Search This Blog

Friday, 28 February 2025

उत्कृष्ट कार्याबद्दल सीईओ जॉन्सन यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव




 उत्कृष्ट कार्याबद्दल सीईओ जॉन्सन यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

चंद्रपूरदि. 28 : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यात करण्यात आलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत गौरव करण्यात आला.

मुख्य कार्यकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. यात मिशन सक्षम, मिशन अंकुर, खुली विज्ञान बाग, स्टेम लॅब, ॲस्ट्रॅानॉमी लॅब, मोबाईल प्लॅनेटोरीयम, स्मार्ट पीएचसी, मोबाईल कॅन्सन व्हॅन, स्मार्ट वाचनालय, बचतगट मॉल, बळीराजा समृध्दी मार्ग अभियान, सोमनाथ कृषी पर्यटन, प्रशासकीय कामकाजात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर आदी उपक्रमांचा समावेश आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल राज्य स्तरावर घेऊन 27 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री. जॉन्सन यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 

०००००

जिल्ह्यात 5013 शालेय बालकांची आरोग्य तपासणी, मोफत उपचार

 जिल्ह्यात 5013 शालेय बालकांची आरोग्य तपासणीमोफत उपचार

Ø आरोग्य विभागातर्फे विशेष मोहीम

चंद्रपूरदि. 28 : आरोग्य विभागामार्फत राज्यातील शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडीतील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करिता राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम  राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत शाळा व अंगणवाडीमधील मुला-मुलींची  विनामुल्य आरोग्य तपासणी करण्यात येणार असून जन्मजात आजार व इतर आजारांवर ‍विनामुल्य उपचारसंदर्भसेवा व विनामुल्य शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे.

            कार्यक्रमाचे उद्घाटन दूरदृष्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते 1 मार्च 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता पुणे येथून करण्यात येणार आहे. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना दिपक साकोरे- बोर्डीकर उपस्थित राहतील. त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्हयातील सर्व तालुक्यात दूरदृष्यप्रणाली द्वारे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांची  आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

या शाळांमध्ये होणार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी : 1. पी.एम.श्री सावित्रीबाई फुले प्रा.उच प्रा.शाळा, बाबूपेठ, चंद्रपूर (विद्यार्थी पटसंख्या -  850), 2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदी न. प. शाळा, बल्लारपुर (विद्यार्थी पटसंख्या -  115), 3. जि.प.उ.प्रा.शाळाविजासन, भद्रावती (विद्यार्थी संख्या - 133), 4. एन.एच.गर्ल्स स्कुलब्रम्हपुरी (विद्यार्थी संख्या - 1275), 5.श्री. राष्ट्रीय प्रा.शाळाचिमुर (विद्यार्थी संख्या - 229),  6. जि.प. उ.प्रा. मुलांची शाळागोंडपिपरी (विद्यार्थी संख्या - 92), 7. जि.प. शाळाजिवती (विद्यार्थी संख्या – 298),  8. आदर्श हिंदी वि. गडचांदुर (विद्यार्थी संख्या - 263),  9. बालविकास विद्यालय, मुल (विद्यार्थी संख्या - 487), 10. सरस्वती ज्ञान मंदीरनागभिड (विद्यार्थी संख्या - 225), 11. जि.प.प्रा.शाळापोंभुर्णा (विद्यार्थी संख्या - 101), 12. आदर्श प्रा. विद्या मंदिरराजुरा (विद्यार्थी संख्या - 554), 13. जि.प.प्रा.शाळासावली क्रं. 1 (विद्यार्थी संख्या - 193), 14. जि.प.प्रा.शाळासिंदेवाही क्रं. 1 (विद्यार्थी संख्या - 133), 15. जि.प.प्रा.शाळावरोरा (विद्यार्थी संख्या - 65) असे एकूण 5013 विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

              राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम विशेष मोहिमेअंतर्गत जन्मत: व्यंगबालपणातील आजारजिवनसत्वची कमतरताविकासात्मक विलंब व किशोरावस्थतील आजार इ. आजाराची तपासणी करून मोफत उपचार करण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत ह्दयरोग शस्त्रक्रियाकॉकलेअर इंम्प्लॉटन्युरलटुब डिफेक्टहिप डिस्प्लेसिया,हायड्रोसेफॅलस,हर्निया हायड्रोसिलफायमोसिसअपेंडीक्सअनडिसेंडेडटेस्टीजहायपोस्पॅडीयातिरळेपणामोतीबिंदुदुभंलेले ओठ व टाळुक्लब फुट इ. आजारावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

       या मोहिमेचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच बालकांचे आरोग्य निरोगी करून त्यांचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी केले आहे.

०००००

1 मार्च रोजी पालकमंत्री डॉ. उईके चंद्रपुरात


 

1 मार्च रोजी पालकमंत्री डॉ. उईके चंद्रपुरात

चंद्रपूरदि. 28 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 1 मार्च 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

1 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता शहरातील शकुंतला फार्म, विद्यानिकेत शाळेसमोर आयोजित विदर्भस्तरीय आदिवासी युवक-युवती वैवाहिक परिचम मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 7.10 वाजता चंद्रपूर वरून नागपूरकडे प्रयाण.

०००००

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण

 आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण

Ø अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 25 मार्च 2025 पर्यंत

चंद्रपूरदि. 28 : आदिवासी उमेदवारांकरीता वर्ग-3 व  वर्ग-4 पदांकरीता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परिक्षेची तयारी करून घेण्याकरीता कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन  केंद्र येथे स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण दिनांक 1 एप्रिल ते 15 जुलै 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन देय राहील.  या प्रशिक्षण कालावधीत खालील अटीची पुर्तता करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या एसटी प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी त्यांचे अर्ज 25 मार्च 2025 पर्यंत सादर करावेत.

            अर्जामध्ये स्वत:चे पुर्ण नाव, संपूर्ण पत्तामोबाईल क्रमांकआधार क्रमांक, जन्मतारीखशैक्षणिक पात्रताप्रवर्ग (जात)जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्र चंद्रपूर यांचा नोंदणी क्रमांक  आदी बाबींचा उल्लेख करावा व सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अर्ज करण्याकरीता (Employment Card) असणे आवश्यक आहे. 

             26 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीकरीता आदिवासी  उमेदवारांकरीता जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन  केंद्रप्रशासकीय भवनपहिला माळा, चंद्रपूर येथे मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. निवड यादी दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल. 

          प्रशिक्षणाच्या अटी :  उमेदवार अनु.जमाती एसटी (आदिवासी ) प्रवर्गातील असावा 2. उमेदवाराचे किमान वय 18 ते 38 दरम्यान असावे 3. उमेदवार किमान एच.एच.एस.सी परीक्षा उर्त्तीण असावा 4. उमेदवारांचे नांव जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्रचंद्रपूर  येथे नोंदणी केलेली असावी.

        आवश्यक कागदपत्रे :  1. शाळा सोडल्याचा दाखला 2. जातीचा दाखला किंवा जात  वैधता प्रमाणपत्र 3. मार्कशिट्स एसएसीसी/ एचएचएससी/पदवी 4. आधार कार्ड. 5. जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंदचंद्रपूर या कार्यालयाचे नोंदणी कार्ड.

०००००

तूर खरेदी : शेतकरी नोंदणीकरीता मुदतवाढ

 तूर खरेदी : शेतकरी नोंदणीकरीता मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 28 : हंगाम 2024-25  मध्ये शासनाच्या पीएसएस योजनेअंतर्गत तूर खरेदीकरीता शेतकरी नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुार  एनसीसीएफ मार्फत सुरू असलेल्या तूर खरेदी 24 जानेवारी 2025 पासून पुढे 30 दिवसापर्यंत शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते. त्यास आणखी 30 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून  खालील दिलेल्या खरेदी केंद्रावर शेतक-यांनी नोंदणी करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.एस. तिवाडे यांनी कळविले आहे.        

असे आहेत नोंदणी केंद्र : 1. चंद्रपूर जिल्हा कृषी औद्योगिक सह.  संस्था मर्या. चंद्रपूर,खरेदी केंद्र- चिमुर 2.

कोरपना तालुका  खरेदी विक्री- संस्था मर्या. कोरपनाखरेदी केंद्र- राजूरागडचांदुर 3. कृषी उत्पन्न बाजार समिती,  चंद्रपूरखरेदी केंद्रचंद्रपूर 4. कृषी उत्पन्न बाजार समितीवरोरा खरेदी केंद्रवरोरा


3 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 3 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

            चंद्रपूरदि. 28 :  सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन जिल्हाधिकारीचंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येते. मार्च 2025 या  महिन्याचा पहिला सोमवार  3 मार्च  रोजी  येत असल्यानेया दिवशी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच 15 दिवस आधी 2 प्रतीत अर्ज सादर करावाव तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावीतद्नंतरच  तक्रार अर्ज स्विकारण्यात येईल.

०००००

जिल्हास्तरीय एक दिवसीय सिकलसेल प्रशिक्षण

 जिल्हास्तरीय एक दिवसीय सिकलसेल प्रशिक्षण

           चंद्रपूरदि.28 :  राष्ट्रीय सिकलसेल आजार निर्मूलन मिशन अंतर्गत जनसामान्यांना सिकलसेल आजाराबाबत अचुक माहितीरोगाची लक्षणेनिदान, उपचारगैरसमजुतीआजाराचा प्रसार टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनासमुपदेशन व जनजागृती होण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षण नुकतेच पार पडले.

मा.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन   सहसंचालक डॉ. सरिता हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळेमाता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विलास दुधपचारे, डॉ.बंडू रामटेकेडॉ. प्रिती राजगोपालडॉ. प्रसाद पोटदुखे, अश्विनी खोब्रागडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयउपजिल्हा रुग्णालयग्रामीण रुग्णालय येथील  वैद्यकीय अधिक्षकतालुका आरोग्य अधिकारीप्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारीजिल्हास्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हास्तरीय प्रशिक्षण  झाल्यानंतर तालुका स्तरावरप्राथमिक आरोग्य केंद्रातील गावपातळीवरील कर्मचारी त्यात आरोग्य पर्यवेक्षकआरोग्य सहाय्यकआरोग्य सहायिका, फार्मासिस्टप्रयोगशाळा तंत्रज्ञआरोग्यसेवकआरोग्यसेविकासमुदाय आरोग्य अधिकारीआशा सेविकांचेही सिकलसेल आजाराबाबतचे  प्रशिक्षण होणार असल्याची माहिती सिकलसेल कार्यक्रम अधिकारी संतोष चात्रेशवार यांनी दिली. तसेच जिल्हयातील या आजाराची स्थिती काय आहे व सिकलसेल रुग्णांकरिता शासनाच्या सोईसुविधा याबाबत त्यांनी सांगितले.

केंद्र शासनामार्फत सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमाचा राष्ट्रीय कार्यक्रमात अंतर्भाव झाला आहे. सिकलसेल नियत्रंण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या  विविध  विभागांना एकत्रितरित्या काम करून सिकलसेल आजारावर 2047 पूर्वी मात करण्याचे  धोरण राबविण्याचे ठरविले आहे. सिकलसेल निदानासाठीच्या तपासण्या करणे, उपचार करणे व आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आणि या उपाययोजना ग्रामीणदुर्गम आदिवासी भागांपर्यत योग्य रितीने राबविण्यासाठी राज्य, जिल्हातालुका स्तरावर समित्या गठित करून सिकलसेल आजाराचे उच्चाटन करण्यासाठी केंद्र शासनामार्फत कळविण्यात आले आहे.

नवनवीन तंत्रज्ञानाचा केला जाणार अवलंब : लोकांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती,  मोफत समुपदेशनतपासणी, उपचार व प्रतिबंध याबाबत एकत्रितरित्या कार्य करून सिकलसेल रुग्णांना गुणवत्तापूर्ण जीवन  जगण्याबाबत औषधोपचार करणेप्रसूतिपूर्व गर्भजल तपासणी  सुविधा उपलब्ध करून देणे व समाजातील सिकलसेल रुग्णांचा प्रसार थांबविणे, सिकलसेल आजाराचे धोरण ठरविणेअधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणेत्यासाठी तांत्रिक मदत करणे अशा विविध बाबींचा आढावा घेऊन नवनीवन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे.

प्रशिक्षण कार्यशाळेत डॉ. सरिता हजारे यांनी उपचार व गैरसमजुती या  विषयावर  मागदर्शन केले. डॉ. स्वप्नील चांदेकरबालरोगतज्ञ डॉ. प्रणाली ठोंबरेफिजिशियन डॉ. प्रसाद पोटदुखे, स्त्रीरेागतज्ञ डॉ. शिल्पा नाईकयांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. नेस्को संस्थेच्या कु अश्विणी खोब्रागडे यांनी सिकलसेल आजारामुळे होणाऱ्या वेदना व उपचारांबाबत आपले मनोगत  व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन संतोष चात्रेशवार यांनी केले. यावेळी जिल्हा सिकलसेल समन्वयकसमुपदेशक भारती तितरेराम बारसागडेनयना चौकेशितल राजपुरे  आदी उपस्थित होते.

०००००


Tuesday, 25 February 2025

पहिल्या "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत" पुरस्काराची घोषणा !

 


पहिल्या "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत" पुरस्काराची घोषणा !
पहिला "छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत" पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या "अनादी मी अनंत मी... " या अमर प्रेरणा गीताला दिला जात आहे.
आमचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे हा पुरस्कार देत आहोत. कारण ते महानयोध्दे, कुशल प्रशासक, पराक्रमी तर होतेच तसेच ते कवी मानाचे आमचे राजे होते. म्हणून हा पुरस्कार त्यांच्या नावे देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी समुद्रात उडी मारली. सावरकर ६० यार्ड एवढे अंतर पोहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला. पण दुर्दैवाने ते पकडले गेले. त्यानंतर आपल्याला इंग्रजाकडून आपला अमानुष छळ होणार हे त्यांच्या लक्षात आलेच होते. त्यावेळी देशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ पुन्हा वाढवण्यासाठी ज्या काव्य पंक्ती त्यांना स्फुरल्या त्या म्हणजे "अनादी मी ... अनंत मी.. हे गीत होय."
त्याच मार्सेलिस समुद्र किनाऱ्यावरुन या पुरस्काराची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे
-ॲड. आशिष शेलार
#ऐतिहासिक_निर्णय #छत्रपती_संभाजी_महाराज_महाराष्ट्र_प्रेरणा_गीत #अनादी_मी_अनंत_मी

वरोरा येथे टीबी फोरम समितीची सभा


 वरोरा येथे टीबी फोरम समितीची सभा

चंद्रपूर, दि. 25 : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत वरोरा येथे गटविकास अधिकारी गजानन मुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली टीबी फोरम कमिटी गठीत करण्यात आली. तसेच पंचायत समिती सभागृहात या समितीची सभा पार पडली.

यावेळी सदस्य सचिव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, होतेबाळू भोयर, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. विशाल लेडेडॉ. सुरज हिवरकरउपजिल्हा रुग्णालय वरोराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आकिब शेखप्रा. राहुल राखे, प्रा. डोंगरे, खाजगी औषधालयचे प्रतिनिधी श्री. तोटावारश्री. पारखीआरोग्य सहायक श्री. येडे आदी उपस्थित होते.

डॉ. बोरकर यांनी क्षयरोगाचे लक्षणेनिदानउपचार याबाबत तसेच क्षयरोगाकरीता राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. यात वरोरा तालुक्यात 27 ग्रामपंचायतींची टीबी मुक्त ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात आली आहे. तालुक्यात सध्यस्थितीत 86 क्षयरोग रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात 7 डिसेंबर 2024 पासून 100 डेज टीबी मोहीम सुरू आहे, सदर मोहिमेंतर्गत जोखीमग्रस्त लोकांचे छातीचे एक्स-रे करण्यात येत आहेत. तसेच लक्षणे असलेल्या लोकांची थुंकी, नमुन्याची तपासणी, सीबीन्याट (CBNAAT) टेस्ट द्वारे केली जाते. या अंतर्गत 2227 लोकांची तपासणी झाली असून 1482 लोकांचे छातीचे एक्स-रे काढण्यात आले व 474 लोकांची सीबीन्याट तपासणी करण्यात आल्याचे डॉ. बोरकर यांनी सांगितले.

प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षय रुग्णांना 6 महिन्यांकरिता पोषण आहार कीट वाटप करण्यात येते. या कीटमध्ये दर महिन्याला 3 किलो गहू किंवा तांदूळदीड किलो तूर डाळ1 लिटर खाण्याचे तेल1 किलो शेंगदाणे व इतर प्रोटीनयुक्त खाद्य पदार्थांचा समावेश केल्या जातो. सदर पोषनाहार कीट सेवाभावी संस्थाराजकीय व्यक्तीसमाजसेवकखाजगी उद्योजकशासकीय अधिकारी यांच्यामार्फत रुग्णांना दत्तक घेऊन दिल्या जाते. वरोराचे गटविकास अधिकारी गजानन मुंडकर यांनी 5 क्षयरोग रुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहार कीटचे वाटप केले. इरतही दानशूर व्यक्तींनी क्षयरुग्णांना दत्तक घेऊन आहाराची किट वेळेवर द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

०००००

निधी अप्राप्त असलेल्या शेतक-यांनी 28 फेब्र.पर्यत आधार संमती व ना - हरकत प्रमाणपत्र सादर करावे

 

निधी अप्राप्त असलेल्या शेतक-यांनी 28 फेब्र.पर्यत आधार संमती व ना - हरकत प्रमाणपत्र सादर करावे  

Ø कृषी विभागाचे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना आवाहन

चंद्रपूरदि. 25 : कृषी विभागाच्या सन 2023 च्या खरीप हंगामातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक    शेतक-यांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत निधी प्राप्त झाला नाही, अशा खातेदारांनी आधार संमती व ना - हरकत प्रमाणपत्र 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत कृषी विभागाकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना 5 हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे कमाल 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येते. यासाठी खरीप 2023 मध्ये ई-पीक पहाणी केलेले कापूस/सोयाबीन उत्पादक शेतकरीज्या शेतक-यांनी खरीप 2023 मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही, तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या 7/12 उता-यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे, असे खातेदार वनपट्टेधारक खातेदार व जिवती तालुक्यातील संगणकीकरण नसलेल्या मधील खरीप 2023 कापूस/सोयाबीन उत्पादक वैयक्तीक व सामाईक खातेदार पात्र आहेत.

पात्र शेतक-यांनी ई-पिक पहाणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असल्याबाबत www.scagridbt.mahait.org या पोर्टलवर किंवा संबंधित कृषि सहायक यांच्यकडून खातरजमा करून घ्यावी. तसेच ज्या शेतक-यांनी खरीप 2023 मध्ये ई-पिक पहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही, तथापि ज्यांच्या खरीप 2023 च्या 7/12 उता-यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहेअशा शेतक-यांनी व जिवती तालुक्यातील Non Digitalised Villages  मधील कापूस/सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी आपल्या गावातील संबंधित तलाठी यांचेशी संपर्क साधावा. तसेच वनपट्टेधारक खातेदार यांनी तहसील/जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

तरी वर नमूद केल्याप्रमाणे अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांना आपले आधारसंमती व सामाईक खातेदारांना आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत संबंधित कृषि सहाय्यक यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र नमूना कृषि सहाय्यक यांचेकडे उपलब्ध आहे. विहीत मूदतीत आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र कृषी विभागास प्राप्त न झाल्याने लाभार्थी अर्थसहाय्यापासून वंचित राहणार नाहीयाची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी नजिकच्या उपविभागीय कृषि अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.

००००००

प्रियदर्शनी सभागृहासाठी कंत्राटी तत्वावर साऊंड व लाईट ऑपरेटरची आवश्यकता

 

प्रियदर्शनी सभागृहासाठी कंत्राटी तत्वावर साऊंड व लाईट ऑपरेटरची आवश्यकता

Ø अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 मार्चपर्यंत

चंद्रपूरदि.25 : जिल्हाधिकारी कार्यालय  यांच्या अधिनस्त असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहासाठी लाईटींग व साऊंड सिस्टीममधील साहित्य हाताळण्याचे किमान एक वर्षाचे ज्ञान/ अनुभव असलेल्या व्यक्तिची मानधन तत्वावर आवश्यकता आहे. विविध व्यक्ती/ संस्थाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहातील साऊंड सिस्टीम तसेच लाईट ऑपरेटींग  हाताळणेसदर साहित्याची देखरेख व जतन करणेतसेच वरिष्ठांनी  वेळेावेळी केलेल्या आदेशाचे पालन करणे आदी कामांकरीता कंत्राटी पध्दतीने मासिक  मानधन तत्वावर 11 महिन्याकरीता अस्थायी स्वरुपात साऊंड ऑपरेटर व लाईट आपॅरेटर यांची नियुक्ती करावयाची आहे.

तरी इच्छुक पात्र व अनुभवी व्यक्तिंनी आवश्यक कागदपत्रासह सहा. करमणुक  कर अधिकारीजिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे. 3 मार्च नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अस्थायी स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरावयाच्या पदास खालील अटी व शर्ती लागू राहतील.

1. अर्जदार हा चंद्रपूर  मुख्यालयी राहणारा असावा. 2. अर्जदाराची वयोमर्यादा 21 ते 50 पर्यंत असावी. 

3. अर्जदारास लाईट व साऊंड  सिस्टीममधील साहित्य हाताळण्याचे किमान 1 वर्षाचे ज्ञान/ अनुभव असणे आवश्यक  आहे. तसेच विविध निमशासकीयखाजगी संस्था किंवा इतर ठिकाणी सदरबाबतचे अनुभव असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. 4. साऊंड ऑपरेटर पदांकरीता 10500 रुपये व लाईट ऑपरेटर करीता 10 हजार रुपये पदाचे मासिक मानधन रुपये राहील. 5. निवड केलेल्या उमेदवारास सभागृहातील कार्यक्रम सुरु होणेपासून ते संपेपर्यंत सभागृहात उपस्थित राहणे  बंधनकारक राहील. 6. निवड केलेल्या उमेदवाराची नेमणूक मा. जिल्हाधिकारीचंद्रपूर यांचे अधिकारात 11 महिन्याच्या कालावधीकरिता अगदी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने करण्यात येईल. 7. सदर कालावधीत त्यांची सेवा असमाधानकारक आढळुन आल्यास त्यांना कोणतीही पूर्व सुचना न देता सेवा केव्हाही समाप्त करण्यात येईल तसेच त्यांना कोणत्याही सेवाविषयक लाभाचा हक्क सांगता येणार नाही. 8. त्याचप्रमाणे नवीन नेमणुकीचा हक्करजाभरपाईवैद्यकीय परिपुर्तीसेवाजेष्ठतासेवानिवृत्ती वेतन इत्यादि सवलती अनुज्ञेय राहणार नाही. 9. कंत्राटी तत्तवावरील नियुक्तींचा  सदर कालावधी संपल्यानंतर त्यांची सेवा आपोआप संपुष्टात येईल. 10. उमेदवारांची सेवा समाधानकारक वाटल्यास त्यांना पुढील कालावधीकरीता जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत कंत्राटी तत्तवावर मुदतवाढ देण्याचे अधिकार मा. जिल्हाधिकारी यांनी राखुन ठेवले आहे.

11.  नियुक्ती कालावधी संपण्यापूर्वी त्यांना सेवेचा त्याग करावयाचा असल्यास त्यांनी या कार्यालयास 1 महिन्याचे अगोदर लेखी नोटीस देणे आवश्यक राहील. तशी नोटीस त्यांनी सादर न केल्यास त्यांचे 1 महिन्याचे मानधन कपात करण्यात येईल. 12. नेमून दिलेली कामे तसेच जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानूसार कामे करणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

०००००

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना


 आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना

Ø जुलै 2022 ते जानेवारी 2025 या कालावधीतील जोडप्यांना मिळणार लाभ

             चंद्रपूरदि.25 : सामाजिक समता व समरसता निर्माण करण्याचे दृष्टीने आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक  सहाय्य देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. ही योजना अनुसूचित जाती,  अनुसूचित जमातीविमुक्त जाती व भटक्या जमातीच्या व्यक्तीपैंकी एक व्यक्ती व दुसरी सवर्ण हिंदुलिंगायतजैनशिख यांच्यातील असेल तर आंतरजातीय विवाहितास लागू करण्यात आलेली आहे.

तसेच या  योजनेअंतर्गत अनुसूचित जातीअनुसूचित जमातीविमुक्त जाती व भटक्या जमाती यामधील आंतर प्रवर्गामधील आंतरजातीय विवाहाच्या सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत. या योजनेमध्ये 50 हजार रुपये प्रति जोडपे डीबीटी तत्वावर अनुदान वितरीत करण्यात येते. सदर अनुदान विवाहित जोडप्यांचे  मुळ कागदपत्राची तपासणी करून त्यांच्या संयुक्त बँक खात्यावर (पीएफएमएस) PFMS प्रणालीमार्फत डीबीटी द्वारे  प्रदान करण्यात येते.

सन 2024-25 या वर्षी शासनाकडून 3 कोटी 75 लक्ष निधीची मर्यादा प्राप्त झालेली आहे. जुलै 2022 ते जानेवारी 2025 पर्यंतच्या ज्या आंतरजातीय विवाहित जोडप्यांनी जिल्हा परिषदेच्या  समाज कल्याण विभागात अर्ज सादर  केलेला आहे, अशा सर्व जोडप्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्या अनुषंगाने नमुद केलेल्या कालावधीत अर्ज केलेल्या विवाहित जोडप्यांनी आपले मुळ जात प्रमाणपत्रशाळा सोडल्याचे प्रमाणपत्रविवाह नोंदणीचे प्रमाणपत्ररहिवासी दाखलाआधार कार्डसंयुक्त बँक खाते पासबुकइत्यादी कागदपत्रे  तपासणी  करण्याकरिता विवाहित जोडप्यांनी मुळ कागदपत्रांसह समाज कल्याण विभागजिल्हा परिषद चंद्रपूर येथे शासकीय सुट्टया वगळता 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा   परिषद यांनी केले आहे.

०००००

जास्त परतावाच्या नावाखाली 2 कोटी 36 लाखांची फसवणूक

 

जास्त परतावाच्या नावाखाली 2 कोटी 36 लाखांची फसवणूक

Ø आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध सुरू

चंद्रपूरदि.25 : आपल्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून गोरगरिबांची तब्बल 2 कोटी 36 लाख 60 हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी हैद्राबाद येथील ग्रँड फॉच्युन इन्फ्रा डेव्हलपर्स या कपंनीविरुध्द तसेच आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आाहे. याबाबत अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत असून आरोपीचा शोध घेणे सुरू असल्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण ) अधिनियम 1999 अन्वये नोंद गुन्ह्यातील आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डीरा. घर नं 1-6-174 ए/बी,  गंगापुत्र कॉलनीमुर्शीदाबाद, आंध्रप्रदेश याच्याविरुद्ध फिर्यादी रेवनाथ आनंदराव एकरेरा.वार्ड क्र.3गडचांदुर, यांच्या लेखी रिपोर्ट वरून पो.स्टे रामनगर येथे अपराध कलम 406, 420, 465, 468, 471, 34.भादंवि सहकलम 3, 4 महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 अन्वये ग्रॅन्ड फॉच्युन इंन्र्फॉ डेव्हलपर्स  कंपनी हैद्राबाद विरुध्द गैरव्यवहारप्रकरणी  गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

        आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी  याने ग्रॅन्ड फॉच्युन इंन्र्फॉ डेव्हलपर्स  कंपनी हैद्राबाद स्थापन करून विविध स्किमद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील गोरगरीब लोकांची फसवणूक केली. त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. याबाबत रेवनाथ आनंद एकरे (46 वर्षे) रा. वार्ड न. 3पोलीस स्टेशनच्या मागे गडचांदूर  यांनी पो.स्टे.  रामनगर येथे दिली असून सदरचा गुन्हा 18 नोव्हेंबर 2022 रोजी नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचे तपासत आरोपीने 2 कोटी 36 लक्ष 60 हजार रुपयांची फसवणुक केल्याचे दिसून आलेले आहे. 

या गुन्ह्यातील आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून सदर गुन्ह्यातील गुंतवणुकदारांना आवाहन करण्यात येते की, आजपावेतो ज्या गुंतवणुकदारांनी परिशिष्ट क्र. 1 चे फॉर्म भरून दिले नाही, त्यांनी आठ दिवसाचे आत आर्थिक गुन्हे शाखाचंद्रपूर येथे जमा करावे. तसेच आरोपीचा सुगावा लागल्यास पोलिस नियंत्रण कक्षचंद्रपूर 07172-27325807172-264702 तसेच तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर (मो. 9359258365) या क्रमांकावर आर्थिक गुन्हे शाखाचंद्रपूर येथे कळवावे, असे पोलिस विभागाने कळविले आहे.

०००००

Sunday, 23 February 2025

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्य चंद्रपुर जिल्ह्याच्या दौ-यावर

 राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व सदस्य चंद्रपुर जिल्ह्याच्या दौ-यावर

चंद्रपूरदि. 23 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमुर्ती सुनील शुक्रे आणि इतर दोन सदस्य तसेच कर्मचारी चंद्रपूर येथे मानाझाडेराजपुतआर्य वैश्य कोमटी व गोलकर या जात समुहाच्या मागण्यांच्या अनुषंगाने सुनावणीसाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी दुर्गापुर येथील थर्मल पॉवर स्टेशन विश्रामगृहात आगमन व मुक्काम.   दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष व प्रांताधिकारी यांच्यासोबत बैठकसकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मानाझाडेराजपुतआर्य वैश्य कोमटीगोलकर समाजप्रतिनिधींची सुनावणीदुपारी 1.30 वाजता राखीव. दुपारी 3 ते 5 या वेळेत थर्मल पॉवर स्टेशन विश्रामगृह येथे आयोगाची बैठक व मुक्काम. दि. 26 रोजी राखीव व सायंकाळी 7.30 वाजता चंद्रपूरवरून नागपूरकडे रवाना.

00000000

राजोली चक हे महसुली गाव पुर्ववत बोथली साझामध्ये समाविष्ट



राजोली चक हे महसुली गाव पुर्ववत बोथली साझामध्ये समाविष्ट

Ø जिल्हाधिका-यांनी प्रसिध्द केली अंतिम अधिसुचना

चंद्रपूरदि. 23 : सावली तालुक्यातील मौजा राजोली चक हे महसूली गावचकविरखल या तलाठी साझ्यातून कमी करून बोथली तलाठी साझ्यामध्ये समाविष्ट करण्याबाबतची अंतिम अधिसुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी प्रसिध्द केली आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्रान्वयेतलाठी साझा पुर्नरचना करून चंद्रपूर जिल्ह्यात या पूर्वी असलेल्या 299 तलाठी साझ्यांमध्ये नव्याने 133 तलाठी साझे निर्माण करण्यात आले आहेत. सावली तालुक्यातील चिचबोडी येथील सरपंचांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. यात मौजा राजोली चक हे गाव नव्याने अंतर्भूत झालेल्या चकविरखल या साझ्याच्या मुख्यालयापासून 15 कि.मी. दूर आहे. त्यामुळे ग्रामस्थांना शासकीय कामाकरीता ये-जा करण्याकरीता दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. तसेच रस्त्यात घनदाट जंगल असून वाघांची भीती असल्यामुळे मौजा राजोली चक हे महसूली गाव चकविरखल या साझाऐवजी बोथली या साझ्यामध्ये अंर्तभूत करण्याची मागणी केली होती.

या निवेदनाच्या अनुषंगाने सावलीच्या तहसीलदारांनी मौका चौकशी करून अहवाल सादर केला. मौजा राजोली चक हे महसूली गाव चकविरखल या साझ्याच्या मुख्यालयापासून 15 कि.मी दूर असल्याने ग्रामस्थांना शासकीय कामाकरीता ये-जा करण्याकरीता दळणवळणाच्या दृष्टीने 2 कि. मी दूर असलेला बोथली हा साझा सोयीचे असल्याचे कळविले होते. त्या अनुषंगाने अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या तलाठी साझांची पुनर्रचना करण्याबाबत शिफारसी मधील मुद्दा क्र. 6.1.3 मध्ये "प्रत्येक तलाठी साझाचे मुख्यालयापासून त्या साझ्यास संलग्न करण्यात येणारे गाव 10 कि.मी पेक्षा जास्त अंतरावर शक्यतो नसावे. उपलब्ध दळण-वळण व्यवस्थेचा विचार करून त्याबाबतचा निर्णय संबंधित जिल्हाधिकारी यांनी घ्यावा" असे नमूद आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम1966 चे कलम 4 पोटकलम (2) नुसार तलाठी साझा निर्मिती किंवा फेरबदल करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. तसेचअधिनियमाच्या कलम 4 पोटकलम (4) च्या अन्वये अंतिम अधिसुचना प्रसिध्द करण्यापूर्वी प्रारूप अधिसुचना 2 जानेवारी 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. प्रारूप अधिसुचनेच्या प्रसिध्दीनंतर कोणताही आक्षेप किंवा उजर या कार्यालयास विहीत वेळेत प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी तलाठी साझा पुनर्रचनेबाबत 10 नोव्हेंबर 2017 रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रात बदल करून अनुसूचीप्रमाणे मौजा राजोली चक हे महसुली गाव चकविरखल या साझामधून कमी करून बोथली या साझाला पुर्ववत जोडण्यात आले आहे.

0000000

Saturday, 22 February 2025

घरकुलाचे स्वप्न त्वरीत पूर्ण करण्यावर भर देणार – पालकमंत्री डॉ. उईके








 

घरकुलाचे स्वप्न त्वरीत पूर्ण करण्यावर भर देणार – पालकमंत्री डॉ. उईके

Ø प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण सोहळा

Ø जिल्ह्यातील 49989 लाभार्थ्यांना मिळणार लाभ

चंद्रपूरदि 22 : गरिबांना घरकुलाचे वेगळेच महत्त्व असते. घरकुल मंजूर झाल्यावर अतिशय आनंद होतो. मात्र त्याचे रूपांतर वास्तविकतेत होण्यासाठी कधीकधी विलंब होतो. हा विलंब कमी करून नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न त्वरित पूर्ण करण्यावर आपला भर राहीलअशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना (ग्राामीण) अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व लाभार्थ्यांच्या खात्यात प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम प्रियदर्शनी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावर उद्घाटन करतांना पालकमंत्री  डॉ. उईके बोलत होते. मंचावर आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवारकिशोर जोरगेवारराष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीरजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळुंकेजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडेउपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सावंत आदी उपस्थित होते.

राज्य स्तरावर पुणे येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील 20 लक्ष लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि 10 लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम होत आहेअसे  सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणालेचंद्रपूर जिल्ह्यातील 49989 लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा दोनया कार्यक्रमाचे सर्व ग्रामपंचायत आणि पंचायत स्तरावर अतिशय चांगले नियोजन करण्यात आले आहे. गरिबाचे घरकुलचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तांत्रिक अडचणी त्वरीत दूर केल्या जातील.

पुढे ते म्हणालेप्रधानमंत्री आवास योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरू झाली आहे. चंद्रपुरातील सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळेल. देशातला एकही पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नयेअसा संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. एक वर्षाच्या आत घरकुलाचे काम पूर्ण करून आजचा कार्यक्रम सार्थ ठरविण्यासाठी आपला प्रयत्न राहील. यासाठी सर्व यंत्रणेने अतिशय गांभिर्याने काम करावेअशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केली.

घरकुलच्या अनुदानात वाढ होण्यासाठी आवाज उठविणार : आमदार सुधीर मुनगंटीवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील 49 हजार 989 घरकुलसाठी मंजुरी दिलीत्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे. अन्नवस्त्रनिवारा या अनिवार्य व मूलभूत गरजा आहेत. आज ज्यांना घरकुल मंजुरी मिळाली आहेत्यांनी याची माहिती आपापल्या परिसरातील लोकांना द्यावी. जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ मिळू शकेल. घरकुलसाठी मिळणारे अनुदान 1 लक्ष 20 हजार रुपयांमध्ये वाढ करण्यासाठी मी आवाज उठवेलअसे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. तसेच मनरेगाअंतर्गत मिळणारी 26 हजार रुपये मजुरी वेळेवर मिळावी. सदर घरकुल एक वर्षाच्या आत पूर्ण बांधून व्हावे. घरकुलाच्या रेतीचा प्रश्न प्रशासनाने मार्गी लावावाअशी मागणीसुध्दा त्यांनी केली.

घर नसलेल्यांना प्रशासनाने घरकुल उपलब्ध करून द्यावे : आमदार किशोर जोरगेवार

राज्यासाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. राज्यातील 20 लक्ष नागरिकांना घरकुल मंजुरी देण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे. आपले स्वतःचे घर असावेअसे प्रत्येकाला वाटत असते. पंतप्रधानांनी सर्वांना घरे देण्याचा संकल्प केला आहे. ज्यांच्याजवळ स्वत:चे घर नाहीत्या सर्वांना प्रशासनाने घरे उपलब्ध करून द्यावेअसे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

गरीबांची गरिबी संपविणारा कार्यक्रम : हंसराज अहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देशाला एक नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांनी प्रत्येक गरजू कुटुंबाला घरकुल उपलब्ध करून दिले आहे. रमाई आवासशबरी आवास व इतरही घरकुलाच्या योजना राज्य सरकार प्रभावीपणे चालवत आहे. एकही कुटुंब घरकुलापासून वंचित राहणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार अतिशय उत्तम काम करीत असून गरिबांची गरिबी संपवणारा हा घरकुल वाटप कार्यक्रम आहे. भारताच्या घरकुल योजनेचे जगाने अनुकरण करावेअसे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी केले.

प्रातिनिधीक स्वरुपात घरकुल मंजूरीपत्र वाटप : यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात साईनाथ झुंगरेयादव बैलमारेसंदीप नागोसेइंद्रदेव पेंदोरगृहदास मांढरेमहादेव मारडकररोशनी जेनेकरमूलचंद करंडेमारुती पाचपाईश्रीपाद बुरांडेनितीन बोभाटेजितेंद्र मोगरकरसुनिता काकडेकुसुम राऊतविनायक मोहितकरवनमाला जांभुळे आदींचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक (जिग्रावियं) गिरीश धायगुडे यांनी केले. संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार सहायक प्रकल्प संचालक प्रणव बक्षी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक आणि लाभार्थी उपस्थित होते.

0000000