Search This Blog

Wednesday, 20 November 2019

सैनिकी स्कूल येथे स्थानिक प्रशासकीय मंडळाची प्रथम बैठक


चंद्रपूर, दि. 20 नोव्हेंबर : देशातील 29 वी सैनिकी शाळा चंद्रपूर जिल्ह्यात सुरू करण्यात आली असून या शाळेच्या स्थानिक प्रशासकीय मंडळाची प्रथम बैठक दिनांक 21 नोव्हेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रामुख्याने एअर मार्शल आर. के. एस. शेरा, एअर वाईस मार्शल बी. मानिकंटन, खासदार सुरेश धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर व इतर सदस्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सैनिकी शाळेचे प्राचार्य स्क्वार्डन लीडर नरेश कुमार यांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील  विसापूर येथे देशातील 29 वी सैनिकी शाळा स्थापन करण्यात आली असून या शाळेमध्ये एकूण 180 विद्यार्थ्यांना यावर्षी प्रथमच प्रवेश देण्यात आलेला आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून सैनिकी शाळेची भव्य दिव्य वास्तू व परिसर डोळ्याचे पाळणे फिटणारा आहे. या सैनिकी शाळेच्या प्रशासनिक मंडळाची प्रथम बैठक दिनांक 21 नोव्हेंबर 2019 या दिवशी पार पाडण्यात येणार असून या बैठकीला प्रमुख्याने एअरमार्शल आर. के. एस. शेरा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते विद्यार्थी तसेच सैनिकी शाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच स्थानिक प्रशासकीय मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. यादरम्यान ते स्थानिक प्रशासकीय मंडळांच्या सदस्यासोबत शाळेच्या शैक्षणिक विकासासंदर्भात चर्चा करणार आहेत. सोबतच संपूर्ण शाळेचा फेरफटका मारून शाळेच्या बांधकामाविषयीचा आढावा घेणार आहेत.
00000

बालहक्क रक्षण बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती

चंद्रपुर जिल्हयातील ४२ गावांचा समावेश२८ नोव्हेंबर पर्यंत चालनार कार्यक्रमचंद्रपूर, 19 नोव्हेंबरमहाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान आणि संयुक्त राष्ट्रांचा बाल आपत्ती निधी - युनिसेफ भारत शाखा यांच्या वतीने बालहक्क रक्षण  हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून एक विशेष मोहीम हाती घेतली आहे.महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यां तील ८५० गावांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ४२ गावामध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये  चालणारी ही मोहीम लोकांना बालहक्क रक्षणाचे आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्व याबद्दल माहिती देईल.  बालदिनाचे औचित्य साधत या मोहिमेचा तिसरा आणि शेवटचा टप्पा १४ नोव्हेंबरला सुरु होऊन २८ नोव्हेंबरला संपणार आहे.
            या दोन आठवड्यांच्या कालावधी मध्ये मुलांसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबा बत आढावा घेण्यात
  येणार आहेविद्याथ्र्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात येतीलगावातील बालगटकिशोरगटमहिला मंडळबालसभा यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  तसेच या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगितले जातील आणि असे विवाह रोखण्यासा ठीच्या कायद्यांची आणि इतर उपाययोज नांची माहिती दिली जाईल. बालविवाह कसे घातक असतात आणि असा एखादा विवाह होत असेल तर त्याची माहिती सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षित केले जाईल. या मोहिमेचा पहिला टप्पा १५ ऑगस्ट ला सुरु झाला. या टप्प्यात अगदी तळागाळा तील गावक-याना  समस्यांची माहिती दिली  व यासाठी ग्रामस भा भरविल्या गेल्या .अशा सभां मध्ये बालहक्कांचे प्रभावीपणे रक्षण करण्यासंबंधीचे ठराव संमत केले.   तर दुसरा टप्पा ११ ऑक्टोबर ला म्हणजे आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी सुरु झाला. यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ‘ या योजनेच्या अमल बजावणीवर लक्ष केंद्रित केले गेले. बालविवाह या समस्येशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शाळांमध्ये बैठका घेतल्या  तसेच बचतगट कार्यकत्र्यांशी बालविवाह समस्येविषयी चर्चा केली. युनिसेफचे अधिकारीही या प्रक्रियेत सहभागी झाले आणि गावकèयांना याविषयीचे महत्व पटवून दिले.
0000

ओबीसी प्रवर्गातील युवकाकरिता कर्ज पुरवठा योजना

चंद्रपूर, 19 नोव्हेंबर: महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीने लघुउद्योगाकरिता ओबीसी प्रवर्गातील युवक आणि युवतीसाठी स्वयंरोजगाराकरिता अत्यल्प व्याजदराने कर्जपुरवठा योजना सुरू करण्यात आली असून याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
ओबीसी प्रवर्गाकरिता विविध कर्जपुरवठा योजना शासनाच्यावतीने राबविण्यात येत असून त्यामध्ये विना व्याज असलेली लक्ष रुपयेची थेट कर्जयोजना राबवली जात असून कर्ज परतफेडीची मुदत चार वर्षे आहे. तसेच बीज भांडवल योजनेअंतर्गत लाख पर्यंतचे प्रकल्पास मंजुरी देण्यात येत असून कृषी व संलग्न व्यवसायवाहतूक क्षेत्राची संबंधित व्यवसाय तसेच पारंपारिक लघुउद्योगासाठी कर्ज देण्यात येणार आहे. मंजूर कर्ज रकमेच्या टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ व 75 टक्के बँकेचा सहभाग असणार आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबवली जात असून मागासवर्गीय प्रवर्गातील कुशल व्यावसायिक व्यक्तींना व्यवसायाकरिता 10 लक्ष रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत असून बचत गटभागीदारी संस्थासहकारी संस्थाकंपनीफार्मर प्रोड्यूसर कंपनी अशा संस्थांना बँकेमार्फत उद्योग उभारणीकरिता कर्जपुरवठा करण्यात येणार असून या योजनांचा लाभ मिळण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींनी वित्त आणि विकास महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क करावाअसे आवाहन करण्यात आले आहे.
00000

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिन


चंद्रपूर, 19 नोव्हेंबर: भारताच्या माजी प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज दिनांक 19 नोव्हेंबर 2019 रोजी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ घेण्यात आली.
भारताच्या माजी प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरी केली जाते. आज जिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकात्मतेची शपथ घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
0000

गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनाला नवा आयाम मिळते हे दाखवून द्या : जिल्हाधिकारी



