Search This Blog

Monday 28 November 2022

बल्‍लारपूर येथील दुर्घटनेतील मृतकाच्‍या कुटुंबियांना मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रू. चे अर्थसहाय्य


बल्‍लारपूर येथील दुर्घटनेतील मृतकाच्‍या कुटुंबियांना

मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रू. चे अर्थसहाय्य


Ø  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्र्यांनी केली मान्य

चंद्रपूर, दि. 28 : बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका निलिमा रंगारी यांच्‍या कुंटुंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर योग्‍य उपचार शासकीय खर्चाने करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत.

रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्‍थळाला भेट दिली व सामान्‍य रुग्‍णालय चंद्रपूर येथे भेट देत जखमींची विचारपूस देखील केली. यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याशी संपर्क साधून मृतकाच्‍या कुटूंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रु.चे अर्थसहाय्य प्रदान करण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार मुख्‍यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य मृतकेच्‍या कुटुंबियांना जाहीर केले आहे.

००००

No comments:

Post a Comment