Search This Blog

Wednesday 24 October 2018

28 व 29 ऑक्टोबरला बल्लारपुरात युथ एम्पॉवरमेंट समीट



चंद्रपूर जिल्हा रोजगार, स्वयंरोजगार युक्त बनविण्यासाठी, प्रधानमंत्री मुद्रायोजनेतून मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करण्यासाठी  व नवयुवकांना शासकीय सेवांमध्ये संधी देण्यासाठी, तसेच कृषी व विदेशातील संधी शोधण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शनासाठी राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात जिल्ह्यातील पहिल्या युथ एम्पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन बल्लारपूर येथे 28 व 29 ऑक्‍टोबरला होत आहे.
काय आहे युथ एम्पावरमेंट समीट
*           महाराष्ट्राच्या पूर्वेकडील अतिदुर्गम भागातील युवकांना मुंबई, पुण्यातील तरुणांप्रमाणे नोकरी-व्यवसाय-प्रशिक्षण व विदेशातील संधींचा जागेवरच फायदा मिळावा असा उदात्त हेतू.
*           महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील उपलब्ध असणा- योजना, प्रशिक्षण व सेवा संधींचा फायदा देण्यासाठीचे हे आयोजन.
*           एकाच छताखाली विविध विभागांमार्फत करण्यात येत आहे.
भारतामध्ये अशिक्षित व सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. मात्र केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या चार वर्षात उभारलेल्या रोजगार युक्त धोरणातून निर्माण झालेल्या नव्या योजना, विदर्भातील युवकांच्या विकासाच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या योजना याची माहिती देण्यासाठी  हा अभिनव प्रयोग आहे.  
  चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरी, व्यवसाय प्रशिक्षण, उद्योग धंदा उभारणी, कृषी, विदेशी सेवा व सामाजिक क्षेत्रात भवीष्य घडविण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण, कर्जपुरवठा आणि उपलब्ध संधीची माहिती देण्यासाठी बल्लारपूर या मध्यवर्ती ठिकाणी या युथ एम्पॉवरमेंट समीट  अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन 28 व 29 ऑक्टोंबरला केले जात आहे.
एकाच छताखाली अनेक संधी
तुम्ही सुशिक्षित आहात, उच्चविद्याविभूषित आहात, अपंग आहात, मागासवर्गीय आहात, दिव्यांग आहात, अक्षर ओळख असणारे अर्धशिक्षीत आहात, कोणत्याही गटात, जातीत, धर्मात आहात. या मेळाव्यामध्ये या सर्व युवकांना संधी दिली जाणार आहे. तीही एकाच छताखाली. यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचा कल ओळखणे, त्याला प्रशिक्षणांची माहिती देणे, त्यासाठी कर्ज पुरवठा करणे व जागेवरच मुलाखती घेवून काही आस्थापनात नोकरी उपलब्ध करुन देणे, असे या युवा सशक्तीकरण आयोजनाचे स्वरुप राहणार आहे.


संधी कोणाला मिळणार
तुम्ही दहावी पास असा की व्यवसाय प्रशिक्षण घेतलेले  सुशिक्षित बेरोजगार असा, तुम्ही प्रशिक्षित असा किंवा अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी वा अन्य कोणत्या क्षेत्रातील उच्चशिक्षित असा. सर्वांसाठी या ठिकाणी संधी असणार आहे, तुम्हाला नोकरी मिळवायची आहे. तुम्हाला समाजासाठी काही नवीन करायचे आहे, तुम्हाला अमुक एका क्षेत्रामध्ये प्रशिक्षण हवे आहे, तुम्हाला नवा उद्योग धंदा उभारायचा आहे किंवा विदेशात जाऊन वेगळे शिक्षण घ्यायचे आहे. अशा कोणत्याही मनातल्या इच्छेला भविष्याचे पंख लावून उडायला शिकवणारा हा महामेळावा असणार आहे. त्यामुळे दहावीपासून पुढे कितीही शिकलेले असाल किंवा अशिक्षित असाल तरीही या मेळाव्याचा लाभ घेणे महत्वाचे आहे. कारण या ठिकाणी आहे भरपूर संधी. जिल्ह्यातल्या प्रत्येक तरुणाला, त्याच्या इच्छा-आकांक्षांना संधीचे बळ देण्याची उपाय योजना या महामेळाव्यात करण्यात आली आहे.
दोन दिवसाच्या आयोजनाचे स्वरूप
हजारो युवकांना दोन दिवस आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्याची उपाय योजना या ठिकाणी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील संधीची चित्रप्रदर्शनी, उद्योगधंद्यात स्वकर्तुत्वाने यशस्वी झालेल्या मान्यवरांची भाषणे, मुलाखती, परिसंवाद, स्लाईडशो, विविध उद्योगांचे प्रशिक्षण, मशिनरीचे प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट रिपोर्ट, उद्यमशीलतेला पोषक ठरतील, असे मार्गदर्शन करणारे सरकारी योजनांचे व स्वयंसेवी संस्थांचे स्टॉल. आपल्या प्रयत्नातून मोठ्या झालेल्या उद्योगविश्वातीलसनदी सेवेतीलविदेशी शिक्षण घेतलेल्या यशवंत मान्यवरांना भेटण्याची संधी देखील या आयोजनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या दोन दिवसाच्या विचारमंथनातून येथे आलेल्या अनुभवातून सुशिक्षित बेरोजगारांना नवी दिशानवसंजीवनी या ठिकाणी निश्चित मिळणार आहे.
अनेक विभागांचा व आस्थापनांचा सहभाग
महाराष्ट्र शासन, केंद्र शासन,खाजगी आस्थापनाबहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आस्थापनाउद्योगविश्वातील दिग्गज कंपन्यांचा या दोन दिवसांच्या रोजगार महामेळाव्यात सहभाग राहणार आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार निर्मितीउद्योग, कृषी सहकारसमाज कल्याण, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रमत्ससंवर्धन, दुग्धव्यवसाय,  वेगवेगळया प्रशिक्षण देणा-या संस्थाविविध महामंडळसर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्याधिकारीसर्व बँकाचे पदाधिकारी व राज्य शासनाच्या रोजगार निर्मितीशी संबंधीत असणा-या सर्व विभागांच्या प्रमुखांची याठिकाणी उपस्थिती राहणार आहे. मुंबईपुणे औरंगाबाद येथील नामवंत कंपन्यांच्या आस्थापनात्यांची निवड मंडळ या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.
हजारोंना नोकरीरोजगाराची संधी
या रोजगार मेळाव्यामध्ये केवळ मार्गदर्शनच नव्हे तर मुंबई,पुणे व औरंगाबाद येथील अनेक कंपन्यांमध्ये असणाऱ्या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही देखील होणार आहे. योग्य उमेदवारांना आपल्या कंपनीमध्ये सहभागी करण्यासाठी या कंपन्यांचे नियुक्ती व निवड मंडळ मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. युवकांच्या शैक्षणिक व कौशल्याची पारख करून त्यांना आपल्या कंपनीमध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही देखील बल्लारपूर मध्ये होणार असून त्यासाठीच जिल्ह्याभरातील युवकांना आपल्या कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे,आवाहन करण्यात येत आहे.
मेळाव्याला उपस्थित राहण्याचे फायदे
हा मेळावा युवकांना खालील बाबींमध्ये मार्गदर्शन करणार आहे...
१. उद्योग व्यवसायाची आवड असणाऱ्यांना व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवावा.
२. विविध प्रकारची मशिनरी व कच्चामाल कुठे मिळेल.
३. व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त मार्गदर्शन करणा-या संस्था कोणत्या आहेत.
४. मुद्रा योजनेतून कर्ज मिळण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करता येईल. कोणती बँक मदत करेल.
५. विदर्भात कोणत्या कृषी व्यवसायाला प्राधान्य द्यायला हवे.
६. बांबू पासून विविध वस्तू बनवणा-या व्यवसाय उभारताना कोणते प्रशिक्षण व कौशल्याची आवश्यकता आहे.
७. सेंद्रिय शेती वनशेती करताना कोणती काळजी घ्यावी व त्यातील भविष्य काय आहे.
८. उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी कोणकोणत्या संस्था कशाप्रकारे अर्थ साहाय्य करतात.
९. मागासवर्गीय तसेच अपंगासाठी व्यवसाय करण्यासाठी कोणत्या सरकारी सवलती आहेत.
१०. मागासवर्गात न बसणा-या उच्च जातीतील सुशिक्षित बेरोजगारांना राज्य शासनाने कर्ज पुरवठा करण्यासाठी कोणत्या योजना आखल्या आहेत.
११. अल्पसंख्यांक समुदायासाठी व विविध घटकातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी कोणत्या योजना आहेत.
१२. महिलांना घरच्या घरी सहज व्यवसाय कोणता करता येईल. कुटीर उद्योगासाठी कोणत्या संधी आहेत.
१३. ग्रामीण भागात जोडधंदा करताना कुक्कुटपालनदुग्ध व दुग्धजन्य उत्पादनेगोट फार्मिंगमत्स्यव्यवसाय यासाठी काय उपाय योजना आहेत.
१४. गटशेतीचे फायदे कायकिती लोकांचा गट करता येईल,त्यासाठी शासकीय योजना कोणते आहेत. किती अनुदान दिले जाईल.
१५. यशस्वी व्यवसाय करण्यासाठी उद्योजकांनी व्यवस्थापन कसे करावे. कोणती शिस्त पाळावी.
१६. मार्केटिंग,मल्टिलेव्हल मार्केटिंगभावी उद्यमशीलतेला नवी दिशा कशी ठरू शकेल.
१७. आपले शहर सोडून भारतात कुठेही  जाण्याची तयारी असणाऱ्या युवकांना नोकरी कुठे उपलब्ध असू शकते.
१८. आपल्या शहरात,घराजवळ,उद्योग व्यवसाय उभारताना कोणत्या संधी उपलब्ध आहेत.
१९. यूपीएससीएमपीएससीस्टाफ सिलेक्शनरेल्वेबँक, पोलीस भरतीयामध्ये असणाऱ्या विविध संधी
२०. बचत गटातील महिलांना उत्पादनांना बाजारपेठ कशी मिळवावीकोणत्या सार्वजनिक उपक्रमात सहभागी व्हावे याबाबतचे मार्गदर्शन.
अशा विविध संधीचा फायदा या ठिकाणी मिळणार आहे सुशिक्षित बेरोजगारांच्या मनात येणा-या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी या युथ एम्पॉवरमेंट समिटचे आयोजन आले आहे.
रोजगारयुक्त जिल्हयासाठी सहा सूत्री कार्यक्रम.
चंद्रपूर जिल्हयाला रोजगार युक्त करण्यासाठी  सूत्रांमध्ये जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
1.मिशन सेवा- ही संपूर्णता नोकरीमध्ये उत्सुकता असणा-या विद्यार्थ्यांसाठी उपाय योजना असेल. यामध्ये गाव जिल्हाराज्य व देशपातळीवरील नोकरीच्या संधीचे मार्गदर्शन केले जाईल. यासाठी राज्य शासनाच्या विविध प्रशिक्षण व राहण्याच्या व अभ्यासाच्या सोयीसुविधांच्या उपाययोजना.
2.मिशन स्वयंरोजगार - मुद्रा व अन्य योजनेअंतर्गत कर्ज व त्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील उपाय योजना. याशिवाय राज्य शासनाच्या गेल्या चार वर्षात सुरू करण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या योजना व त्यातून केल्या गेलेल्या कर्जपुरवठाच्या तरतुदी. मागासवर्गीयांसाठी सुरू असणा-या योजनांची माहिती व उपाययोजना.
3.मिशन कौशल्य – यामध्ये राज्य शासनाचे व अन्य खासगी संस्थांचे प्रशिक्षणव्यवसाय, अभ्यासक्रम उपलब्ध करण्याची उपाय योजना. डायमंड प्रशिक्षण केंद्रापासून तर मत्स्य व्यवसाय कुक्कुटपालन व अन्य व्यावसायिक प्रशिक्षणाची तसेच सवलतीची माहिती दिली जाणार.
4.मिशन फॉरेन सर्व्हिसेस – यामध्ये विदेशातील शिक्षण व प्रशिक्षण घेणा-या उपाययोजना असतील. राज्य शासनाने नव्याने घेतलेल्या निर्णयामध्ये मागासवर्गीयांसह आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणार्‍या उन्नत गटांचाही सहभाग असणा-या उपाययोजना.
5.मिशन उन्नत शेती- कृषी व्यवसायात आवड असणा-यांना आधुनिक शेती व त्यावर आधारीत उद्योगाची माहिती उपलब्ध करणे. तसेच शेतीमध्ये प्रयोग करणाऱ्यांसाठी गट शेती व  राज्य शासनाने नव्याने सुरू केलेल्या उपाययोजनांची माहिती व अंमलबजावणीचे तंत्राचा सहभाग.
6.मिशन सोशलवर्क- सार्वजनिक क्षेत्रात विविध लोकोपयोगी उपक्रमात झोकून देणा-या युवकांसाठी प्रशिक्षणाची उपाययोजना. समाजकार्यातून समाज सेवेसोबतच उपजीविकेचे व्यवस्थापन विकसित करण्याचे तंत्रशिक्षण.
इयत्‍ता 10 वी पासुन पदवी, पदव्‍युत्‍तर,  अभियांत्रीकी, आय.टी.आय. अशा सर्वच प्रकारचे शिक्षण घेतलेले चंद्रपूर जिल्‍हयातील तरूण-तरूणी या मेळाव्‍यात सहभागी होवू शकतील. यासाठी www.yeschandrapur.com/register.aspx या माध्‍यमातुन ऑनलाईन नोंदणी इच्‍छूक तरूण, तरूणी करू शकतील. 25 ऑक्‍टोबरच्या  सायं.6 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू राहणार आहे. प्रत्येक युवकाने या संधीचा फायदा घेणे गरजेचे आहे चंद्रपूर जिल्हयातीलच युवकांना ही संधी असून त्यासाठी प्रत्येक घरातून चलो बल्लारपूरचा नारा बुलंद होने आवश्यक आहे.


     प्रवीण टाके
                                                                                                जिल्हा माहिती अधिकारी
चंद्रपूर-970285877 0000

No comments:

Post a Comment