  • प्रगतिशील शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची दोन तास चर्चा 
  • सोयाबीन खरेदी पासून अनेक विषयांवर तातडीने घेतले निर्णय
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. १८ नोव्हेंबर : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांसोबत दोन तास चर्चा केली. गटशेतीला बळकटी देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर बैठकीतच त्यांनी निकाली काढले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना लगेच वाचा फोडली.        
            यावेळी शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचताना आर्थिक लाभाचा फायदा विलंबाने मिळणे हा मोठा अडथळा असल्याचे शेतकऱ्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे कृषी विभाग व अन्य विभागांनी शेतकऱ्यांच्या योजना राबविताना वेळेचे बंधन पाळावेअसे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.
            कोणतीही योजना ही वेळेत मोबदला मिळाल्यास यशस्वी ठरते.मात्र अनेक योजनांच्या बाबतीत उशिराने शेतकऱ्यांना लाभ मिळत असेल तर ती योजना लोकप्रिय ठरू शकत नाही. त्यामुळे कृषी विभागाने काल मर्यादा आखून कामांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
            जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे अध्यक्षतेखाली व विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात गटशेती योजनेची ही सभा पार पडली. सभेस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटीलउपविभागीय कृषी अधिकारी चंद्रपूर रवींद्र मनोहरेउपविभागीय कृषी अधिकारी नागभीड दिगंबर तपासकरउपविभागीय कृषी अधिकारी वरोरा जाधव कृषी अधिकारी गणेश मादेवार व गटाचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
            या सभेत जिल्हाधिकारी यांनी सर्व मंजूर गटांना गटशेतीमधून एकूण देय अनुदानाच्या 15 टक्के पर्यंत अनुदान गटांना तात्काळ वितरित करण्याच्या सूचना दिल्या. ज्या गटांचे सविस्तर प्रकल्प आराखडे मंजूर नाहीत अश्या गटांच्या संबंधित उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी दिवसात गटांचा आढावा घेऊन सुधारीत सविस्तर प्रकल्प आराखडे जिल्हा स्तरीय समितीस सादर करण्याचे सूचना दिल्यात.
            उपस्थित गटाच्या अध्यक्ष व सचिवांनी त्यांच्या कृषी विभागातील विविध योजनेच्या अनुषंगाने असलेल्या अडचणी सांगितल्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अडचणी सोडविण्याचा उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतोहे आपण सर्वांनी दाखवून द्यावे ,असे आवाहन यावेळी उपस्थित प्रगतशील शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केले. 
            ज्या गटांनी कर्ज प्रकरणासाठी बँकेत प्रस्ताव सादर केला अश्या गटांनी ती माहिती कार्यालयास कळविण्यास सांगितले. जेणेकरून त्या संबंधात बँकांचा आढावा घेण्यात येईल. विभागीय कृषी सहसंचालक यांनी गटांना ज्या बाबी आवश्यक आहेत त्याच बाबी आराखड्यात घ्यावे व गरज वाटल्यास गटाचा आराखडा सुधारित करावा,अश्या सूचना उपस्थितांना दिल्यागटांना गट पुढे नेण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न व मदत करण्याचे आश्वासन  जिल्हाधिकारी यांनी दिले.
            या बैठकीला युवक बिरादरी बहुउद्देशिय शेतकरी बचत गटमुलअशोक जैरामजी गायकवाडअध्यक्षअन्नपुर्णा स्वयंसहाय्यगिरगावमधुकर गोविंदा श्रीरामेसचिवअन्नपुर्णा स्वयंसहाय्यगिरगावपुरूषोत्तम दादाजी बोरकरसदस्यअन्नपुर्णा बचत गटसुनिल भोलानाथजी सोनवणेसदस्यअन्नपुर्णा स्वयंसहाय्य गिरगावरितेश येनप्रेड्डीवारयुवक बिरादरी शेतकरी गट मुलराजल्ला वाभिटकरशेतकरी मित्र बचत गट खिरडीसुधाकर जिवतोडेकिसानपुत्र शेतकरी स्वयंसहाय्य गट नंदोरीनरेंद्र नानाजी जिवतोडे,  किसानपुत्र शेतकरी स्वयंसहाय्य गट नंदोरीआबाजी ढुमणेकृषी मित्र बचत गट सिंदीपलिंद्र सातपुतेउमळपेठ फार्मर्स प्रा. कंपणी उधळपेठतात्यासाहेब रामराव मत्तेवंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामीण विकास गटकान्सा ता. भद्रावतीभाऊजी शंकर जाबोरअन्नदाता शेतकरी बचत गटसुब्बई ता. राजुराश्री. गुरूदेव ग्रामीण विकास संस्थानेदमापेठचिमुर फारर्मस प्रोडूसर कंपणी लिमी. चिमूरसंदीप कुटेमाटेउन्नती शेतकरी पुरूष बचत गट पिपरीहेमंत बोबडेउन्नती शेतकरी पुरूष बचत गटपिपरीए. एस. धनविजयसंजय एस येनुरकरकृषि विकास शेतकरी बचत गटगडिसुर्ला यांची उपस्थिती होती.
00000