Search This Blog

Wednesday 20 November 2019

बालहक्क रक्षण बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती

चंद्रपुर जिल्हयातील ४२ गावांचा समावेश२८ नोव्हेंबर पर्यंत चालनार कार्यक्रमचंद्रपूर, 19 नोव्हेंबरमहाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान आणि संयुक्त राष्ट्रांचा बाल आपत्ती निधी - युनिसेफ भारत शाखा यांच्या वतीने बालहक्क रक्षण  हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून एक विशेष मोहीम हाती घेतली आहे.महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यां तील ८५० गावांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ४२ गावामध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये  चालणारी ही मोहीम लोकांना बालहक्क रक्षणाचे आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्व याबद्दल माहिती देईल.  बालदिनाचे औचित्य साधत या मोहिमेचा तिसरा आणि शेवटचा टप्पा १४ नोव्हेंबरला सुरु होऊन २८ नोव्हेंबरला संपणार आहे.
            या दोन आठवड्यांच्या कालावधी मध्ये मुलांसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबा बत आढावा घेण्यात
  येणार आहेविद्याथ्र्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात येतीलगावातील बालगटकिशोरगटमहिला मंडळबालसभा यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  तसेच या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगितले जातील आणि असे विवाह रोखण्यासा ठीच्या कायद्यांची आणि इतर उपाययोज नांची माहिती दिली जाईल. बालविवाह कसे घातक असतात आणि असा एखादा विवाह होत असेल तर त्याची माहिती सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षित केले जाईल. या मोहिमेचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट ला सुरु झाला. या टप्प्यात अगदी तळागाळा तील गावक-याना  समस्यांची माहिती दिली  व यासाठी ग्रामस भा भरविल्या गेल्या .अशा सभां मध्ये बालहक्कांचे प्रभावीपणे रक्षण करण्यासंबंधीचे ठराव संमत केले.   तर दुसरा टप्पा ११ ऑक्टोबर ला म्हणजे आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी सुरु झाला. यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ‘ या योजनेच्या अमल बजावणीवर लक्ष केंद्रित केले गेले. बालविवाह या समस्येशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शाळांमध्ये बैठका घेतल्या  तसेच बचतगट कार्यकत्र्यांशी बालविवाह समस्येविषयी चर्चा केली. युनिसेफचे अधिकारीही या प्रक्रियेत सहभागी झाले आणि गावकèयांना याविषयीचे महत्व पटवून दिले.
0000

No comments:

Post a Comment