Search This Blog

Tuesday 15 June 2021

जिल्ह्यात 137 कोरोनामुक्त

 

जिल्ह्यात 137 कोरोनामुक्त, 58 पॉझिटिव्ह तर 5 मृत्यू

चंद्रपूर,दि.15जून : गत 24 तासात जिल्ह्यात 137 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 58 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 5 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

बाधित आलेल्या 58 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 3, बल्लारपूर 5, भद्रावती  1, ब्रम्हपुरी 1 , नागभिड 0, सिंदेवाही 1, मूल 2, सावली 0, पोंभूर्णा 4, गोंडपिपरी 0, राजूरा 2, चिमूर 0, वरोरा 3, कोरपना 12, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 20  रुग्णांचा समावेश आहे.

आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड येथील 75 वर्षीय महिला, 42 वर्षीय महिला, बल्लारपूर तालुक्यातील राजेंद्र प्रसाद वार्ड येथील 72 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील आंबेडकर वार्ड  येथील 49 वर्षीय पुरुष तर गडचिरोली जिल्हयातील आरमोरी येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 301 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 81 हजार 997 झाली आहे. सध्या 797 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 22 हजार 256 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 34 हजार 893 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 1507 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1393, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 42, यवतमाळ 52, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment