Search This Blog

Thursday 29 August 2024

पी.एम. जनमन योजनेअंतर्गत आदिम कोलाम लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप





पी.एम. जनमन योजनेअंतर्गत

आदिम कोलाम लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

चंद्रपूरदि. 29 : बिरसा मुंडा जयंती निमित्त आदिम जमातींच्या विकासाकरिता पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान अर्थात पी. एम. जनमन योजनेची मागच्या वर्षी सुरुवात करण्यात आली होती. आता या योजनेचा दुसरा टप्पा 25 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाला असून  जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील अभियानाची सुरुवात जिवतीराजुरा आणि कोरपना या आदिम बहुल तालुक्यांतून विविध सेवांच्या आयोजनाने करण्यात येत आहे. 

त्यानुसार कोरपना तालुक्यातील एकूण 430 लाभार्थ्यांना, राजुरा तालुक्यातील 54 आणि जिवती तालुक्यातील 509 लाभार्थ्यांना जातीचे दाखलेउत्पन्नाचे दाखलेआयुष्यमान भारत कार्डजॉबकार्डआरोग्य तपासणीआधार कार्ड नुतनीकरणपी.एम. किसान योजनाविद्युत जोडणीमतदार कार्डरेशन कार्डसंजय गांधी योजनाअधिवास प्रमाणपत्र जनधन खाते अशा विविध योजनांचा लाभ मिळालेला आहे.

            या अभियानांतर्गत प्रथम चरणात वंचित राहिलेल्या जिवतीराजुराआणि कोरपना या आदिम बहुल तालुक्यांतील लाभार्थ्यांना आधार कार्डआयुष्यमान भारत कार्डजातीचे दाखलेजनधन खातेअधिवास प्रमाणपत्रउत्पन्न दाखलेमतदान कार्डकिसान क्रेडिट कार्डरेशन कार्ड इत्यादी ‍विविध दाखले शिबिरांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आदिम जमातीतील कुटुंबांना पक्के घरनल से जल योजनेअंतर्गत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविणेपाडे व वस्त्यांना  रस्त्याने जोडणेप्रत्येक घराला वीज जोडणी  उपलब्ध करुण देणेपोषण आहार आणि आरोग्य सुविधावस्त्यापाडे मोबाईल आणि इंटरनेट  सुविधेने जोडणेबेरोजगारांसाठी कौशल्य विकास योजना राबविणेउपजिविका साधनांची  निर्मिती करणेवैयक्तिक वनहक्क दावे धारकांना पीएम – किसान योजनेचा लाभ देण्यात येत आहे. सदर अभियान जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे मार्गदर्शनात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांचे समन्वयाने आणि संबंधित सर्व शासकीय विभागांचे सहकार्याने 27 ऑगस्ट 2024 पासून पार पडत आहे.

            एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूर द्वारे जिल्ह्यात आदिवासींसाठी 10 सप्टेंबर 2024 पर्यंत राजुराकोरपना व जिवती तालुक्यात अशा शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या योजनांचा तसेच वरील ठिकाणी असलेल्या शिबिराला आदिम समुदायाने उपस्थित राहून आवश्यक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment