Search This Blog

Thursday, 30 January 2020

चांदा ते बांदा योजनेतुन महिलांना मिळाला आधार : अलकाताई आत्राम


पोंभुर्णा येथे चांदा ते बांदा मार्गदर्शन मेळावा
चंद्रपूर, दि. 30 जानेवारी :जिल्ह्यातील शेतकरी सुशिक्षित बेरोजगार महिला उद्योग व्यवसाय व जोडधंदा करू इच्छिणाऱ्या युवक-युवती साठी चांदा ते बांदा योजनेच्या उपयोगिता व त्यातील मिळणाऱ्या लाभाच्या घटकांना समजून घेण्यासाठी पंचायत समिती सभागृह, पोंभुर्णा येथे 30 जानेवारी रोजी चांदा ते बांदा योजनेच्या मार्गदर्शन मेळाव्याचे जिल्हा प्रशासनाच्या मार्फत तसेच चांदा ते बांदा  जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष व जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर यांच्या माध्यमातून  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी सुरू करण्यात आलेली चांदा ते बांदा योजना नाविन्यपूर्ण असून या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती अलकाताई अत्राम यांनी केले.
चांदा ते बांदा या योजनेतून महिला आर्थिक विकास महामंडळ व रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून महिलांना कारपेट सतरंजी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचा असून आतापर्यंत पाचशे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगार मिळाला असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे, असे मार्गदर्शन चांदा ते बांदा कार्पेटचे प्रशिक्षक मनीष द्विवेदी यांनी यावेळी केले.
कृषी विस्तार अधिकारी शेंडे यांनी संबोधित करताना, कृषी आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून या घटकाचा विकास करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन याठिकाणी केले.  सर्व ग्रामपंचायतीमध्ये कृषी ग्रंथालय स्थापन करून यामध्ये शेती संदर्भातील सर्व माहिती पुस्तिका ठेवण्यात आलेली आहे.
बचत गटातील महिलांना चांदा ते बांदा योजना व कार्पेट, सतरंजी युनिट यामुळे उत्पन्नाचे साधन निर्माण झाले, असे मार्गदर्शन सीएमआरसी व्यवस्थापक वंदना बावणे यांनी केले.
या मेळाव्याचे उद्घाटन पंचायत समिती सभापती अलकाताई आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसभापती पंचायत समिती पोंभूर्णा ज्योतीताई बुरांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, नायब तहसीलदार जि.एच.रणदिवे     गटविकास अधिकारी धनंजय साळवे तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक पशुधन विस्तार अधिकारी पी. एस. दामले, उमेद अभियान समन्वयक राजेश दुधे, चांदा ते बांदा कार्पेट प्रशिक्षक मनीष द्विवेदी, सी.एम. आर. सी व्यवस्थापक वंदना बावणे, कृषी विस्तार अधिकारी शेंडे, टाटा ट्रस्टचे आकाश वासमवार, महिला आर्थिक महामंडळचे गट सदस्य राजश्री भांडेकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे सुधीर आत्राम, नामदेव शेवाळे, सुभाष नगारे, संचालन संजय मेकर्तीवार तर आभार प्रदर्शन विजय जाधव यांनी केले.
000000

No comments:

Post a Comment