Search This Blog

Friday, 4 April 2025

माता महाकाली यात्रा महोत्सव : जिल्हाधिका-यांच्या हस्ते नियंत्रण कक्षाचे उद्घाटन

 





माता महाकाली यात्रा महोत्सव :

जिल्हाधिका-यांच्या हस्ते नियंत्रण कक्षाचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 4 एप्रिल : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव 3 एप्रिलपासून सुरू झाली आहे. यात्रा कालावधीत इतर राज्यातून व बाहेरच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी राहण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून भाविकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी महाकाली यात्रेबाबत सोईसुविधांचा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच पार्किंग व्यवस्था व यात्रेकरूंची कोणतीही गैरसोई होणार नाही, याची दक्षात घेण्यात यावी. सीसीटीव्ही मॉनिटर करण्यासाठी टीम नेमावी,  प्रथमोचार साहित्य पुरेशा प्रमाणात ठेवावे व पथक 24 तास कार्यरत ठेवावे, असेही निर्देश दिले.

यात्रेनिमित्त चंद्रपूर शहरात बाहेरून येणा-या बसेसची व्यवस्था तसेच प्रशासनाने नियोजित केलेल्या जागेवरच पार्किंग व्यवस्था असली पाहिजे. भाविकांसाठी आवश्यक मुलभूत सोयीसुविधा जसे पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट, दैनंदिन स्वच्छता व इतर अनुषंगीक बाबी मनपाने उपलब्ध करून द्याव्यात. नियमित स्वच्छतेसाठी मनपाने अधिकारी – कर्मचा-यांच्या ड्युटी लावाव्यात. नदीवर आंघोळ करतांना कोणतीही दुर्घटना होऊ  नये म्हणून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने शोध व बचाव पथक तैनात ठेवावे. यात्रा कालावधीत हवामानाची माहिती अवगत करावी तसेच जिल्हा नियंत्रण कक्षासोबत (07172-250077) समन्वय ठेवावा.

महावितरणने यात्रा परिसरात अखंडीत वीज पुरवठा सुरू राहील, याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने रुग्णवाहिकेसह 24 बाय 7 आरोग्य पथक तैनात ठेवावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिका-यांनी परिसराची पाहणीसुध्दा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपील पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.

००००००

महाकाली यात्रेनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

 

महाकाली यात्रेनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

चंद्रपूरदि. 4 एप्रिल : चंद्रपुर शहरात माता महाकाली यात्रेला 3 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. महाकाली यात्रेमध्ये येणा-या भाविकांसाठी एकेरी मार्ग आहे. त्यामुळे यात्रेच्या कालावधीदरम्यान जटपुरा गेट येथे जास्त गर्दी होत असते. त्या अनुषंगाने शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलिस अधिनियम- 1951 च्या कलम 33-(1) ब नुसार सार्वजनिक ठिकाणी चंद्रपूर शहरातील रहदारी सुरळीत चालावीरहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निमार्ण  होऊ नये व जनतेला त्रास अगर गैरसोय होऊ नयेम्हणून 3 ते 13 एप्रिल पर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्याची अधिसुचना जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निर्गमित केली आहे.

सदर कालावधीत अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल खेरीज सर्व वाहनांकरीता बंद राहील . तसेच अचंलेश्वर गेट ते बागला चौकअचंलेश्वर गेट ते कोहीनुर तलावकडे जाणारा रोड व महाकाली मंदीर पार्कींग ते आर के. चौक हा नो पार्कींग झोन  व नो हॉकर झोन घोषित करण्यात येत आहे. महाकाली मंदीर समोरून गौतम नगरकडे जाणारा रस्ता सर्व वाहनाकरीता बंद राहणार आहे.

नागरिकांसाठी पर्यायी  मार्ग : बागला नगरमहाकाली वार्डभिवापूर वार्ड या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्यासाठी व परत येण्यासाठी भिवापूर- हनुमान खिडकी- दादमहल वार्ड  या मार्गाचा  वापर करावा. सदरचा मार्ग हा मोटार सायकल व ऑटो यासाठीच राहील. बागला नगर, महाकाली वार्डभिवापूर वार्ड परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी चारचाकी वाहनांने शहरात जायचे असल्यास किंवा बाहेर जायचे असल्यास लालपेठ कॉलरी-पठाणपुरा गेट- गांधी चौक या मार्गाचा वापर करावा. तसेच शहराबाहेर इतरत्र जायचे असल्यास कामगार चौक मार्गे बायपास रोडचा वापर करावा.

यात्रेकरीता येणाऱ्या वाहनाकरीता पार्कींग व्यवस्था : 1. नियोजित वाहनतळांची नावे पुढीलप्रमाणे आहे. कोहीनुर तलाव मैदान येथे जिप कार, (टॅम्पोआईचर आणि त्यापेक्षा मेाठे जड वाहनांना या पार्कींग स्थळी प्रवेश दिला जाणार नाही.) 2. इंजिनिअरींग कॉलेज ते भिवापुर मार्केट रस्त्याच्या दोन्ही बाजुला तेलंगणा व आंध्रप्रदेशातुन येणा-या बसेसची व्यवस्था 3. डी. एङ कॉलेज मैदान (जुनी बाबुपेठ पोलिस चौकीच्या बाजुला) सर्व प्रकारचे वाहन 4. न्यु इंग्लींश हायस्कुल मैदानात राज्य परिवहनच्या बसेस करीता (विश्राम गृह समोर) 5. बैलबाजार पार्कींग क्र.1 व पार्कींग क्र.2 मध्ये सर्व प्रकारचे वाहन 6. नयरा पेट्रोल पंप (बायपास रोडआंबेडकर चौक)  सर्व प्रकारचे वाहन

०००००

25 एप्रिलपर्यंत करता येणार चना खरेदी नोंदणी

 

25 एप्रिलपर्यंत करता येणार चना खरेदी नोंदणी

चंद्रपूरदि. 4 एप्रिल :  हंगाम 2024-25 मध्ये शासनाच्या पीएसएस योजने अंतर्गत चना खरेदीकरीता शेतकरी नोंदणी करण्याची मुदत 25 एप्रिल 2025 पर्यंत आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार चंद्रपूर जिल्ह्यात एनसीसीएफ मार्फत चना  खरेदी सुरू करण्यात येणार असून शेतकरी नोंदणीची मुदत  30 दिवस पुढे करण्याच्या सुचना प्राप्त झाल्याने आता शेतक-यांना 25 एप्रिलपर्यंत चना खरेदी नोंदणी करता येईल, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.एस. तिवाडे यांनी कळविले आहे

या खरेदी केंद्रावर करू शकता शेतकरी नोंदणी : 1. चंद्रपूर जिल्हा  कृषी औद्योगिक सह. संस्था मर्या. चंद्रपूरखरेदी केंद्र- चिमुर, 2. कृषी उत्पन्न बाजार समितीचंद्रपूरखरेदी केंद्र- चंद्रपूर, 3. कृषी उत्पन्न बाजार समिती वरोराखरेदी केंद्र-वरोरा

०००००

प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे अनिवार्य


 प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे अनिवार्य

Ø कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण

चंद्रपूरदि. 4 एप्रिल :  कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक  छळापासून संरक्षण (प्रतिबंधमनाई आणि निवारण)  अधिनियम2013 अंतर्गत जिल्हयातील ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर दहा किंवा दहा पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक कार्यालयामध्ये अंतर्गत  तक्रार समितीची स्थापन असणे अनिवार्य आहे.

             समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष असावी. महिलांच्या प्रश्नांशी  बांधील असलेल्या किंवा ज्यांना सामाजिक कार्याचा अनुभव व कायद्याचे ज्ञान आहे, अशा कर्मचाऱ्यांमधून  किमान दोन सदस्यतसेच अशासकीय संघटना किंवा लैंगिक छळाशी संबंधित प्रश्नांशी  परिचीत असलेली  व्यक्ती यामधील एक सदस्य असावा. समितीमध्ये किमान 50 टक्के सदस्य महिला राहतील व समितीचा कार्यकाल हा तीन वर्षाचा राहिल.

            निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा अधिकारी, (पीओएसएच) ॲक्ट यांचे आदेशान्वये सदर अधिनियमात दिल्याप्रमाणे बाल विकास प्रकल्प अधिकारी व नगर परिषदेच्या मुख्याधिका-यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिनियमांतर्गत तक्रार करण्यास काही अडचण जात असल्यास संपर्क साधावा.          

           ज्या कार्यालयात दहा पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत किंवा मालकाविरुध्द तक्रार आहे, अशा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी  स्थानिक तक्रार  समिती किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे आपली तक्रार नोंदवावी. सदर अंमलबजावणीत कोणी कसुर केल्यास 50 हजार रूपयांपर्यंत दंडात्मक कारवाईची तरतुद कायद्यात नमुद आहे.

        ज्या आस्थानेवर दहा किंवा दहा पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक कार्यालयाने अंतर्गत  तक्रार समिती  स्थापन केल्याची महिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,जुना कलेक्टर बंगलाआकाशवाणीच्या मागेसार्ई बाबा वार्डचंद्रपूर येथे किंवा disttwcdocha@gmail.com disttwcdocha@rediffmail.com या संकेतस्थळावर येथे सादर करावी, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००‍

साथी पोर्टलवर बियाणे विक्रीबाबत प्रशिक्षण


 

साथी पोर्टलवर बियाणे विक्रीबाबत प्रशिक्षण

चंद्रपूरदि. 4 एप्रिल :  कृषी विभाग तसेच पंचायत समिती चंद्रपूर आणि सावली यांच्या संयुक्त विद्यमाने सावली तालुक्यातील कृषी केंद्र धारकांची खरीप हंगाम पूर्व  नियोजन आढावा बैठक तसेच  साथी पोर्टल वर बियाणे विक्रीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. 

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी संगिता भांगरेतर प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा कृषी अधिकारी जयंत धात्रकजिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक श्री. बोढेतालुका कृषी अधिकारी अनिकेत माने व प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोहिम अधिकारी लंकेश कटरे उपस्थित होते.

       यावेळी जिल्हा कृषी अधिकारी यांनी उपस्थित कृषी केंद्र संचालकांना खरीप हंगाम 2025-26 मध्ये साठा पुस्तकई-पॉस मशीन अद्यावत  ठेवण्याच्या सुचना दिल्या. तसेच शेतक-यांना उच्च  दर्जाचे बी-बयाणे व रासायनिक खते पुरविण्याबाबत मागदर्शन केले. शासनाच्या निर्देशान्वये सन 2025-26  पासून साथी पोर्टल वरून बियाणे विक्री करणे बंधनकारक  असल्याने याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मोहीम अधिकारी श्री. धात्रक यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. तसेच खरीप हंगामात कृषी संचालकांना उद्भवणाऱ्या शंकाचे निराकरण केले. 

        कार्यक्रमाचे संचालन कृषी  अधिकारी दिनेश आत्राम यांनी तर आभार उमेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला ‍विस्तार अधिकारी (कृषी) अमोल उघडे यांच्यासह चंद्रपूर व सावली तालुक्यातील कृषी केंद्र संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

बेपत्ता महिलेबाबत संपर्क करण्याचे आवाहन

 बेपत्ता महिलेबाबत संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 4 एप्रिल : कोणालाही न सांगता घरून निघून गेलेल्या महिलेबाबत काही माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.

मितलेश नेहरु  देवागंन (वय २५ वर्षे) रा. गोपालपुरी आनंदनगर चंद्रपूर यांनी 26 मार्च रोजी चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, त्यांची पत्नी वामनी मितलेश देवागंन रा. गोपालपुरी आंनदनगर ही घरी  कोणाला काही न सांगता घरून निघुन गेली. पत्नी वामनी नेहमी मोबाईलवर बोलत असल्याने तिला टोकले असता ती फिर्यादीला घर सोडून जाण्याची धमकी देत होती. तिचा वार्डात, आजुबाजुला शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तसेच पठाणपुरागांधी चौकजटपुरा वार्ड, रेल्वे स्टेशनबसस्थानकमहाकाली मंदीर परिसरात तसेच नातेवाईकांना फोन करून  विचारपुस केली असता ती आली  नसल्याचे सांगितले.

          बेपत्ता महिलेचे वर्णन :  उंची -5 फूट 1 इंचरंग-गोराकेस-काळे लांबडोळे- लहान काळेचेहरा- गोलनाक-सरळअंगात निळया रंगाचा नाईट गाउनपायात स्लीपर चप्पल असून सदर महिला कोणाला आढळल्यास पोस्टे. चंद्रपूर शहर येथे कळवावे.

००००००


Thursday, 3 April 2025

7 व 8 एप्रिल रोजी विशेष तपास पथकाकडे करता येणार तक्रार

 7 व 8 एप्रिल रोजी विशेष तपास पथकाकडे करता येणार तक्रार

चंद्रपूरदि. 3 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यातील मद्य परवाने मंजुर करतांना मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरव्यवहारअनियमितता व लाचखोरीच्या प्रकरणी तपास करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त  संदिप दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले आहे.

 तपासाच्या अनुषंगाने 7 व 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत विशेष तपास पथक (SIT) अध्यक्ष  संदिप दिवाण हे तपास पथकासह चंद्रपूर विश्राम गृह येथे येत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठविल्यानंतर (शासन अधिसूचना दिनांक 8 जून 2021 नंतर) जिल्ह्यात नुतनिकरण करून कार्यान्वीत करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्तीनव्याने मंजुर करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्तीनव्याने मंजुर करण्यात आलेल्या / इतर जिल्ह्यातून स्थलांतरीत होवून आलेल्या अनुज्ञप्ती (प्रकारानुसार : सीएल-3एफएल-3एफएलबीआर-2 इ.) या आक्षेपाबाबत आणखी काही तक्रारी असतील किंवा यातील आक्षेपाच्या अनुषंगाने काही माहिती असेलअशा व्यक्ती / तक्रारदार हे त्यांचेकडील कागदपत्रांसह विशेष तपास पथकास (SIT) 7 व  8 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेस चंद्रपूर विश्राम गृह येथे समक्ष येवून भेटु शकतातअसे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले आहे.

0000000

सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे ' जियो टॅगिंग ' करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




 

सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे जियो टॅगिंग करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø  जिल्हा नियोजनमधून निधी मिळणाऱ्या कार्यालयांनी इमारतींचे सौर ऊर्जीकरण करावे       

Ø  रस्ते सुरक्षेसाठी आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित करावी

Ø २२ विभागांची १०० दिवस आराखडा आढावा बैठक

मुंबई,दि.3- राज्यामध्ये सर्व विभागांच्या शाळांमध्ये असलेल्या पिण्याच पाणीशौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह जियो टॅगिंगकरण्यात यावे. नामांकित शाळांच्या सद्यस्थितीबाबत विभागाने पडताळणी करावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत जिल्हा नियोजनमधून निधी घेणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या इमारतीचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या सूचनाही दिल्या.

सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी २२ विभागांच्या १०० दिवस आराखड्याचा आढावा आज घेतला. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारमुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभाअसेगाचे मंत्रीराज्यमंत्रीअपर मुख्य सचिव,प्रधान सचिव,सचिव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.  यावेळी विभागनिहाय आढावा घेताना मुख्यमंत्री निर्देश देत होते.

मुख्यमंत्री म्हणाले,  सर्व शासकीय इमारतींचे सौर ऊर्जीकरण करतांना त्याचे पुढील पाच वर्षाचे व्यवस्थापन संबंधित पुरवठादार कंपनीला देण्यात यावे. इमारतीवरील सौर पॅनलची स्वच्छता ठेवण्यात यावी. शासन साडेसात अश्‍वशक्तीपर्यंतच्या सौर उर्जेवर आधारित पंपांना अनुदान देत आहे. ज्या ठिकाणी बूस्टर पंपाची आवश्यकता आहे,  तिथे बूस्टर पंपही देण्यात येतील.

