Search This Blog

Friday 25 June 2021

अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा


अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा

Ø 12 प्रकरणे निकाली

चंद्रपूर,दि. 25 जून : शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणीची बैठक अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या 28 प्रकरणांवर चर्चा झाली. यापैकी 12 प्रकरणे पात्र करून मदतीकरीता निकाली काढण्यात आली तर 12 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली. चार प्रकरणे फेरतपासणीकरीता तालुकास्तरीय समितीला पाठविण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, तहसीलदार यशवंत धाईत, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अजय वाहाणे, कृषी कार्यालयाचे गजानन हटवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनिल वानखेडे, डॉ. मेश्राम आदी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment