Search This Blog

Tuesday, 29 April 2025

अक्षय तृतीयाच्या दिवशी बालविवाह रोखण्याचे आवाहन

 

अक्षय तृतीयाच्या दिवशी बालविवाह रोखण्याचे आवाहन

चंद्रपूरदि.29 एप्रिल : उद्या म्हणजे 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया हा सण आहेया दिवशी मोठ्या प्रमाणात सामुहिक विवाह सोहळे तसेच वैयक्तिक विवाह आयोजित केले जातातयामध्ये बालविवाह‌ सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते.  राज्यामध्ये बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006  कार्यान्वित असून महाराष्ट्र शासनाने बालविवाह प्रतिबंध नियम 2022 तयार केले आहेतचंद्रपूर जिल्ह्यामध्ये गत 5 वर्षात 68 बालविवाह थांबविण्यात आले असून एफआयआर दाखल करण्यात आले आहेयावर्षीसुध्दा जिल्हा प्रशासन बालविवाह रोखण्यासाठी सज्ज असून गावात बालविवाह होणार नाहीयाची दक्षता सरपंचपोलीस पाटीलग्रामसेवकअंगणवाडी सेविका  सुजान नागरिकांनी घ्यावीअसे आवाहन करण्यात आले आहे.

बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहेत्यानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहेबालविकास प्रकल्प अधिकारी (नागरीहे शहरी भागाकरिता बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असूनग्रामसेवक हे  ग्रामीण भागाकरिता प्रतिबंधक अधिकारी आहेत्यांना सहायक म्हणून अंगणवाडी सेविका आहेतगावामध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्राम बाल संरक्षण समित्या गठित आहेपोलिस पाटीलआशा वर्कर हे त्या समितीचे सदस्य आहेत  अंगणवाडी सेविका सदस्य सचिव आहेतत्यामुळे गावात बालविवाह तसेच  बालकांच्या संबंधित कोणतीही अघटित घटना होणार नाही,  याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

तर होऊ शकतो कारावास आणि दंड : बालविवाह झाल्यास विवाह  लावणारे भटजीमौलवीपादरीभंतेजीतसेच  मंडपवालेकॅटरिंगवाजंत्री विवाह सोहळयात सहभागी होणारी वऱ्हाडी मंडळीमंगल कार्यालय मालकवर वधुचे आई-वडील  हे बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006   अन्वये दोन वर्षाचा सश्रम कारावासाच्या शिक्षेस तसेच एक लाख रुपयापर्यंत दंडाच्या शिक्षेस पात्र असू शकेल .

बालविवाहाबद्दल माहिती देण्याचे आवाहन : ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रात कुठेही बालविवाह होत असल्यास महिला  बाल विभाग अंतर्गत चाईल्ड लाईन टोल फ्री क्र.1098 (24तास),   जिल्हा बाल संरक्षण कक्ष 7972059274, संस्था क्षेत्रीय अधिकारी 7304583054, असेस टू जस्टीस फॉर चिल्डेन प्रकल्प जिल्हा समन्वयक 9112796463  या क्रमांकावरजवळचे पोलिस स्टेशन,   गावातील ग्रामसेवक अंगणवाडी सेविकाबाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी /ग्रामीणयांना त्वरीत माहिती द्यावी.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी बालविवाह राेखण्याबाबत जागृत राहावेमाहिती देणाऱ्याचे  नाव गोपनीय ठेवण्यात येईलअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौड़ा जी.सीयांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment