Search This Blog

Monday, 4 August 2025

महसूल विभाग म्हणजे ‘लोकसेवा’ – पालकमंत्री डॉ. उईके

 महसूल विभाग म्हणजे लोकसेवा’ – पालकमंत्री डॉउईके

Ø महसूल सप्ताहाबद्दल जिल्हा प्रशासनाला शुभेच्छा पत्र

चंद्रपूर, दि. 4 सामान्य नागरिकांसाठी सरकार म्हणजे महसूल विभाग. कोतवाल ते जिल्हाधिकारी हे सामान्य नागरिकांकरिता शासनाचे प्रतिनिधी म्हणून समर्पित भावनेने कर्तव्य बजावतातत्यामुळे त्यांच्या कामात पारदर्शकताजलद गतीआणि लोकाभिमुखता असणे अत्यावश्यक आहेमहसूल विभाग हा केवळ प्रशासनाचा भाग नाहीतो 'लोकसेवेचा खरा प्रतिनिधीआहेत्यामुळे महसूल विभागात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचा-याकडून निष्ठापारदर्शकता आणि सामाजिक जाणिव यांचा सदैव विचार व्हावा व कालमर्यादेत नागरिकांची कामे पार पाडण्यास प्राधान्य असावेअशी अपेक्षा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक उईके यांनी व्यक्त केली.

ते ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात साजरा होणा-या महसूल सप्ताहानिमित्त दिलेल्या शुभेच्छा पत्रात पालकमंत्री डॉउईके म्हणालेमहसूल विभाग प्रशासकीय यंत्रणेचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातोशासनाच्या विविध योजनाधोरणेआदेश आणि कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी करणे ही महसूल विभागाची जबाबदारी आहे. ‘गाव ते राजधानी असा व्यापक कार्यक्षेत्र असलेला हा विभाग शासन आणि जनतेमधील एक दुवा म्हणून कार्य करतो-याच वेळा महसूल या शब्दाचा अर्थ फक्त आर्थिक उत्पन्नाशी जोडला जातोपणप्रत्यक्षात हा विभाग जमिनीचे अधिकार अभिलेख अद्यावतीकरणफेरफार नोंदणीशेतपिक नुकसानीचे पंचनामेसामाजिक अर्थसहाय्य योजनानैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व निवडणुका अशा असंख्य कार्यामध्ये अहोरात्र सहभागी असतो-या अर्थाने महसूल विभाग शासनाच्या यंत्रणेचा कणा आहे.

गेल्या काही वर्षांत महसूल विभागाने डिजिटायझेशनऑनलाईन सेवा-सातबारा-फेरफारमोबाईल अॅप्सनागरिक सेवा केंद्रे याद्वारे एक सुलभपारदर्शक आणि तत्पर सेवा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहेयामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत नाहीतहे एक सकारात्मक परिवर्तन आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वने मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वनविभाग आणि महसूल विभाग यांच्यातील योग्य समन्वय असल्यानेवनहक्क प्रकरणेनिर्वाणीकरणझुडपी जमिनीचे रूपांतरणवनीकरणासाठी लागणारी जमीनयामुळे अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेतयासंबंधी महसूल विभागाची भूमिका निर्णायक ठरतेतसेच चंद्रपूर जिल्हयात मोठ्या प्रमाणात वन जमीन असल्याने येथील पारंपरिक आदिवासी समुदायाला वनहक्क दावे मंजुर करुनत्यांच्या हक्काची जमीन कसण्याकरिताउपलब्ध करून देण्यात आलीयामुळे पिढयानपिढ्या दुर्लक्षित असलेला आदिवासी समुदाय हा विकासाच्या मुख्या प्रवाहात आला आहेत.

महसूल विभागाच्या माध्यमातूनच शासनाच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचतातम्हणून महसूल विभागाचा सन्मानत्याचे कार्य ओळखणेआणि ते अधिक प्रभावीपणे घडवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहेचंद्रपूर जिल्हयातील पाणंद रस्ता योजनाचॅटबोट, शस्त्र परवाना अॅपइत्यादी उपक्रम राज्यस्तरावर अग्रस्थानी ठरलेया विभागातील कर्मचारी व अधिकारी वर्गाने प्रामाणीकपणे कार्य केल्यामुळे चंद्रपूर जिल्हा लोकाभिमुख प्रशासनाचा उत्कृष्ठ नमुना बनला आहेत्याचेच फलीत म्हणून महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसाच्या अभियानामध्ये चंद्रपूर जिल्हा अव्वल स्थानी राहिलेला आहे.

महसूल विभागाच्या माध्यमातुन आपण शासन आपल्या दारी हे तत्व प्रत्यक्षात उतरवित आहोतयापुढेही महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांच्या अंमलबजाणी करिता जिल्ह्यातील महसूल विभाग महत्वाची भूमिका बजावेलअशी अपेक्षा पालकमंत्री डॉउईके यांनी व्यक्त केली.

००००००

No comments:

Post a Comment