दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांना
मानसशास्त्रीय कल चाचणीद्वारे मार्गदर्शन
विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि.31 जुलै: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकताच इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्यात आला. दहावी व बारावीचे वर्ष शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या परीक्षेत मिळणारे गुण तुमच्या पुढील वाटचालीची दिशा ठरवतात. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर मार्फत दहावी व बारावी नंतर पुढे काय? याविषयी मानसशास्त्रीय कल चाचणीच्या आधारे मार्गदर्शन आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर, कार्यालयाच्या rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन करिअर मार्गदर्शन बाबत अधिक माहितीकरिता कार्यालयाच्या 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
00000
No comments:
Post a Comment