचे आमदार  नानाभाऊ श्यामकुळेजिल्हा परिषदेचे अध्यक्ष  देवराव भोंगळेमहापौर अंजलीताई घोटेकरजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डीमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेअतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रेनिवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकरव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरस्वातंत्र्य संग्राम सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले कीशाहिदांनी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगल  कलश आपल्या हाती दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे या दिवशी आपल्याला काय अधिकार मिळाले याचा विचार न करता भारत निर्माण करिता कर्तव्याचा विचार करणे आवश्यक आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या देशात स्वतःचा परिचय भारत देशाच्या नावाने द्यायचा महत्वपूर्ण निर्णय प्रधानमंत्र्यांनी घेतला आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास येथील जनतेने जिल्हा पुढे जावा याकरिता भरपूर प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्र सरकारने अनेक योजना राबवलेल्या असून  बीपीएल मध्ये नाव नसेल तरीही 2 रुपये 3 रुपये किलो अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. तसेच संपूर्ण राज्य चूलमुक्त व धूरमुक्त करून गॅसयुक्त करण्याकरिता अभियान राबवलेले आहे. जनसामान्यांना गॅस कनेक्शन देण्यात  राज्यात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर असून यावेळी घोषित करू इच्छितो की येत्या आठ दिवसात चंद्रपूर जिल्हा गॅस युक्त झालेला राज्यातील पहिला जिल्हा असेल.
जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध सिंचन योजना पूर्णत्वास आल्या असून यामध्ये चीचडोह प्रकल्पामुळे चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्याला फायदा होणार आहे. सोबतच कोटगलपळसगाव-आमडीचिंचाळा प्रकल्पही पूर्णत्वास आले आहे. मोठ्या प्रमाणावर बंधाऱ्याचे काम या जिल्ह्यात सुरू झाले आहेत. प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी पोहचून आपला जिल्हा येत्या पाच वर्षात पाणीदार व्हावा याकरिता संकल्प केला असून 4 ऑगस्ट रोजी जलपुरुष राजेंद्र सिंह व सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीत जलसाक्षरता अभियानाला गती देण्यासाठी संकल्प केला असून जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतीच्या सहभागाने जलसत्याग्रह चळवळ सुरू करण्यात येणार आहे. याकरिता सर्वांनी सहकार्य करावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्यातील निराधारविधवाघटस्फोटितापरित्यक्ता महिलांचे अनुदान 600 रुपयेहुन  1000 रुपये व दोन मुले असल्यास 1200 रुपये पर्यंत वाढवले आहे. अण्णाभाऊ साठे यांचे हे शंभरावे जयंती वर्ष असून त्यांच्या नावाने भारतीय डाक विभागाशी  प्रयत्नपूर्वक  संपर्क करून डाक तिकीट सुरू केले आहे. त्यांचं प्रसिद्ध असणारे वाक्य हे आझादी झुठी है देश कि जनता भुकी है उच्चारले होते. त्यांच्या जयंतीचे शंभरावे वर्ष साजरा करताना आपल्या जिल्ह्यात कोणीही उपाशी राहू नये. याकरिता सर्वांनी संकल्प करावाअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            सोबतच महात्मा गांधींचे हे 150 वे जयंती वर्ष आहे. 1923 मध्ये महात्मा गांधी या जिल्ह्यात दोन दिवस मुक्कामी होते. त्यावेळी त्यांनी नागविदर्भ चरखा  समिती सोबतच देशात स्वदेशी चळवळ राबविण्याकरिता अनेक उपक्रम सुरू केले. महाराष्ट्र सरकारने सोलर चरख्याकरिता 8 कोटी 90 लाख रुपयांची तरतूद केली आहे. यूपीएससी एमपीएससी परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थी पास होऊन आयएएसआयपीएसआयआरएसआयएफएस व्हावेत याकरिता मिशन सेवा हा उपक्रम सुरू केला आहे. तसेच जिल्ह्यातील युवकांनी 2024 मधील ऑलिंपिक मध्ये पदक मिळावे याकरिता मिशन शक्ती अभियान सुरू केले आहे. मिशन शौर्यच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. जिल्ह्यात मिशन मंथनची सुरुवात करण्यात येणार असून या माध्यमातून आयआयटी संस्थांशी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आयआयटीसाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक इन्कम टॅक्स भरतील. मिशन सक्षम महिला या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बचत गटांसाठी  विविध योजना राबविण्यात येत आहे. माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिलातर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान असा नारा दिला. तर आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान असा नारा दिला आहे. याला अनुसरून देशात विविध अनुसंधान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून महाराष्ट्रात दोन अनुसंधान केंद्र यवतमाळ व चंद्रपूर येथे स्थापन करण्यात येणार आहे. याकरिता टाटा ट्रस्टशी सामंजस्य करार करण्यात आला असून 189 कोटी रुपये या अनुसंधान केंद्रासाठी टाटा ट्रस्टने दिले आहेतअशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
चंद्रपूर जिल्हा प्रत्येक जाती-धर्माचा सन्मान करणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात सैनिकी शाळा सुरू झाली असून भविष्यातील आर्मीचीफ व लष्कराच्या वरिष्ठ पदावर असलेला अधिकारी चंद्रपूर जिल्ह्यातील सैनिकी शाळेत शिकलेला असेलतेव्हा आपल्यासाठी अभिमानाची बाब असेल. जागतिक सोयीसुविधांनी परिपूर्ण अशी वनअकादमी निर्माण करण्यात आली आहे. बीआरटीसीच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवले जात आहे. वैद्यकीय महाविद्यालय व कॅन्सर हॉस्पिटल तयार करण्यात येणार येत आहे. बांबू हँडीक्राफ्ट आर्ट युनिटच्या माध्यमातून अगरबत्ती प्रकल्प सुरू केलेला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात येणार असून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. कारण जिल्ह्याचा गौरव वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा तेव्हाच देशात जिल्ह्याचा गौरव वाढेलअसे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा नियोजन विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुजीब शेखअशोक राऊतज्ञानू लवटेअजय राठोड तसेच शंभर टक्केपेक्षा जास्त महसूल गोळा केल्याबद्दल अनुप हंडाभारवी जिवनेआशिष राठोडरमेश गुज्जनवारपौर्णिमा उईकेगजानन भुरसेभगवान रणदिवेअरविंद डाहुलेसूर्यकांत ढाकणेप्रफुल्ल चिडेविभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभागामार्फत सीमा मामीडवार छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत उथळपेठआठवीमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये नववे स्थान संपादन केल्याबाबत वेदांत येरेकरआरोग्य विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. सूर्यकांत बाबरडॉ. जिनी पटेलडॉ. उल्हास सरोदेसंवर्ग विकास अधिकारी श्री. बागडीडॉ. संदीप गेडामडॉ. सुधीर मेश्रामछाया पाटीलकेंद्र शासनाचे गृह विभागाकडून उत्तम जीवन रक्षा पदक प्राप्त डॉ. चरणजीतसिंग सलुजापोलीस विभागामार्फत शेखर देशमुखहृदयनारायण यादवप्रकाश कोकाटेस्वप्निल धुळेदीपक गोतमारेकिसन शेळकेविठ्ठल मुत्यमवारधर्मेंद्र जोशीए. एम. सय्यदमहेश कोंडावारमहेंद्र आंभोरेप्रशांत केदारविकास मुंडेनीलेश वाघमारेसंदीप कापडेसंदीप मिश्रादिलीप लोखंडेआकाशकुमार  साखरेतीर्थराज निंबेकरसुधीर बंडावारकुणाल रामटेके यांना विशेष सेवा पदक तर भीमा वाकडेरमेश पढालएस. खैरकर यांना महासंचालक यांचे विशेष सन्मान चिन्ह पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट कार्यालयीन कामाकरिता विवेक कोहळे तसेच आपत्ती निवारणाकरिता शोध व बचाव पथकाचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये  सुनील नागतोडे,  शरद बनकर,  गजानन पांडे,  अजय यादव,  राहुल पाटील,  विपिन निंबाळकर,  मयूर चहारे,  मोरेश्वर भरडकर,  निळकंठ चौधरी,  राष्ट्रपाल नाईक,  पुंडलिक ताकसांडेटी.डी. मेश्राम,  इन्द्रपाल बैसके.  एम. वलेकरव्ही. एन. ढुमणे यांचा समावेश आहे.
चांदा- कृषी मोबाईल अॅपचे उद्घाटन
            ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर कृषी ॲपचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व आत्मा कार्यालय यांच्यावतीने चांदा कृषी मोबाईल ॲप सुरू करण्यात आले. या ॲपच्या मार्फत जिल्ह्यातील विविध कृषी योजना तसेच लाभार्थ्यांची माहितीकृषी विषयक सल्लाशेतकऱ्यांनी साकारलेले प्रयोगत्यांच्या यशकथा याबाबतची माहिती या ॲप मार्फत दिली जाणार आहे.
        यावेळी पालकमंत्री यांनी कृषी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना संबोधित करताना शासकीय नव्हे मानवीय दृष्टिकोनातून काम करावेअसे आवाहन केले. कृषी ॲप हा दीर्घकाळ चालावा व यावर टाकण्यात येणाऱ्या पोस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अधिकाधिक सेवा व्हावीअशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटीलकृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे  यांची उपस्थिती होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेतली तसेच वृक्षारोपण करून रुग्णवाहिकेचा लोकार्पणसोहळा पार पाडण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सभापती व सदस्यपंचायत समिती सभापती व सदस्यमहानगरपालिका सदस्य विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

Friday, 26 July 2019

भविष्यातील सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी चंद्रपूर सैनिकी शाळेचे असावेत : ना. मुनगंटीवार





 चंद्रपूर सैनिकी शाळेत लेफ्टनंट जनरल निंभोरकरांच्या उपस्थितीत कारगील दिन  
·         पहिल्या तुकडीच्या चिमुकल्यानी पालकमंत्र्यांना दिला गार्ड ऑफ ऑनर
·         सैनिकी शाळेच्या पहिल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती
·        सैनिकी शाळेचे प्रधानमंत्रीसंरक्षणमंत्री करणार लवकरच उद्घाटन

चंद्रपूर दि.26 जुलै : ऑपरेशन विजय, अर्थात 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्ध जिंकण्याचा दिवस. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या चंद्रपूर सैनिकी शाळेमध्ये आज देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात कारगिल दिवस साजरा करण्यात आला. यावेळी या शाळेत दाखल झालेल्या सैनिकी पेहरावातील पहिल्या तुकडीला संबोधित करताना राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भविष्यामध्ये या शाळेचा विद्यार्थी आर्मीनेव्ही किंवा एअर फोर्सचा प्रमुख व्हावा व त्याने गर्वाने चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचे नाव सांगावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन लवकरच प्रधानमंत्री किंवा संरक्षण मंत्र्यांच्याहस्ते होणार आहे. मात्र सैनिकी शाळेच्या नियमानुसार या ठिकाणची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून 90 विद्यार्थ्यांची सहाव्या वर्गाची पहिली तुकडी अभ्यासक्रमाला लागली आहे. आज कारगिल विजय दिवसाच्या शुभ पर्वावर चंद्रपूर सैनिकी शाळेने देशभक्तीने ओतप्रोत  कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सैनिकी शाळेसाठी प्रेरणास्थान ठरलेले सर्जिकल स्ट्राइक मधील मुख्य भूमिका असलेले लेफ्टनंट जनरल  राजेंद्र निंभोरकर आणि  ज्यांनी अथक पाठपुरावा व विक्रमी वेळेत 123 एकरा मधील सैनिकी शाळा चंद्रपूरकरांना लोकार्पित केलीअसे राज्याचे वित्तनियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत या कार्यक्रमाला लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकरएअर व्हाईस मार्शल(सीनियर ॲडमिन एअर स्टाफ ऑफिसर) बी. मणिकंटनवन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेलजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर महानगरपालिकेच्या  महापौर  अंजलीताई घोटेकर,  विभागीय मुख्य अभियंता उल्हास देबडवार, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनारपोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,  अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रेअधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडेअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सैनिकी शाळेचे प्राचार्य स्कॉर्डन लिडर नरेशकुमार, उपप्राचार्य लेप्ट कमांडर अनमोल,  समाज कल्याण सभापती  ब्रिजभूषण पाझारे,  बल्लारपूर नगरपरिषदेचे  नगराध्यक्ष  हरिष शर्माशिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांची देखील उपस्थिती होती.
आज कारगिल दिनी या सैनिकी शाळेमध्ये दिल्लीच्या इंडिया गेट प्रमाणे तयार करण्यात आलेल्या अमर जवान ज्योतीवर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तत्पूर्वी त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना हस्तांदोलन केले. यानंतर अवघ्या बारा, तेरा वर्षाचे असणारे सैनिकी पेहरावातील विद्यार्थ्यांनी सैनिकी शिस्तीत पालकमंत्र्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. उपस्थित सर्व 90 विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना सलामी दिली. हा क्षण पालकमंत्र्यांना भावूक करणारा ठरला.
त्यानंतरचा सैनिकी शाळेतील विस्तीर्ण मैदानावरचा कार्यक्रम सैनिकी शिस्तीचा वेगळा आविष्कार होता. सैनिकी शाळेचे गीत, एअर फोर्स दलाच्या बँडचे संचालन व  शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेले चित्तथरारक प्रात्यक्षिक लक्षवेधी होते.
यावेळी संबोधित करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सैनिकी शाळेच्या निर्मितीमागील भूमिका व प्रेरणा विषद केली. देशातील 712 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वाघ असणारा जिल्हा चंद्रपूर आहे. त्यामुळे या सैनिकी शाळेतून निघालेला एक एक विद्यार्थी या देशाचा नावलौकिक वाढविणारा विद्यार्थी असेलअशी आशा त्यांनी व्यक्त केली. सैनिकी शाळा उभारण्यासाठी राजेंद्र निंभोरकर यांनी केलेल्या वेळोवेळी मदतीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ही सैनिकी शाळा विक्रमी 14 महिन्यात तयार झाली आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सैनिकी शाळेच्या निर्माणाचे काम करणारे कामगार देखील उपस्थित होते. त्यांचे देखील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आभार मानले. तुम्ही केवळ सैनिकी शाळा उभारली नाही तर देश मजबूत करणाऱ्या पिढीच्या मजबुतीसाठी काम केलेले आहे.  भारत मातेच्या या कामगार सुपुत्रांनी आपले दायित्व व्यक्त केले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या कामामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी, संस्थांनी पुढाकार घेतला त्या सर्वांचे यावेळी त्यांनी आभार मानले.
4 ऑगस्ट रोजी चंद्रपूरला आमीर खान यांच्याहस्ते मिशन शक्तीला सुरुवात होत असून येत्या ऑलम्पिकमध्ये चंद्रपूर, गडचिरोलीतील क्रीडापटूंनी ऑलम्पिकमध्ये मेडल मिळावे, ही आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूरची सैनिकी शाळा हे आपले एक स्वप्न असून खरा आनंद जेव्हा हा या शाळेतला विद्यार्थी वीस-पंचवीस वर्षांनंतर देशाच्या आर्मी दलाचा प्रमुख असेल, नेव्ही दलाचा प्रमुख असेल किंवा एअरफोर्समध्ये महत्त्वाच्या पदावर असेल तेव्हाच मिळेल. हा अधिकारी जेव्हा सांगेल कीहोय ! मी चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचा विद्यार्थी आहे. तेव्हा मला आणखी समाधान मिळेलअशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. सैनिकी शाळेच्या परिसरात त्यांनी आज फेरफटका मारला व नव्या कामाची पाहणी केली. त्यानंतर पहिल्या तुकडी सोबत छायाचित्र देखील काढले. यावेळी चंद्रपूर-बल्लारपूर शहरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.
                                                            0000

Monday, 22 July 2019

बालकांच्या संरक्षणासाठी समाजानेच पुढे यावे : प्रवीण घुगे


पत्रकार परिषदेत आवाहन
महिला व बालकल्याण समिती सोबत बैठक

चंद्रपूर, दि.20 जुलै - उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठात बाल संरक्षण संदर्भातील प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष रचना केलेली आहे. बाललैंगिक शोषणाबाबत निकाल जलद गतीने व्हावेत. न्यायालयात त्यासंबंधिचे सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे याकरिता प्रयत्न सुरू असून बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनासोबतच संवेदनशील  व प्रशिक्षित समाज तसेच सामाजिक  संस्थांनी पुढे येऊन कार्य करणे आवश्यक आहे त्यानंतरच समाजातील वाईट प्रवृत्तीला आळा बसेलअसे मत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी आज 20 जुलै रोजी  शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी आयोगाच्या सदस्या डॉ. वासंती देशपांडे व सीमा व्यास प्रामुख्याने उपस्थित होत्या. तसेच  बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड.वर्षा जामदार, सदस्या मनीषा नखातेमृणाली धोपटेअभय बोधे उपस्थित होते.
बाल संरक्षण संदर्भातील संस्थांची वर्गवारी करण्यात आली असून अ व ब दर्जाच्या संस्थांनाच मान्यता दिली असून क दर्जाच्या संस्था वगळण्यात आल्या आहेत. पालक असूनही घरी ठेवण्यायोग्य नाहीत, अश्या काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी बालगृहात ठेवण्यात येते.  तसेच जास्तीत जास्त बालक कुटुंबा सामावली जावी असा आमचा मुख्य हेतू आहे. 12 वर्षाच्या आत वयोगटातील असणारी बालक तात्काळ दत्तक प्रक्रियमार्फत दत्तक झाली पाहिजेयाकरिता सीएआरए व एसएआरए  यातील मार्गदर्शक सूचनेनुसार प्रयत्न सुरू आहेत.  दत्तक विधानाची प्रक्रिया करीत असताना अर्ज करणाऱ्या कुटुंबाची मानसिक स्थिती लक्षात घेऊनच निर्णय घेतला जातो. यात पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने ऑनलाइन नोंदणी केल्या जात आहे. याबाबत समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये जागृती होणे आवश्यक आहे. याकरिता गावस्तरावर सक्रिय ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन होणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी दत्तक विधानाची संपूर्ण प्रक्रिया समजून सांगितली.
तसेच शाळेत बालकांना मारहान होत असल्यास किंवा एखादा बालक संकटात असल्यास 1098 या चाईल्डलाईनवर संपर्क करावा तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी बाल संरक्षण संदर्भातील यंत्रणा उदाहरणार्थ बालकल्याण समितीबाल न्याय मंडळ, बाल पोलीस पथक व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याशी मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावर शिक्षणाचे अधिकारांतर्गत तात्काळ पोलीस विभागामार्फत कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी पोलीस विभाग,  जिल्हा महिला बालविकास अधिकारी , जिल्हा बाल संरक्षण कक्ष,  जिल्हा शिक्षण विभाग,  सहाय्यक कामगार आयुक्त यांची संयुक्तरीत्या बैठक घेतली यादरम्यान त्यांनी बाल पोलीस पथक जिल्हा बाल संरक्षण कक्ष व शिक्षण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने सुरू असलेली सुरू असलेली बाल संरक्षणाविषयी जनजागृतीची मोहिमेचा आढावा घेतला.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक  प्रशांत खैरे, महिला सहाय्यक कक्षाच्या  अतिरिक्त पोलीस निरीक्षक श्रीमती एकुरकेशिक्षणाधिकारी (माध्यमिकसंजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी  (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे, जिल्हा परिविक्षा अधिकारी रमेश दडमल परिविक्षा अधिकारी  छोटू बोरीकरबाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर व  इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                                       0000

सातव्या आर्थिक गणनेकरिता जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न


चंद्रपूरदि. 20 जुलै:  केंद्रशासनातर्फे राष्ट्रव्यापी सातवी आर्थिक गणना घेण्यात येणार असून यामध्ये उद्योग, व्यवसाय व सेवा यांची प्रत्यक्ष कुटुंबास तसेच उद्योगास भेट देऊन गणना करण्यात येणार आहे. ही गणना जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळएनआयसीचे प्रमुख सतिश खडसे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमीत सुतार, सीएससीचे विभागीय प्रभारी निलेश कुंभारेनगर परिषदेचे सर्व मुख्याधिकारी तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आर्थिक गणना दर पाच वर्षांनी होत असून यापूर्वी 2013 साली करण्यात आली होती. यावर्षी आर्थिक गणना ही प्रथमच पेपरलेस पद्धतीने पद्वारे राबवण्यात येणार आहे. या गणनेत उद्योगरोजगारकामगारांची संख्यानोकरदारस्वयंरोजगार,कामगार पणन संस्थावस्त्रोद्योगशाळामहाविद्यालयांची संख्याकुटुंबांचा आर्थिक स्थरसंकलित महसूलआदी घटकांची गणना केली जाणार आहे. सदर गणेनेसाठी जिल्ह्यात 1892 प्रगणक व 473 पर्यवेक्षकांची आवश्यकता भासणार आहे. प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी ऑनलाइन परीक्षा पास करावी लागेल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांनाच प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून कॉमन सर्विस सेंटर कडून निवड करण्यात येईल. हे प्रगणक प्रत्येक कुटुंबात पर्यंत पोहोचणार आहे.
या गणनेवर संनियंत्रण ठेवण्यासाठी तसेच राज्यस्तरीय समितीशी समन्वय ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत आर्थिक गणनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी त्या कार्यालयांना सहकार्य करण्याबाबत सूचना देणेस्थानिक प्रशासन व पंचायत यांना वेळोवेळी मार्गदर्शनात्मक सूचना करणेराज्यस्तरीय समन्वय समितीला अवगत करणेगणनेचा जिल्हास्तरीय अहवाल मंजूर करणे व प्रचार प्रसिध्दीची कामे करण्यात येईल. प्रगणक तसेच पर्यवेक्षकाची नेमणूक करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिल्या.
                                                                          0000

सफाई कामगारांचे प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


चंद्रपूरदि. 20 जुलै: सफाई कामगार समन्वय समितीच्या निवेदनानुसार प्रलंबित प्रकरणे तसेच मागण्या तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आज 20 जुलै 2019 रोजी वीस कलमी सभागृह येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे,उपायुक्त गजानन बोकडेजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड तसेच इतर विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सफाई कामगार समन्वय समिती सोबत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून द्यावी. प्रलंबित असलेली वारसान हक्काचे प्रकरण निकाली काढण्यात यावे. सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. कामगारांना आवश्यक असलेले सफाई साहित्य व इतर किरकोळ सामान उपलब्ध करून द्यावे. सफाई कर्मचाऱ्यांच्या वस्तीचे सौंदर्यीकरण दलित वस्ती सुधार निधी अंतर्गत करून देण्यात यावे. लाड पागे समिती नुसार वारसा हक्क लागू करण्यात यावे. ग्रामीण रुग्णालयात कार्यरत कामगारांना दुसऱ्या व चौथ्या शनिवारची शासकीय सुट्टी लागू करावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीनंतरचे लाभ तात्काळ देण्यात यावे. लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढत असल्याने मुलींच्या आश्रमशाळेत महिला कर्मचा-यांची तात्परती अथवा कायम स्वरूपात नियुक्ती करण्यात यावी. या मुख्य मागण्यांवर  जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष सफाई कामगार समन्वय समितीने प्रकाश टाकला.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रश्न समजून घेत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या यामध्ये सफाई कामगारांसाठी श्रमसाफल्य योजनेअंतर्गत भविष्यातील गरज लक्षात घेऊन  येत्या पंधरा दिवसात महानगरपालिकेमार्फत जागा निश्चित करावी किंवा समन्वय समितीने स्वतः जागा सुचवावी. आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी सोमवारला प्रकाशित करावी. तसेच 31 जुलैपर्यंत सुनावणी घेऊन वारसांचा प्रश्न सोडवावा. सफाई कामगारांना प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेचा  लाभ मिळवून देण्याकरिता  विशेष शिबिर आयोजित करावे. त्यात  महानगरपालिका प्रशासनाने सफाई कामगारांबद्दल असलेल्या संपूर्ण योजनांची  माहिती द्यावी. दर दोन महिन्यांनी महानगरपालिकेने सफाई कामगार समन्वय समितीसोबत बैठक घेऊन प्रत्येक मागणीचा पाठपुरावा करावा, अशा सूचना महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. सफाई कामगारांच्या आरोग्याची विशेष काळजी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने घेऊन दर तीन महिन्यांनी कॅन्सरटीबी व इतर आजारांच्या तपासणीसाठी आरोग्य शिबिरे घ्यावीतअशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या. प्रत्येक मागणीचा योग्य पाठपुरावा करावा. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालयपोलीस विभागऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनाही जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सूचना दिल्या.
                                                                                     00000