Search This Blog

Monday 19 March 2018

शेतमाल निर्यातीतून मिळवा समृद्धी, निर्यात प्रक्रिया झाली सोपी : निर्यातवृद्धीसाठी अनेक योजना


चंद्रपूरदि.17 मार्च-  शेतमाल निर्यातीबाबतच्या कायद्यातील किचकटपणा दूर होवून नियम सोपे झाले आहेत. निर्यात प्रक्रियेत सुसत्रता आली आहे. सर्वसामान्य शेतकरीही आता अतिशय सोपेपणाने आपला शेतमाल निर्यात करु शकतो. निर्यातीविषयक गैरसमज दूर सारुन शेतकऱ्यांनी निर्यातदार व्हावे आणि शेतमालाला चांगली बाजारपेठ व दर मिळवावेतअसे आवाहन विदेश व्यापार महासंचलनालयाचे (डीजीएफटी) उपमहासंचालक संभाजी चव्हाण यांनी केले.
ग्रोव्हिजन फाउंडेशन (नागपूर)प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चंद्रपूर   संयुक्त महासंचालक विदेश व्यापार (नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतमाल निर्यात संधी कार्यशाळा व महाराष्ट्र कृषि विकास प्रकल्पांतर्गत खरेदीदार-विक्रेते संमेलनाचे उद्घाटन श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. डीजीएफटीचे सहाय्यक उपमहासंचालक अनुपम कुमार, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकरजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. ए. आर. हसनबादेकृषी उपसंचालक श्री. तपासकर, ग्रोव्हिजन फाउंडेशनचे संतोष डुकरेस्नेहा आईल मिलचे कावडकर, मालु दाल मिलचे अधिकारी व पतजंली कंपनीचे विपणन अधिकारी अश्विन मुसळे हेäþ व्यासपिठावर उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणालेशेती फक्त हिरवी असून उपयोग नाही. उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन करणेत्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ व योग्य मल्य मिळवणे महत्वाचे आहे. यासाठी निर्यात हे महत्वाचे साधन आहे. मात्र निर्यात म्हणजे खुप किचकट गोष्टत्यासाठी खुप परवाने लागतातविदेशातले खरेदीदार पैसे बुडवतात अशा गैरसमजांमुळे सर्वसामान्य शेतकरी त्यापासून दूर राहतात. प्रत्यक्षात निर्यातीची प्रक्रिया खुप सोपी असून त्यासाठी परवाने लागत नाहीतआर्थिक संरक्षणापासून शासकीय योजनांपर्यंत अनेक प्रकारचे लाभही उपलब्ध आहेत. शेतकरी गटशेतकरी उत्पादक कंपन्यांनी याचा लाभ घेणे गरजेचे आहे.
निर्यातक्षम उत्पादन व निर्यातीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेक प्रकारे सहाय्य करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे स्वतंत्र निर्यात धोरणही लवकरच येणार आहे. यासाठी केंद्रामार्फत सहकार्य करण्यात येत आहे. येत्या दोन वर्षात निर्यात 60 लाख कोटींपर्यंत वाढविण्याचे उद्दीष्ट आहे. पर्वी अर्थव्यवस्था कृषीप्रदान होतीआता अर्थव्यवस्था कृषीप्रधान न राहता लोकसंख्या कृषीप्रधान झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पन्नवाढीसाठी निर्यातीतील संधींचा अधिकाधिक लाभ घेण्याची गरज आहेअसे मत श्री. चव्हाण यांनी व्यक्त केले. देशाचे  शेतमाल निर्यात धोरणनिर्यात प्रक्रियाशेतकऱ्यांनी निर्यातदार, कसे व्हावे आदी बाबींविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
अनुपम कुमार यांनी शेतमालाची वैशिष्ट्येब्रॅन्डिंगपरकीय ग्राहक कसे शोधावेतदर निश्चितीनिर्यातीचे टप्पेत्यासाठी उपलब्ध असलेली संकेतस्थळे यांची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. आपला शेतमाल किंवा उत्पादने विक्रीसाठी कधी उपलब्ध असतातत्या वेळी कोणत्या देशातील खरेदीदारांची मागणी असते व त्यांना कोणत्या गुणवत्तेची उत्पादने आवश्यक असतात हे लक्षात घेवून निर्यातीचे नियोजन करावे,चंद्रपूरमधील सेंद्रीय शेतमाल उत्पादकतांदूळडाळी उत्पादकउद्योजक यांना सहजपणे विदेशातील बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. शेतकरी उत्पादक कंपन्या व व्यवसायिकांनी पुढाकार घेतल्यास यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईलअशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. विद्या मानकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमाल उत्पादनाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील तांदुळकडधान्ये उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळण्याची गरज आहे. जिल्ह्यात 48 शेतकरी गट व 15 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेतमात्र अद्याप त्या बाल्यावस्थेत आहेत. ही बाल्यावस्था लवकरात लवकर संपविण्याची गरज आहे. काही गटांनी शेतमालाची जिल्ह्याबाहेर विक्री करण्यास सुरवात केली आहे. या सर्वांसाठी निर्यात हा उत्पन्नवाढीसाठी महत्वाचा उपाय ठरु शकतो. आत्मा मार्फत शेतकऱ्यांना निर्यातक्षम उत्पादनासाठी व विक्री व्यवस्था बळकट कऱण्यासाठी शेतकऱ्यांना पाठबळ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी सेंद्रीय शेतमाल उत्पादन करत आहेत. त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी पतंजली समुहाशी जोडणी करण्याचा प्रयत्न आहे. सेंद्रीय तांदुळडाळी ही आपली कस्तुरी आहेहे ओळखून शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पाणी व इतर साधन सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. बाजारपेठाही उपलब्ध आहेत. कृषी विभागामार्फत यंदा 60 कोटी रुपयांची अवजारे उपलब्ध करण्यात आली आहेत. ठिबक व तुषार सिंचनासाठी दोन कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. योजनानिधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत मात्र त्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याची स्थिती आहे. भाजीपाला उत्पादनसंरक्षित शेतीफळबागा या सर्वात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या संधी आहेतबाजारपेठही उपलब्ध आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावाअसे आवाहन डॉ. ए. आर. हसनाबादे यांनी केले. स्नेहा आईल मिलचे कावडकर, मालु दाल मिलचे अधिकारी व पतंजली कंपनीचे विपणन अधिकारी अश्विन मुसळे यांनी आपल्या कंपनीचे खरेदीविषयक धोरण सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष डुकरे यांनी केले तर विशाल घागी यांनी सत्रसंचालन व आभार मानले.
                                                          0000

No comments:

Post a Comment