Search This Blog

Monday, 23 June 2025

शिवगर्जनेने शाळेत बालकांचे पहिले पाऊल






 

शिवगर्जनेने शाळेत बालकांचे पहिले पाऊल

Ø विद्यार्थी घडले तरच देश घडेल – जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø दाताळा येथील जि.प. उच्च प्राथ. शाळेत विद्यार्थ्यांचा जल्लोषात प्रवेशोत्सव

चंद्रपूरदि. 23 : ‘महाराजराजनीती धुरंधरप्रौढप्रताप पुरंदरसिंहासनाधिश्वरमहाराजाधिराजराजा शिवछत्रपती महाराजांचाविजय असोविजय असोविजय असो…’ अशा पहाडी आवाजात 7 वी ची विद्यार्थीनी कार्तिकी मुंगले हिने शिवगर्जनेचा जयघोष केला आणि विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल पडले.

दाताळा येथील पी.एम.श्रीजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव पार पडलायावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणेदाताळाच्या सरपंचा सुनिता देशकरशाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुमन दोनाडकरशिक्षण विस्तार अधिकारी मनोज गौरकारशाळेचे मुख्याध्यापक लटोरी मोहितकरशिक्षिका सुनिता पावडेवंदना वनकरअर्चना चिंतावारशिक्षक राजू लांजेकरकेशर चकोले यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणालेआजपासून शैक्षणिक सत्र 2025-26 ला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांसाठी आज अतिशय महत्वाचा दिवस आहेपहिल्यांदा शाळेत पाऊल टाकण्याचा क्षण अविस्मरणीय असतोत्याचे महत्व जीवनभर असतेशिक्षणामुळेच स्वत:चाकुटुंबाचा तसेच सामाजिकआर्थिक व सर्वांगीन विकास होण्यास मदत होतेसर्वांना चांगले शिक्षण देणे ही आपली प्राथमिकता आहेकोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीअसा शासनाचा मानस आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावेजेणेकरून स्पर्धेच्या या युगात आपलाही विद्यार्थी पुढे राहीलआजचा विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेविद्यार्थी घडला तरच देश घडेलशाळांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन निधीची कमतरता पडू देणार नाहीविद्यार्थ्यांनोचांगला अभ्यास करातरच मोठ्या पदावर पोहचालअसे म्हणत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यातसेच पालकांनीसुध्दा मुलांना चांगले शिक्षण द्यावेअसे आवाहनही त्यांनी केलेयावेळी शाळेकरीता मिळालेल्या स्मार्ट टीव्हीचे लोकार्पण जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन वंदना वनकर यांनी तर आभार राजू लांजेकर यांनी मानलेयावेळी पालकविद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाची क्षणचित्रे : 1. नवीन प्रवेशित बालकांचे सजावट केलेल्या इनोव्हातून आगमन 2. जिल्हाधिकारी विनय गौडा यांची विद्यार्थ्यांसोबत हितगुज 3. लेझीम आणि बॅन्डच्या ठेक्यावर विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत 4. जिल्हाधिका-यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण 5. फित कापून तसेच दीप प्रज्वलनाने शैक्षणिक सत्राचा प्रारंभ 6. शिवगर्जनेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव. 7. नवीन बालकांच्या प्रवेशाच्या पाऊलखुणा 8. विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत. 9. जिल्हाधिका-यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅगपुस्तके आणि गणवेश वाटप.

शाळेविषयी माहिती : दाताळा येथील पी.एम.श्रीजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वर्ग 1 ली ते 8 वी पर्यंत एकूण 225 विद्यार्थी प्रवेशित आहेतनवीन शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहेशाळेमध्ये मुलामुलींकरीता स्वतंत्र आणि स्वच्छ शौचालयपिण्याच्या पाण्यासाठी दोन आर.मशीन, 7 वर्गखोल्यांमध्ये स्मार्ट टिव्हीविज्ञान प्रयोगशाळास्टेम लॅबगार्डन आदी सोयीसुविधा आहेत.

