Search This Blog

Wednesday, 17 September 2025

चंद्रपूर जिल्ह्यातील 200 द्वितीय अपिलीय प्रकरणे निकाली

 चंद्रपूर जिल्ह्यातील 200 द्वितीय अपिलीय प्रकरणे निकाली

Ø राज्य माहिती आयोगनागपूर खंडपीठ चंद्रपूर जिल्ह्यात

चंद्रपूरदि. 17 : राज्य माहिती आयोगनागपूर खंडपीठाने ‘आयोग आपल्या जिल्ह्यात’ उपक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील माहिती अधिकार अधिनियमाची 200 द्वितीय अपिलीय प्रकरणे निकाली काढली आहेतनागपूर खंडपीठाचे मुख्य माहिती आयुक्त गजानन निमदेव यांनी दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्यात प्रलंबित प्रकरणांची सुनावणी घेऊन सदर प्रकरणांचा निपटारा केला आहे.

याबाबत बोलतांना आयुक्त गजानन निमदेव म्हणालेराज्य माहिती आयोगाच्या वतीने आयोग आपल्या जिल्ह्यात’ असा उपक्रम राबविला जात आहेवर्धागडचिरोलीभंडारागोंदिया आणि चंद्रपूर येथे आयोग सुनावणीसाठी आलाज्या जिल्ह्यातील अपील आहेतेथे जाऊन सुनावणी करायची आणि माहिती अधिकार अधिनियम - 2005 ची प्रभावी अंमलबजावणी करायचीहा नागपूर खंडपीठाचा मुख्य हेतू आहेजनमाहिती अधिकारीप्रथम अपिलीय अधिकारी आणि नागरिक यांचा वेळपैसा आणि त्रास वाचावाया हेतूने हा उपक्रम नागपूर खंडपीठाने सुरू केला आहे आणि त्याची यशस्वी सांगता पहिला टप्पा पूर्ण होऊन झाली आहे.

पुढे ते म्हणालेवर्धागडचिरोलीभंडारागोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 675 द्वितीय अपिलीय प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेयात चंद्रपूर जिल्ह्यातील 200 प्रकरणांचा समावेश आहेराज्यात असा पुढाकार घेणारे नागपूर खंडपीठ हे पहिलेच असावेयाचा नागरिकांना आणि अधिकाऱ्यांनाही भरपूर फायदा झाला आहेपाचही जिल्ह्यातील जनमाहिती अधिकारीअपिलीय अधिकाऱ्यांनी आणि अपीलकर्त्यांनी आयोगाला धन्यवाद दिले आहे आणि आयोगाच्या या उपक्रमाची प्रशंसा सुद्धा केली आहे.

पुढील काळात अशाच प्रकारे आयोगाच्या भेटी जिल्ह्यांना सुरू राहतीलज्या जिल्ह्यातील अपील आहेतेथे जाऊन त्या निकाली काढल्या जातीलया उपक्रमांतर्गत सन 2022 -23 मधील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यात आयोगाला यश आले आहेआयोगाच्या सर्व सहकाऱ्यांचे यासाठी विशेष योगदान लाभले आणि त्यांच्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचे नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव यांनी सांगितले.

०००००००

No comments:

Post a Comment