अभय योजनेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
चंद्रपूर, दि. 4 :महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्काच्या व दंडाबाबतअभय योजना -2023सुरू केली असून1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या कालावधीत जवळपास 242 नागरिकांनी पहिल्या टप्प्याचा लाभ घेतलेला आहे. तसेच अभय योजना- 2023 चा दुसरा टप्पा 1 फेब्रुवारीते 30 जुन 2024 पर्यंत सुरू होता. परंतु सदर योजनेसंदर्भात जनतेचा सहभाग लक्षात घेता शासनाने या योजनेला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जनतेने अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारीअंकिता तांदळेयांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment