Search This Blog

Tuesday 31 March 2020

घरातच सुरक्षित रहा, कोणाचीच उपासमार होऊ देणार नाही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची ग्वाही; प्रशासनाचा घेतला आढावा





Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव रुग्ण नाही
Ø  आतापर्यंत विदेशातून आलेल्या 154 प्रवाशांची नोंद
Ø  53 प्रवासी निगराणीत100 लोकांचे कॉरेन्टाईन पूर्ण
Ø  30 हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करणार
Ø  सर्व कृषी केंद्रखते यांची दुकाने उघडे राहतील
Ø  शिवभजन यंत्रणा आणखी सक्षमतेने राबविण्याचे निर्देश
Ø  महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे
Ø  वितरणासाठी शासकीय यंत्रणेचा सहभाग घ्यावा
Ø  सरपंचपं.स. सदस्य जि.प. सदस्य यांनी प्रशासनासोबत काम करावे
Ø  जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही
Ø  जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करा
Ø  व्हाट्सअप वरील खोट्या संदेशापासून सावध रहा
Ø  मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सढळहस्ते मदत करावी
चंद्रपूर, दि.31 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रोजी एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाहीही बाब अतिशय सकारात्मक असून यासाठी आरोग्य यंत्रणाजिल्हा प्रशासन व स्वतःच्या घरात राहणाऱ्या जबाबदार नागरिकांचे मी कौतुक करतो. येणाऱ्या काळामध्ये आणखी जागरूक राहून लॉकडाऊन पाळायचा आहे. या काळात कोणाच्याही घरी अन्नधान्याचा तुटवडा किंवा उपासमार होणार नाही याची काळजी प्रशासनाच्या मदतीने मी घेतो. सर्वांनी राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करावेअसे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हे देखील उपस्थित होते त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 2 लाख 11 हजार 863 रुपयाचा धनादेश पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केला.
ना.विजय वडेट्टीवार यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेमहानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या काटेकोर कामाचे कौतुक केले. मात्र एकीकडे लॉकडाऊन असताना कोणत्याच परिस्थितीत अन्नधान्याचा पुरवठा किंवा तयार अन्न पुरविण्याच्या प्रक्रियेतील त्रुटीमुळे उपासमार होणार नाही. याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी एप्रिल नंतर आपण स्वतः वैयक्तीकरित्या 30 हजार अन्नधान्याच्या किट ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा लोकांना देणार असल्याचे स्पष्ट केले.
      शेतकरीशेतमजूरगरीबनिराश्रितबेघर, विमनस्क अशा सगळ्या लोकांच्या रोजच्या भोजनाबाबत अधिक काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. महानगरात काही स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात गावा गावातील सरपंचजिल्हा परिषद सदस्यपंचायत समिती सदस्य यांनी आपल्या परिसरात कोणी उपाशी राहणार नाहीयासाठी प्रशासनासोबत येऊन काम करावेअसे आवाहन त्यांनी केले.
अन्य राज्यातील अनेक मजूरकामगार रोजंदारी कर्मचारी बांधकामावर असणारे मजूरछोट्या-मोठ्या उद्योगात काम करणारे मजूरयांच्याकडे रेशन कार्ड नाही. मात्र रेशन कार्ड नाही म्हणून त्यांची उपासमार होता कामा नयेआपल्या राज्यातील अनेक ठिकाणी मजूर अडकून आहे.त्या त्या ठिकाणचे राज्यशासन त्यांची व्यवस्था करत आहेत. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव व अन्य मंत्र्यांची आपले बोलणे झाले आहे. अन्य राज्यातील मजूरप्रवासी व अडकून पडलेल्या सर्व नागरिकांची, विद्यार्थ्यांची कामगारांचीउपासमार होणार नाही. त्यांना योग्य मदत मिळेलयासाठी यंत्रणेने काम करावेअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यांमध्ये सुरू केलेले प्रशिक्षण व घेत असलेली काळजीतसेच आशा वर्कर पासून तर आरोग्य उपकेंद्रात प्राथमिक केंद्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी या काळातील कर्तव्याबद्दल आभार व्यक्त केले. पुढील अनेक दिवस हा लढा आपल्याला लढायचा असून उत्तमोत्तम आरोग्य सुविधा आपल्याला मिळाव्यात यासाठी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मदत व पुनर्वसन मंत्रालयामार्फत आवश्यक असेल असे कितीही यंत्र खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची ही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात आतापर्यंत बाहेर देशातून प्रवास करून आलेल्या 100 नागरिकांचे होमकॉरेन्टाईन पूर्ण झाले आहे. 53 नागरीक अद्याप निगराणीत आहे . आत्तापर्यंत पाठवलेल्या सगळ्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. यासाठी आरोग्य यंत्रणापोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी समन्वयाने सुरू केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाच्या समन्वयात सुरू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देखील भेट दिली. जिल्ह्यांच्या सीमा बंद झाल्या असून सर्व जिल्ह्यात त्या त्या ठिकाणी नागरिकांची उत्तम व्यवस्था केली जात आहे.त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचे त्यांनी आवाहन केले.सोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सढळहस्ते मदत करावी.सर्व कृषी केंद्र व खतांचा पुरवठा करणारी दुकाने उघडी ठेवावी.शिवभोजन यंत्रणा तालुका स्तरावर सक्रीय करण्यात यावी.व्हॉटसअप वरील खोट्या संदेशापासून नागरीकांनी सावध रहावे.अशा सुचना त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी त्यांनी पोलिस प्रशासनाने गेल्या काही दिवसात अतिशय संयमाने काम केल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले. आतापर्यंत 67 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्याला मज्जाव करणेआवश्यक असून जनतेने या काळात गरज नसताना बाहेर पडूच नयेअसे आवाहन शेवटी त्यांनी यावेळी केले.
शहरात विविध सामाजिक संस्थांमार्फत सध्या भोजनदान चालू असून नागरिकांनी आपल्या अवतीभवती अशा पद्धतीने कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या   07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचारसमुपदेशनपाठपुरावाअॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्णप्रवाशांची चौकशीशहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी     07172-251597टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा उद्यापासून पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा सुरू होत असून टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावाअसे आवाहन त्यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment