Search This Blog

Thursday, 22 January 2026

गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम करिता नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा

 

गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम करिता नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा

·         दिल्लीमुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे

 नवी दिल्ली 21 : 'हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 शहिदी समागम वर्षानिमित्त  नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने  'ट्रेन ऑन डिमांडअंतर्गत मुंबईचंदीगड आणि दिल्ली (हजरत निजामुद्दीन) येथून नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसारउत्तर भारतातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावरून २३ आणि २४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता विशेष गाडी सुटेल. ही गाडी  हजरत निजामुद्दीनपानिपतआग्रा कॅन्टविरांगणा लक्ष्मीबाई झांसीबीनाभोपाळइटारसीखंडवाभुसावळजळगावछत्रपती संभाजीनगरजालनापरभणीपूर्णा मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी १६.२० नांदेडला पोहोचेल .

चंदीगड ते नांदेड (गाडी क्र. ०४५२४/०४५२३) आणि हजरत निजामुद्दीन ते नांदेड (गाडी क्र. ०४४९४/०४४९३) या दोन राखीव सुपरफास्ट विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. चंदीगडवरून २३ आणि २४ जानेवारी रोजी सकाळी ०५:४० वाजता सुटणारी गाडी अंबालापानिपतदिल्ली सफदरजंगआग्राविरांगणा लक्ष्मीबाई झाशीभोपाळइटारसीखंडवाभुसावळजळगावमनमाडछत्रपती संभाजीनगरजालनापरभणीपूर्णा मार्गे प्रवास करत दुसऱ्या दिवशी दुपारी १३:३० वाजता नांदेडला पोहोचेल.

मुंबई येथून देखील विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नांदेड दरम्यान गाडी क्र. ०१०४१/०१०४२ ही विशेष रेल्वे २३ आणि २४ जानेवारी रोजी मुंबईहून दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता नांदेडला पोहोचेल. ही गाडी ठाणेकल्याणइगतपुरीनाशिक रोडमनमाडऔरंगाबादजालना आणि परभणी या स्थानकांवर थांबेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी नांदेडवरून २४ आणि २५ जानेवारी रोजी रात्री २३:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १३:४० वाजता मुंबईला पोहोचेल. या गाडीत १८ डब्यांची रचना असून यात स्लीपरजनरल आणि एसी कोचचा समावेश असेल.

या सर्व गाड्यांच्या नियोजनामुळे पंजाबहरियाणादिल्ली आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ‘सोशल डिस्टंसिंग’ आणि सॅनिटायझेशनसह सर्व आवश्यक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असूनगाड्यांच्या सुयोग्य संचालनासाठी संबंधित विभागांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

                                                            0000

No comments:

Post a Comment