Search This Blog

Thursday 10 June 2021

स्वाभिमान योजनेअंतर्गत जमिन खरेदीचे प्रस्ताव सादर करावे.

 स्वाभिमान योजनेअंतर्गत जमिन खरेदीचे प्रस्ताव सादर करावे.

चंद्रपूर,दि. 10 जून : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या दारिद्ररेषेखालील भूमिहीन कुटुंबाना कायमचे उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा यासाठी त्यांना कसण्याकरिता 4 एकर जिरायती किंवा 2 एकर बागायती जमीन उपलब्ध करून द्यावयाची आहे. तरी जिल्ह्यातील गैर आदिवासी कुटुंबाकडून शेतजमीन खरेदी करावयाची असून विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून सन 2020-21 करिता अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव कार्यालयास सादर करावे असे आवाहन, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, अमोल यावलीकर यांनी केले आहे

इच्छुक शेतकरी, जिरायत जमीन चार एकर व बागायती जमीन दोन एकर विक्री करण्यास तयार असल्यास समंती पत्रासह पटवारी साझानिहाय अर्ज जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील किंवा वाटाघाटी करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मुल्य निश्चित करण्यात येईल. अर्जासोबत जमिनीचा ७/१२, गाव नमुना आठ, परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी किंवा कर्ज बोजा नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र, अर्जदाराचे कुटुंबातील सख्खे भाऊ, पत्नी, मुले यांचे जमीन विकण्यासंबंधी ना-हरकत व सम्मती प्रमाणपत्र, विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याची मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल, शेतजमीन विक्री प्रस्ताव समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही. जमिनीच्या खरेदी प्रक्रीयेमुळे कोणतीही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत तसेच जमीनीबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरु नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे 100 रुपये स्टॅम्प पेपरवर शपथपत्र व हमीपत्र जोडण्यात यावे.

सदर प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये पाठविण्यात यावे किंवा प्रत्यक्ष दि. 30 जून 2021 पर्यंत संपर्क साधावा असे चंद्रपूर,समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment