Search This Blog

Thursday 17 June 2021

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांच्या वर

 


जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांच्या वर

Ø गुरुवारी एकही मृत्यु नाही, 52 कोरोनामुक्त तर 44 पॉझिटिव्ह

चंद्रपूर,दि. 17 जून : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात 84,408 जण कोरोना बाधित झाले असून यापैकी 82,112 जण कोरोनामुक्त झाले आहे. बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात 97.27 टक्के आहे.

गत 24 तासात जिल्ह्यात 52 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 44 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. बाधित आलेल्या 44 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 12, चंद्रपूर तालुका 4, बल्लारपूर 1, भद्रावती  8, ब्रम्हपुरी 0 , नागभिड 0, सिंदेवाही 1, मूल 3, सावली 1, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 2, राजूरा 2, चिमूर 1, वरोरा 3, कोरपना 3, जिवती 1 व इतर ठिकाणच्या 1 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 408 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 112 झाली आहे. सध्या 785 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 28 हजार 64 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 40 हजार 988 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1511 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment