Search This Blog

Wednesday, 29 October 2025

अतिवृष्टीग्रस्त मदतीचे जिल्ह्यात 67 कोटी 43 लक्ष रुपयांचे वाटप




अतिवृष्टीग्रस्त मदतीचे जिल्ह्यात 67 कोटी 43 लक्ष रुपयांचे वाटप

Ø वरोरा येथील पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांची माहिती

Ø मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही

Ø उर्वरीत वाटप तात्काळ करण्याचे प्रशासनाला निर्देश

चंद्रपूरदि. 29 : यंदाच्या पावसाळ्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेराज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले आहेत्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 94098 शेतकऱ्यांना 67 कोटी 43 लक्ष 28 हजार रुपयांचे वाटप झाल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक वुईके यांनी वरोरा येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत दिलीतसेच ज्या शेतक-यांच्या खात्यात तांत्रिक कारणांमुळे निधी पोहचला नाहीअशा शेतक-यांची अडचण दूर करून त्यांच्या खात्यात तात्काळ निधी जमा करावाअसे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

चंद्रपूर जिल्ह्यात जूनजुलैऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लक्ष 10 हजार 665 हेक्टर जमीन बाधित झालीजिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या लक्ष 26 हजार 286 आहेयासाठी राज्य शासनाकडून 94 कोटी 86 लक्ष 27 हजार रुपये प्राप्त झालेजिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 94 हजार 98 शेतकऱ्यांच्या खात्यात 67 कोटी 43 लक्ष 28 हजार रुपये जमा केले आहे.

यात जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टीबाधित 12 हजार 882 शेतकऱ्यांच्या खात्यात कोटी 84 लक्ष 75 हजार रुपयेऑगस्ट महिन्यातील बाधित 12 हजार 297 शेतकऱ्यांना कोटी 42 लक्ष 46 हजार रुपये आणि सप्टेंबर महिन्यातील बाधित 68 हजार 919 शेतकऱ्यांच्या खात्यात 51 कोटी 16 लक्ष हजार रुपये वाटप करण्यात आल्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी सांगितले

 पत्रकार परिषदेला आमदार करण देवतळेप्रभारी जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारेसहायक जिल्हाधिकारी बालाजी कदमउपविभागीय अधिकारी संदीप भस्केतहसीलदार योगेश कौटकर आदी उपस्थित होते.

रब्बी हंगामासाठी अतिरिक्त अनुदानाची मागणी : अतिवृष्टी आणि पुरामुळे विविध शेती पिकांचे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रती हेक्टरी 10 हजार रुपये याप्रमाणे शासनाकडे निधी मागणी करण्यात आली आहेयात जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टीबाधित 13 हजार 742 शेतकऱ्यांसाठी कोटी 62 लक्ष 10 हजार रुपयेऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीबाधित 15 हजार 384 शेतकऱ्यांसाठी 14 कोटी लक्ष 67 हजार रुपये तर सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीबाधित 96 हजार 477 शेतकऱ्यांसाठी 87 कोटी 64 लक्ष 14 हजार रुपयांची अतिरिक्त मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.

जिल्ह्यात दुष्काळी सवलती जाहीर : अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतमालाचे नुकसान झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात राज्य शासनाने दुष्काळी सवलती जाहीर केल्या आहेतयात जमीन महसुलात सूटसहकारी कर्जाचे पुनर्गठणशेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीत एक वर्षाकरीता वसुलीस स्थगितीतिमाही वीजबिलात माफी आणि 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये माफी यांचा समावेश आहे

शासनाकडून प्राप्त झालेला अतिवृष्टीग्रस्त मदतनिधी त्वरित वाटप करण्याचे काम अविरत सुरू आहेमात्र काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आली नाहीयात प्रामुख्याने सामुहिक खाते असलेल्या खातेदारांचे संमती पत्र न मिळणेई -केवायसी प्रलंबित असणेआधार अपडेट व बँक खाते संलग्न नसणे याचा समावेश आहेतरी सामुहिक खातेदारांनी संबंधित तलाठ्याकडे त्वरित संमतीपत्र सादर करावेमदतनिधी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयसेतू केंद्र तसेच तलाठ्यांशी संपर्क करून ई -केवायसी करून घ्यावीतसेच आपले आधार कार्ड बँक खात्याला संलग्न करावेजेणेकरून शेतक-यांच्या खात्यात मदत निधी जमा करता येईल.

०००००००

No comments:

Post a Comment