मदतीसाठी शेतकरी आत्महत्येची पाच प्रकरणे पात्र
Ø अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरांनी घेतला आढावा
चंद्रपूर, दि. 31 डिसेंबर : जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण दहा प्रकरणांचा आढावा अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यापैकी पाच प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून तीन अपात्र तर दोन प्रकरणे फेरचौकशीसाठी पाठविण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, तहसीलदार यशवंत दाईट, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एम.एन. हेकाड, पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार आदी उपस्थित होते.
शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झा
00000
No comments:
Post a Comment