०००००० 

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना आता प्रतिमाह 5 हजार रुपये मानधन

 

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना आता प्रतिमाह 5 हजार रुपये मानधन

Ø राजर्षी शाहू महाराज मानधन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि 23 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेत’ महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेतया योजनेअंतर्गत ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना देण्यात येणारे मानधन हजार रुपये प्रतिमाह इतके वाढविण्यात आले आहेचंद्रपूर जिल्ह्यातील पात्र साहित्यिक व कलाकारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ते 31 जुलै 2025 या कालावधीत आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेतअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

योजनेचा उद्देश : ज्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांचे जीवनमान केवळ कलेवर किवा साहित्यावर अवलंबून आहे आणि ज्यांना उतारवयात आर्थिक अडचण भासत आहेत्यांना या योजनेद्वारे आर्थिक सहाय्य करून त्यांच्या कलेचा सन्मान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

पात्रतेचे निकष: अर्जदाराचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असावे. (विधवा/परित्यक्ता/दिव्यांग अर्जदारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे आहे.)  कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान 15वर्षांचे योगदान आवश्यकअर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 60 हजार रुपयांपेक्षा कमी असावेअर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावाअर्जदार केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा व त्याचा उदरनिर्वाह केवळ कला/साहित्यावर अवलंबून असावा.

अर्ज करण्याची पद्धत :  1 जुलै 31 जुलै 2025 या कालावधीत फक्त ऑनलाईन पद्धतीने https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारले जातीलअर्जदार जवळच्या सेतू केंद्रावर किंवा इतर उपलब्ध माहिती तंत्रज्ञान प्रणालीद्वारे अर्ज सादर करू शकतात.

आवश्यक कागदपत्रे : वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखलाजन्म प्रमाणपत्र इ.), आधार कार्डतहसीलदार यांनी दिलेला चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखलारहिवासी दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट), अर्जदाराचा व लागू असल्यास जोडीदाराचा फोटोबँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत (IFSC कोडसह), कला/साहित्य क्षेत्रातील योगदानाचा पुरावा (उदाप्रमाणपत्रेपुरस्कारबातमीपत्रांतील कात्रणे इ.), इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे नोटरी केलेले प्रमाणपत्रसांस्कृतिक संस्थांचे शिफारसपत्र असल्यासकेंद्र शासनाचा / राज्य शासनाचा / सांस्कृतिक मंत्रालयाच्या पुरस्काराचे प्रमाणपत्र असल्याससाहित्य अकादमी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील सहभागाचे पुरावे असल्यासनामांकित संस्था / व्यक्तीचे शिफारस पत्र असल्यासअर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र.

             चंद्रपूर जिल्हातील सर्व पात्र ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेतअधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील पंचायत समितीशी संपर्क साधावाअसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापंमिना साळूंके यांनी कळविले आहे.

००००००

Saturday, 21 June 2025

योगाच्या माध्यमातून मानवाचा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक संगम - पालकमंत्री डॉ. अशोक उईके












 

योगाच्या माध्यमातून मानवाचा शारीरिकमानसिक व आध्यात्मिक संगम - पालकमंत्री डॉ. अशोक उईके

Ø जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य शासकीय योग दिन

चंद्रपूरदि. 21 : धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे आज अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे. यावर मात करून निरोगी आणि उत्तम जीवन जगायचे असेल तर दैनंदिन जीवनात योगा करणे आवश्यक आहे. हा एक केवळ व्यायामच नाही तर योगामुळे मानवाचा शारीरिकमानसिक आणि आध्यात्मिक संगम साधण्यास मदत होतेअसे विचार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले.