शिक्षण हमी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याबाबत सूचित करीत मुख्यमंत्री म्हणाले,  आरटीई अंतर्गत विहित अंतरातील मर्यादेत प्रवेश देताना प्रथम शासकीय शाळांना प्राधान्य देण्यात यावे.  राज्यात रस्ते सुरक्षितता महत्त्वाची आहे.  रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) कार्यान्वित करण्यात यावी.  या प्रणालीच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रभावीपणे थांबविणे आणि अपघात प्रवण स्थळे दुरुस्त करणे सोयीचे होईल.

 मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये इमारत बांधकामबाबत सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी इमारत नियोजन व्यवस्थापन यंत्रणा  (बीपीएमएस) प्रभावीपणे कार्यान्वित करावी.  यामुळे मुंबईचा जागतिक दर्जा सुधारण्यामध्ये आणखी मदत होईल. विकास हक्क हस्तांतरण प्रक्रियेमध्ये ऑनलाइन सुविधा देण्यात यावी.  यासाठी इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म ई- टीडीआर सुरू करण्यात यावीअसे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत हिरव्या आणि पिवळ्या रंगातील मुद्द्यांवर विभागांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. येत्या एक मे पर्यंत अपूर्ण असलेल्या लाल रंगातील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून कामे पूर्ण करावीत. तसेच प्रत्येक विभागाने  आपल्या संकेतस्थळावर शंभर दिवस आराखड्यातील घेतलेली कामेपूर्ण झालेली कामे व अपूर्ण कामे कारणांसह पब्लिक डोमेन मध्ये संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावीतअसे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेएसटी महामंडळाने स्वतःचे जाहिरात धोरण तयार करावे. त्यासाठी चांगल्या सल्लागाराची नियुक्ती करावी.   यामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढेल. शंभर दिवसांच्या आराखड्यामुळे नागरिकांना गतिमान सेवा मिळत आहेत.  अशाच पद्धतीने भविष्यातही विभागांनी विहित कालमर्यादा आखून कामे पूर्ण करावीअशा सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.

या बैठकीत एकून २२ विभागांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. विभागांच्या एकूण मुद्द्यांपैकी ४४ टक्के मुद्द्यांवर पूर्णतः काम झाले आहे. तसेच ३७ टक्के मुद्दे अंतिम टप्प्यात असून निश्चित वेळेत पूर्ण होतील. मात्र १९ अद्याप पूर्ण झाले नाहीत. या कामांच्या पूर्ततेबाबत असलेल्या समस्यांची माहिती संबंधित विभागांनी दिली.

०००००

घरकुल बांधकामाकरीता आता क्रश सॅन्डचा वापर

 

घरकुल बांधकामाकरीता आता क्रश सॅन्डचा वापर

चंद्रपूर, दि. 3 एप्रिल : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व इतर घरकुलांची संख्या मोठी आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून गरीबांसाठी मोठया प्रमाणात घरकूले मंजूर करण्यात आली आहेत. परंतु सध्यास्थितीत वाळू उपलब्ध होण्यास अडचण असल्यामुळे वाळूला पर्याय म्हणुन क्रश सॅन्डचा वापर करणे हा उत्तम पर्याय होऊ शकतो. त्यामुळे लाभार्थ्यांनी घरकुलाच्या बांधकामाकरीता क्रश सॅन्डचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना स्वतःच्या घराचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याकरीता जिल्हा परिषद प्रशासन पूर्ण प्रयत्नात आहे. काही वेळेस घरकूलाची कामे पूर्ण करण्यास विलंब होतो. त्यामुळे घरकुल बांधकामात येणा-या अडचणी दूर करण्याकरिता व लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याकरीता जिल्हा परिषदेतर्फे एकाच वेळी 30263 घरकुलाच्या भूमिपूजनाचा उपक्रम राबविण्यात आला. त्यात सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सहभागी करून घेवून लाभार्थ्यांना येणा-या अडचणी समजून घेण्यात आल्या व लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

क्रश सॅन्ड ही (कृत्रिम वाळू) असून हा नैसर्गिक वाळू (नदीतील वाळू) ला पर्याय म्हणून विविध बांधकामाकरिता वापरली जाते. ही खड्यांमधील कठीण खडक (बेसॉल्ट) फोडून व मशीनव्दारे बारीक पावडर तयार केली जाते. अशा वाळूचा वापर काँक्रीट मिश्रण जसे कीरेतीसिमेंट किंवा सिमेंट खडी व पाणी यांचे सोबत मिश्रण करून मजबूत काँक्रीट तयार करण्याकरीता होते. ही सॅन्ड बीम/कॉलम स्लॅब व विट जुडाई यासारख्या बांधकामाकरिता उपयुक्त आहे. प्लॉस्टरींग व विट बांधकामासाठी नैसर्गिक वाळूच्या उत्खननामुळे नदी व पर्यावरणाला होणारे नुकसान टाळण्यासाठी क्रश सॅन्ड हा पर्याय म्हणून वापरला जातो. क्रश सॅन्डची मजबूती ही नैसर्गिक वाळू पेक्षा जास्त असल्याने क्रश सॅन्ड वापरण्याबाबतचा तांत्रिकदृष्ट्या सल्ला ही देण्यात येतो.

नैसर्गिक वाळूच्या तुलनेत क्रश सॅन्ड स्थानिक पातळीवर तयार होत असल्याने वाहतुक खर्च कमी असतो. तसेच पर्यावरणीय नुकसान कमी होते. क्रश सॅन्ड, बांधकामासाठी मजबूतटिकाऊ व फायदेशीर पर्याय असून नैसर्गिक वाळुपेक्षा अनेक बाबतीत सरस आहे. सर्व गट विकास अधिका-यांच्या मार्फतीने सर्व ग्रामपंचायतीचे सरपंचपदाधिकारी तसेच घरकुल लाभार्थी यांची कार्यशाळा घेऊन क्रश सॅन्ड वापरण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. त्याला घरकुल लाभार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. घरकुल लाभार्थ्यांनी वाळूऐवजी क्रश सॅन्डचा वापर करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन व प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे यांनी केले आहे.

०००००

आशा दिन व जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आरोग्याच्या रणरागिणीचा गौरव




 

आशा दिन व जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आरोग्याच्या रणरागिणीचा गौरव

चंद्रपूरदि.3 एप्रिल:    तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहजि.प. येथे (आशा) दिवस व जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला, ‍विविध कार्यक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी संगिता भांगरे यांच्या हस्ते करण्यात आले.  प्रमुख अतिथी म्हणून एकात्म अभियानाचे अमर सिंग राठोडसुष्मा सिंगतालुका आरोग्य अधिकारी  डॉ. कोमल मुनेश्वरशितल राजापूरेवैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पडगीलवारडॉ. प्रशांत चौधरीविस्तार अधिकारी मुरलीधर नन्नावरे आदी उपस्थित होते.

वर्षभरात आशा स्वयंसेविका योजना व क्षयरोगाबाबत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकागटप्रवर्तक यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात  आला. आरोग्याच्या रणरागिणी अहोरात्र आरोग्य विषयक कार्य करीत असतातअसे मान्यवरांनी आशा स्वयंसेविकांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमात एकात्म अभियानाचे समन्वयांमार्फत  हार्टफुलनेस सत्र आयोजित करण्यात आले.

सदर कार्यक्रमात गित गायननृत्यपथनाट्य असे विविध कलाकृती आशा स्वयंसेविकांनी सादर केली.तसेच क्षयरोग दिनानिमित्त रांगोळी स्पर्धानिंबध स्पर्धा चित्रकलाराष्ट्रीय क्षयरोग विषयावर एकपात्री अभिनय स्पर्धा  घेण्यात आली. सर्व विजयी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक व  विद्यार्थ्यांना भेट वस्तु देवून सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कोमल मुनेश्वर  यांनी केले.  संचालन दीक्षा फुलझेले यांनी तर आभार आम्रपाली दुर्योधन यांनी मानले. यावेळी आरोग्य अधिकारीआरोग्य सहाय्यक स्त्रि/ पुरुषआरोग्य सेविकास्टॉफ नर्स  व तालुका आरोग्य कार्यालयातील कर्मचारी उपस्थित  होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.के राठोडसुरेश कुंभारे,  डॉ. प्रियंका उपरे,  जयांजली मेश्रामखिरेंद्र पाझारेसंदीप मुनप्रणल मुन तसेच कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

