Search This Blog

Thursday, 1 January 2026

वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात कमी होण्यास मदत







वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात कमी होण्यास मदत

Ø जिल्हाधिका-यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियान – 2026 चा शुभारंभ

चंद्रपूरदि. 01 : रस्ते अपघातात होणारे मृत्यु हे मानवनिर्मित आहेअपघातांची संख्या आणि त्यात होणारे मृत्यु आपण नक्कीच कमी करू शकतोमात्र त्यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहेत्यामुळे प्रत्येक व्यक्तीसमाजशासन आणि प्रशासन मिळून जिल्ह्यात अपघातांची संख्या कमी करू याअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी केले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयवाहतूक नियंत्रण शाखा आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने जनता महाविद्यालय येथे रस्ता सुरक्षा अभियान – 2026 चा शुभारंभ करतांना ते बोलत होतेयावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमहानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेशअतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडेप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरेएस.टीमहामंडळाच्या विभागीय नियंत्रक स्मिता सुतवणेमहाविद्यायाचे प्राचार्य डॉआशिष महातळे आदी उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्व वाढले आहेअसे सांगून जिल्हाधिकारी श्रीगौडा म्हणालेआज रस्त्यांची लांबी आणि रुंदी वाढली असून त्यावर वाहनांची संख्यासुध्दा मोठ्या प्रमाणात वाढली आहेत्यामुळे अपघातही वाढलेयात कुणी जखमी होतात तर कुणाला जीव गमवावा लागतोभारतात दरवर्षी रस्ते अपघातात मृत्यु पडणा-यांची संख्या दीड लाखांच्यावर आहेहे मृत्यु आपण नक्कीच रोखू शकतोवाहतुकीचे नियम पाळले नाही तर अपघातांची संख्या वाढतेत्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहेरस्त्यावर अतिजलद जाणे टाळावेआपले जीवन अमुल्य असून 1 – 2 मिनिटांमध्येसुध्दा आपला जीव जाऊ शकतोत्यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपले मित्रपरिवारातील सदस्य व इतरांना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करावीजेणेकरून आपला जीव सुरक्षित राहू शकेलअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणालेइतर कोणत्याही रोगापेक्षा अपघातात मृत्यु होणा-यांची संख्या जास्त आहेरस्त्यावर सुरक्षित वाहन चालविणेही आपली जबाबदारी आहेकेवळ दंड आकारणे हे प्रशासनाचे ध्येय नाही तर जिवाची सुरक्षा महत्वाची आहेअसे त्यांनी सांगितलेमहानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश म्हणालेरस्ता सुरक्षा ही आपली जबाबदारी आहेलोकांमध्ये जनजागृती करण्यासाठीच प्रशासनामार्फत असे उपक्रम राबविले जातातलोकांचा सहभाग वाढला तरच रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी होईल.

अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणाले, 2024 पेक्षा 2025 मध्ये अपघात आणि त्यात होणा-या मृत्युची संख्या 7 टक्क्यांनी कमी झालीवाहन चालवितांना स्वयंशिस्त पाळली तर अपघातांची संख्या कमी होईलअपघात झाला तर टोल फ्री क्रमांक 108 किंवा 112 वर त्वरीत कॉल करावाविभागीय नियंत्रण स्मिता सुतावणे म्हणाल्यापरिवहन महामंडळाच्यावतीने सुध्दा रस्ता सुरक्षा अभियान राबविले जातेबसमध्ये विनातिकिट कुणीही प्रवास करू नयेएस.टी.चे तिकीट म्हणजे आपला 10 लाखांचा विमा असतोएसटीच्या अपघातात अपंगत्व आले तर 75 हजार ते 5 लक्ष रुपयांपर्यंत मदत दिली जातेअसेही त्यांनी सांगितलेयावेळी प्राचार्य डॉमहातळे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.

रस्ता सुरक्षा ही सामाजिक चळवळ व्हावी –किरण मोरे

प्रास्ताविकात प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे म्हणालेआजचे विद्यार्थी हे देशाचे जबाबदार नागरिक आणि वाहन चालविणारे सुध्दा आहेतरस्ते अपघात हे मानवनिर्मित आहेरस्त्यावर स्वयंशिस्त पाळली तर आपण चांगले आयुष्य जगू शकतोप्रशासनाच्या वतीने संपूर्ण वर्षभर रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती करण्यात येतेरस्ता सुरक्षा ही सामाजिक चळवळ करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावेअसे आवाहन त्यांनी केले.

अपघातात प्राण वाचविणा-या जीवनदुतांचा सन्मान : अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना त्वरीत रुग्णालयात नेण्यासाठी मदत करणा-या जीवनदुतांचा यावेळी सन्मान करण्यात आलायात अफरोज नासीर पठाणदीपक सावरकरजयकांत थोरातअमित कोसुरकरराकेश आमनेयोगेश देशमुखसुरज ढोणेबापुजी पवारकिशोर कोटरंगे यांच्यासह किशोर ठाकरेअभिलाषा भगत या विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.

तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तकाचे विमोचन करण्यात आलेयावेळी रस्ता सुरक्षा संदर्भात व मतदानाबाबत शपथ घेण्यात आलीकार्यक्रमाचे संचालन सहायक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांनी तर आभार श्रीमती बेग यांनी मानले.

००००००

No comments:

Post a Comment