Search This Blog

Monday 11 June 2018

खरीप पिकासाठी बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही बँकेत पोहोचलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला तातडीने कर्ज उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांची निर्देश

चंद्रपूर दि. 6 जून: जूनचा पहिला आठवडा सुरू झाला असून शेतकरी पेरणीसाठी तयार आहे.अशावेळी पीक कर्जासाठी राष्ट्रीयीकृत व खाजगी कुठल्याही बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये. काही बँका संदर्भात तक्रारी आल्या असून कोणत्याही कारणाशिवाय तातडीने शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी आज दिले.
           जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या आज बैठकीमध्ये सर्व बँक प्रतिनिधींना  कठोर शब्दांमध्ये याबाबतची निर्देश देण्यात आले. काही बँकांमध्ये कर्ज वाटप करत असताना नियमित,अरे बाबा चलेगा की नाही तू चंद्रपुर मार्गअनियमित कर्जदार, सातबारा किंवा अन्य कागदपत्रे नसणे, कर्जमाफीच्या वेगवेगळ्या टप्प्यातील थकबाकी असणे, नव्या कर्जदाराला प्राधान्य देणे अशा पद्धतीच्या तक्रारी जिल्ह्याच्या काही भागातून आल्या. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंतही अशा काही ठिकाणच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आज तातडीने जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात पाचारण करण्यात आले होते. राज्य शासनाने 2018-19 या वर्षासाठी कर्जवाटप आराखडा यापूर्वीच तयार केला आहे.. जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून चंद्रपूर जिल्ह्याला पीक कर्जाचे 1036.26 कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा असताना शेतकर्‍यांना कर्ज देण्यासाठी कोणतेही कारण सांगितले जाणे योग्य नसल्याचे सचिन कलंत्रे यांनी बजावून सांगितले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर उपस्थित होत्या. याशिवाय सर्व उपविभागीय अधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत या हंगामात पीक कर्ज मिळण्यापासून वंचित  राहावे लागणार नाही याची काळजी घ्यावी ,असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व महापौर अंजलीताई घोटेकर यांनी केले.

          शेतकऱ्यांनी देखील कोणतीही बँक कर्ज देण्या मध्ये अडचण निर्माण करत असेल ,महसूल विभागाच्या कागदपत्रांसाठी कर्ज नाकारत असेल तर शेतकऱ्यांनी तालुका उपनिबंधक तहसीलदार यांची भेट घ्यावी. जिल्ह्यातल्या सर्व महसूल यंत्रणेला शेतकऱ्यांना या वेळी कर्ज भेटण्यात कुठलीही अडचण जाऊ नये यासाठी निर्देशित करण्यात आले आहे. त्यामुळे सातबारा किंवा तत्सम कुठल्याही कारणास्तव कुठलीही बँक अडचण निर्माण करत असल्यास शेतकऱ्यांनी हताश न होता महसूल विभागाची मदत घ्यावी,असेही जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी स्पष्ट केले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील पिक कर्ज वाटपामध्ये प्रत्येक बँकेने 100% शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाले पाहिजे. हे लक्ष्य घेऊन काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यासंदर्भातील कोणत्याही तक्रारी बँकेमार्फत येऊ नये असे, महापौर अंजली घोटेकर यांनी स्पष्ट केले. या बैठकीला काही शेतकरी प्रतिनिधीही उपस्थित होते. जिल्हाभरातील काही बँकांमार्फत वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांची विभागणी करून कर्ज वाटप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी बँक प्रतिनिधींसोबत संवाद साधताना पेरणीच्या दिवसांमध्ये सर्वांना एक सोबत पेरणी करावी लागत असल्याने बँकेने अशाप्रकारे कोणावरही अन्यायाची भूमिका घेऊ नये. सर्वांना समानतेने व शासन निर्णयानुसार कर्ज वाटप करावे असे स्पष्ट केले. सोबतच  बँकेत येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची नोंद घेण्याचे निर्देश दिले
0000

No comments:

Post a Comment