Search This Blog

Friday 2 August 2024

पालकमंत्र्यांच्या पत्रानंतर शेतकऱ्यांना ई-केवायसी करिता 15ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 

पालकमंत्र्यांच्या पत्रानंतर शेतकऱ्यांना ई-केवायसी करिता 15ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Ø मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी घेतली दखल

Ø नुकसान भरपाई मिळण्यासाठी निर्माण झाली होती अडचण

चंद्रपूरदि.2 : राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रानंतर काही तासांमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी निर्णय घेतला. तात्काळ दखल घेऊन राज्यभरातील शेतकऱ्यांना ई-केवायसीकरिता 15 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळण्याच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांना काही शेतक-यांकडून निवेदन प्राप्त होताच त्यांनी मंत्र्यांना पत्र लिहिले. सन 2023-24 मधील अतिवृष्टी व पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पीक वाहून गेले. संपूर्ण शेत पाण्याखाली आले. अशा परिस्थितीत नुकसान भरपाईसाठी पात्र असतानाही अडचण निर्माण झाली होती. नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे आणि अपुऱ्या वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करणे अवघड आहेअशाप्रकारचे निवेदन अनेक शेतकऱ्यांकडून श्री. मुनगंटीवार यांच्या कार्यालयात प्राप्त झाले होते.

या सर्व निवेदनांची दखल घेऊन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांकडे वेळ अपुरा असल्यामुळे ई-केवायसीकरिता मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. आपण या प्रक्रियेकरिता मुदतवाढ द्यावीअसे पत्र श्री. मुनगंटीवार यांनी मुदत व पुनर्वसन मंत्र्यांना लिहिले होते. या पत्राची काही तासांतच दखल घेण्यात आली आणि ई-केवायसीकरिता 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या तत्परतेमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात येणारी मोठी अडचण दूर झाली आहे.

०००००००

No comments:

Post a Comment