Search This Blog

Monday, 14 October 2024

पर्यावरणपुरक ई-बस सेवा दळणवळणाचे उत्तम साधन बनेल

 





पर्यावरणपुरक ई-बस सेवा दळणवळणाचे उत्तम साधन बनेल

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

Ø पीएम ई-बससेवेंतर्गत इलेक्ट्रिक बस डेपोचे भूमिपूजन

चंद्रपूरदि. 14 :  जिल्ह्यातील जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांसारख्या पर्यायी इंधनांवर धावणाऱ्या वाहनांचा वापर करून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. त्यासाठीच चंद्रपूर शहर महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. शासनाने चंद्रपूरला 50 ई-बस देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पर्यावरणपुरक ई-बस दळणवळणासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी उत्तम साधन बनेलअसा विश्वास राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने केंद्र पुरस्कृत पी.एम. ई -बस सेवा योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बस डेपोचे भुमिपूजन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवालअतिरिक्त आयुक्त चंदन पाटीलउपयुक्त मंगेश खवलेमहाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळाचे सदस्य प्रकाश धारणेसुभाष कोसनगोट्टूवाररामपाल सिंगनामदेव डाहुलेरवींद्र बेलावे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रपूरमध्ये एखाद्या प्रकल्पाचे भुमिपूजन किंवा उद्घाटन होते, तेव्हा मनस्वी आनंद होतो. चंद्रपूरचे नाव देशात अग्रेसर असले पाहिजेयासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. या गावात एखादी योजना मंजूर झाली कीत्याचा लाभ या गावातीलशहरातील व जिल्ह्यातील नागरिकांना होतोअसे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा उल्लेखही केला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन अकादमीला थ्री स्टार नामांकन मिळाले आहे. सोबतच बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थाकॅन्सर केअर हॉस्पिटलसैनिक स्कूलएसएनडीटी विद्यापीठ आदी बाबी येथे उत्तमरित्या साकारण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ताडोबा व्याघ्र प्रकल्प आपल्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाची आपली जबाबदारी वाढली आहे.

केंद्र सरकारने चंद्रपूर शहरात शहरात 50 ई-बसला परवानगी दिली आहे. बस डेपोई- चार्जिंग व्यवस्था येथे निर्माण करण्यात येत आहे. बस डेपोच्या परिसरात बचत गट आणि शेतक-यांच्या उत्पादित मालासाठी सुसज्ज बाजारहाटप्रशिक्षण व्यवस्थासंकुल व्यवस्थाफूड कोर्ट आदी बांधण्यात येणार आहे. भविष्यात हा परिसर शहराचा मुख्य केंद्रबिंदू ठरणार असून बसस्टेशन आणि बाजार यादरम्यान रस्ता करण्याचे नियोजन आहे. जेणेकरून बचत गट आणि शेतकऱ्यांनी आणलेला माल बस स्थानकातून बाजारामध्ये येईल व पुढे ग्राहकसुद्धा येथून माल खरेदी करून शहरबस सेवेचा वापर करून आपापल्या गावी जातीलअसेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणालेई -बस सेवा हा चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. शाळादवाखाना व इतर ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना याची सुविधा होईल. पर्यावरणाच्या दृष्टीने एक चांगला उपक्रम असून पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे.

 प्रास्ताविकात महापालिका आयुक्त विपिन पालीवालम्हणाले इलेक्ट्रिक बस सेवा ही शहरासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. सदर बस सेवा सुरू करण्याची नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे नागरिकांची ही अडचण दूर झाली आहे. 10 कोटींच्या निधीतून हा प्रकल्प साकारण्यात येणार असून ई -बस सेवेसाठी चंद्रपूरच्या 25 किलोमीटर परिसराचा विचार या करण्यात आला आहे. सदर इलेक्ट्रिक बस 18 मार्गावर चालणार आहेअसे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले तर आभार महानगरपालिका उपायुक्त मंगेश खवले यांनी मानले.

००००००

No comments:

Post a Comment