Search This Blog

Sunday 18 November 2018

क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाचे भूमीपूजन या देशात सर्वात आधी आदिवासींचा सन्मान होईल : ना.अहिर



शेडमाके व बिरसा मुंडा यांच्या वंशजाच्या उपस्थितीत कार्यक्रम
वित्त मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचे अभिवादन

चंद्रपूर दि.17 नोव्हेंबर : आमच्या संस्कृतीचे अतिशय प्रामाणिकपणे जतन करणारेसंवर्धन करणारे आदिवासी यांनी स्वातंत्र्यलढ्यात लढलेला लढा बावनकशी होता. मात्र दुर्दैवाने हा इतिहास लिहिला गेला नाही. त्यामुळे या इतिहासाला समजून घेऊन त्याचा सन्मान करण्याचा विडा या शासनाने उचलला आहे. बिरसा मुंडा यांची जयंती पूर्ण देशभर सध्या साजरी होत असताना शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मारकाची सुरुवात करीत असल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्य मंत्री ना.हंसराज अहीर यांनी केले.
चंद्रपूर शहरातील कारागृह परिसरात 1957 च्या उठावामध्ये इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणा-या वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीमध्ये स्मारक बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी बीरसा मुंडा यांच्या स्मृती अभिवादनाच्या केद्र शासनाच्या मोहीमेमध्ये बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या वंशजाच्या उपस्थितीत हजारो आदिवासींच्या साक्षिने आज हा सोहळा पार पडला. वीर बाबुराव शेडमाके यांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आली होती. त्या ठिकाणी आज केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर, राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी अभिवादन केले. ना.अहीर यांच्या अध्यक्षतेत मुख्य कार्यक्रम पारपडला. या ठिकाणी 25 लाख रुपये खर्च करुन स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. तथापि, ही सुरुवात असून जेल प्रशासनाच्या अधिपत्यात असणारी या ठिकाणची गोंड राज्याच्या राजवाडयाची वास्तू मोकळी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ना.अहीर यांनी केले.
ते म्हणाले, या देशाचा खरा इतिहास हा आदिवासींचा इतिहास आहे. मात्र त्यांच्या संघर्षाला लिहीले गेले नाही. आज बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांचे वंशज तुमच्या पुढे आहेत. या कुटुंबाच्या बलिदानांमुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे या शहीदांचा सन्मान सर्वात आदी करणे या शासनाचे आध्य कर्तव्य आहे. या स्मारकासाठी खासदार निधीतून खर्च करण्यात आला आहे. पण ही सुरुवात आहे. आगामी काळामध्ये आदिवासी बांधवांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. त्या दृष्टीने आमची पाऊले पडत असून आदिवासींना सोडून आमची वाटचाल शक्य नाही. याची आम्हाला जाणीव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी छत्तीसगड मधून आलेले बिरसा मुंडा यांचे पणतु सुखराम मुंडा, सनिका मुंडा, वीर बाबुराव शेडमाके यांचे वंशज गोविंदराव शेडमाके, रामचंद्र शेडमाके, गुणबाई शेडमाके यांचा सत्कार केला.  यावेळी व्यासपीठावर आ.नानाभाऊ शामकुळेआ.राजू तोडसाममहापौर अंजलीताई घोटेकरभगवान बिरसा मुंडा यांचे वंशज सुखराम मुंडाशहीद बाबुराव शेडमाके यांचे वंशज गोविंदराव शेडमाकेरामचंद्र शेडमाकेगुणाबाई शेडमाकेखुशाल बोंडेविजय राऊतआतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूतअभियंता मनोज जयस्वाल, दयालाल कन्नाके, विजय राऊत यांची उपस्थिती होती. 
तत्पूर्वी बोलतांना आर्णीचे आमदार राजू तोडसाम यांनी बोलताना स्पष्ट केले की, आदिवासी बांधवानी आपली संस्कृती विसरु नये, भाषा, सण उत्सव या माध्यमातून संस्कृती टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी या स्मारकासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असे स्पष्ट केले. तर महापौर अंजलीताई घोटेकर यांनी यावेळी बाबुराव शेडमाके यांच्या क्रांतीकारी आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक खुशाल बोंडे यांनी केले. या स्मारकासाठी ना.अहीर यांनी गेल्या अनेक वर्षापासून सुरु ठेवलेल्या प्रयत्नाबद्दल माहिती दिली.   कार्यक्रमाचे संचालन नगरसेविकास सविता कांबळे यांनी केले.
00000

No comments:

Post a Comment