000000000

Wednesday, 2 April 2025

वरोरा येथील विकासकामांची जिल्हाधिका-यांकडून पाहणी



 

वरोरा येथील विकासकामांची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

Ø उपजिल्हा रुग्णालयाला भेट व रुग्णांची विचारपूस

चंद्रपूर, दि. 2 एप्रिल : राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत क्षेत्रीय भेटीदरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी वरोरा तालुक्यातील विविध विकास कामांना भेटी देऊन कामांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल खुजे यांच्या टीमसोबत रुग्णालयाची पाहणी करून विविध रुग्णालयातील वॉर्ड त्यातील यंत्र सामग्रीमेडीसिन उपलब्धताटेलीमेडिसिन सुविधा कक्ष आदी सोयीसुविधांचा आढावा घेतला व रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर नगर परिषद वरोरा अंतर्गत येणाऱ्या सीव्हएज ट्रीटमेंट प्लांट व प्रस्तावित तलाव खोलीकरण कामाची पाहणी केली. न.प. मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांच्या पथकाने नियोजित कामाबाबत जिल्हाधिका-यांना माहिती दिली. तलाव खोलीकरण बाबत सामाजिक संघटनांचा सहभागत्यासाठी लागणारा सामाजिक दायित्व निधी व इतर योजनांमधील उपलब्ध पर्यायाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

तसेच वरोरा ते माढेंळी व पुढे यवतमाळकडे जाणा-या राज्य मार्ग विकास कामाची पाहणी केली. त्यानंतर मौजे भटाळा या गावात गडकिल्ले व स्मारक संवर्धन योजनेअंतर्गत पुरातत्त्व विभागाद्वारे संवर्धन करण्यात येणारा तलाव व महादेव मंदिर येथील कामाची पाहणी करून सदर कामाच्या विकासात येणारे समस्या जाणून घेतल्या. तसेच ग्रामपंचायत भटाळा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या पाणंद रस्त्याच्या मातीकामाची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.

संपूर्ण भेटीदरम्यान वरोराचे उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार योगेश कौटकरगटविकास अधिकारी श्री. मुंडकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. लोयान.प. मुख्याधिकारी विशाखा शेळकीवैद्यकीय अधीक्षक डॉ.श्री प्रफुल्ल खुजेनायब तहसीलदार श्री. काळेनागपूर येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक मयुरेश खडके  यांच्यासह मंडळ अधिकारी, सरपंच, उपसरपंचग्रामसचिवतलाठी आदी उपस्थित होते.

००००००

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी क्रीडा अकादमीचे सक्षमीकरण

 

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी क्रीडा अकादमीचे सक्षमीकरण

Ø आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 2 एप्रिल :  महाराष्ट्रात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व प्रतिभावंत  खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडूंनी  ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके  संपादित करण्याकरीता नियोजनबध्द प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणाक्रीडा विषयक पायाभूत  सुविधाक्रीडा वैद्यकशास्त्रक्रीडा स्पर्धांचे आयोजनखेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहनखेळाडूकरिता करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या  क्षमता विकासासाठी  देशी/ विदेशी प्रशिक्षक व संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्वाकाक्षी योजनेची अंमलबजावणी  करण्याचा निर्णय घेतला आहे.

            मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या ॲथलेटिक्सआर्चरीबैडमिंटनबॉक्सिंगहॉकीलॉन टेनिसरोईंगशुटींगरोलींगटेबल टेनिसवेटलिफ्टिंगकुस्ती या 12 क्रीडा प्रकारचे राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खाजगी अकादमीना आर्थिक सहाय्य देऊन अशा संस्थांचे सक्षमीकरण करण्यात  येणार आहे. त्यासाठी खाजगी  अकादमींना  आर्थिक  सहाय्य करवायाच्या दृष्टीने संबधित अकादमी मधील खेळाडूक्रीडा मार्गदर्शकसहाय्यक प्रशिक्षकप्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा व त्यांचा स्तरक्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरीचे गुणांकन करण्यात येणार आहे. 35 ते 50 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘क’ वर्गात51 ते 75 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘ब’ वर्ग आणि 76 ते 100 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘अ’ वर्गात वर्गीकरण करण्यात येणार आहे. ‘क’ वर्ग अकादमींना वार्षिक 10 लक्ष रुपये‘ब’ वर्ग अकादमीना वार्षिक 20 लक्ष रूपये आणि ‘अ वर्ग अकादमीना वार्षिक 30 लक्ष रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. यात पायाभूत क्रीडा सुविधा उभारणीक्रीडा  सुविधा उन्नत करणेप्रशिक्षक मानधनक्रीडा व प्रशिक्षण उपकरणे आदी बाबींवर खर्च करणे बंधनकारक आहे.

इच्छुक संस्थांनी अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सह संचालक सुधीर मोरे यांनी केले आहे. खाजगी अकादमींना भरून द्यावयाचा अर्ज नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे उपलब्ध असून अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्याशी संपर्क करावा, असे क्रीडा विभागाने कळविले आहे.

००००००

आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बॅचचा शुभारंभ


 आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बॅचचा शुभारंभ

            चंद्रपूरदि. 2 एप्रिल :  आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र येथे सन 2025-26 मधील पहिल्या बॅचचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी प्रशिक्षण केंद्राच्या केंद्रप्रमुख तथा कौशल्य विकास व मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री  वाघमारे यांनी सन्मानचिन्ह योजनादर्शिका व माहिती पुस्तिका देऊन उपजिल्हाधिकारी श्री. पवार यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. पवार म्हणाले, उमेदवारांनी अभ्यासाची तीव्र इच्छानिश्चीत ध्येयप्रयत्नात सातत्यकठीण परिश्रमपरिस्थितीची जाणीव ठेवून वाटचाल करावी. तसेच आपले ध्येय साध्य करावे. प्रास्ताविकात श्रीमती वाघमारे यांनी कार्यालयाची माहितीप्रशिक्षणाचा उद्देश तथा स्पर्धा परिक्षाबाबतचे महत्व याबाबत माहिती दिली

           कार्यक्रमाचे संचालन व आभार कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी विजय गराटे यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वांनी नवीन बॅचच्या उमेदवारांचे स्वागत करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

००००००

शालेय राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा संपन्न


 शालेय राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धा संपन्न

चंद्रपूर, दि. 2 एप्रिल : क्रीडा व युवक सेवा संचानालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घुघुस येथे राज्यस्तरीय बुडो मार्शल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत मुंबईपुणेनाशिकअमरावतीनागपूर या विभागातून जवळपास 100 विद्यार्थी सहभागी झाले. या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करून प्रथम स्थान प्राप्त केले व आपल्या विभागाचे नाव राज्यस्तरावर पोहचविले.

स्पर्धेचे उ‌द्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. रामेश बोरकुटे तर प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, घुग्घुसचे सहा. पोलीस निरीक्षक योगेश पाटीलराज्य क्रीडा मार्गदर्शक विजय ढोबळेबुडो मार्शल आर्टचे सिहान लहू पारवे, विवेक बोढे, सोमेश्वर येलचलवार, विनय बोढे, एलिजा बोरकुटे  आदी उपस्थित होते.

पंच म्हणून स्पर्धेला लहू पारवेप्रवीण घुगेसुरेश जाधव, सचिन पट्टेकरअभिजित हरपळेसंतोष कुलकर्णीशैलेश मोटघरेराजेंद्र जंजाळेअमोल युवनातेप्राजक्ता सोनवणेविशाल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत विपुल नेमराज कावडकर प्रथम, आदित्य संदीप पाटील द्वितीय तर जीत निलेश भोईर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे मुख्य आयोजक तथा बुडो मार्शल आर्टच्या जिल्हा प्रमुख ज्योती मानुसमारे यांनी स्पर्धेचे आयोजन केले. कोषाध्यक्ष राहुल गौरकारसह सचिव सुबोध आलेवार यांनी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.

००००००