जिल्हा प्रशासनजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमेरा युवा भारत आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित मुख्य शासकीय योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवारमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहअतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारेउपविभागीय अधिकारी संजय पवारतहसीलदार विजय पवारजिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंडप्रकल्प अधिकारी विकास राचेलवारशिक्षणाधिकारी राजेश पाताळेअश्विनी सोनवणेउपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंकेसुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संयुक्त राष्ट्र संघटनेने योगाचे महत्व ओळखले आणि 21 जूनला आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा ठराव पारीत केला. गत 11 वर्षांपासून जगातील 177 देशांमध्ये योग दिन साजरा केला जात आहे. एक पृथ्वीएक आरोग्य’ ही 2025 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे. जिल्हा प्रशासनाने पतंजली योग समिती आणि विविध संघटनांच्या माध्यमातून चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पुढील वर्षापासून सर्वांनी एकत्रित येऊन शासकीय योग दिन साजरा करावा. चंद्रपूरात योग संगम दिसणे आवश्यक आहे. पुढील आंतरराष्ट्रीय योग दिन यापेक्षा मोठ्या स्वरूपात व खुल्या मैदानात आयोजित करावाअशा सुचनाही पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुजन करण्यात आले. यावेळी योगशिक्षिका वैजंती गौरकार आणि कविता मंघानी यांनी उपस्थितांना योगाचे प्रात्याक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे संचालन मंगला घोगी आसुटकर यांनी केले. कार्यक्रमाला क्रीडा अधिकारी मनोज पंधराममोरेश्वर गायकवाडनंदू आवारेतालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरेजयश्री देवकरसंदीप उईकेविजय ढोबाळे यांच्यासह पतंजली योग समितीचे इतर सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चांगले व निरोगी आयुष्य योगामुळे शक्य : आमदार किशोर जोरगेवार

 आज 11 वा आंतराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करीत आहोत. देशाच्या पंतप्रधानांनी योगाचे महत्व जगाला पटवून दिलेत्यामुळेच याला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. अनादी कालापासून भारतात योग सुरू असून याला अनन्यसाधारण महत्व आहे. चांगले आयुष्य केवळ योगामुळेच मिळू शकते. कोणत्याही आजारावर नियंत्रण मिळवायचे असेल किंवा मनाच्या शांतीसाठी योगा करणे आवश्यक आहेअसे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

उपस्थितांनी केली ही आसने : कपालभारती प्राणायामअनुलोमविलोमब्राभरी प्राणायामवज्रासनस्कंदसंचालनस्कंदस्थलांतरणस्कंदचक्रघुटनासंचालनताडासनवृक्षासनपादअष्टासनअर्धचक्रासनत्रिकोनासनदंडासनभद्रासनवज्रासनअर्धवज्रासनउत्तंगासनवक्रासनभुजंगासनअर्धहलासनपवनउत्तासनशवासन आदी आसने करण्यात आली.

००००००

पालकमंत्र्यांच्या हस्ते सहा वाहनांचे लोकार्पण




 

पालकमंत्र्यांच्या हस्ते सहा वाहनांचे लोकार्पण

चंद्रपूरदि. 21 : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सहा वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या वाहनांचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले.

नियोजन भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवारमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहपोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शनअतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारेनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारउपविभागीय अधिकारी संजय पवारअजय चरडेरविंद्र मानेतहसीलदार विजय पवारप्रकल्प अधिकारी विकास राचेलवारजिल्हा नियोजन अधिकारी संजय कडूसुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारीउपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनात्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली स्वरुपात नवीन वाहने खरेदी करण्यास शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार एकूण सहा महिंद्रा बोलेरो न्युओ या वाहनांची खरेदी करून सदर वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. ही वाहने चंद्रपूरगोंडपिपरीमुलवरोरा येथील उपविभागीय अधिकारी तथा राजुरा आणि कोरपना येथील तहसीलदारांना देण्यात येणार आहे.

000000

प्रशिक्षणाच्या माध्यमातून नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे





 

प्रशिक्षणाच्या माध्यमातून नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

चंद्रपूरदि. 21 : पावसाळ्यात उद्भवणारी पूर परिस्थिती व इतर आपत्ती वेळी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावीयाबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच चंद्रपूर तालुका प्रशासनाच्या वतीने लोहारा येथील तलावावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणाला अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारेउपविभागीय अधिकारी संजय पवारतहसीलदार विजय पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी नागरिकांना सीपीआरनैसर्गिक आपत्तीमध्ये घ्यावयाची दक्षता याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन दलातर्फे प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. सदर प्रशिक्षणाचा लाभ गावातील नागरीक तसेच तालुक्यातील पोलीस पाटीलइतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीसरपंचतलाठीमंडळ अधिकारीकोतवालग्रामसेवककृषी सहायकआशा सेवकिाआपदा मित्रआपदा सखीपट्टीचे पोहणारे नागरिक यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख व त्यांच्या टीमने सहकार्य केले.

000000