Search This Blog

Sunday 16 May 2021

गत 24 तासात 1282 कोरोनामुक्त

 

गत 24 तासात 1282  कोरोनामुक्त,

674 पॉझिटिव्ह तर 20 मृत्यू

Ø  आतापर्यंत 66,226 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 10,097

चंद्रपूरदि.16 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1282 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहेतर 674 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 20 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 77 हजार 575 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 66 हजार 226 झाली आहे. सध्या 10 हजार 97 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 34 हजार 760 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 53 हजार 903 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

 आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 62 व 77 वर्षीय पुरुषतुकुम येथील 75 वर्षीय महिलारामनगर येथील 42 वर्षीय पुरुष35 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील कोंढा येथील 54 वर्षीय महिला60 वर्षीय महिलाघोडपेठ येथील 31 वर्षीय महिला. बल्लारपूर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष. सावली तालुक्यातील 70 वर्षीय महिला. चिमूर तालुक्यातील 62 वर्षीय पुरुषवडाळा पैकु येथील 60 वर्षीय पुरुष. सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील 65 वर्षीय महिला. नागभीड तालुक्यातील नवखळा येथील 55 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील कुर्झा येथील 60 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील 46 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 59 वर्षीय महिला. कोरपना तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष65 वर्षीय महिला तर वणी-यवतमाळ येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 1252 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1159 , तेलंगणा एकबुलडाणा एकगडचिरोली 35यवतमाळ 40भंडारा 11वर्धा एकगोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

 आज बाधीत आलेल्या 674 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 227चंद्रपूर तालुका 20बल्लारपूर 80भद्रावती 47ब्रम्हपुरी 20नागभिड 10सिंदेवाही 31मूल 38सावली 26पोंभूर्णा 34गोंडपिपरी 04राजूरा 34चिमूर 04वरोरा 45कोरपना 40जिवती 08 व इतर ठिकाणच्या 06 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापरवारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावास्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावीव प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment