Search This Blog

Thursday, 17 July 2025

‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ द्वारे प्रलंबित प्रकरणात झटपट निकाल


राष्ट्रासाठी मध्यस्थी’ द्वारे प्रलंबित प्रकरणात झटपट निकाल

Ø 90 दिवसांची विशेष मोहीम

चंद्रपूरदि. 17 :  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणसर्वोच्च न्यायालय आणि मुख्य मध्यस्थी केंद्रउच्च न्यायालयमुंबई यांच्या निर्देशानु‌सार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर न्यायालय व जिल्ह्याअंतर्गत  सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी राष्ट्रासाठी मध्यस्थी’ ही 90 दिवसांची विशेष मोहीम 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत राबविण्यात येत आहे.

सदर मोहिमेचा उद्देश हा न्यायालयीन प्रकियेत प्रलंबित असलेल्या प्रकरणाचे परस्पर सहमतीने जलद निवारण करणेपक्षकारांचा वेळखर्च व श्रम वाचवणे आणि न्यायव्यवस्थेवरील भार कमी करणेतसेच पक्षकारांच्या नातेसंबंधात कटुता निर्माण न करता जिव्हाळयाचे संबंध निर्माण करणेहा आहे.

या मोहिमेअंतर्गत न्यायालयात प्रलंबित  फौजदारी  प्रकरणांमध्ये (आपसी  तडजोड लायक प्रकरणे)  तसेच सर्व दिवाणी प्रकरणे  कलम 138 एन.आय ॲक्ट (धनादेश न वटणे ) प्रकरणेबॅंकाची कर्ज वसूली  प्रकरणेमोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणेजमीन अधिग्रहण प्रकरणेकामगार कायद्याखालील प्रकरणेघरमालक भाडेकरू वादकौटुंबिक वादघरगुती हिंसाचाराची प्रकरणेआपसी मध्यस्थी ठेवून ती  सामंजस्याने सोडविण्याबाबतचे आवाहन  एस. एस. भिष्म व जिल्हा  विधीसेवा प्राधिकरणचे सचिव एस. एस. इंगळेयांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी  तसेच नागरिकांना आपली प्रकरणे सदर मोहिमेत ठेवायची असल्यास त्यांनी चंद्रपूर  जिल्ह्यातील संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचंद्रपुर येथे संपर्क साधावाअसे कळविण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment