Search This Blog

Friday 5 July 2024

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पिकस्पर्धा

 

अन्नधान्यकडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पिकस्पर्धा

चंद्रपूरदि. 5 :  राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव केल्यास आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होण्यास मदत होईल. प्रगतशील शेतक-यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना झाल्यास राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेलहा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भातज्वारीबाजरीमकानाचणी, रागीतुरसोयाबिनभुईमुंग व सुर्यफुल या  पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी : पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31जुलै तसेच भातज्वारी  बाजरीमकानाचणी, रागीतुर सोयबिनभुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी 31  ऑगस्ट आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठीर क्कम 300 रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहिल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी  शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर जमीन असणे व ती जमीन स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता  येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता स्पर्धकास स्वत:च्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर. व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर. (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. ही स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी  गटासाठी तालुका स्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य,  जिल्हा व  तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्ज कुठे करावा व अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे : 1) विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ) 2) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन 3)  सातबाराअ चा उतारा 4). जातप्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) 5) पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या  क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा  6) बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकिंत प्रत.

बक्षिसाचे स्वरुप : सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्यजिल्हा व तालुका पातळीवरील पिकनिहाय प्रथमद्वितीय व तृतीय क्रमांकाची  बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे.

            तालुका पातळीवर पहिले बक्षीस  5 हजार रुपये, दुसरे बक्षीस 3 हजार रुपये,  तिसरे बक्षीस 2 हजार रुपये आहे. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10 हजार रुपये, दुसरे बक्षीस 7 हजार रुपये,  तिसरे बक्षीस 5 हजार रुपये तर राज्य पातळीवर पहिले बक्षीस 50 हजार रुपये, दुसरे बक्षीस 40 हजार रुपये आणि तिसरे बक्षीस 30 हजार रुपये आहे. 

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभागसंकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. खरीप हंगाम सन 2024 पीक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment