Search This Blog

Tuesday 2 October 2018

महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली


चंद्रपूर दि 2 ऑक्टोबर : संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणारे महात्मा गांधी, जय जवान जय किसान नारा देणारे माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांना आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आदरांजली व्यक्त करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पुष्पांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी  डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी घनशाम भूगावकर यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.  यावेळी उपस्थित कर्मचारी – अधिकारी यांनीही आदरांजली वाहिली.
000

No comments:

Post a Comment