Search This Blog

Wednesday, 8 October 2025

शेतकरी पॅकेजमुळे नुकसानग्रस्त भागातील बळीराजा पुन्हा उभा राहील

 

शेतकरी पॅकेजमुळे नुकसानग्रस्त भागातील बळीराजा पुन्हा उभा राहील

Ø आदिवासी विकास मंत्री डॉअशोक वुईके यांनी व्यक्त केला विश्वास

चंद्रपूर, दि. 08 : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झालेया संकटाच्या काळात राज्य शासन शेतक-यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेनुकसानग्रस्त भागात 65 मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार आहेत्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केलेया पॅकेजमुळे नुकसानग्रस्त भागातील बळीराजा पुन्हा उभा राहीलअसा विश्वास राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी व्यक्त केला.  

शेतक-यांसाठी आतापर्यंतची ही सर्वात मोठी आर्थिक मदत आहेअसे सांगून पालकमंत्री डॉवुईके म्हणालेराज्य शासनाने जाहीर केलेली मदत दिवाळीपूर्वी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहेअतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांसह पिकेजनावरेगोठेदुकानेग्रामीण भागातील पायाभूत सुविधा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेकाही जणांचे मृत्यूही झाले आहेतपुरामुळे कागदपत्रेशैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाहीयाची दक्षता घेतली जाणार आहेअसेही पालकमंत्री डॉवुईके यांनी सांगितले.

शेतक-यांना आतापर्यंतची सर्वाधिक मदत : राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे 29 जिल्हे प्रभावित झाले आहेतनुकसानग्रस्त 253 तालुके आणि 2059 मंडळांमध्ये मदतीसाठी 65 मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असून राज्य शासनाने 31 हजार 628 कोटींच्या मदतीचे पॅकेज जाहीर केलेया पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18 हजार 500 रुपयेहंगामी बागायतीसाठी 27 हजार रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32 हजार 500 रुपये मदत दिली जाणार आहे.  ही आतापर्यंतची सर्वाधिक मदत आहे.

असे आहे नुकसानग्रस्त शेतक-यांसाठी जाहीर केलेले पॅकेज : 1) मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लक्ष रुपये,  2) जखमी व्यक्तींना  74 हजार ते 2.5 लक्ष रुपये, 3) घरगुती भांडेवस्तूंचे नुकसान – 5 हजार रुपये प्रतिकुटुंब, 4) कपडेवस्तूंचे नुकसान- 5 हजार रुपये प्रति कुटुंब, 5) दुकानदारटपरीधारकांना 50 हजार रुपये, 6) डोंगरी भागात पडझडनष्ट पक्क्या घरांना  1 लक्ष 20 हजार रुपये, 7) डोंगरी भागात पडझडनष्ट कच्च्या घरांना  लक्ष 30 हजार रुपये, 8) अंशतः पडझड - 6500 रुपये, 9) झोपड्यांच्या नुकसानीसाठी 8 हजार रुपये, 10) जनावरांचे गोठे नुकसान – 3 हजार रुपये, 11) दुधाळ जनावरांसाठी 37 हजर 500 रुपये, 12) ओढकाम करणा-या जनावरांसाठी 32 हजार रुपये, 13) कुक्कुटपालन 100 रुपये.

निकषांपेक्षा जास्त मदत जाहीर एनडीआरएफचे निकष हे हेक्टरपर्यंत आह. परंतु राज्य शासनाने त्यापेक्षा अधिक म्हणजे हेक्टर पर्यंत मदत जाहीर केली आहेनिकषापेक्षा अधिकची मदत देण्यासाठी 10 हजार कोटी रुपये अतिरिक्त मंजूर करण्यात आले आहे. शेतक-यांना प्रति हेक्टर 48 हजार रुपये, खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47 हजार प्रतिहेक्टर रोखीने आणि मनरेगाअंतर्गत लाख रुपये प्रतिहेक्टर मदत, खचलेली किंवा बाधित विहीरी करीता 30 हजार रुपयेतसेच तातडीच्या मदतीसाठी 1500 कोटी रुपये डीपीडीसीत राखीव ठेवण्यात आले आहे.

दुष्काळी सवलती लागू : जमीन महसुलात सुटपीक कर्जाचे पुनर्गठनशेती कर्ज वसुलीला स्थगितीवीज बिल माफी आधीचशाळाकॉलेज परीक्षा शुल्कात माफीरोहयो कामात शिथिलताशेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती लागू झाल्या आहेत.

००००००

No comments:

Post a Comment