Search This Blog

Tuesday 10 September 2024

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ


 पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ

Ø श्री. मुनगंटीवार यांना कृषिमंत्र्यांनी दिला शब्द

Ø पीक विम्याची उर्वरित 58.95 कोटी रुपये मिळणार

चंद्रपूरदि. 10 : राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ची उर्वरित रक्कम मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी ऑगस्टमध्ये देखील यासंदर्भात पाठपुरावा केला होता. राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीशेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन केवळ पाच दिवसांत चंद्रपूर येथे दोन बैठका तर मुंबई येथे कृषीमंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला होता.

या हंगामात जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार 976 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीनकापूस व धान या पिकांचे अवकाळी पाऊस व रोगांमुळे नुकसान झाले. पीक विमा काढणाऱ्या जिल्ह्यातील 1 लाख 51 हजार 332 शेतकऱ्यांना 202.76 कोटी रुपये विमा रक्कम विमा कंपनीमार्फत देय ठरविण्यात आली. यापैकी 143.81 कोटी रुपये पीक विमा रकमेचे वाटप झाले आहे. पणउर्वरीत शेतकऱ्यांच्या पीक विमा नुकसान भरपाईदाखल 58.95 कोटी रुपये प्रलंबित आहेत.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्रव्यवहार केला. त्यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थिती सांगितली. शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळाली तर शेतीचे पुढचे नियोजन करणे शक्य होईल. शिवाय सणासुदीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना आधार होईलअशी भावना श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला विमा हप्त्याचा राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा मिळालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरीत शेतकऱ्यांची पिक विमा नुकसान भरपाई प्रलंबित असल्याचे विमा कंपनीमार्फत कळविण्यात आले आहे. ही बाब देखील पालकमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर श्री. मुंडे यांनी याची दखल घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम लवकरच मिळण्याचा मार्ग त्यामुळे मार्ग सुकर झाला आहे.

०००००

No comments:

Post a Comment