Search This Blog

Friday, 2 May 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी ठरले राज्यात सर्वोत्कृष्ट



 चंद्रपूर जिल्हाधिकारी ठरले राज्यात सर्वोत्कृष्ट

Ø 84.29 गुणांसह प्रथम क्रमांक

Ø 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम

चंद्रपूरदि. 2 मे : राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीहे राज्यातून सर्वोत्कृष्ट ठरले आहेजिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात 84.29 गुण मिळवत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होतीया मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आलेयात उत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय श्रेणीत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने बाजी मारली. तर द्वितीय क्रमांक जिल्हधिकारी कार्यालयकोल्हापूर (गुण 81.14), तृतीय जिल्हाधिकारी जळगाव (80.86), चतुर्थ जिल्हाधिकारी अकोला (78.86) आणि पाचवा क्रमांक जिल्हाधिकारी नांदेड (66.86 गुणयांनी पटकाविला.

याबाबत बोलतांना जिल्हाधिकारी श्रीगौडा म्हणालेचंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यात प्रथम क्रमांक मिळालाही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहेजिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी – कर्मचा-यांचे यात मोठे योगदान आहेलोकांना अधिकाधिक चांगल्या सेवा कशा देता येईलशासन त्यांच्यापर्यंत कसे पोहचलेयाबाबत योग्य नियोजन करण्यात आलेतसेच शासनाच्या सुचनेप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील संकेतस्थळाचे अद्ययावतीकरणतक्रार निवारणअभ्यागतांसाठी सोयीसुविधा-ऑफिस प्रणालीचा वापर, कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करून अधिकार व कर्मचा-यांना प्रशिक्षणगुंतवणूकीस प्रोत्साह आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा यात समावेश होताअसे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केलेते म्हणालेगुणवत्ता मोहिम एक सुरवात आहेभविष्यातील महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी ही एक आदर्श कार्यपद्धती ठरेलनागरिकांना जीवन सुखकर करण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहेया मोहिमेचे चळवळीत रुपांतर होऊन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काम करावेअसे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुल्यांकन पध्दत : भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India)  मार्फत संकेतस्थळ अद्यावतीकरण व कार्यक्षमताकार्यालयीन सोयीसुविधातक्रार निवारण व्यवस्थागुंतवणूक अनुकूलतानागरिकांसाठी सेवा सुलभतातंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment